Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पलायन केल्याचा गुन्हासीआयडीकडे वर्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत खून केल्यानंतर गुन्हा लपविण्यासाठी अनिकेत आणि अमोल भंडारे या दोघांनी पोलिसांच्या तावडीतून पलायन केल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. आता या गुन्ह्याचा तपासही सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडीच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. अनिकेतच्या खुनाचा तपास आगोदरपासूनच उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे आहे. त्यामुळे आता अनिकेत कोथळेच्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लुटमार केल्याप्रकरणी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना ६ नोव्हेंबर रोजी पहाटे शहर पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना पुन्हा शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. त्याच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तपास अधिकारी या नात्याने बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने अनिकेत आणि अमोलला कोठडीतून बाहेर काढले. थर्ड डिग्रीचा अमानुष वापर केला गेल्याने अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर कामटे आणि इतर संशयितांनी अनिकेतचा मृतदेह पोलिस गाडीतून हलविला. काही वेळाने अनिकेत आणि अमोल या दोघांनी पोलिसांच्या हाताला हिसडा मारून पलायन केल्याचा आभास निर्माण करण्यात आला. शहरात नाकाबंदी लावली. तत्कालीन उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांनी नियंत्रण कक्षाला दोन आरोपींनी पलायन केल्याची सूचना दिली. सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कामटेने दोन आरोपींनी पलायन केल्याची फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्याकडे देण्यात आला. दुपारपर्यंत अनिकेतचा घातपात झाल्याची बातमी शहरभर पसरली. नातेवाईकांसह जनसमुदायांतून संतापाची लाट उसळल्याची दिसताच आरोपी पलायन प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. या, दरम्यान कामटे आणि त्याचे साथीदार पळून गेलेल्या दोघांपैकी अमोल भंडारे हा कर्नाटकात सापडल्याचा दावा करीत त्याला घेऊन सांगलीत आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजन माने यांनी अमोल भंडारेची कसून चौकशी केल्यानंतर कामटेसह सहा जणांनी केलेले गंभीर कृत्य उघडकीस आले. माने यांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्या सर्वांना अटक केली.
पोलिस कोठडीतील अनिकेतच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास तत्काळ सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अनिकेत आणि अमोल या दोघांनी पलायन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास अद्यापही सांगली पोलिसांकडेच होता. आता हा तपास सीआयडीच्या निरीक्षक बागवडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ते दोघे कोण?
अनिकेतचा कोठडीतच मृत्यू झाल्यानंतर कामटेसह इतर संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने केलेल्या हालचालींचा पाठपुरावा सीआयडीने करायला सुरुवात केली आहे. सांगलीत नदीकाठी दोघांनी अमोल भंडारे याला काहीकाळ धरून ठेवले होते. ते दोघे कोण याचा शोध अद्यापही लागलेला नाही. त्यामुळे तपास अधिकारी उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी कॉलडिटेल्सच्या सहाय्याने घटनेच्या वेळी संशयितांच्या संपर्कात आलेल्यांची कुंडली काढायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत दहा ते बारा जणांची चौकशी झाल्याचे समोर येत आहे. अवैध धंद्यांच्या निमित्ताने पोलिसांच्या संपर्कात असलेल्यांपैकी कोणीतरी अमोलला धरून बसण्याचे काम केले असावे, असा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विलासकाका तत्त्वाच्या लढाईतील लढवय्येसुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
‘राज्यात माझ्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री असताना विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी माझ्याकडे नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आग्रह धरला. तत्वासाठी लढणारा लढवय्या नेता व निर्भीड स्वभावांमुळेच मंत्रिमंडळात त्यांना माझी पसंती होती. त्यांचे संपूर्ण जीवन जनतेच्या प्रश्नांसाठीच समर्पित असून, त्यांनी नेहमीच तत्वांची लढाई लढली आहे,’ असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे काढले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील भारत छोडो आंदोलनाचा अमृत महोत्सव व रयत संघटना तसेच माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सवाच्या संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. भारत पाटणकर, पत्रकार ज्ञानेश महाराव, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, ‘उंडाळकर तसेच आमच्यासारखे अनेक काँग्रेसजन यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर वाटचाल करीत आलो आहे. त्यामुळे कितीही वैचारीक वावटळी आल्या तरी आमच्यावर काहीही फरक पडत नाही. काँग्रेसने यापूर्वीही अनेक पराभव पचवले आहेत. परंतु त्यामुळे पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता कधीही डगमगला नाही. विरोधकांनी कितीही दावे केले तरी एका पराभवाने संपणारा पक्ष काँग्रेस नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. ज्यावेळी काँग्रेस संपली असा गवगवा केला जातो. त्यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पुन्हा ज्वालामुखीसारखी उफाळून वरती येत. देशात हुकुमशाही वृत्ती दिवसेंदिवस वाढत असताना त्याला विरोध करणाऱ्यांचा छळ केला जात आहे. देशाच्या सीमेवर दररोज जवानांचे बळी जात असताना केंद्र सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे. सरकार सर्वच विभागांमध्ये अपयशी झाले आहे.’
सत्काराला उत्तर देताना विलासकाका पाटील-उंडाळकर म्हणाले, ‘सामान्य माणूस हीच माझ्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी ताकद राहिली आहे. राजकारणात कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी मी संस्कार आणि विचारधारेशी फारकत घेतली नाही. विचारधारा ही बाजारात विकण्यासारखी किंवा विकत घेण्यासारखी गोष्ट नाही. सामान्य माणूस हाच नेहमी माझ्या राजकारणाच्या केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांच्यासाठीच माझा राजकीय संघर्ष अजूनही सुरू आहे आणि तो कायम सुरू राहील. सामान्य कार्यकर्ता सक्षम बनवून त्याला स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न केले. मंदिरात देव शोधण्यापेक्षा माणसातील देव ओळखून त्याची सेवा करणे हे आपले अंतिम ध्येय होते.’
या वेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे, डॉ. भारत पाटणकर, ज्ञानेश महाराव, डॉ. बुधाजीराव मुळीक,
कुमार केतकर, विनोद शिरसाठ यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर उदयसिंह पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ डॉ. करमळकर सोलापूरविद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
‘शैक्षणिक संकुलांसह समाजात परस्परांतील संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद अधिक दृढ करून सोलापूर विद्यापीठाच्या विकासाला बळ देऊ,’ असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी केले. सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु म्हणून डॉ. करमाळकर यांनी रविवारी दुपारी पदभार घेतल्यानंतर ते बोलत होते.
या वेळी माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, माजी कुलगुरु डॉ. एन. एन. मालदार, कुलसचिव गणेश मंझा, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते.
डॉ. करमाळकर म्हणाले, ‘विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मालदार यांनी आजपर्यंत चांगले काम केले आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक संदर्भात विद्यापीठाचा आलेख चढता आहे. पुणे विद्यापीठातील चांगले उपक्रम सोलापूर विद्यापीठात राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फायदा होईल.
पुणे विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठात परस्पर सहकार्याचे काही करारही करण्याचा विचार आहे. नवीन कुलगुरु निवडीची प्रक्रिया होईपर्यंत किमान चार महिन्यांचा वेळ लागेल. या कालावधित विद्यापीठाचे कामकाज विनाअडथळा गतीने होईल. पुणे विद्यापीठाचा कामाचा व्याप मोठा आहे. तरीही मी आठवड्यातून किमान एक दिवस सोलापूर विद्यापीठाच्या कामांसाठी देणार आहे. त्यामुळे कामकाजात खंड पडणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस दाहिनीच्या जोडणीला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोफत अंत्यसंस्कार योजना राबविणाऱ्या महापालिकेने आता पंचगंगा स्मशानभूमी येथे गॅस दाहिनीच्या कामालाही सुरुवात केली आहे. गॅस दाहिनीसाठी आवश्यक यंत्रसामग्री पंचगंगा स्मशानभूमी येथे दाखल झाले असून त्याच्या जोडकामाला सुरुवात झाली. जानेवारी महिन्यापासून गॅस दाहिनी कार्यरत करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. बडोदा येथील अल्फा इक्विपमेंटतर्फे महापालिकेला मोफत गॅस दाहिनी पुरविण्यात आली आहे. अल्फा इक्विपमेंटचे राजेंद्र चव्हाण आणि विहंग चव्हाण हे मूळचे कोल्हापूरचे आहेत.

महापालिकेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमी, कदमवाडी, बापट कॅम्प आणि कसबा बावडा येथील स्मशानभूमी येथे मोफत अंत्यसंस्कार केले जातात. महापालिका मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी दरवर्षी साधारणपणे साठ लाख रुपये खर्च करते. पंचगंगा स्मशानभूमी येथे रोज दहा ते बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. एका वर्षात चार हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याची प्रशासनाकडील माहिती आहे. सध्या लाकूड आणि शेणीचा वापर होतो. पारंपरिक पद्धतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जादा वेळ लागतो. शहराचा विस्तार, आसपासच्या उपनगरातील मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमी येथे आणले जातात. पंचगंगा स्मशानभूमीवर ताण पडत असल्यामुळे विस्तारीकरणासह गॅस दाहिनीच्या पर्यायाबाबत विचार सुरू होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने गॅस दाहिनीचा प्रस्ताव मंजूर केला. कंपनी प्रतिनिधींनी स्थायी समिती सभागृहात गॅस दाहिनीबाबत सादरीकरण केले. कंपनीकडून गॅस दाहिनीचे साहित्य उपलब्ध झाले असून चार कर्मचारी शुक्रवारपासून पंचगंगा स्मशानभूमी येथे यंत्रसामग्री जोडण्याचे काम करत आहेत. या महिन्यात गॅस दाहिनी जोडण्याचे काम पूर्ण होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गॅस दाहिनीचे फायदे

गॅस दाहिनीसाठी अंदाजे ३२ लाख रुपये खर्च आहे. मात्र गॅस सिलिंडरचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. गॅस दाहिनीत मृतदेह दहनासाठी ९० मिनिटे वेळ लागतो. यासाठी ६०० रुपयांच्या आसपास खर्च येतो. तसेच दोन किलोपर्यंत रक्षा निर्माण होते. शिवाय दुर्गंधी आणि धूरही निर्माण होत नाही. एका मृतदेहाच्या दहनासाठी २५ किलो गॅस लागतो. गॅस दाहिनी अॅटोमेटिक गॅस कंट्रोल पॅनेल, हायड्रोलिक पॅनेल, हायड्रोलिक ट्रॉली, २० सिलिंडरचा फोल्डर अशी रचना असणार आहे. गॅस दाहिनीचा देखभाल, दुरुस्तीचा खर्च कमी असणार आहे. गॅस दाहिनीमुळे लाकडाच्या खर्चात ५० टक्के बचत होणार आहे. भविष्यात महापालिकेमार्फत कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या ऑरगॅनिक गॅसचा वापर गॅस दाहिनीसाठी होऊ शकेल.


सध्याची पद्धत

सध्या लाकूड व शेणीचा वापर करून मृतदेहाचे दहन केले जाते. एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी १४०० रुपये खर्च होतो. मृतदेहाच्या दहनासाठी १२० किलो लाकडे, ३५० शेणी लागतात. प्रचलित पद्धतीत मोठ्या प्रमाणात रक्षा तयार होते. पंचगंगा स्मशानभूमी येथे रोज दहा ते बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. दहनासाठी चार ते पाच तास वेळ लागतो. एका मृतदेहाच्या दहनानंतर जवळपास ५० किलो राख निर्माण होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पर लेखापरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

पतसंस्थेचा वार्षिक शासकीय अहवाल संस्थेच्या बाजूने करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अप्पर लेखपरीक्षक तानाजी दादू पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. पोलिस उपअधीक्षक गिरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली.

चेअरमन महेश कुरडेकर यांनी गडहिंग्लज येथे ओम अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही पतसंस्था स्थापन केली आहे. पतसंस्थेच्या २०१६-१७ या वर्षाचे ऑडिट करण्याचा ठराव मुख्य लेखपरीक्षक सहकारी संस्था कोल्हापूर येथे मुदतीत सादर झाला नाही. त्यामुळे कार्यालयाने पतसंस्थेचे सन २०१६-१७ या वर्षांच्या ऑडिट करण्यासाठी अप्पर लेखा परीक्षक तानाजी पाटील यांची नेमणूक केली होती. तक्रारदार यांनी ऑडिटसाठी आवश्यक शासकीय फी भरली होती. कार्यालयाच्या आदेशानुसार कुरडेकर यांनी उर्वरित सर्व दप्तर घेऊन एक नोव्हेंबर रोजी अप्पर लेखापरीक्षक पाटील यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी पतसंस्थेचे दप्तर, रजिस्टर तपासून संस्थेस सहाय्य होईल व संस्थेचा कारभार सुरळीत होईल या दृष्टीने शासकीय लेखा परीक्षन अहवाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. तसेच पैसे न दिल्यास संस्थेच्या विपरीत अहवाल सादर करून संस्थेचा परवाना रद्द करू. संस्थेने खोटी कागदपत्र दिल्याचा रिपोर्ट सादर करून तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. तसेच सर्व संचालकांना नोटीस पाठवून पतसंस्था दिवाळखोर होईल, असा अहवाल मुख्य लेखा परीक्षण कार्यालयात सादर करेन, अशी भीती घातली होती.

कुरडेकर यांनी यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार शुक्रवारी (ता. ८) पडताळणी केली असता पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज (रविवारी) पाटील यांनी तक्रारदार यांना लेखा परीक्षक कार्यालयात बोलावले होते. तिथे सापाळा रचून पंच व साक्षीदार यांच्या समक्ष पाटील याला तक्रारदार यांच्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलिस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, विष्णू गुरव यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलनाचा फार्सच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने दोन आठवड्यांपासून अनाधिकृत केबीन्सविरोधात जोरदार मोहीम राबवली असली तरी केबीन्स जप्त करण्याऐवजी त्या मालकांकडेच सोपवल्या जात असल्याने काही महिन्यातच त्या केबीन्स पुन्हा जैसे थे येण्याची भीती आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केबीन्स जप्त करण्याचे आदेश दिले असताना दररोज ५० हून अधिक अतिक्रमणे हटवली जात असली तरी केवळ दाखवण्यासाठी काहीच केबीन्स जप्त केल्या जात आहेत. त्यामुळे ही मोहीम केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.

महापालिकेने शहरातील विभागीय कार्यालयनिहाय अतिक्रमणे हटवण्याचे नियोजन केले. त्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली. यंत्रणा दिली. ही मोहीम सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने अनाधिकृत केबीन्सधारकांना इशारा दिला होता. महापालिकेने दिलेल्या कालावधीत केबीन्स हटवण्यात आल्या नाहीत तर त्या केबीन्सच्या होणाऱ्या मोडतोडीला जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच आयुक्त डॉ. चौधरी यांनी या केबीन्स जप्त करण्यात येतील, असेही सांगितले होते.

मोहीम राबवली गेल्यानंतर प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणच्या अनाधिकृत केबीन्स हटवण्यात आल्या. त्यातील काही केबीनधारक केवळ काँक्रीट काढून द्या, आम्ही केबीन काढून घेतो असे सांगताना दिसत होते. फुलेवाडी नाक्यापासून सुरू झालेल्या मोहिमेत यंत्रणेने केबीन्सधारकांचे मत ऐकून घेत केबीन्स त्या जागेवरुन केवळ हलवल्या. अनेक केबीन्सधारकांनी स्वतःची वाहने आणून त्यातून केबीन्स हलवल्या. त्यामुळे मोहिमेनंतर अनेक रस्त्यावरील केबीन्स सध्या दिसत नसल्या तरी त्या मालकांच्या ताब्यात आहेत.

आतापर्यंत महापालिकेने मोहीम राबवल्यानंतर पुढील महिन्यापासून पुन्हा केबीन्स त्या जागेवर बसवल्याचे पहायला मिळाला आहे. त्यामुळे केबीन्सधारकही हुशार झाले आहेत. त्यांना काही कर्मचारीच आता केबीन काढून घ्या, असे सांगत असल्याची परिस्थिती होती. या आधारामुळे केबीन्स जप्त करु देत नव्हते. त्याला महापालिकेची यंत्रणाही केवळ काँक्रीट काढण्याबरोबर जाग्यावरून हलवून देण्याचे काम करत होती. त्यात केबीन्सचे नुकसान होत नसल्याने मालक निवांत आहेत. केबीन्स जप्त न केल्याने महापालिकेची मोहीम शांत झाल्यानंतर पुन्हा हळूहळू या केबीन्स त्या त्या जागेवर येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे प्रचंड वादावादी होऊन व इतकी मोठी यंत्रणा राबवून केवळ काही महिनेच या मोहिमेचा प्रभाव राहणार असेल तर शहरवासियांकरिता ही मोहीम केवळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.

केबीनधारकाची खबरदारी

मोहीम राबवण्यात येत असल्याने अनेक रस्त्यांवर केबीन्सधारकांनी खबरदारी म्हणून साहित्य काढून ठेवले आहे. जर मोहीम त्या केबीन्सच्या रस्त्यावर राबवण्यात आली नाही तर ठीकच आहे. जर केबीन हटवण्यास कर्मचारी आलेच तर ती आपल्या वाहनातून दुसरीकडे नेऊन ठेवायची अशी तयारी केली आहे. यामुळे महापालिकेची ही मोहीम प्रभावी ठरण्यासाठी केबीन्स जप्त करण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टाच्या गुंतवणुकीत खात्रीची हमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यात अनेक गुंतवणुकीच्या योजना आहे. पैसे बुडण्याची कोणतीही भीती या विविध योजनांत नाही. बाजारपेठेत असलेल्या काही वित्तीय संस्थाकडून आकर्षक व्याज दिले जाते. मात्र सुरक्षेची तितकी हमी दिली जात नाही. पोस्ट विभागाच्या विविध योजनांत कमी टक्के व्याजदर असला तरीही सर्वच योजना फायदेशीर आहे. बचत खाते, आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव खाते, मासिक प्राप्ती योजना, यंग सीनिअर्संसाठी बचत योजना, पंधरा वर्षीय भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, पाच वर्षीय राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र या योजना असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक रमेश पाटील यांनी ही माहिती दिली.

बचत खाते

कमीत कमी ५० आणि धनादेशाद्वारे ५०० रुपये जमा करता येतात. जास्तीत जास्त गुंतवणूकीला मर्यादा नाही. चेक सुविधा उपलब्ध असून कोणत्याही पोस्ट कार्यालयात पैसे जमा करता येतात आणि काढताही येतात. पोस्ट कार्यालयात एटीएम, डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध आहे. सर्व वयोगटातील नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडता येते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

आवर्ती ठेव योजना

या योजनेची मुदत पाच वर्षे आहे. खात्याची मुदत पाच वर्षे पूर्ण झालेवर देखील यार खात्याची मुदत पुढील पाच वर्षासाठी वाढवता येते. महिन्याला या योजनेत कमीत कमी १० रुपये आणि पाच रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. यामध्येही गुंतवणूकीला मर्यांदा नाही. खाते रोखीने किंवा धनादेशाने काढता येते. खाते उडघून एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर जमा रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम खात्यातून काढता येते. यामध्ये सहा महिने किंवा वर्षाचे आगाऊ पैसे भरले तर रक्कमेत सूट मिळते. महिन्याच्या १५ तारखेच्या आत खाते उघडले असेल तर पुढील महिन्यांची मासिक रक्कम प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेच्या आत भरणे बंधनकारक आहे. १६ तारखेनंतर खाते उघडल्यास महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पैसे भरता येऊ शकतात. सर्व वयोगटातील नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडून मासिक बचत करू शकतात.

मुदत ठेव खाते

मुदत ठेव खाते १ ते ३ आणि पाच वर्षे मुदतीचे आहे. कमीत कमी १०० रुपये आणि १०० च्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेतही गुंतवणूकीला मर्यादा नाही. कोणतीही मुदत ठेव खाते एक वर्षाच्या आत मुदतपूर्व बंद करता येते. त्यावर सेव्हिंग खात्याच्या व्याज दराने व्याज दिले जाते. पाच वर्षे मुदतगुंतवणूकीला आयकर सवलत आहे. सर्व वयोगटासाठी ही योजना आहे.

मासिक प्राप्ती योजना

या योजनाची मुदत पाच वर्षे आहे. यामध्ये १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. अधिकाधिक गुंतवणूक मर्यादा एकल खाते ४,५०,०००, संयुक्त खाते ९,००,००० रुपये आहे. मुदतपूर्व खाते बंद करता येते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद केल्यास जमा रकमेतून दोन टक्के रक्कम कपात केली जाते. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदत पूर्व खाते बंद केल्यास जमा रक्कमेतून एक टक्के रक्कम कमी केली जाते. सर्व वयोगटातील नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. गुंतवणूक केलेल्या रकमेवर मासिक व्याज मिळते.

ज्येष्ठ नागरीक बचत योजना

या योजनेची मुदत पाच वर्षे आहे. व्याज दर वर्षी ३१ मार्च, ३० जून, ३० सप्टेंबर आणि ३१ डिसेंबरला दिला जातो. या योजनेत एक हजारच्या पटीत गुंतवणूक केली जाते. अधिकाधिक गुंतवणूक मर्यांदा १५ लाख रुपये आहे. ६० वर्षे पूर्ण झालेली आणि त्यापेक्षा अधिक वयाची व्यक्ती गुंतवणूक करता येऊ शकते. सेवा निवृत्ती किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतलेली व्यक्तीचे वय ५५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे मात्र, ६० वर्षापेक्षा कमी आहे, अशा व्यक्ती निवृत्ती मोबदला मिळालेपासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करू शकते. गुंतवणूक रक्कम निवृत्ती मोबदला मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त नसल्याची अट आहे. या खात्यातील रकमेवर आयकर सवलत आहे.

१५ वर्षीय भविष्य निर्वाह निधी

या योजनेची मुदत पंधरा वर्षाची आहे. एका आर्थिक वर्षात कमीत-कमी ५०० ते अधिकाधिक गुंतवणूक मर्यांदा दीड लाखांपर्यंत आहे. ही रक्कम एकरकमी किंवा बारा हप्त्यामध्ये जमा करता येऊ शकते. खात्याची मुदत पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही एका वर्षाच्या आत पुढील पाच वर्षांसाठी वाढविता येऊ शकते. गुंतवणूकीची रक्कमेला आयकर सवलत आहे. कोणत्याही ‘अ’ किंवा त्यावरील दर्जाच्या पोस्ट ऑफीसमध्ये सदर खाते उघडता येते. खाते उघडलेपासून पाच आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते वैद्यकिय किंवा शैक्षणिक गरज असेल तर मुदतपूर्व बंद करता येऊ शकते. सर्व वयोगटातील नागरिक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात.

सुकन्या समृध्दी योजना

या योजनेची मुदत २१ वर्षे असून यामध्ये एक हजार किमान गुंतवणूकीची मर्यादा असून कमाल मर्यांदा दीड लाखांपर्यंत आहे. एका महिन्यात किंवा एका वर्षात कितीही वेळा पैसे जमा करता येऊ शकतात. जन्मापासून ते दहा वर्षे वयाच्या मुलींच्या नावे खाते सुरु करता येऊ शकते. खात्याची मुदत संपल्यानंतर बंद करता येते. या गुंतवणूकीवर आयकर सवलत आहे.

पाच वर्षीय राष्ट्रीय बचत पत्र (आठवी मालिका)

या योजनची मुदत पाच वर्षे आहे. यामध्ये १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते. रक्कमेवर आयकर सवलत असून सर्व वयोगटातील नागरिक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. त्यासह किसान विकास पत्र योजनेत ९ वर्षे ७ महिन्यांनी दाम दुप्पट होते. यामध्ये एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करता येते. कोणतीही व्यक्ती स्वत:च्या नावे किंवा अज्ञान पालनकर्ता म्हणून त्यांच्या मुलाच्या नावे किंवा दोन व्यक्ती संयुक्तपणे किसान विकास पत्राचे खाते काढू शकते. किसान विकास पत्र खाते मुदत पूर्व अडीच वर्षानंतर बंद करता येते. ही योजना सर्व वयोगटासाठी खुली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळ उत्पादक हवालदील

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : निर्यातीसाठी कडक नियमाची अंमलबजावणी आणि मागणी कमी झाल्याने दरात घसरण होत असल्याने गूळ उत्पादकांना आतबट्ट्याचा व्यवसाय करावा लागत आहे. मुहूर्ताच्या सौद्यांना पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्यानंतर खुशीत आलेल्या उत्पादकांना सद्य:स्थितीला केवळे क्विंटल गुळाचा दर ३२०० ते ३५०० रुपये झाल्याने गूळ उत्पादक हवालदील झाले आहेत. खर्च वजा जाता उत्पादकांना दोन हजार ते २३०० रुपये शिल्लक राहत असल्याने क्विंटलमागे उत्पादकांना एक हजार ते १२०० रुपयांचा फटका बसत आहे.

नैसर्गिक गुणधर्मामुळे येथील गुळाचा रंग आणि गोडवा यामुळे कोल्हापुरी गुळाची देशभरात ख्याती. उत्पादनासोबत येथील गुळाने आपली स्वतंत्र बाजारपेठ तयार केली. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला गुजरात आणि राजस्थान राज्यात चांगली मागणी आहे. तसेच अखाती देशामध्येही चांगली मागणी आहे. येथील गूळ उत्पादक असंख्य समस्येत अडकूनही कसाबसा या व्यवसायात टिकून आहे. मात्र अलिकडच्या काही वर्षात कोल्हापुरी गुळाच्या नावावर होणारी विक्री येथील गूळ उत्पादकांच्या मुळावर येत आहे.

गूळ अशा समस्यांशी झगडत गुळाचे उत्पादन घेत असताना घसरत असणाऱ्या दरांमुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुहूर्ताच्या सौद्याला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजारपेक्षा जास्त दर मिळाला होता. मुहूर्ताच्या सौद्यानंतर जिल्ह्यातील एकाही उत्पादकांना पाच हजाराचा दर मिळालेला नाही. एक ते दोन टक्के उत्पादकांना ३८०० ते चार हजार रुपये मिळत असताना बहुतांशी उत्पादकांना ३२०० ते ३५०० रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे उत्पादकांना क्विंटलमागे एक हजार ते १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. सौद्यामध्ये दराची घसरण झाल्यानंतर गुळाच्या साठवणुकीसाठी कोल्डस्टोरेज अभाव आणि शेतीमाल तारण योजनेत गुळाचा नसलेल्या समावेशामुळे उत्पादकांना अधिक फटका बसत आहे.

जीआय मानांकन कागदावर

कोल्हापुरी गुळाला बनावट गूळ विक्रीपासून बचाव करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जीआय मानांकन प्राप्त करून घेतले. यासाठी समितीने लाखो रुपये मोजले. प्रत्येक हंगामापूर्वी समिती जीआयनुसार गुळाचे उत्पादन घेण्याची चर्चा होते. पण प्रत्यक्षात चर्चेपलिकडे यातून काही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे दर आणि इतर राज्यातील गुळाचे आक्रमण रोखण्यासाठी व जीआयनुसार गुळाचे उत्पादन घेण्यासाठी चर्चेच्या पलिकडे कृती करण्याची आवश्यकता आहे.



जीआय मानांकनानुसार गुळाचे उत्पादन घेण्यासाठी हंगामापूर्वी उत्पादकांची बैठक घेतली. पुढील मासिक बैठकितही चर्चा होणार असून दर पडतील तेव्हा गुळाची साठवणूक करण्यासाठी लवकरच कोल्डस्टोरेजचा प्रश्न मार्गी निघेल.

कृष्णात पाटील, सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री बनणार आहे, असे सांगणारे नारायण राणे मंत्री होतील की संत्री हे माहिती नाही, असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लगावला. ​बारा वर्षापूर्वीं शिवसेनेचा नारायण राणे यांच्याशी संबंध संपला आहे. तरीही ते सतत शिवसेनेवर, पक्षप्रमुखांवर बोलत असतात. हा उद्योग बंद करावा, अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला.

रविवारी कोल्हापुरात आलेल्या दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टिका केली. दुधवडकर म्हणाले, ‘राणे यांना माहिती आहे की शिवसेनेवर बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते सतत टीका करत असतात. त्यांच्याकडे जी काही गुपिते आहेत ती त्यांनी एकदा उघड करावीच. पण वाघ आल्याचे सांगून घाबरवणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे. सततच्या टिकमुळे त्यांच्या पाठीशी आता जनाधार राहिलेला नाही. नवीन पक्ष काढला आहे, त्याच्या मेळाव्यांना सिंधुदुर्गातून सुरू करण्याऐवजी कोल्हापुरातून केली आहे, यातूनच सारे स्पष्ट होत आहे. इतरांना पक्षात घेण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातून सुरुवात करावी. कोल्हापुरात ज्या कोरे, जानकर यांनी पक्ष काढले, त्यांची काय अवस्था आहे हे राणे यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यांनी त्याचे नियम बनवावेत. आमच्यावर बोलण्याचा आता प्रयत्न करू नये.’

राणे मंत्री होणार असल्याचे वक्तव्य करत असल्याबाबत दुधवडकर म्हणाले, ‘शिवसेनेचा व राणे यांचा संबंध संपला आहे. त्यामुळे त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असेल तर ते मंत्र‌िपद देतील. त्याबाबतही शिवसेनेचा काहीच संबंध नाही. गुजरातच्या निवडणुकीनंतर मंत्री होणार असे राणे सांगत असेल तरी ते मंत्री होणार की संत्री हे आपल्याला माहिती नाही. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा आमदारांना आव्हान दिल्यानंतर आमदार व जिल्हाप्रमुखांनी उत्तर दिले आहे. दसरा चौकात एक करमणुकीचा कार्यक्रम होता. शहरवासियांची चांगली करमणूक झाली. आमच्या पक्षातील पाहण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम आहेत. राणेंनी त्यांच्या पक्षाचे पहावे. यानंतरही शिवसेनेवर ते बोलल्यास सध्या तरी लोकशाही पद्धतीने पाहू.’ यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार वैभव नाईक, शहर प्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, युवा सेनेचे हर्षल सुर्वे उपस्थित होते.



खासदार बाणाच्या चिन्हावरीलच

जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदारपद थोडक्यात चुकले. पण आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच खासदार होणार असे संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी सांगितले. त्यावेळी प्रा. संजय मंडलिक यांच्या उपस्थितीबाबत विचारल्यानंतर खासदारकीच्या उमेदवाराबाबत न बोलता खासदार शिवसेनेच्या बाणाच्या चिन्हावरीलच होणार असे सांगितले.

दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष

राणे हे भाजपचे बांडगुळ म्हणून वावरत असल्याचा जोरदार आरोप करत आमदार वैभव नाईक म्हणाले, राणे यांनी आपल्या दोन मुलांच्या पुनर्वसनासाठी पक्ष काढला आहे. त्यांची सिंधुदुर्गामध्येच ताकद संपलेली असताना इतर ठिकाणचा जनाधार कसा मिळणार? त्यांनी शिवसेनेवर टिका करुन स्वतःचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, राणे यांना राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटले असून त्यांच्या सिंधुदुर्गात ते संपले असताना कोल्हापुरात येऊन आम्हाला काय संपवणार? त्यांना सभेसाठी भाड्याने माणसे आणावी लागली. त्यांनी आम्हाला लॉलीपॉप दाखवू नये. आमच्यातील कुणीही त्याला भुलणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर जलउपसा केंद्राचा वीज पुरवठा सोमवारी (ता. ११ डिसेंबर) तांत्रिक कामासाठी बंद करण्यात येणार असल्याने या केंद्रावरील पाणी उपसा बंद राहणार आहे. त्याचा ए, बी, ई वॉर्डबरोबरच उपनगरे व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर दोन दिवस परिणाम होणार आहे. सोमवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असून मंगळवारीही कमी दाबाने, अपुरे पाणी येणार आहे.

महावितरण कंपनीकडून सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे शिंगणापूर केंद्राचा पाणी उपसा बंद राहणार आहे. या केंद्रावरील पाणी उपसा बंद राहिल्याने आपोआपच सोमवारी ए, बी, ई वॉर्डमध्ये, उपनगरांमध्ये तसेच ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना पाणीपुरवठा होणार नाही. यामध्ये सानेगुरुजी वसाहत, बुदीहाळकरनगर, सुर्वेनगर, तुळजाभवानी कॉलनी, आपटेनगर, देवकर पाणंद, नाळे कॉलनी, राजोपाध्येनगर, तपोवन, जरगनगर, रायगड कॉलनी, रामानंदनगर, संभाजीनगर, कामगार चाळ, जवाहरनगर, सुभाषनगर, शेंडा पार्क, आर. के. नगर, पाचगाव, बागल चौक, राजारामपुरी, टाकाळा, शाहूनगर, राजेंद्रनगर, दौलतनगर, शास्त्रीनगर, प्रतिभानगर, शिवाजी विद्यापीठ, शाहूपुरी, नागाळा पार्क, ताराबाई रोड, रमणमळा, सदरबाजार, जाधववाडी, कसबा बावडा परिसराचा समावेश आहे.

सोमवारी रात्रीपासून पाणी उपसा करण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी ज्या भागात पाणीपुरवठा होतो, तिथे कमी दाबाने पाणी मिळणार आहे. काही उंच भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असेही सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणूस म्हणून जगा, माणुसकीचे दर्शन घडवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

‘दोन भाषांच्या संकरातून नव्या भाषेचा जन्म होतो. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. माणसाबरोबरच भाषाही संकरीत झाली. संकर आहे म्हणून विकास आहे. मात्र आज भाषा, प्रांत, जात, धर्म हे मुद्दे अस्मितेचे बनवून आपण भांडतो. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, यामुळे याची अस्मिता बाळगून माणुसकीचे दर्शन घडवा,’ असे आवाहन ​ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.

निमशिरगाव (ता.शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंचच्यावतीने आयोजित २१ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, प्राचार्य श्रीधर हेरवाडे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार यांना दे.भ.डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार, शि.गो.पाटील यांना ज्येष्ठ साहित्यिक पी.बी.पाटील साहित्यरत्न पुरस्कार तसेच अमोल लकेसर यांना ‘शेतकरी राजा’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना राजन खान म्हणाले, ‘जग आणि भाषा म्हणजेच एक खिचडी आहे. अरबी आणि पारशी भाषेतून उर्दू भाषेची निर्मिती झाली. हिंदी व उर्दू भाषा जन्माला येण्यापूर्वी दख्खनी भाषा होती. सातव्या शतकात ही भाषा आढळते. सर्वच धर्म समानता, सहिष्णुता शिकवतात असे धर्म सांगतात. मात्र इतरांपेक्षा आपली भाषा, धर्म श्रेष्ठ ठरविण्यासाठी चढाओढ दिसते. यामध्ये त्या धर्माचाच कमीपणाच दिसून येतो. चुकीच्या इतिहासातून हिंदू-मुस्लिमांमध्ये व्देषाची भावना निर्माण केली जात आहे. यामुळे प्रत्येकाने खरा इतिहास जाणून घ्यावा. आजच्या काळात महापुरूषांची नावे घेतली जातात, त्यांच्या प्रतिमा डोक्यावर घेवून लोक नाचतात. पण त्यांचे विचार डोक्यात घेतले जात नाहीत. हा जिजाऊंचा महाराष्ट्र, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र असे आपण अभिमानाने सांगतो, पण याच महाराष्ट्रात स्त्रीयांवरील अत्याचार आजही सुरू आहेत. घराची चौकट ओलांडताना तिला आजही अडविले जाते, संशय घेतला जातो. घरात गुलामासारखे राबविले जाते, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. जात-पात, धर्म, प्रांतवादाच्या भिंती उभ्या करून आपसात भांडत न बसता जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने माणूस म्हणून जगा. ’

आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘निमशिरगावच्या साहित्य संमेलनास २१ वर्षापूर्वी सुरूवात झाली. गावकऱ्यांनी त्यामध्ये सातत्य ठेवले. अशी संमेलने ग्रामीण भागात गरजेची असून ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात.’

प्रारंभी शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ.सुकुमार मगदूम, डॉ.धवल पाटील यांच्या उपस्थितीत श्री सिध्देश्वर मंदिरापासून सवाद्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. रत्नसागर हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी गायिलेल्या स्वागत गीताने संमेलनास सुरूवात झाली. स्वागत पद्माकर पाटील यांनी केले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. गड, किल्ल्यांचे अभ्यासक बाळासाहेब सागळे यांचा सत्कार करण्यात आला. आभार रावसाहेब पुजारी यांनी मानले. यावेळी प्रा.मोहन पाटील, डॉ.महावीर अक्कोळे, शांताराम कांबळे, सरपंच बनाबाई कांबळे, अजित सुतार, विजय बेळंके, निवृत्ती साजणे यासह साहित्य सुधा मंचचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने दिलेल्या आदेशाप्रमाणे मंगल कार्यालये तसेच लॉन्सवर विविध कार्यक्रमांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर चार विविध ठिकाणी स्वतंत्ररित्या प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक सेवा मंगल कार्यालय संघाने महापालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. महापालिकेने हा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे.

जुलै महिन्यात न्यायाधिकरणाने निकाल देताना मंगल कार्यालये व लॉन्समधून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. कार्यालये व लॉन्स यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, तसेच प्रक्रिया करुन खतनिर्मिती करावे, असे निर्देश त्यामध्ये होते. जे कचरा वर्गीकरण प्रक्रिया न करता बेकायदेशीरपणे ​कचऱ्याची विल्हेवाट लावतील, त्यांना प्रत्येक गुन्ह्यासाठी ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेशही दिले होते. याबाबत महापालिकेने लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले होते. मुळात मंगल कार्यालयात, लॉनवर जेवणानंतरच कचरा होण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेकवेळा हा कचरा कोंडाळ्यामध्ये टाकला जातो व तिथे दुर्गंधी सुटते.

न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर येथील मंगल कार्यालय संघाची सर्वसाधारण सभेसारखी बैठक झाली. त्यामध्ये महापालिकेच्यावतीने कचरा प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. काही मंगल कार्यालयांनी हा प्रयोग पूर्वीच केला होता. पण तिथे दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याचे बैठकीमध्ये समोर आले. त्यामुळे सर्व ठिकाणी असा प्रयत्न करण्यापेक्षा काही ठिकाणे निवडून तिथे त्या भागातील मंगल कार्यालये व लॉन्सचा कचरा एकत्रित करण्याचा विचार समोर आला. त्याप्रमाणे शहरातील चार ते पाच ठिकाणी असे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचे ठरले. त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन द्यावी, असे सूचवण्यात आले.

या प्रकल्पाबाबत संघाचे सागर चव्हाण म्हणाले, ‘महापालिकेने जागा दिल्यास संघाकडून त्यासाठी लागणारी मशिनरी उपलब्ध करुन दिली जाईल. हा प्रकल्प अवनिसारख्या संस्थेकडे सोपवण्यात येईल. त्यांनी आमच्या मंगल कार्यालयाकडून कचरा संकलित करावा, त्यावर प्रक्रिया करावी व खत विक्री करावी. कचरा उठाव केल्याबद्दल त्यांना वजनाप्रमाणे पैसे देण्यात येतील. मंगल कार्यालये व कॅटरिंग हे एकत्र व्यवसाय करत असतात. कॅटरिंगमुळे बहुतांश कचरा निर्माण होतो. त्यामुळे त्यांनीच कचऱ्याचे वजन करून संबंधित संस्थेला पैसे द्यावेत.’

प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे

कचरा संकलित करण्यासाठी योग्य जागा निवडून त्या ठिकाणी त्या परिसरातील कार्यालयातील कचरा संकलित केला जाईल. हा प्रकल्प संबंधित संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी त्या संस्थेवर देण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू राहण्यात अडचण येणार नाही. महापालिकेकडे हा प्रस्ताव सादर केला असून महापालिकेने तो पुढील मंजुरीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जतमध्ये कॉँग्रेस विजयी

$
0
0


सांगली :
अत्यंत चुरशीने झालेली जतची नगराध्यपदाची निवडणूक काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनावर यांनी जिंकली. त्यांनी १७८ मतांनी भाजपच्या उमेदवार डॉ. रेणुका आरळींचा पराभव केला. हा पराभव भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ७, भाजपचे ७ आणि राष्ट्रवादीचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेसही सर्व अपक्षांना खातेही उघडता आले नाही. निवडणुकीच्या निकालानंतर तीनही पक्षांच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
सोमवारी सकाळी दहा वाजता जत येथील तहसीलदार कार्यालयानजीकच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. साडे अकरावाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल स्पष्ट झाले होते. या निकालाने पुन्हा एकदा जत शहरातील मतदारांनी त्रिशंकूचा कौल देऊन सर्वच पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणल्याचे चित्र आहे.
जत नगर परिषदेसाठी या वेळी पहिल्यांदाच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी बन्नेनावर विजयी झाल्या. त्यांना ७ हजार २१९ मते मिळाली, भाजप रिपाई व रासपच्या उमदेवार डॉ. रेणुका आरळी यांना ७ हजार ४१ आणि राष्ट्रवादीच्या शबाना ईनामदार यांना ३ हजार ८६१ मते मिळाली. शिवसेनेच्या शांता राठोड यांना अवघ्या २४६ मतांवरच समाधान मानावे लागले.
भाजपचे विजयी उमेदवार- प्रमोद सदाशिव हिरवे, दिप्ती उमेश सावंत, श्रीदेवी तम्मा सगरे, जयश्री दीपक शिंदे, विजय शिवाजी ताड, प्रकाश आप्पासो माने, जयश्री तुकाराम मोटे.
काँग्रेसचे विजयी उमेदवार- संतोष कृष्णा कोळी, गायत्रीदेवी नाना शिंदे, संतोष कुमार कांबळे, आश्विनी चंद्रकांत माळी, नामदेव पुडलीक काळे, कोमल शिवराम शिंदे, इकबाल मौला गवंडी. राष्ट्रवादीचे वनिता अरुण साळे, आप्पासाहेब दुर्गाप्पा पवार, बाळाबाई पांडुरंग, स्वप्नील सुरेश शिंदे, भारती प्रवीण जाधव, लक्ष्मण नामदेव एडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंतत्र्यांना भेट बोंड अळ्यांची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे विधानसभेतील गटनेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथील विधान भवनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना बोंड अळ्यांची पिशवी भेट दिली. बोंड अळ्यांनी त्रस्त विदर्भातील कापूस ऊत्पादक शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या. बोंड अळ्यांनी विदर्भातील कापूस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकारने या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती भरपाई देणार? या बद्दल फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अकरा दिवसांची यवतमाळ-नागपूर हल्लाबोल दिंडी राज्यात सर्वांधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून सुरू करण्यात आली. या पायी दिंडीत आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या राज्य सरकारचा नाकर्तेपणा लोकांपुढे मांडतानाच शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेतल्या. या दिंडीत असंख्य शेतकऱ्यांनी या नेत्यांना आपल्या शेतात नेऊन बोंड अळीपासून झालेले नुकसान दाखवित आम्ही आता कसे जगायचे असा? असा सवाल केला. यातील एका शेतकऱ्याने या बोंड अळ्या मुख्यमंत्र्यांना दाखवा, म्हणजे आमचे दुखणे त्यांना कळेल, असे म्हणत पाटील यांच्याकडे बोंड अळ्यांची पिशवी दिली होती. पाटील यांनी या शेतकऱ्यांना आपल्या भावना राज्य सरकारपुढे मांडून आपणास न्याय देऊ, अशी ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे पाटील यांनी नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. त्यांनी या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकूनही घेतल्या. मात्र, या शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत करता येईल, याबद्दल त्यांनी कोणताही ठोस शब्द दिला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसेभत आज कोथळे प्रकरणी चर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
अनिकेत कोथळे प्रकरणी सहा आमदारांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, या प्रश्नांवर मंगळवारी सकाळच्या सत्रात चर्चा होणार आहे. यासाठी सीआडीचे तपास अधिकारी उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी प्रकरणाचा अहवाल घेऊन नागपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार अनिल बाबर यांच्यासह तिघांनी कोथळेप्रकरणी लक्षवेधी दिली आहे. त्याचबरोबर आमदार गाडगीळ यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून कोथळेप्रकरणी सभागृहात चर्चा घडवून आणण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची भेट घेणार असल्याचे सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांगली शहर पोलिस ठाण्यात अमानुष थर्ड डिग्रीचा वापर करून संशयित अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षकासह सहाजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सहाय्यक फौजदारासह आठ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. महिनाभर गाजलेल्या या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे. या प्रकरणाच्या पहिल्या दिवसांपासून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वर्तन संशयास्पद असल्याचा आरोप कोथळे कुटुंबीयासह सर्वपक्षीय कृती समिती, प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. अद्यापही काही अनुत्तरीत मुद्यांची उकल होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर सहा आमदारांनी सरकारला तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून काही सवाल केले आहेत. या प्रश्नांवर उद्या मंगळवारी चर्चा होणार आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहाला उत्तर अपेक्षित आहे.
कोथळे कुटुंबीयांचे बेमुदत उपोषण स्थागित
अनिकेत कोथळे प्रकरणानंतर कोथळे कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची कुटुंबाची मागणी अद्यापही कायम आहे. या मागणीसाठी पूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार अनिकेतची पत्नी संध्या, दोन भाऊ अमित आणि अशिष, आई आदींनी सोमवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोथळे कुटुंबाशी संपर्क साधून सरकारी नोकरीचा विषय सभागृहात मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गाडगीळ यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असे सांगत कोथळे कुटुंबीयांनी दुपारी उपोषण स्थगित केले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना देऊन चर्चा केली. या वेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा उपस्थित होते.
प्रांजलचा शिक्षणाचा, पालनपोषणाचा खर्च
हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक करणार
हिंगोलीच्या निवासी पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी अनिकेतच्या तीन वर्षे वयाच्या मुलीची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली आहे. त्यांनी थेट अनिकेतच्या नातेवाईकांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये अनिकेतची मुलगी प्रांजली हिच्या शिक्षणाची, लग्नापर्यंतच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर सोपवावी, अशी विनंती केली होती. या बाबत अनिकेतच्या पत्नीशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘सुजाता पाटील यांचे पत्र आले आहे. प्रांजली ही आमच्याकडेच राहणार आहे. परंतु, तिच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा खर्च पाटील या करणार आहेत, त्यांच्या या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिली आहे.’


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर आज राजीनामा देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक वर्षाची मुदत पुर्ण झाल्यामुळे महापौर हसीना फरास मंगळवारी (१२ डिसेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देणार आहेत. पुढील महापौरपद काँग्रेसकडे येणार असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून उत्तर विधानसभा मतदारसंघाला संधी देण्यात येणार असल्याने उमा बनछोडे व स्वाती यवलुजे यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे गटनेता सुनील पाटील हे इच्छूक आहेत.

आघाडीच्या समझोत्यानुसार वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद होते. राष्ट्रवादीच्या हसीना फरास यांना वर्षभर संधी मिळाली. मंगळवारी सर्वसाधारण सभेत फरास या राजीनामा देतील. तत्पूर्वी काँग्रेसचे उपमहापौर अर्जुन माने महापौरांकडे राजीनामा सोपवतील. महापौरपद ओबीसी महिलेसाठी अडीच वर्षासाठी राखिव होते. त्यातील दोन वर्षे पूर्ण झाली असून उर्वरित सहा महिन्यांसाठी काँग्रेसला संधी आहे. आमदार सतेज पाटील यांनी सुरुवातीला दक्षिण मतदारसंघातील अश्विनी रामाणे यांना संधी दिली. आता उत्तर मतदारसंघातील कसबा बावड्यातील पोलिस लाइन प्रभागातील स्वाती यवलुजे आणि बाजार गेट प्रभागातील उमा बनछोडे या इच्छुक आहेत. दक्षिण मतदारसंघातील राजलक्ष्मीनगर प्रभागातील​ दीपा मगदूम, कॉमर्स कॉलेज प्रभागातील निलोफर आजरेकर याही इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता सुनील पाटील, सचिन पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्यानंतर खंडणीसाठी धमकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाचगावमधील जगतापनगर येथे शिवलिंग खतकल्ले यांच्या घरावर दरोडा टाकून दोन चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. यावेळी चोरट्यांनी दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देऊन बेडरुममध्ये कोंडून ठेवले. घरात लूट केल्यानंतर पुन्हा ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन करून धमकावले. या घटनेने शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

शिवलिंग खतकल्ले हे शाळांसाठी लागणारे होलसेल साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. मूळचे निपाणीचे खतकल्ले १५ वर्षे मंगळवार पेठेत राहत होते. गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांनी पाचगाव येथे मुख्य रस्त्यालगत बंगला बांधला. त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानंतर शिवलिंग आणि लीला खतकल्ले हे दोघेच या घरात राहत होते. नात्यातील एक मुलगा कोल्हापुरात खासगी कंपनीत काम करीत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून खतकल्ले यांच्याकडे राहत आहे. शनिवारी (ता. २) तो गावी गेला होता. सोमवारी (ता. ४) ते नेहमीप्रमाणे रात्री टीव्हीवरील कार्यक्रम पाहत बसले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास घराची बेल वाजली. लीला यांनी दार उघडल्यानंतर दोन तरुणांनी घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवत यांनी पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने खतकल्ले दाम्पत्याने प्रतिकार केला नाही.

चोरट्यांनी या दोघांनाही बेडरुममध्ये कोंडून घातले. कपाटातील रोख ८० हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या, चैन, गंठण, नेकलेस असा सुमारे सव्वाचार लाखांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी चोरट्यांनी खतकल्ले दाम्पत्याकडे ३० लाख रुपयांची मागणीही केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने हे दाम्पत्य पोलिसांकडे गेले नाही. नातेवाईकांनी त्यांना फिर्याद दाखल करण्याचा सल्ला दिली, मात्र भीतीपोटी हे दाम्पत्य पोलिसांकडे गेलेच नाही. चोरट्यांचा याचाच गैरफायदा घेऊन खतकल्ले दाम्पत्याला सोमवारी कॉइन बॉक्सवरून फोन करून ३० लाख रुपयांची मागणी केली. दोनदा फोन आल्याने घाबरलेले खतकल्ले यांनी नातेवाईकांकडे धाव घेतली. यानंतर करवीर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

संशयित माहितीचा असावा

खतकल्ले दाम्पत्याला फोन करून त्यांच्याकडे तीस लाखांचा मागणी करणाऱ्या चोरट्यांकडे खतकल्ले यांचा मोबाइल नंबर कुठून आला? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. चोरट्यांनी खतकल्ले दाम्पत्याला मारहाण केली नाही. कोणतीही इजा न पोहोचवता चोरट्यांनी रोकड आणि दागिने काढून घेतले, त्यामुळे चोरटे माहितीतील असावेत असा पोलिसांना संशय आहे.

धमकीचे फोन कोल्हापुरातूनच

सोमवारी शिवलिंग खतकल्ले यांच्या मोबाइलवर चोरट्यांनी फोन केला. तीस लाख रुपयांची व्यवस्था झाली की नाही, अशी विचारणा चोरट्यांनी केली. पोलिसांनी शोध घेतला असता, चोरट्यांनी शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आणि गोखले कॉलेज परिसरातील कॉइन बॉक्सवरून फोन केल्याचे समोर आले आहे. खतकल्ले यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही आणि कॉइन बॉक्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. लवकरच या दरोड्याचा छडा लागेल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५ कोटी २६ लाख रुपये जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्जमाफी विषयावरून हिवाळी अधिवेशावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना जिल्ह्यातील पात्र २९ हजार, २०१ लाभार्थ्यांना १७२ कोटी, ५४ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. राज्य सरकारकडून कर्जमाफीतील ९५ कोटी, २६ लाख, ४६ हजार रुपये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राप्त झाली असून लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर सदरची रक्कम जमा केली आहे. मात्र १७२ कोटींमधील ८७ कोटी, २८ लाखाची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नाही. रक्कम प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या दोन लाख, ५६ हजार लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. एका खातेदाराचे अनेक खाती असल्याने चार लाख ४८ हजार खाती अपलोड केली. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या एक हजार ८९ लाभार्थ्यांना तीन कोटी, ७९ लाख तर बँक ऑफ इंडियाच्या १५० लाभार्थ्यांना ९५ लाख, ८८ हजार रुपयांची कर्जमाफी दिली असून ती लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे.

दुसऱ्या यादीतील जिल्ह्यातील ६१२ लाभार्थ्यांपैकी जिल्हा बँकेच्या १४८ लाभार्थ्यांना ७२ लाख, ६९ हजार रुपये खात्यावर जमा केले आहेत. कर्जमाफीची टप्प्याटप्प्याने जाहीर झालेल्या यादी आतापर्यंत २९ हजार, २०१ लाभार्थ्यांना १७२ कोटी, ५४ लाखांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. गुरुवारनंतर जिल्हा बँकेला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याने जमाखर्च कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. सोमवारी मात्र यातील ८० कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात आली. जिल्हा बँकेला आतापर्यंत ९५ कोटी २६ लाख रुपये प्राप्त झाले असून चार दिवसांत आणखी रक्कम आल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी सांगितले.

दृष्ट‌िक्षेप कर्जमाफी

लाभार्थी : दोन लाख ६२ हजार ४६७

कर्ज खात्यांची संख्या : चार लाख ५० हजार

कर्जमाफीची अपेक्ष‌ित रक्कम : ५८५ कोटी

कर्जमाफीतील आतापर्यंतचे लाभार्थी : २९ हजार २०१

प्राप्त रक्कम : ९५ कोटी, २६ लाख ४६ हजार

आवश्यक रक्कम : १७२ कोटी, ५४ लाख

थकबाकीदार लाभार्थी : १४,५५६

रक्कम : ५२ कोटी २३ लाख

प्रोत्साहनपर अनुदान लाभार्थी : १४,६५४

रक्कम : ११९ कोटी ७७ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतीत १६१२ खटले निकाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालतीत १६१२ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले आहेत. तडजोडीसाठी ६४१२ खटले दाखल होते. प्राधिकरणने केलेल्या तडजोडीमुळे पक्षकारांना १० कोटी ५४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. ५० पॅनेलमध्ये जिल्ह्यात १३ ठिकाणी कामकाज झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी दिली.

जिल्ह्यातील दाखल व दाखलपूर्व अशा दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, सहकार, औद्योगिक, कामगार, कौटुंबिक अशा विविध क्षेत्रातील प्रलंबित ६४१२ खटले तडजोडीसाठी विधी सेवा प्राधिकरणकडे दाखल झाले होते. जिल्ह्यातील १२ विधी सेवा समिती व प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज झाले. त्यासाठी ५० पॅनेल्सनी कामकाज पाहिले. मोटार अपघात न्यायाधीकरणच्या विशेष पॅनेलमध्ये एकूण ८२ खटले तडजोडीने मिटले. यात पक्षकारांना २ कोटी ८९ लाख ७८ हजार ७३० रुपयाची नुकसान भरपाई मिळाली. कौटुबिक खटल्यांमधील ५१ खटले तडजोडीने मिटवण्यात आले. कामगार कायदेसंबंधी ९ खटले कामगार न्यायालयाने तडजोडीने मिटवले. कलम १३८ अन्वये दाखल करण्यात आलेले ३०६ खटले मिटवण्यात यश आले. दाखलपूर्व ७१६ खटल्यामध्ये तडजोडीने १ कोटी ९३ लाख ५७ हजार २७४ रुपये नुकसान भरपाई मिळाली. दिवसभरात १६१२ खटले निकाली निघाल्याने १० कोटी ५४ लाख रुपयांची नुकसान भरपाई पक्षकारांना मिळाली आहे.जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी, पी. एल. व्ही, लॉ कॉलेजचे विद्यार्थी, विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, एस. एस. बाबर, सर्जेराव सावंत, ज्ञानेश्वर मिरजकर, गुरुदास येळावडेकर, शैलेश पवार, बाळासाहेब खुपेरकर, यांनी सहकार्य केले.

लाभ घेण्याचे आवाहन

लोकअदालतीमध्ये खटले सामोपचाराने मिटविले जातात, त्यामुळे पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दाखलपूर्व ७१६ खटल्यामध्ये तडजोडीने एक कोटी ९३ लाख ५७ हजार २७४ रुपये नुकसान भरपाई मिळाली. दिवसभरात १६१२ खटले निकाली निघाल्याने १० कोटी ५४ लाख रुपयांची नुकसान भरपाई पक्षकारांना मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांची सुरक्षा धोक्यात

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर: केंद्र सरकारच्या गृह खात्याने जाहीर केलेल्या ‘क्राइम इन २०१६’ या अहवालात ज्येष्ठ नागरिकांसाठी धक्कादायक बातमी आहे. देशात ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रत गेल्या वर्षभरात ज्येष्ठ नागरिकांबाबत ४६९४ गुन्हे दाखल आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, दरोडे आणि खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी २२ टक्के गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. या माहितीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची चिंता आणखी वाढली आहे.

ज्येष्ठ नागरिक हे चोरटे आणि गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. कामानिमित्त परगावी किंवा परदेशात राहणाऱ्या मुलांमुळे पाठीमागे एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. अशा एकाकी ज्येष्ठ नागरिकांचा गैरफायदा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणे, त्यांच्या घरांवर दरोडा घालून लूट करणे आणि ज्येष्ठ नागरिकांचा खून करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये देशात ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित १८ हजार ७१४ गुन्हे नोंद होते. २०१५ मध्ये ही संख्या २० हजार ९३२ तर २०१६ या वर्षात या गुन्ह्यांची संख्या २१ हजार ४१० इतकी आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांबाबत ४ हजार ६९४ गुन्हे घडले आहेत. यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो. मध्यप्रदेशात ३ हजार, ८७७ गुन्हे घडले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू आहे. तमिळनाडूत २ हजार ८९५ गुन्हे घडले आहेत.

केंद्रीय गृह खात्याने ज्येष्ठांची फसवणूक, दरोडे आणि खून हे तीन प्रकारचे गुन्हे नोंदवले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत फारच पुढे आहे. महाराष्ट्रात फसवणुकीचे ८०० गुन्हे घडले आहेत. तेलंगना राज्यात २२४, तर आंध्रप्रदेशात २०९ गुन्ह्यांची नोंद आहे. दरोड्याच्या गुन्ह्यांतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांच्या घरांवर ४१६ दरोडे पडले आहेत. कर्नाटकात १२५, तर तमिळनाडूत ११७ दरोड्याचे गुन्हे नोंद आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या खुनाच्या गुन्ह्यात १९ गुन्ह्यांनी महाराष्ट्राचा नंबर हुकला आहे. सर्वाधिक १८८ खुनाचे गुन्हे उत्तरप्रदेशात नोंद आहेत. महाराष्ट्रात १६९ गुन्हे नोंद आहेत. २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांबाबत होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये ४.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण गुन्ह्यांपैकी २२ टक्के गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. ही स्थिती गंभीर मानली जात आहे.

कोल्हापुरातही ज्येष्ठ नागरिक असुरक्षित

बहुतांश सोयी उपलब्ध असल्याने कोल्हापुरात स्थायिक होण्यास पसंती मिळते. बाहेरच्या जिल्ह्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर कोल्हापुरातच स्थायिक होतात. कोल्हापुरातही ज्येष्ठ नागरिकांच्या घरात जाऊन जबरी चोरी करणे, लूटमार, फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. उदगाव येथील दरोडा, शहरात नेहमीच घडणारे चेन स्नॅचिंग, उजळाईवाडी येथील प्लॉट विक्री प्रकरण, अशा अनेक गुन्ह्यांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images