Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर दराबरोबर मूल्यांकनही घसरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या १५ दिवसांत देशातंर्गत साखरेचे भाव कमी झाल्याने राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्यांकनामध्ये ११० रुपयांची कपात केली आहे. साखरेचे मूल्यांकन कमी झाल्याने कारखान्यांना मिळणाऱ्या पहिल्या उचलीमध्ये कपात होऊ शकते. त्यामुळे तोडग्यानुसार ऊस उत्पादकांना एफआरपी देताना साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

सध्या बाजारपेठ एम-वन व एस-वन साखरेचे प्रतिक्विंटल दर ३६५० व ३५५० रुपये आहे. साखर हंगाम सुरू होण्यासपूर्वी बाजारात हाच दर अनुक्रमे ३८०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल होता. बाजारपेठेतील तीन महिन्याचा साखर दराचा आढावा घेऊन राज्य बँकेने साखरेचे मुल्यांकन ३५०० रुपये केले होते. यावर कारखान्यांना ८५ टक्के प्रमाणे पहिली उचल व कारखान्यांच्या उत्पादन खर्चासाठी २९७५ रुपये निश्चित केले होते. प्रक्रिया खर्च व विविध कर्जाचे हप्ते यासाठी ७५० रुपये वजा जाता कारखान्यांना प्रत्यक्षात २२२५ रुपये मिळाले.

यावर्षीच्या गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये वाढ केल्याने यासाठी संघर्ष होणार अशीच शक्यता होती, आणि झालाही. बाजारातील साखरेचा दर गृहीत धरुन एफआरपी अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा निर्णय झाला. पण हंगाम सुरुवात होऊन अवघे २२ दिवस झाले असताना, साखर दरात घसरण होऊ लागल्याने कारखानदारांसमोर एफआरपी देण्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. नवीन मूल्यांकनानुसार कारखान्यांना २८८० रुपये मिळणार असून जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी ३१०० रुपये दर जाहीर केल्याने याचा ताळेबंद घालताना कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे.

‘साखरेचे दर वाढत असताना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी साखर दर नियंत्रणात ठेवण्यासाठी परदेशातून साखर आयात करु, व्यापारी व कारखान्यांच्या साठ्यावर निर्बंध आणू असे सांगितले होते. सध्या साखरेचे दर कमी होत असताना मंत्री पासवान व्यापाऱ्यांना स्टॉक निर्बंध वाढवून देणार का,असा प्रश्न आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकांद्वारे केला आहे.’

राज्य बँक मागील तीन महिनाच्या साखर दर विचारात घेऊन साखरेचे मूल्यांकन करत असते. तिमाही नंतर मूल्यांकन झाल्यानंतर यामध्ये वाढ होऊ शकते. तात्पुरती निर्माण झालेली स्थिती असून यामुळे पहिल्या एक-दोन बिलांमध्ये अडचण होईल, त्याचा कारखानदारांनी कांगावा करू नये.

खासदार राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समरजित घाटगेंना ताकद देवू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

‘विरोधक काय टीका करतात, त्याकडे लक्ष देवू नका, तुम्ही विक्रमसिंहराजे यांच्या कार्याचा आणि सहकाराचा वारसा जपत आहात, आता त्यांचा राजकीय वारसा चालवा, तुमच्या विकासाच्या राजकारणाला हवी ती ताकद देऊ,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समरजित घाटगे यांना दिली.

कागल येथील कागल बँकेस राजे विक्रमसिंह घाटगे यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी समरजित घाटगे यांच्या वर्षभरातील वाटचालीचा गौरव केला. आपल्या कर्तृत्वावर विक्रमसिंह घाटगे यांनी शाहूंचा वारसा जपला. आजची गर्दी पाहिल्यावर विक्रमसिंह घाटगेंच्या कर्तृत्वावर जनता प्रेम करत असल्याचा पुरावा मिळतो. जनतेचा पालक कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले. सहकारातूनच समाजाचा विकास होतो, हे जाणून सहकाराचा शाहू महाराजांनी पाया घातला. त्याचा वारसा विक्रमसिंहराजेंनी चालवला. आता त्यांच्या राजकारणाचा वारसा समरजित यांनी चालवाला.त्यासाठी त्यांना लागेल ती ताकद पुरवू, हे करताना विकासाचे आणि परिवर्तनाचे राजकारण केले तर जनता त्यांना नक्की साथ देईल.’

सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले,‘ ग्रामीण भागात बँका वाढल्यास त्याचा शेवटच्या घटकाला चांगला लाभ होईल. विक्रमसिंह घाटगे यांचे काम राज्याला प्रेरणादायी आहे. म्हणूनच सहकारात चुकीचे काम करणाऱ्याला शिक्षा आणि चांगले काम करणाऱ्याला शाबासकी मिळाली पाहिजे असेच आमचे धोरण आहे.’

खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘आम्ही लाभार्थी म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्या आणि नेहमी मोबाइल बंद ठेवणाऱ्यांना उत्तर देवून मी त्यांना मोठे करणार नाही. समरजितसिंह घाटगेंनीही हे लक्षात घ्यावे.’

समरजितसिंह घाटगे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर,प्रवीणसिंह घाटगे,सुहासिनीदेवी घाटगे,नवोदिता घाटगे,आमदार अमल महाडिक,जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, चंद्रकांत गाडीवड्ड, महेश जाधव, बाबा देसाई आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत पंडीत पाटील, आभार बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी मानले.

गडहिंग्लज विभागातील गावे जोडणार

मतदारसंघ पुनर्रचनेत आपल्याला कापून टाकल्याची भावना गडहिंग्लज व चंदगडकरांची झाली आहे. त्यामुळे पुढील कार्यक्रम याच ठिकाणी व्हावा, अशी मागणी समरजितसिंहानी मुख्यमंत्र्यांकडे केली. गडहिंग्लज विभागात येणारी ४१ गावे शाहू कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जोडण्याची घोषणा यावेळी घाटगे यांनी केली.

घाटगे,मंडलिकांच्या पाठीत खंजीर

ज्यांनी दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि राजे विक्रमसिंह घाटगे यांचा कायम आशिर्वाद घेवून त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसले, त्यांना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद काय असतात ते कळणार नाही, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता समरजित घाटगे यांनी लगावला. त्यांची नैतिकता नाही, त्यांनी त्यांच्या संस्काराप्रमाणे ते वागले, आमच्यावर शाहूंचे संस्कार आहेत, त्यामुळे २०१९ ला कोणत्या संस्काराखाली काम करायचे हे जनताच ठरवेल असेही ते पुढे म्हणाले. कागल तालुक्यात स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर समोरच्या व्यक्तीस कापायला पाहिजे, अथवा कमी करायला पाहिजे, अशीच त्यांची राजकीय संस्कृती आहे. ‘पुढच्याचा कंडका पाडायला पाहिजे’, ‘त्याला आडवा करायला पाहिजे’, ‘त्याची जिरवली पाहिजे’ हे कागलच्या राजकारणातील शब्द आहेत. परंतु ही आमची संस्कृती नाही. आम्ही सकारात्मक आणि विकासात्मक राजकारण करत आहोत.

नगरपालिकेच्या इमारतीला निधी द्या

कागल नगरपालिकेला आग लागल्याचा संदर्भ देत घाटगे यांनी ही घटना कागलसाठी अपमानास्पद बाब आहे. नगरविकास मंत्री या नात्याने भरघोस निधी द्यावा अशी मागणी घाटगे यांनी केली. ही इमारत तातडीने उभारण्यात यावी. कारण यामुळे जनतेचे खूपच हाल होत आहेत. पण ही आग लागली की कुणी लावली? याची शहानिशा व्हायलाच पाहिजे. ज्यांनी लावली त्यांचा अनुभव फार मोठा आहे. परंतु कागल आणि गडहिंग्लज आमची जहागिरी आहे आम्ही कायपण बोलले तरी चालतयं, काहीपण व कसपण केले तरी चालतयं .कायदा काहीच नाही असं समजणाऱ्यानी कागलच्या जनतेचे हाल केलेत. यांच्यामुळे जनतेला त्रास होवू लागला आहे. त्यामुळे एकदा यांना कायद्याचा दणका बसलाच पा‌हिजे, अशी मागणी केली. एकवेळ माझ्यावरील टीका सहन करीन पण मुख्यमंत्र्यांवरील टीका सहन करणार नाही, असे स्पष्ट करून घाटगे म्हणाले, ‘सरकारचे लाभार्थी फक्त मी आणि संभाजीराजे असल्याची टीका झाली. परंतु त्यांना पण कळायचे नाही की त्यासाठीही कर्तृत्व लागतं. त्यांनी पहिल्यांदा कर्तृत्व निर्माण करावं आणि मगच बोलावं. आम्हाला मिळालेली पदे ही आमची नसून जनतेचीच आहेत.’

चिकोत्रा आणि आंबेओहळ मार्गी

घाटगे यांनी आपल्या भाषणात चिकोत्रा प्रकल्प पूर्ण भरण्यासाठी उपाय सुचवल्याचे सांगून आंबेओहळ प्रकल्पही पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मदत करण्याची मागणी केली. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू घराण्याला सन्मान दिल्याने अनेकांना पोटशूळ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘ज्यांनी शाहूंचे नाव घेऊन मते मागितली आणि राज्य केले त्यांनीच शाहूंच्या घराण्याला डावलले. पण या घराण्याला आम्ही सन्मान दिला. नेमकी हीच बाब अनेकांना खटकू लागली असून, त्यांना पोटशूळ उठला आहे,’ असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दोन्ही काँग्रेससह शिवसेनेवर चढवला. पन्नास वर्षे केवळ बोलघेवडेपणात गेल्याने राज्याची वाट लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

कागल येथील दि कागल को ऑप-बँकेचे ‘राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप-बँक,’ असे नामकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राजे गटाने शक्तिप्रदर्शन करत २०१९च्या विधानसभेची तयारी सुरू केल्याचे यानिमित्ताने संकेत दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सहकारातील अपप्रवृत्ती घालवून भाजपने सहकाराचे शुद्धीकरण केल्याचा दावा केला.

जिल्ह्यात भाजपचे दोनच लाभार्थी असल्याचा टोला सेनेचे संपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी शुक्रवारी लगावला होता. त्याचे पडसाद या मेळाव्यात उमटले. मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी शाहू घराण्याच्या सन्मानासाठी माझ्या माध्यमातून संदेश पाठवला. त्यांचा निरोप घेऊन सेवक म्हणून संभाजीराजेंना राष्ट्रपती कोट्यातून खासदार होण्यासाठी विनंती केली. भाजपने त्यांचा सन्मान केला आहे, पण हे घराणे वरचढ होत असल्याने अनेकांना मळमळत आहे. त्यामुळेच ते ‘लाभार्थी’ म्हणून टीका करत आहेत. खालच्या स्तरावर टीका करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल.’

चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख या दोघांनी सहकारातील अपप्रवृत्ती बाहेर काढून सहकारात स्थेर्य आणण्याचा प्रयत्न केला असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली. तेव्हा शेतमालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच सहकारी साखर कारखानदारीही टिकली पाहिजे, या हेतूने एफआरपीसाठी २४०० कोटी रुपये दिले. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात सहकाराचा मोठा वाटा आहे. त्याचा पाया शाहू राजांनी रचला होता, याची जाणीव आम्हाला आहे. आधीच्या सरकारने स्वत:च कारखाने मोडीत काढून मातीमोल दरात विकत घेण्याचा घाट घातला.’

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना सामान्य माणसांच्या विकासाची भाषा कळत नाही, असे लोक बेछूट आरोप करीत सुटले आहेत. आपल्याला विकासाचे राजकारण करायचे आहे. लोकसभेपासून जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतीपर्यंत आम्हाला यश मिळाल्यावर तुम्ही ‘सूज’ म्हणत असाल तर प्रत्येकवेळी ती कशी येईल? आणि ती तुम्हाला का येत नाही? असा सवाल केला. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच ते बेछूट आरोप करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हा वर्षातील सर्वांत मोठा विनोद

$
0
0


टीम मटा

कराड, कोल्हापूर : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी, कराड येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला शनिवारी अभिवादन करतानाही राजकीय खेळ रंगला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यातही राजकीय धुरळा उडाला. ‘यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या आधारे सध्याचे राज्य सरकार काम करीत आहे,’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी कराडमध्ये काढले, तर त्याची खिल्ली उडविताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे वर्षांतील सर्वांत मोठा विनोद आहे,’ अशी टीका केली. दरम्यान, सत्तेत असतानाही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली पुन्हा एकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला, पण मुख्यमंत्र्यांनी या आरोपांना बेदखल केले.

कराडमध्ये वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिताच राज्य सरकार काम करीत आहे. यशवंतराव सुसंस्कृत राजकारण करीत. सामान्य माणूस, शेतकरी, वंचित यांना न्याय देण्याचा ते प्रयत्न आम्ही करू. तीच प्रेरणा या ठिकाणाहून मी नेत आहे.’

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, ‘उभ्या आयुष्यात चव्हाणसाहेबांनी या विचारांच्या (संघ-भाजपची) जवळपाससुद्धा जाण्याचा विचार कधी केला नाही आणि मुख्यमंत्री सांगतात ती विचारधाराही चव्हाणसाहेबांच्या विचारांच्या कधी जवळ गेली नाही. हा सगळा विरोधाभास आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून ते येथे येत असतील तर ठीक आहे; पण चव्हाणसाहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र सध्याचे सरकार चालवित आहे, असे म्हणणे म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा विनोद आहे, दुसरे काही म्हणता येणार नाही.’

या दोन्ही नेत्यांची वक्तव्ये आणि पवार यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेले प्रत्युत्तर यांमुळे राज्यातील राजकीय ‘सुसंस्कृत’तेचे दर्शन घडल्याची चर्चा आहे. पवारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांच्यावर टीका केली. त्याला उद्धव ठाकरे यांनी कुरुंदवाड येथील मेळाव्यात प्रत्युत्तर दिले. पवारांनी पंधरा वर्षे काँग्रेसची भांडी घासली, अशा शेलक्या शब्दांत उद्धव यांनी त्यांचा समाचार घेतला. ठाकरे यांनी अनेक सभेत सरकारलाही धारेवर धरले. सध्याचे सरकार हे नवसाचे पोर आहे, ते उडाणटप्पू निघाले तर कुणाला विचारायचे? असा सवाल त्यांनी केले. मुख्यमंत्रीही शनिवारी सांगली व कोल्हापूर दौऱ्यावर होते, पण त्यांनी ठाकरे यांच्या कोणत्याच आरोपाला प्रत्त्युत्तर दिले नाही, पण आमच्यावर संस्कार असल्याचे कागलच्या सभेत ठणकावून सांगितले.

===

सत्तेत राहायचे आणि मित्रपक्षाविरोधातच आंदोलने करीत टीका करायची, असे मी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. शिवसेनेला सत्तेचा मोह सोडवत नाही, असे मी यापूर्वीही बोललो होतो. शिवसेनेचे पाय सत्तेच्या फेव्हिकॉलमध्ये अडकले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकारने आडमुठी भूमिका घेतली तर आम्ही सत्तेवर लाथ मारू, असे विधान यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते; पण काय करणार ते आमच्या मित्राचे चिरंजीव आहेत. त्यामुळे जास्त काय बोलणार?

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

०००००००००००

गेल्या १५ वर्षांत पटत नसताना सरकारमधे राहून काँग्रेसची भांडी घासणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आजचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर चाललेले आहे. आम्ही बाहेर पडलो, की ते सरकारमध्ये सामील व्हायलाच बसले आहेत, असे भाजपचेच खासदार नाना पटोले म्हणतात. जनतेच्या प्रश्नांबाबत मी रोखठोक बोलणारच. मला त्याची पर्वा नाही.

उद्धव ठाकरे, (कुरुंदवाडमधील मेळाव्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तरीही रंगले शक्त‌िप्रदर्शन

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर : सरकार नालायक आहे, शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाट लावली, मुख्यमंत्र्यांनी सीमाभागाचा केवळ राजकीय वापर केला, कारभार सुधारल्यास हात जोडू नाहीतर जोडे मारू... अशी नेहमीच्या शैलीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेत भाजपवर सडकून टीका केली. पण मुख्यमंत्र्यांनी ना त्याला प्रत्युत्तर दिले ना अन्य कोणता आरोप केला. तरीही सत्तेतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा हा दौरा भलताच गाजला तो शक्त‌िप्रदर्शनाने. कुणाचा विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा तर कुणाची मंत्र‌िमंडळ विस्तारावर नजर... त्यामुळे जंगी शक्त‌िप्रदर्शन केले. यातून दोन्ही पक्षाची हवा झाल्याचा भास झाला असला तरी कुरघोड्यांमुळे संभ्रमही निर्माण झाला आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अजून किमान दीड वर्षांचा अवधी आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपमधील कुरबुरी पाहता राज्यात कोणताही क्षणी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने रोज सेनेचे नेते भाजपवर धणुष्यबाण सोडत आहेत, त्यावरून ते कधी सत्तेतून बाहेर पडतील याचा नेम राहिला नाही. यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्याच तर आपली थोडी तरी तयारी असावी या हेतूने दोन्ही पक्षांचे नेते सक्रीय झाले आहेत. यामध्ये सेना आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत भाजपने चांगली हवा तयार केली आहे. अनेक सत्तास्थाने ताब्यात घेतानाच गावपातळीवर सत्ता काबीज केल्या आहेत. हा जसा दोन्ही काँग्रेसला धोक्याचा इशारा आहे, तसा सेनेलादेखील आहे. कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात सेनेचे आमदार आहेत. कोल्हापूरला तब्बल सहा आमदार असल्याने सेनेचे या भागावर विशेष लक्ष आहे. यामुळे राजकीय भूकंपाची शक्यता गृ​हित धरून ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोघेही योगायोगाने दोन दिवस पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यामुळे ठाकरे सरकारला धुणार, आणि मुख्यमंत्री नेहमीच्या शैलीत सेनेचा खरपूस समाचार घेणार अशी अपेक्षा होती, पण भाजपला ठाकरेंनी धू धू धुतले, पण त्याचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या भाषणात उमटलेच नाहीत.

निवडणूक प्र्रचारात ज्या पद्धतीने एका दिवसात दहा बारा सभा घेतल्या जातात, त्याच पद्धतीने ठाकरे यांनी दोन दिवसात सहा सभा घेतल्या, अनेक कार्यक्रम घेतले. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सरकारला धारेवर धरले. सरकार नालायक आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, फसवण्यात हे सरकार आघाडीवर आहे असे अनेक आरोप केले. दोन दिवसांत झालेल्या सर्वच सभेत काँग्रेस राष्ट्रवादी ऐवजी मित्रपक्ष असलेल्या भाजपवरच टीका केली. सराकर विरोधात मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय देखील जाहीर केला. पण हे सारे करताना आपण देखील सरकारचेच घटक आहोत हे मात्र ते सोयीस्कर विसरले. उद्योग खाते सेनेकडे असूनही उद्योजकांचा मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री कागलच्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर देतील अशी अपेक्षा होती, पण तसे काहीच घडले नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरेंच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देण्याचे टाळले. सेनेऐवजी जाता जाता त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. कागलला मोठा जनसमुदाय जमला होता, त्यामुळे या सभेत ठाकरेंच्या सर्वच नव्हे तर किमान काही आरोपांना तरी प्रत्युत्तर मिळेल ही भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली. उलट, बोलून बोलून थकतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, असे म्हणत सेनेच्या आरोपांना बेदखल करण्यात आले.

सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

या दोन नेत्यांचे दौरे आरोप प्रत्यारोपाने जरूर गाजले नाहीत. पण ते गाजले ते शक्त‌िप्रदर्शनाने. निवडणुका जवळ नसतानाही जोरदा शक्त‌िप्रदर्शन करण्यात इच्छुकांना यश आले. दोन आमदारांनी मंत्र‌िपदासाठी आपली सारी शक्ती पणाला लावली. मंत्र‌िपदासाठी चंद्रदीप नरके व राजेश क्षीरसागर हे दोघेही इच्छुक आहेत. यामुळे ठाकरेंना थक्क करण्यासाठी दोघांनी बराच प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून कुडित्रेत ठाकरेंची जंगी सभा झाली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाढदिवसानिमित्त शक्त‌िप्रदर्शनासाठी पोष्टरबाजी करण्यासाठी शहराचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्वागत फलक लावायला देखील भाजपला काही ठिकाणी जागा मिळाली नाही. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक हे कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आपली ताकद दाखवत आहेत. या निमित्ताने रविवारी त्यांचे शक्त‌िप्रदर्शन होत आहे. पण ज्यासाठी आमदारांनी शक्त‌िप्रदर्शन केले. ते मंत्र‌िपदच देणार नसल्याचे सांगत ठाकरेंनी उत्साहावर पाणी टाकले. खरे तर त्यांनी या दौऱ्यात कोल्हापूरच्या आमदारांना बक्षीस देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. चंदगड ते शिरोळपर्यंत सर्वच सेनेच्या नेत्यांनी ठाकरेंचा दौरा जंगी केला. या निमित्ताने जिल्हयात सेनेची हवा झाली. पण अजूनही जिल्हा भगवा करा म्हणत ठाकरेंनी बक्षीस ऐवजी केवळ शुभेच्छा दिल्या. जे खरोखरच सेनेच्या स्थानिक नेत्यांना अपेक्षित नव्हते.

दोन्ही पक्षांची हवा

दोन्ही नेते आल्याने फायदा झाला तो दोन्ही पक्षाचा. या निमित्ताने दोन्ही पक्षाची चांगली हवा झाली. विधानसभा निवडणूक लांब असली तरी सेना भाजप देखील शक्त‌िप्रदर्शनात कुठेही कमी पडत नाही हे स्थानिक नेत्यांनी दाखवून दिले. शिवसेना सरकारमध्ये आहे की विरोधात याबाबत या दौऱ्यातील भाषणांनी संभ्रमावस्था वाढवण्यात मदत झाली. दोन्ही काँग्रेसला जे हवे आहे, तेच घडत आहे. जेवढे सेना व भाजप यांच्यातील संबंध दुरावतील, तेवढा दोन्ही पक्षाचा फायदा आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्या दौऱ्याने जेवढा फायदा त्यांच्या पक्षाला झाला, तेवढा विरोधकांना देखील.

शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शनाला त्याच ताकदीने उत्तर देण्याची तयारी भाजपने केली होती. त्याचाच एक भाग म्हणून कागल बँकेच्या नामकरणाचा समारंभ जंगी करण्यात आला. सेनेत मंत्रीपदासाठी तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. यामुळे कागलमध्ये म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी चाळीस हजाराचा जनसमुदाय एकत्र आणून मुख्यमंत्र्यांना राजे गटाची ताकद दाखवली. अतिशय नेटका व जंगी कार्यक्रम करताना राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट केली. गर्दी जमवण्यात आमदार हसन मुश्रीफ यांचा हात कुणी धरू शकणार नाही, असे म्हटले जात होते, पण मंडलिक गटानंतर आता राजे गट देखील गर्दी जमवू शकतो हे दाखवून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी घाटगे इच्छूक आहेत. त्यामुळे मिशन २०१९ डोळयासमोर ठेवूनच अनेकांची भाषणबाजी झाली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सेनेला, ठाकरेंना जोरदार प्रत्यूत्तर देतील अशी अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही. घाटगे यांना राजकीय ताकद देण्याची ग्वाही देत विधानसभेची तयारी सुरू करण्याचा मंत्र मात्र या दौऱ्याने मिळाला.


विनय कोरेंना ताकद ?

कागलप्रमाणे वारणेत देखील ​माजी मंत्री विनय कोरे यांनी देखील वेगळ्या पध्दतीने शक्तीप्रदर्शन केले. केवळ जेवणावळी न ठेवता मुक्तसंवादाचा कार्यक्रम ठेवत मुख्यमंत्र्यांना त्यांनी बोलते केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडल्याने भाजपला एक मित्र पक्ष हवा होता. खासदार राजू शेट्टी यांना टक्कर देवू शकेल, त्रास देवू शकेल असा नेता त्यांना कोरे यांच्या रूपाने मिळाला आहे. एक मोठा उद्योग समुह सोबत आल्याने दोन तालुक्यात पक्षाला विस्तार करण्याची संधी मिळाली आहे. कोरे यांना राजकीय स्थैर्य हवे आहे. या पार्श्वभूमीवरच हा जंगी कार्यक्रम झाला. त्याचा राजकीय फायदा काय होणार हे लवकरच कळेल. मंत्रीपदाच्या चर्चेत अधूनमधून त्यांचेही नाव चर्चेत असते. तसे झाल्यास मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कोरे यांना लाभदायी ठरणार आहे. यामुळे या दौऱ्याचे लाभार्थी कोण ठरणार ? याचे उत्तर कळायला बराच वेळ लाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विद्यापीठ विकासाचे व्हिजन ठेवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘कोणत्याही निवडणुकीतील विजय हा प्राप्त स्थितीतील विषयावर अवलंबून असतो; पण विजयानंतरची कामगिरी भविष्यातील निवडणुकीच्या विजयाची नांदी असते. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी नवनिर्वाचित उमेदवारांनी स्वत:चे व्हिजन तयार ठेवावे. विद्यापीठाची गुणात्मक आणि शैक्षणिक पातळी उंचावण्यासाठी स्वत:चा विकास आराखाडा तयार करा, ज्याद्वारे पुढील निवडणुकीत प्रचाराचीसुद्धा आवश्यकता भासणार नाही. अधिसभेमध्ये सर्व विषय बहुमताने मंजूर करून घ्या, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल,’ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या विकास आघाडीच्या नवनिर्वाचित उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘अधिकार मंडळांच्या निवडणुकीत प्रथमपासून विकास आघाडीच्या सर्वच घटकांनी एकजूट दाखवली. बंडखोरी, नाराजी आणि अशा कुरबुरी संपुष्टात आल्याने विजय सुकर झाला. आघाडीची मोट बांधण्यास डॉ. संजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली, पण केवळ निवडणुकीतील विजय महत्त्वाचा नसून त्यानंतरची कामगिरी महत्त्वाची असते. त्यामुळेच विद्यापीठाचा स्तर उंचावण्यासाठी अधिकार मंडळांतील सर्वच सदस्यांनी एक व्हिजन तयार ठेवून विकासाभिमुख काम करावे.’

विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘अधिकार मंडळांमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांना संस्थानिहाय संधी दिली आहे. संधी देताना ९० टक्के नवीन चेहऱ्यांना संधी दिली. शिवाजी विद्यापीठ राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे, ज्यामध्ये प्राचार्य व व्यवस्थापन परिषदेत बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. विद्यापीठाच्या विकासासाठी शंभर कोटींचे अनुदान उपलब्ध आहे, तसेच एक हजार कोटी देण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत.’

अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील अपघाताने झालेले मंत्री नसून ते एकवेळ राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांची सकारात्मक ऊर्जा यासाठी उपयोगात येईल.’

यावेळी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महापौर हसीना फरास, प्रा. डी. यू. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. जे. एफ. पाटील, शंकरराव कुलकर्णी, आदी उपस्थित होते. डॉ. एल. जी. जाधव यांनी प्रास्ताविक कले. प्रा. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. भैया माने यांनी आभार मानले.


तावडे राज्यातील

एकमेव आमदार

उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे गेली पाच टर्म विधिमंडळाचे प्रतिनिधित्व करत आहेत. साडेचार वर्षे मतदारसंघात झपाटून काम करतात. त्यामुळे ज्यावेळी निवडणूक होते, त्यानंतर ते मतमोजणीला जात नाहीत. कारण त्यांना विजयाची खात्री असते. अशी विजयाची खात्री असणारे राज्यातील ते एकमेव आमदार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावळागोंधळ अन् बेपर्वाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाचा सावळागोंधळ चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आढावा बैठकीवेळी निदर्शनास आला. पालकमंत्री पाटील पहिल्यांदाच महापालिकेत आढावा बैठकीसाठी दाखल होत असताना प्रशासनाने त्यांच्या बैठकीचे निमंत्रण महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह अन्य पदाधिकारी व नगरसेवकांना कळविण्याची सुबुद्धीही प्रशासनाला सुचली नाही. परिणामी मोजके नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वीस मिनिटांत आढावा बैठक आटोपली.

शहरातील विविध विकास प्रकल्प सध्या राज्य सरकारकडे प्रस्तावित आहेत. कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. थेट पाइपलाइन योजना, अमृत योजना, सेफ सिटीचा दुसरा टप्पा, मंदिर विकास आराखडा, नाट्यगृह विकास दुसरा टप्पा अशी शहर विकासांशी कामे निगडित आहेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाऱ्या आढावा बैठकीचे पत्र २१ ऑक्टोबरला प्रशासनाला मिळाले. प्रशासनाकडून गेल्या चार दिवसांत महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांना याबाबत कल्पनाही दिली नाही. शनिवारी दुपारी नगर सचिव कार्यालयाकडून पदा​धिकारी व गटनेत्यांना फोनवरून आढावा बैठकीविषयी कळविले.

दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी पालकमंत्र्यांचे महापालिका चौकात आगमन झाले. त्यावेळी भाजप-ताराराणी आघाडीचे मोजकेच नगरसेवक आणि आयुक्तांसह अधिकारी हजर होते. पालकमंत्री मोटारीतून उतरताच महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींसह पदाधिकाऱ्यांना बैठकीविषयी कळविले नव्हते का ? ते बैठकीला का नाहीत ? अशी विचारणा आयुक्तांना केली. त्यावर आयुक्तांनी आज दुपारी सर्वांना कळविल्याचे सांगत पुस्तक देऊन पालकमंत्र्याचे स्वागत केले.

प्रोटोकॉल तपासा, अभ्यास करा

नगरसचिव कार्यालयाकडून दुपारी अडीच वाजता महापौरांना फोनवरून आढावा बैठकीची माहिती दिली. चार वाजता बैठक आहे, दुपारी अडीचला कळविता ही कुठली पध्दत अशी विचारणा महापौरांनी केली. दुपारी चार वाजता आयुक्त चौधरी यांनी महापौर फरास यांना फोन करून बैठकीला येण्याची विनंती केली. तेव्हा महापौरांनी प्रोटोकॉल तपास, अभ्यास करा, चारच्या बैठकीचे आता सांगताय अचानक कसे येणार, या शब्दांत आयुक्तांना सुनावल्याचे वृत्त आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीचे निमंत्रण नसल्याचे सांगत त्याकडे पाठ फिरवली.

वाढीव दराने निविदा मंजूर कशी करता?

सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा मी दोन टक्के जादा दरानेही मंजूर करत नाही. मग तुम्ही ड्रेनेज लाइनची ५९ कोटी रुपयांची निविदा सात टक्के जादा दराने मं​जूर कशी करता? असा सवाल मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केला. वाढीव दरामुळे साधारणपणे पावणे पाच कोटींचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. शिवाय विविध विकासकामांसाठी मंजूर दहा ते बारा कोटी रुपये खर्ची पडली नसल्याचा विषय बैठकीत झाला. यासंदर्भात आयुक्तांनी कुठलाही निधी परत गेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.


शहराशी संबंधित विकासकामांसंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली त्याबद्दल महापौर या नात्याने त्यांचे अभिनंदन करते. मात्र, आढावा बैठकीसंदर्भात आयुक्तांनी जो आगाऊपणा केला असून, ते मनमानी कारभार करत आहेत. महापालिकेतील बैठकीची माहिती महापौरांना पहिल्यांदा द्यायला हवी होती. आयुक्तांकडून पुन्हा असा प्रकार घडला तर त्यांना कोल्हापुरी धडा शिकवू.

हसीना फरास, महापौर


पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीची माहिती पदाधिकाऱ्यांना कळविण्यात प्रशासनाकडून ढिलाई झाली. त्यांना आढावा बैठकीविषयी लेखी कळविले नाही. शनिवारी दुपारी सर्व पदाधिकारी व गटनेत्यांना फोनवरून कळविले. येथून पुढे काळजी घ्यावी. पदाधिकाऱ्यांना रितसर कळविले जाईल.

अभिजित चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी कर्जमाफी तुटकी-फुटकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कर्जमाफीसाठी साडे सहा हजार कोटी रुपये खात्यावर जमा झाले आहेत, असे मुख्यमंत्री सांगतात. मात्र केवळ चार हजार शेतकऱ्यांना तुटकी-फुटकी कर्जमाफी मिळाली आहे. उर्वरित शेतकरी अद्याप वंचितच आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत घोटाळा होणार असेल तर सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. नोटाबंदी, जीएसटी, फसवी कर्जमाफी, काळा पैसा आदी विषयांवर त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर आसूड ओढले.

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे सीताबाई पटवर्धन विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेच्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कनेते खासदार गजानन कीर्तिकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यज‌ित पाटील-सरुडकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘सत्तेत राहूनही सरकारविरोधात बोलल्यावर मला दुतोंडी म्हणणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. मला केवळ शेतकऱ्यांचे अश्रू, दु:ख कळते. त्याच्या दु:खात सहभागी व्हायचे नाही, तर काय त्याला निवडणुकीपुरती आश्वासने द्यायची? मी सरकारवर माझ्यासाठी टीका करीत नाही. जीवन-मरणाचा लढा देणाऱ्या जनतेसाठी मी टीका करतो. टीका करून कामगिरीत सुधारणा व्हावी आणि हे सरकार टिकावे, यासाठी टीका असते. त्यामुळे माझ्या टीकेवर मला उत्तर देण्याऐवजी त्यांनी जनतेला उत्तर द्यावे. शेतीला बारा तास वीज, शेतमालाला भाव, कर्जमुक्ती हे माझे प्रश्न नाहीत, तर ते जनतेचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली, त्यावेळी मला खूप आनंद झाला. मात्र, त्यानंतर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची शासकीय आकडेवारी आणि वस्तुस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित केलेल्या या कर्जमाफी योजनेत फसवणूक होतेय, की काय अशी भीती वाटू लागली आहे. न्याय मागण्यासाठी जर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार असेल, तर आपण स्वत: त्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी रस्त्यावर उतरू, अशी ग्वाही दिली.

शेतीला बारा तास दिवसा वीज द्यावी, ही मागणी पूर्वीच्या सरकारकडेही केली गेली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजप सत्तेवर आले, तरीही हा प्रश्न कायम आहे. मग कुठे आहेत अच्छे दिन? चोवीस तास सोडाच, पण बारा तास तरी वीज द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. विहीरी-नद्यांना पाणी आहे. पण वीज नाही. डोळ्यांदेखत पिके करपून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन नव्हे,तर पूर्वीचे दिवस आठवत आहेत. अच्छे दिन नको, तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चार सुखासमाधानाचे क्षण आणण्यासाठी काम करा,’ असा टोला त्यांनी लगावला.

कर्जमाफीसंबंधातील १३ लाख शेतकऱ्यांची खाती गायब आहेत. त्यामुळे गावोगावी मदत केंद्रे उभी करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करा, असे आदेश आपण शिवसैनिकांना दिल्याचे ठाकरे यांनी घोषित केले.

आमदार उल्हास पाटील यांनी स्वागत करताना शिरोळ तालुक्यात साडेआठ कोटी रुपये खर्चून बंधारे दुरुस्तीचे काम केल्याचे सांगितले. ७० लाख रुपये खर्चून शिरोळ नवीन बसस्थानक उभे केले. मात्र तालुक्यातील १८ हजार हेक्टर जमीन क्षारपड झाली असून ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नद्यांच्या प्रदूषणामुळे कर्करोगाचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्त्याचे प्रश्न आहेत. पंचगंगा नदीवर बंधारा व दोन नवे पूल बांधण्यासाठी निधीची गरज असल्याचे सांगितले. पक्षप्रमुखांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घातल्यास सांगली व कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे भगवे करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील यांनी मानले. मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी उपस्थित होते.

मी नाही लाभार्थी

सध्या जाहीरातींचा जमाना आहे. मी लाभार्थी अशा जाहीराती राज्य सरकारकडून दाखविल्या जात आहेत. पण आता ‘वीज कनेक्शन नाही- मी नाही लाभार्थी, रेशनवर साखर नाही-मी नाही लाभार्थी,’ अशा जाहीराती करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या जाहीरातींची खिल्ली उडविली.

शरद पवार यांना टोला..

तुम्ही सरकारमध्ये सामील असूनही सरकारवर टीका करता. तुमचं पटत नसेल, तर वेगळे व्हा, असा सल्ला शरद पवार देतात. मग गेल्या १५ वर्षांत पटत नसताना काँग्रेससोबत सरकारमधे राहून काँग्रेसची भांडी घासणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आजचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने चाललेले आहे. आम्ही बाहेर पडलो, की ते सरकारमध्ये सामील व्हायलाच बसलेत, असे खुद्द भाजपचेच आमदार नाना पटोले म्हणतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत मी रोखठोक बोलणारच. मला त्याची पर्वा नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सैनिकांमया बलिदानाचा अपमान नको...

नोटाबंदीनंतर देशातील दहशतवादाचा बीमोड होईल, काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचार बंद होईल, असे सांगून मला फक्त पन्नास दिवस द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, गेल्या वर्षभरात कश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले वाढले आहेत. अनेक हिंदुस्थानी सैनिक धारातीर्थी पडत आहेत. काळा पैसा किती बाहेर आला आणि किती लोकांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा झाले, हे कुणी सांगत नाही. दहशतवादाचा बीमोड होईल, तो नोटाबंदीमुळे नव्हे, तर सैनिकांच्या शौर्यामुळे! त्यामुळे नोटाबंदीचे गुणगान गात सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करू नका, असेही उध्दव ठाकरे यांनी ठणकाविले.

जांभळीत शेतकऱ्यांशी संवाद

शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जांभळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. शेतीसाठी पाणी आहे, मात्र वीज नाही, अशी स्थिती असून दिवसा बारा तास वीज द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यानंतर शिरोळ येथील अद्ययावत बसस्थानकाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले.

आभाळ नव्हे सरकार कोसळेल

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘रस्त्यात खड्डे पडले, तर आभाळ कोसळणार नाही’. ‘डांबराचा खर्च अर्धाच दाखवा’, असेही ते म्हणत आहेत. रस्त्यात खड्डे पडण्याच्या या प्रकारामुळे आभाळ कोसळणार नाही, तर सरकारच कोसळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतापगडाने अनुभवला चैतन्याचा दिवस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा निनाद, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक, अशा अलोट उत्साहात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. रविवारी पहाटेपासूनच मंगलमय वातावरण आणि हजारो शिवप्रेमी लोकांनी हा परिसर भारुन गेला होता.
सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सांगली जिल्ह्याचे आयकर विभागाचे सहायक आयुक्त पुर्णेश गुरुरानी तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचारे पुजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. या वेळी माजी आमदार नितीन शिंदे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे आदी उपस्थित होते.
मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम-तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई-भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आले. शिवपुतळयावरील ध्वजस्तंभावर सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले. शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम जोशपूर्ण पोवाडा सादर केला. छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी विद्यार्थ्यांसह लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवारांनी मलाराजकारण शिकवू नयेकराडच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची टीका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
‘शरद पवारांनी स्वत:च्या पक्षातील नेत्याच्या पाठीत वार करून मुख्यमंत्रिपद मिळवले होते. त्यामुळे पवारांनी मला राजकारण शिकवू नये,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला. कराडमधील शेतकरी संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ‘तीन वर्षांमध्ये भाजपाने कुठे नेऊन ठेवालय महाराष्ट्र माझा? अशीच म्हणण्याची वेळ आणली आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होईपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. वसंतदादा पाटील व यशवंतराव चव्हाणसाहेबां सारख्या मोठ्या माणसांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यशवंतरावांमधील नेतृत्व गुण ओळखून तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी त्यांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी बोलावून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. यशवंतराव, वसंतरांवांनी राजकारण जरूर केले. पण, महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे ही भूमिका कायम त्यांची राहिली आहे. मात्र, आताच्या मुख्यमंत्र्यांची फक्त पक्ष मोठा झाला पाहिजे, अशीच भूमिका आहे. सरकारला आमचा पाठिंबा आहे, याचा अर्थ असा नव्हे की, आम्ही दिन दुबळ्या, कामगार, शेतकऱ्यावरील अन्याय सहन करावा. खरे बोलणे माझ्या रक्तात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला फसवल म्हणून जनतेने तुम्हाला निवडून दिले आणि आता भाजपने जनतेला फसवल तर त्याचा आम्हाला विचार करावा लागेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी मी शिवसैनिक बसविल्याशिवाय राहणार नाही.’
सरकारने शेतकऱ्यांना रडवल
शेतकऱ्याला महाराष्ट्रात हिणवल जातय, रडवल जातय, पण आता शेतकरी सरकारला रडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत. कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, ही मागणी शिवसेनेची आजही आहे. शिवरायांचे नाव देऊन कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ज्यावेळी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होईल, त्यावेळी मला खरा आनंद होईल. शेतकरी म्हणजे मल्ल्या नाही, तो काय पळून जाणार नाही. तो देशाचा राजा आहे, बळीराजा आहे. शेतकऱ्याला कष्टाच मोल मिळत नसेल व गोरगरिबांच्या खेड्यापाड्यांतील मुलांना शिकविणाऱ्या शाळांना अनुदान न देणाऱ्या सरकारचे मी उधो-उधो करणार नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाभार्थी म्हणून मुख्यमंत्री,महसूल मंत्र्‍यांचे फोटो लावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘जनतेने सत्ता भोगायची संधी दिल्यामुळे खरेतर सरकारचं जनतेचे लाभार्थी आहे. म्हणून व्हय मी लाभार्थी, असे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे फोटो लावले पाहिजेत,’ असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. खानापूर तालुक्यातील कार्वे येथे शेतकरी संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, असे सांगितले जात असले तरी आजअखेर एकाचाही सातबार कोरा झाला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा ऑनलाइन घोटाळा झाल्याची शंका येते. सांगली जिल्हा भविष्यात भगवामय करण्याबरोबरच शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने जनतेला छळले होते, त्यामुळे अच्छे दिन येतील म्हणून प्रतिष्ठा, अहंकार बाजूला ठेवून केवळ महाराष्ट्रासाठी भाजपाला पाठिंबा दिला. परंतु, आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ९५साली युती सरकारने कृष्णा खोरे सारख्या योजना सुरू केल्या. त्या अद्यापही अपूर्ण आहेत. कापसावर लाल बोंड तर द्राक्षावर दावण्या रोगाचे संकट आहे. सरकारचे नाकर्तेपण कमी पडते की, काय म्हणून निसर्गही आपल्याला मारतोय. पिकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्याला मरण आले. अशी औषधे विकतात, तीही सरकारमान्य दुकानेच असतात. त्या औषधावर बंदी टाकण्याऐवजी औषध फवारणीवरच बंदी करून टाकली म्हणजे कीड तशीच आहे. सरकारला कोणी नीट सल्ले देणारी माणसे आहेत की नाहीत? हवामानाचे अंदाजही चुकीचे असतात. मदत करणे, शेतकरी जगविणे हा हेतू असताना अधिकारी कागदपत्रे आणि कॅलेंडर घेवून नियमावर बोट ठेवतात. मी आलो आहे, मला दिखावा करण्याची हौस नाही तर शेतकऱ्यांसाठी आता रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी केली आहे. लोक माझ्याकडे निवेदने घेवून येतात, निवडणुका नसतानाही शेतकरी संवादाला प्रतिसाद मिळतो, याचा अर्थ तुमच्यापेक्षा जनतेचा विश्वास माझ्यावर जास्त आहे. मी मुख्यमंत्री नाही तरीही येवढा तुमचा विश्वास असेल तर काळजी करू नका. सरकार बदलले पण, परस्थिती बदलली नाही, म्हणून मी रस्त्यावर उतरलो आहे.’ या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार गजानन किर्तीकर, आमदार अनिल बाबर, संपर्क प्रमुख नितिन बाणूगडे पाटील उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
उद्धव ठाकरेंची
रोगग्रस्त द्राक्षबागांना भेट
सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे रोगग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केली. त्यांनी द्राक्ष बागाइतदार आणि इतर शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. त्यांच्या सोबत जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार अनिल बाबर, जिल्हा कृषि अधीक्षक राजेंद्र साबळे उपस्थित होते.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत लाभार्थींना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. आळते येथील शेतकरी अजित पाटील यांना ३५ एचपी ट्रॅक्टर, वैष्णवी पाटील यांना २० एचपी ट्रॅक्टर तर शहाजी पाटील, मीनाताई पोतदार, दशरथ पाटील व हणमंत लाड यांना पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले. मंत्री शिवतारे यांनी रोगामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना कृषी खात्याने कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून लाभ मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निट्टूर येथे ट्रॅक्टर घरात घुसला

$
0
0

आजरा

निट्टूर (ता. चंदगड) येथे गिअर निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या ट्रॅक्टरच्या अपघातात दोन घरांच्या भिंती, विद्युत व टेलिफोन खांब व विजेच्या तारांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. निट्टूरच्या वेशीमधील प्राथमिक शाळा व ओढा या दरम्यानच्या उतरावरील अरुंद रस्त्यावर ही घटना शनिवारी रात्री १० च्या सुमारास घडली.

कोवाड-माणगाव मार्गावरून डुक्करवाडी येथून हेमरस कारखान्याकडे ट्रॅक्टर (क्र. एमच-०९, एएल-८५६२) ऊस वाहतूक करीत होता. रात्री या ट्रॅक्टरवर बाळू जोतिबा गावडे चालक होते. मात्र निट्टूर गावनजिक एल आकाराच्या उतारावर अचानक या ट्रॅक्टरचा गिअर निकामी झाला. त्यामुळे चालक गावडे यांनी आरडाओरड करीत उडी मारली. त्यामुळे ते बचावले. दरम्यान, या ट्रॅक्टरसमोरून दुचाकीवरून एकनाथ पाटील येत होते. ते बाजूला झाल्याने बचावले. पण या दरम्यान त्यांच्या अंगावर तुटलेल्या वीज तारा पडल्या. सुदैवाने त्यातून वीजपुरवठा होत नव्हता. दरम्यान, तेथील रस्त्याकडेच्या वीज व टेलिफोन खांबांना धडक मारून समोरील भरमाणा दत्तात्रय पाटील यांच्या चौकटीतून ट्रॅक्टर घरात शिरला. पण त्या खोलीमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली. खांब वाकल्याने १५ घरातील वीजपुरवठा खंडित झाला. विजेचा खांब, टेलिफोन खांब व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक दिंडोर्लोंची वकिलाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वत:च्या मुलीला भेटायला आलेल्या वकिलाला नगरसेवक राजू दिंडोर्ले आणि सासरच्या नातेवाईकांनी रविवारी बेदम मारहाण केली. ११ नोव्हेंबर रोजी सानेगुरुजी परिसरात ही घटना घडली. सातारा शहर पोलिस ठाण्याकडून दाखल झालेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुना राजवाडा पोलिसांनी माहिती दिली, फिर्यादी राजमोहन मोहन खारकर (वय ३२, रा. अमराई शाहूनगर, गोडोली, ता.सातारा) हे वकील असून त्यांचा विवाह सानेगुरुजी वसाहतील सपना उर्फ श्रिया अरुण हराळे (राणेजी कॉलनी, साने गुरुजी वसाहत) यांच्याशी १२ मे, २०१३ मध्ये झाला. त्यांना ईरा नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. २५ सप्टेंबर, २०१६ मध्ये सपना या साताऱ्याहून माहेरी कोल्हापुरात रहायला आल्या. त्या परत सासरी साताऱ्याला गेल्या नाहीत. ११ नोव्हेंबर रोजी राजमोहन खारकर मुलगी ईराला भेटण्यासाठी रात्री कारने सानेगुरुजी वसाहत येथे आले. खारकर यांना मुलीला भेटण्यासाठी सपनाच्या नातेवाईकांनी विरोध केला. यावेळी खारकर व हराळे यांच्यात वाद झाला. वादावादीतून सपनाचे वडील अरुण विष्णुपंत हराळे, मेहणे अक्षय हराळे, पत्नी सपना, चुलत मेहुणा राजू दिंडोर्ले व त्यांच्या भावाने खारकर यांना लाथा बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमी अवस्थेतील खारकर हे कोल्हापुरातील नातलगांकडे गेले. नातलगांनी त्यांना साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. खारकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सातारा पोलिसांनी खारकर यांची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे वर्ग केली. त्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी नगरसेवक दिंडोर्ले यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांवर आज हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतुकीला व पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिका सोमवारपासून (२७ नोव्हेंबर) हातोडा चालवणार आहे. साडेपाचशेहून अधिक अनाधिकृत केबीन्स व फुटपाथवरील अतिक्रमणे या मोहिमेच्या टार्गेटवर आहेत. यासाठी दोन जेसीबी, डंपर, टॅक्टर, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग अशा साऱ्या यंत्रणांचे पथक तयार करण्यात आले आहे. जवळपास सव्वाशेहून अधिक कर्मचारी या मोहिमेत सहभागी करण्यात येणार असून फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा इशारा दिला असल्याने कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व्हेनुसार शहरात २२२ केबीन्स तर दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या १७३ केबीन्स अधिकृत आहेत. विविध वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर या व्यतिरिक्तच्या अनाधिकृत केबीन्स थाटण्याचे पेवच शहरात फुटले होते. त्यामुळे एका रात्रीत अनेक ठिकाणी केबीन्स आणून ठेवल्या जात होत्या. अशा केबीन्समध्ये कालांतराने व्यवसाय सुरू केले जात होते. याबरोबरच अनेक फुटपाथवरही अशा अनाधिकृत केबीन्स बसवल्या होत्या. त्याचा पादचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. शहरात प्रवेश करणाऱ्या नऊ रस्त्यांवरही या केबीन्स बसवल्या जात असल्याने विद्रुपीकरणही होत होते. यामुळे महापालिकेने गेल्या महिन्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने ही मो​हीम पुढे जात होती. पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त देण्याच्या तारखा निश्चित करून निर्मूलन मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

यानुसार प्रत्येक विभागीय कार्यालय तसेच त्यांच्याशी संबंधित पोलिस ठाणे यांचे नियोजन करून सोमवारपासून मोहीम राबवण्याचे निश्चित केले आहे. शहरातील प्रवेशाच्या नऊ रस्त्यांवरील अनाधिकृत केबीन्स हटवण्यासाठी चारही विभागीय कार्यालयातून प्रत्येकी २५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांबरोबर अग्निशमन विभाग, विद्युत विभागातील कर्मचारी देण्यात आले आहेत. केबीन्स काढण्यासाठी व‌िजेच्या तारांचा अडथळा येत असेल तर मोहीम थांबू नये म्हणून विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांकडून तेथील ​वीजपुरवठा बंद करुन मो​हीम पुढे सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच जमिनीमध्ये केबीन्स बसवल्या असल्या तर त्या कापून काढण्यासाठी कटरची व्यवस्थाही केली आहे.

फुटपाथवरील अतिक्रमणे काढणार

महापालिकेने केवळ अनाधिकृत केबीन्स तसेच फुटपाथवर अडथळा होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही फेरीवाल्यांवर कारवाई झाली तर विरोध करण्यात येईल, असे फेरीवाला कृती समितीने जाहीर केले आहे. याबरोबरच काही ठिकाणी केबीन्सधारकांचाही विरोध होण्याची शक्यता गृहीत धरुन कडक पोलिस बंदोबस्त सोबत देण्यात येणार आहे. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच काढण्यात येणाऱ्या केबीन्स जप्त करण्यात येणार आहेत.

कसे असेल नियोजन

उपनगरातून कारवाई सुरू करुन सर्वात शेवटी शहरातील मध्यवस्तीमध्ये कारवाई करण्याचे नियोजन होते. मात्र शहरात प्रथम कारवाई करा, असे उपनगरातील नगरसेवकांनी सांगितले असल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी दहा वाजता सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त कोणत्या ठिकाणी कारवाई केली जाणार ही बाब गोपनीय ठेवली आहे. तरीही पहिल्या दिवशी एक नंबर विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली जाणार असल्याचे समजते.


कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा

१२५

एकूण कर्मचारी संख्या

कटर, जेसीबी, डंपर, टॅक्टर

अग्निशमन विभाग व विद्युत विभागाचे कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्यापोलिसाची बदली

$
0
0

इचलकरंजी

खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत यंत्रमाग कामगाराकडे खंडणी मागणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग जाधवर याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामध्ये आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.

कसलाही गुन्हा नसताना खाकीचा धाक दाखवून खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पांडुरंग जाधवर याने यंत्रमाग कामगाराकडे खंडणी मागितल्याचे मोबाइलवरील संभाषण व्हायरल झाल्यानंतर पोलिस दलातील खाबुगिरी पुन्हा ऐरणीवर आली. हे संभाषण शहापूर पोलिस स्टेशनमधील कॉन्स्टेबल जाधवर व खोतवाडी येथील एका व्यक्तीमध्ये झाले आहे. हे संभाषण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती लागले असून गोपनीय चौकशी सुरु केली आहे. उसनवार घेतलेले वीस हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्यामुळे मित्रानेच एकाचा खून केला होता. या खुनाच्या घटनेमध्ये अडकवण्याची धमकी देऊन कॉन्स्टेबल जाधवर याने यंत्रमाग कामगाराकडे खंडणी मागितली. जर पैसे एकदम देण्यास जमत नसेल तर थोडे थोडे करून दे असेही संभाषणात म्हटले आहे. सुमारे वीस मिनिटांचे हे संभाषण आहे. या प्रकाराची दखल घेत जाधवर याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रडू नका, थेट रस्त्यावर उतरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘दबलात तर संपलात... स्वतःची दुखणी सांगत रडण्यापेक्षा रस्त्यावर उतरा, जळून जाऊ नका, अन्याय करणाऱ्यांना जाळा, जानेवारीत मुंबईत मोर्चा काढू, मी तुमच्यासोबत आहे. निश्चितच उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या समस्या सुटतील,’ असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यापारी, उद्योजकांना दिला. कोल्हापुरात शनिवारी उद्योजक, व्यापाऱ्यांसमवेत हॉटेल सयाजी येथे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू असून, व्यापारी आणि उद्योजकांच्या हक्कासाठी लढ्याचे पहिले रणशिंग कोल्हापुरातून फुंकले जाईल, त्यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाकरे म्हणाले, ‘जीएसटी, नोटाबंदीचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणीची पद्धत वाईट आहे. जीएसटी, नोटांबदीसह भूसंपादनाला प्रथम विरोध केला. बांधकाम व्यवसायातील रेरा तर काहींच्या दुर्दैवाचा फेरा ठरला आहे. गुजरातमधील व्यापारी जीएसटीविरोधात उतरले आहेत. मग महाराष्ट्रातील व्यापारी गप्प का? सरकारकडून व्यापारी, उद्योजकांची पिळवणूक करण्याचे काम सुरू आहे. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी रडणे आणि दुखणी सांगण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. राज्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पहिल्या टप्प्यात लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली जाईल. त्यातून तोडगा न निघाल्यास जानेवारीत मुंबईत महामोर्चा काढू. अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम आहे. ही एक प्रकारची पाकीटमारी आहे. चलाखी दाखवून आणि पिळवणूक करूनच सर्वसामान्यांचा पैसा घेतला जातो. मात्र, त्या तुलनेत हजारो कोटी रुपयांचा कर देणाऱ्यांना सवलत आणि प्राथमिक सुविधा दिल्या जात नाहीत. अनेक उद्योगांना वीज, रस्ते, पाणी नाही. केवळ विकासाचा आभास निर्माण करून जाहिरातबाजीतून सर्वसामान्यांना फसविले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी व्यापारी आणि उद्योजकांसाठी परिसंवाद घेऊ. कोल्हापूर, सांगली, सातारा, विदर्भासह राज्यातील उद्योजक, व्यापाऱ्यांना मुंबईत बोलाविले जाणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून केली जाणार आहे.’

यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन कीर्तिकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आदी उपस्थित होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी स्वागत केले.

रामदेवबाबांचा योगायोग

योगगुरू रामदेवबाबा गेल्या वर्षी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उद्योग आणि व्यापारासाठी चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, रामदेवबाबा स्वतःच उद्योजक झाले आणि कोल्हापूरच्या मूळ उद्योजकांना रडायची वेळ आली आहे. त्यामुळे एखादा मोठा उद्योग आणण्यापेक्षा स्थानिक कामगारांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद करण्यास संधी देऊ नका. मुंबईत अनेक सूतगिरण्या याच कारणामुळे बंद पडल्या आहेत. हजारो कामगारांना आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावून नवीन उद्योग करू नयेत, असा टोलाही कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लगावला.

व्यापारी, उद्योजकांनी मांडले प्रश्न

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांचे काही प्रश्न सोडविले. मात्र, अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची मागणी उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या. चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, ‘जीएसटीचे आजअखेर १७ जीआर निघाले आहेत. त्याचा मोठा फटका उद्योजकांना बसत आहे. ग्रामीण उद्योग, चांदी आणि वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे.’ कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर म्हणाले, ‘एलबीटीची असेसमेंटसह त्यासाठी नेमलेली सीएची समिती रद्द करावी. जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीमधून वगळावे. व्यापाऱ्यांना लागू असलेली २० लाखांची करमर्यादा ५० लाखांपर्यंत वाढवावी.’ चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, ‘महाराष्ट्रात वीज दराची मोठी तफावत आहे. विदर्भात विजेसाठी सबसिडी दिली जाते. त्या तुलनेते महाराष्ट्राला सवलत दिली जात नाही. विजेशी संलग्न नवे तंत्रज्ञान बदलण्याची गरज आहे.’

‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, ‘एमआयडीसीत अतिक्रमणे वाढत आहे. त्यामुळे दळणवळणास मोठी अडचण निर्माण होत आहे. उद्योगमंत्री देसाई यांच्यासमवेत उद्योजकांच्या दोन बैठका झाल्या. त्यातून काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. कोल्हापुरात मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’ गोशिमाचे सूरजितसिंग पवार म्हणाले, ‘उद्योगांच्या वाढीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यासाठी लघुउद्योगांना अधिक चालना देण्याची गरज आहे.’ इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, ‘शेती उद्योगासाठी लागणाऱ्या साधनांना जीएसटी लागू केल्याने शेती उद्योग अडचणीत आला आहे.’ क्रेडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, ‘बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करावी. ‘ड’ वर्ग महापालिकेसाठी लागू केलेल्या नियमावलीत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे व्यवसायाला अधिक चालना मिळालेली नाही. दहा हजार चौरस फुटांच्या आत बांधकाम करणाऱ्यांना नवीन नियमांतून सूट देण्याची गरज आहे.’ केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘औषधावर दोन प्रकारचे कर केल्यास औषधे स्वस्त होतील. मुदत संपलेल्या औषधांविषयाची काहीच तरतूद जीएसटीत नाही. त्यासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही.’ इचलकरंजीचे ओम बियाणी म्हणाले, ‘इचलकरंजीतील अनेक उद्योग अडचणीत आहेत. इचलकरंजीतील गुंडगिरी बंद करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेण्याची गरज आहे.’

यावेळी चेंबरचे मानद सचिव जयेश ओसवाल, ऑटोमोबाइल स्पेअर स्पार्टचे प्रवीण शहा, टिंबर असोसिएशनचे डाह्याभाई पटेल, कांतिभाई पटेल, व्यापारी असोसिएशनचे जयंत गोयानी, मॅकचे उपाध्यक्ष गोरख माळी, स्मॅकचे माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी एसआरपी पोलिसांना चोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपी) दोन पोलिसांना कसबा बावड्यातील नागरिकांनी शनिवारी रात्री बेदम चोप दिला. या दोन पोलिसांना मारल्याच्या रागातून स्टीक, बॅट आणि अन्य साहित्य घेऊन आलेल्या अन्य पोलिसांना नागरिकांनी पिटाळून लावले. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मद्यपान केल्यानंतर त्यांनी एका हॉटेलच्या दारात लघुशंका केली, यावरून वाद वाढला. पोलिसांनी माफी मागितल्यावर या घटनेवर पडला पडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची तुकडी कोल्हापुरात आली होती. कसबा बावड्यातील चौथ्या बस स्टॉपजवळ त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी रात्री रेणुका मंदिराजवळील एका हॉटेलमध्ये एसआरपीचे दोन पोलिस जेवायला आले होते. दोघांनी मद्यप्राशन केले होते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर दोघे हॉटेलच्या दारातच लघुशंका करू लागले. यावेळी हॉटेलचे कर्मचारी व स्थानिक परिसरातील तरुणांनी लघुशंका करू नका, अशी सूचना केली. त्यावेळी ते दोघेही तरुणाच्या अंगावर दोघे पोलिस धावून गेले. त्याला कानशिलात लावून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी परिसरातील तरुणांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरुणांनाही त्यांनी शिविगाळ केली. ही घटना कळताच कसबा बावडा परिसरातील तरुण घटनास्थळी जमा झाले. त्यांनी त्या दोन पोलिसांना बेदम चोप दिला. त्यानंतर दोघे पोलिस पळून गेले. त्यांनी निवासातील सहकाऱ्यांना मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर दोन पोलिसांसह त्यांचे आठ ते दहा सहकारी हॉकी स्टीक, बॅट, फायबर स्टीक घेऊन रेणुका मंदिर परिसरात येऊ लागले. यावेळी उपस्थित जमावाने हातात दगड विटा भिरकावत चाल करून आल्यावर एसआरपीचे पोलिस पळून गेले.

दरम्यान या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना कळताच ते घटनास्थळी आले. हॉटेलच्या कर्मचारी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला. पण एसआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेणुका मंदिर परिसरातील नागरिकांना तक्रार न देण्याची विनंती केली. लघुशंका करणाऱ्या दोन पोलिसांनी माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला.

एसआरपीकडे अहवाल पाठवण्याची शक्यता?

शनिवारी रात्री झालेल्या घटनेप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नाही. पण झालेल्या प्रकारचा अहवाल एसआरपीच्या प्रमुखांना शाहूपुरी पोलिस पाठवण्याची शक्यता आहे. दोषी पोलिसांच्यावर खातेअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांसाठी धोक्याचा अलार्म

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com
Tweet:@udaysingpatilMT

कोल्हापूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषणाच्या निश्चितीसाठी जी मानके ठरवली आहेत, त्यांपेक्षाही अधिक प्रदूषण कोल्हापूरमध्ये होत आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्रातील १७ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांपाठोपाठ कोल्हापूरचाही समावेश यात झाला आहे ही गंभीर बाब आहे. प्रदूषण मंडळाने हवेबाबत ठरवलेल्या मानकांपेक्षा शहरात प्रदूषणाचे प्रमाण किती तरी जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूरचा समावेश राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांमध्ये झाला आहे. हे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. हा शहरवासियांसाठी धोक्याचा अलार्म आहे. त्यामुळे यापासून शहराला वाचविण्यासाठी आतापासूनच उपाययोजना राबवल्या नाहीत तर कोल्हापूर पूर्वीसारखे आल्हाददायक राहणारच नाही हे वास्तव आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११ ते २०१५ या कालावधीत केलेल्या पाहणीनंतर आलेल्या नोंदीनुसार कोल्हापूरचा समावेश राज्यातील १७ प्रदूषित शहरात केला आहे. या पाहणीपासून सलग शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या माध्यमातून हवा प्रदूषणाबाबत निरीक्षण करण्यात येत आहे. या अहवालानंतरच्या गेली तीन वर्षे केलेल्या पाहणीत प्रदूषणाचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसले आहे. त्यात सल्फरचे प्रमाण कमी दिसत असले तरी नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त दिसून आले आहे. वातावरणात त्यापेक्षा जास्त धुलीकणांचे प्रमाण आढळले आहे.

गेल्या तीन वर्षांची सरासरी पाहिल्यास प्रदूषणाचे प्रमाण मानकांपेक्षा जास्तच दिसून येते. हवेतील प्रदूषणाची अॅलर्जी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वसनाच्या विकारांना आमंत्रण दिले जात असून त्वचा विकारही दिसून येत आहेत. वस्तूतः कोल्हापूर हे स्वच्छ हवा व आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. त्याला शहर परिसरातील हिरवाईसुद्धा कारणीभूत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरासह उपनगरांतील काँक्रीटच्या जंगलाने हिरवाईचे प्रमाण घटवले आहे. नव्या उद्योगांची उभारणी, वाढलेली वाहनसंख्या यांतून वातावरण बदलले आहे. जिल्ह्यातही वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात तर कोणताही रस्ता वाहनाविना दिसत नाही. वर्दळीच्या रस्त्यांवर तर सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत धावणाऱ्या वाहनांमुळे धुराचे प्रमाण प्रचंड असते. या काळात प्रवास केल्यास डोळे चुरचुरतात. हवेचे प्रदूषण वाढल्याचे हे लक्षण सर्वांनाच जाणवत आहे.

शहरातील स्टेशन रोड, ताराराणी चौक, शिवाजी पुतळा, गंगावेश, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, राजारामपुरी, कसबा बावडा, ​रंकाळा रोड, फुलेवाडी रोड, सानेगुरुजी रोड, कळंबा फिल्टर हाऊस या वर्दळीच्या ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण जास्तच असते. रस्त्यावर धावणारी वाहने याला कारणीभूत आहेत. दुचाकींसह रिक्षा, मालवाहू ट्रक, केएमटी, एसटी अशा वाहनांच्या धुराचे प्रमाण अधिक आहे. या धुरातील सल्फर व नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण शरीराला घातक ठरते. हवेत धुळीकणांचेही प्रमाण अधिक आहे. यांसह शहरालगत शेतातील पाचट पेटवणे, गुऱ्हाळांसाठी पेटवण्यात येणारी चिपाडे, वीटभट्ट्या, अन्य भट्ट्या, कारखाने यांतूनही हवेतील दूषित कणांचे प्रमाण वाढत आहे.

......

अन्य शहरांचा विचार केला तर आपल्या शहरातील प्रदूषण कमी वाटते. पण प्रदूषणात सातत्याने होणारी वाढ धोकादायक आहे. हा वातावरणाने दिलेला अलार्म म्हणावा लागेल. शहरात नियमित स्वच्छता न केल्यास धुलीकण वाढण्यास मदत होते. रस्त्यांवरील झाडे कमी असल्याने धुळीसह इतर वायूंचे कण स्थिरावण्यास जी झाडांची हवेतून थेट शरीराच्या संपर्कात येतात. त्यामुळेच श्वसन विकारांचा, अॅलर्जीचा धोका आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कृतिशील उपायांची गरज आहे.

डॉ. पी. डी. राऊत, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीकरांनी चूक पोटात घ्यावीकोथळे प्रकरणी आयजी नागरे-पाटील आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘सांगली शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत घडलेले अनिकेत कोथळे प्रकरण गंभीरच आहे. पोलिसांची ही गंभीर चूक सांगलीकरांनी पोटात घ्यावी. आमच्या चुका कबुल करून जनतेचे बोल आणि सूचना ऐकूण घेऊ, पण बदमांशाचे नाही. अनिकेत कोथळे प्रकरणाचा तपास योग्य आणि निःपक्षपातीपणे सुरू असून, जनतेने सीआयडीवर विश्वास ठेवावा,’ असे आवाहन कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.
समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करुन नांगरे-पाटील, सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी सर्वांच्या अपेक्षा आणि पोलिस यंत्रणेबाबतच्या तक्रारी, सूचना ऐकूण घेतल्या. घरफोडी, चोऱ्या, वाटमाऱ्या, आठवडा बाजारातील चोरीच्या घटना, वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून होणारी अडवणूक, महिला, मुलींच्या छेडछाडींपासून ते पोलिस तक्रार घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यापर्यंच्या तक्रारी या वेळी मांडण्यात आल्या. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवराळ भाषांबाबतही काही प्रतिनिधींनी चांगलेच सुनावले. काहींनी पोलिस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन त्यांच्या बाबतचे चांगले अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला.
सुमारे दोन तासांहून अधिक काळ जनतेच्या प्रतिनिधींचे एकूण घेतल्यानंतर नांगरे-पाटील म्हणाले, ‘गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करून गुन्हेगारी आळा बसल्याचा दावा करणे बरोबर नाही. कोथळे प्रकरणातही ३ नोव्हेंबर रोजी निलेश खत्री आणि अनिकेत यांच्यात घडलेल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नाही. ५ नोव्हेंबरच्या पहाटेच्या लुटमारीची फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला माघारी पिटाळण्यात आले. सोमवारी पहाटे त्या तक्रारीची नोंद करून अनिकेत आणि अमोल भंडारे या दोघांना त्या गुन्ह्यात अटक केली गेली. या बाबत सीआयडी सखोल तपास करीत आहे. नेमके वास्तव समोर येईलच. परंतु, अनेक घटनांच्या बाबतीत सांगली पोलिसांची दिरंगाई समोर येत आहे. हे अतिशय गंभीर आहे. जनतेच्या करातून आमचा पगार होत असल्याने जनतेच्या अपेक्षापूर्ती करणे हे आमचे काम आहे. ठाणे अंमलदारांबाबतीत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येक पोलिस ठाणे तक्रारीचे निवारण केंद्र ठरेल, अशी उपाययोजना केली जाईल. पोलिसही एक माणूसच आहे. त्याला सुट्टी, सण, उत्सव असे काहीच नसते. लोकसंख्या जास्त आणि पोलिस बल कमी असल्याने मानसिक तणावाखालीच काम करावे लागते. त्यामुळे काही चुका होतात. परंतु, शहर पोलिस ठाण्यातील चूक अतिशय गंभीरच आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.’
पोलिस अधीक्षक शर्मा यांनीही जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने आमचे पाऊल पडेल, अशी ग्वाही दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्यासह अन्य अधिकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातीभेदामुळे देशाचे मोठे नुकसानः राजन खान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी
‘संत आणि वारकऱ्यांनी आपण एक होण्यासाठी साहित्य चळवळ उभारली. तर महावीर, कबीर आणि बसवअण्णापासून फुले, आंबेडकर महात्मा गांधीपर्यंत सर्वांनी आपल्याला शांततेने एकोप्याने माणूस म्हणून जगण्याचा सल्ला दिला. परंतु, आपण या सर्वांची देउळे बांधून, महात्मे करून कर्मकांडाने त्यांना जाती-पातीत विभागून घेतले. म्हणूनच देव, धर्म, जाती, लिंगभेद आणि भ्रष्टाचार या पाच गोष्टींनीच देशाची वाट लावली आहे,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केली.
कारदगा (ता. चिकोडी) येथे साहित्य विकास मंडळाच्या वतीने आयोजित २२व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. संमेलनाच्या व्यासपीठाला दिवंगत डॉ. भीमराव गस्ती यांचे नाव देण्यात आले होते. उद्घाटन खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केले.
खान म्हणाले, ‘जात, धर्म, लिंग एवढेच मेंदूत असेल तर त्यामुळे माणसातील माणूसपण बाजूला जाते. जेवढी माणसे युद्धात मारली गेली नाहीत तेवढी माणसं धर्मकांडाने मारली. संविधाना सारखा जागतिक दर्जांचा ग्रंथ लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जातीच्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले. मग आपल्याला भारतीय म्हणून संविधान दिन पाळण्याचा अधिकार आहे का? कुठलाही एक दिवस पाळून त्याचा वर्षभर किती अंमल होतो? आपण आपआपसात भांडून समाज आणि घरात तेढ निर्माण करीत आहोत. भारतीयांनी शोधलेली गमतीशीर आणि मजेदार व भंपक गोष्ट कुठली असेल तर ती जात आहे. देशात सरकारी आकड्यानुसार आठ हजार जाती आणि प्रत्येकच्या दहा-बारा पोटजाती आहेत. जात-पात न मानणारे युरोपीय आणि जपानी देश जगात चांगले शोध लावत आहेत. भारतात मात्र एकही शोध लागलेला नाही.’
मला भारतीय म्हणून देशाचा खरोखरच अभिमान आहे. परंतु, पाकिस्तान नाव काढल्याशिवाय भारतीयांचा अभिमानच जागा होत नाही. निवडणुकीत पैसे घेऊनही उमेदवारांशी अप्रामाणिक वागतो. आपल्या देशात परस्त्रीला मातेसमान मानले जात असताना दर तीन मिनिटाला एका महिलेवर बलात्कार का होतो, असा असा सवालही खान यांनी केला.
खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, ‘आमच्या भागात सीमाप्रश्न अथवा भाषिक वाद नाहीत. कर्नाटक व महाराष्ट्र भावा-भावासारखे आहेत. सीमाभातील महाराष्ट्रातील साखर कारखानदारीने आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण केले आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा पातळीवर असे मराठी साहित्य संमेलन व्हावे. त्यासाठी लागेल ती मदत करू.’
माजी आमदार काका पाटील म्हणाले, ‘गेली २२ वर्षे मराठी साहित्य संमेलन भरते ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. साहित्याचा हा जागर चिरंतन सुरू रहावा.’ अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी माजी आमदार सुभाष जोशी, प्रदीप जाधव, अजित पाटील, प्रा. चंद्रकुमार नलगे, उत्तम पाटील, श्रीकांत नाईक आदी उपस्थित होते. स्वागत ग्रामपंचायत अध्यक्षा शिवूबाई गावडे, प्रास्ताविक संमेलनाच्या कार्याध्यक्षा कल्पना रायजाधव यांनी तर सुचित बुडके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images