Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सुविधा केंद्राच्या फेरकरारावर आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे कर भरुन घेण्याबरोबरच विविध सुविधा देण्यासाठी नेमण्यात आलेल्या एचसीएल कंपनीची मुदत पुढील वर्षात मेमध्ये संपणार आहे. त्यांच्याशी पुन्हा करार करू नये. सुविधा केंद्राचा करार संपण्यापूर्वी दहा वर्षातील डाटा महापालिकेने ताब्यात घ्यावा, अन्यथा कंपनी हा डाटा गहाळ करण्याची शक्यता आहे, असे निवेदन युवक विद्यार्थी पालक प्रवेश हक्क व संरक्षण संघटनेने आयुक्तांना दिले.

जन्म मृत्यू दाखला तसेच विविध कर भरुन घेण्यासाठी एचसीएल कंपनीला काम दिले होते. यामधून कंपनीने मोठे उत्पन्न मिळवले असल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे. या कंपनीची मुदत २०१८ मध्ये संपणार आहे. पण कंपनीतील कारभारी व महापालिकेतील काही कारभारी मुदतवाढ देण्याचा वा नवीन कंपनी आणण्याच्या हालचाली करत आहेत. यापेक्षा महापालिकेने स्वतः या सुविधा द्याव्यात, असेही निवेदनात सुचवले. कंपनीचा सर्व डाटा महापालिकेकडे घेतल्याशिवाय त्यांना पूर्ण बिल देण्यात येऊ नये. गैरव्यवहार झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शिष्टमंडळात फिरोज सरगुर, सुशांत बोरगे, बाबूराव कदम, मधुकर हरेल, नागेस फरोड, रविंद्र मुतगी, मोहन पाटील, अजमल बागवान यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोटावेटरच्या पात्यात अडकून मृत्यू

$
0
0

कुडित्रे

नागदेववाडी (ता.करवीर) येथे रोटावेटरच्या साहाय्याने शेतात नांगरट करत असताना चालक दिलीप मारुती पाटील (रा. नागदेववाडी) यांचा रोटावेटरच्या पात्यात अडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

नागदेववाडी येथील दिलीप पाटील हे गेली १५ वर्षे रोटावेटरच्या माध्यमातून नांगरट व अन्य शेतीची कामे भाडे तत्त्वावर करण्याचे काम करत होते. नेहमीप्रमाणे ते बुधवारी गावातील खंडेराव बाबूराव दिवसे यांच्या ‘देवमुळी’ परिसरातील नदीकडच्या शेतात नांगरणीसाठी गेले होते. नांगरणी करत असताना बांधावरून रोटावेटर खाली घसरला व त्यांचा ताबा निसटला. बांधाच्या सुमारे १० फूट अंतरावर नदीपात्र होते. त्यामुळे रोटावेटर नदीपात्रात जाऊ नये म्हणून पाटील यांनी रोटावेटर थांबण्याचा प्रयत्न सुरू केला. यातच पाटील हे रोटावेटरच्या पात्यात अडकले आणि त्यासोबत गुंडाळले गेले. पाटील रोटावेटरच्या पात्यात अडकल्याचे समजताच खंडेराव दिवसे व त्यांच्या पत्नी गुणाबाई दिवसे यांनी आरडाओरडा करून सभोवतालच्या शेतकऱ्यांना बोलावले. दरम्यान, रोटावेटर पलटी झाला होता. लोकांनी रोटावेटर बंद करून पाटील यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण पाटील यांचा देह पात्यात सापडून छिन्नविछीन झाल्यामुळे बाहेर काढता येत नव्हता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर मेस्त्रीला बोलावून रोटावेटरची सर्व पाती रिकामी केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीच्या एसपींची आज चौकशी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोर भंडारे याचा सीआयडीने बुधवारी कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. या प्रकरणी निलंबित केलेल्या सातही पोलिसांची चौकशी आणि जबाब रात्री उशीरापर्यंत नोंदविले जात होते. चौकशीसाठी सीआयडीने सांगलीजवळच्या पाच जिल्ह्यातील सीआयडी पथकाचा कँपच लावला आहे.

अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांनाही जबाबासाठी बोलावले असून त्यांचा नेमका आक्षेप काय आहे? याची पडताळणी केली जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या कृत्याची विविध कारणे समोर येत असून ती सर्व तपासली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सांगलीचे एसपी दत्तात्रय ‌शिंदे व डीवायएसपी दीपाली काळे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

सध्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त पुरावे संकलित करण्यावर भर देण्यात येत आहे. संशयित उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झाकीर पट्टेवाले या सर्वांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवले आहे. त्यांना तपासाठी सीआयडी कँपमध्ये आणले जाते. ज्यांच्यासमोर पोलिस गुन्हेगारांनी अनिकेतचा अमानुषपणे जीव घेतला त्या सर्व सात पोलिसांना निलंबित केले असून त्याची चौकशी सीआयडीने सुरू केली आहे. यामध्ये ठाणे अंमलदार मिलिंद शिंदेसह प्रदीप जाधव, गजानन व्हावळ , श्रीकांत बुलबुले, स्वरुपा संतोष पाटील, ज्योती वाजे आणि सुभद्रा साबळे यांचा समावेश आहे.


खाकी वर्दीतील गुंडांना आधी गोळ्या घाला...

गोळ्या घालण्याची इतकीच खुमखुमी असेल तर सरकारने आधी खाकी वर्दीतील गुंडांना गोळ्या घाला आणि त्यानंतर सामान्य शेतकऱ्यांची चळवळ दडपण्यासाठी गोळ्या झाडाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत बोलताना दिली. नगरमध्ये शांततेत सुरू असणारे शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला खाकी वर्दीतील गुंड न्यायासाठी लढणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांवर गोळ्या झाडत आहेत, तर सांगलीत खोट्या गुन्ह्यात अडकवून निरपराध तरूणाचा खून करण्याचा पराक्रम खाकी वर्दीतील गुंड करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

०००००००००००००००००००

डीएनए अहवाल लवकरच

वास्तविक डीएनए चाचणीचा अहवाल यायला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु कोथळे खून प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनीच अनिकेतचा खून करून त्याचा मृतदेह जाळून मुख्य पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीव्दारे तो मृतदेह अनिकेतचाच आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तपासाला गती येण्यासाठी डीएनएचा अहवाल लवकर मिळविण्यासाठी सरकार पातळीवरुनच प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच चिता रचून संपविली जीवनयात्रा

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

स्वत:ची चिता स्वत:च्याच घरात रचून आत्महत्या करणाऱ्या बामणी (ता.कागल) येथील वृध्देच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभा केले आहेत. कुटुंबव्यवस्थेच्या पडझडीचे विदारक लोण बामणीतील कल्लवा दादू कांबळे या ८५ वर्षाच्या वृध्देच्या मृत्यूच्या निमित्ताने ग्रामीण भागात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन विवाहीत मुली आणि शेजारीच राहणारा एकुलता एक मुलगा असताना या वृध्दने घरातच स्वत:ची चिता रचून आपली जीवनयात्रा संपवली. परंतु तिच्या जाण्याने समाजव्यवस्थेत ‘नात्याचीच माती’ झाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

सोमवारी मध्यरात्री कल्लवा कांबळे या वृध्देने घरात आपली चिता रचली. चिता पेटण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सरपण व रॉकेलची जुळणी तिने अगोदरच केली होती. आपल्या मुलापासून ती बाजूलाच एका घरात विभक्त रहात होती. परंतु तिला आवश्यक असणारे दुध व इतर साहित्य तिची नातवंडे तिला पोहच करीत होती. सुमारे १५ वर्षांपासून त्या विभक्तच रहात होत्या. तिच्या मुलींना भावाच्या मालमत्तेतील हिस्सा पाहीजे होता. परंतु या वृध्देने मुलींची समजूत काढायचा प्रयत्न केल्याने मुलीही तिच्याकडे हळूहळू दुर्लक्ष करु लागल्या. मंगळवारी या वृध्देला एका मुलीकडे पाठवायचे होते. मुलाच्या पोटगीवरच तिची गुजराण होत असे. दिवसभर फिरुन कुणाच्याही घरात मागून मिळेल ते खाऊन ती आपला दिवस ढकलत असे. अशा परिस्थितीत तिला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही. मरण्यापूर्वी त्या आपण मरणार असल्याचे सांगत होत्या, परंतु त्या नेहमीच असे बडबडत असल्याने सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

कांबळे या ज्या घरात राहत होत्या, ते पत्र्याचे तीन लहान खोल्यांचे घर आहे. त्यातील मध्यभागी असणाऱ्या खोलीत दरवाजे बंद करुन त्यांनी स्वत:ला संपवले. सकाळी त्यांची नात दूध द्यायला गेल्यावर ही बाब उघडकीस आली. या वृध्देचे घर इतर घरांपासून लांब असल्याने ही घटना शेजाऱ्यांच्याही लक्षात आली नाही. विशेष म्हणजे घरातून धुराचे लोट अथवा वरील पत्राही म्हणावा तसा जळाला नाही. सकाळपर्यंत मात्र या माऊलीच्या हाताचा आणि पायाचा थोडा भाग वगळता संपूर्ण शरीराची राख झाली होती. आपल्या वृध्दापकाळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

घराचेच झाले स्मशान

समाजाची संवेदनशीलता इतकीही बोथट होवू नये की घराचेच स्मशान व्हावे. स्वत:च्या घरात स्वत:ची चिता रचून एखादी माऊली अशा पध्दतीने आत्महत्या करीत असेल तर ही बाब एकूणच समाजव्यवस्थेला आत्मपरिक्षण करायला लावणारी असल्याची चर्चा परिसरात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाअनुदानित दीड हजार शिक्षक रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मी लाभार्थी... वेठबिगार, झाडू कामगार, सेंट्रिंग कामगार, हॉटेल कामगार अशा घोषणा आणि फलक दर्शवत जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित शाळांमधील दीड हजार शिक्षकांनी रस्त्यावर सरकारच्या अन्यायी धोरणाविरोधात एल्गार पुकारला. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीच्या धर्तीवर विडंबनात्मक मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले.

ढोल-ताशांच्या निनादात शिक्षकांनी बुधवारी सकाळ ​जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला. उद्याची पिढी घडवण्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांना​ किमान पगार देण्याबाबतही उदासीन असलेल्या सरकार व शिक्षण सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली.

समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, ‘सरकार सध्या मी लाभार्थी..., हे माझे सरकार अशी जाहिरातबाजी करत आहे. पण हे सरकार माझे आहे असे म्हणण्यासारखे शिक्षकांच्या आयुष्यात काहीच झालेले नाही. अनेक शिक्षकांची हयात ​फुकट ​अध्यापन करण्यात गेली आहे. गेली सोळा वर्षे विनावेतन काम करणाऱ्या आणि कधीतरी वेतन मंजूर होईल या आशेतून अध्यापन करणाऱ्या संजय मगदूम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्यासारख्या अनेक शिक्षकांच्या मृत्यूला सरकारचे अन्यायी धोरण कारणीभूत आहे.’

आता सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. राज्यातील शिक्षक तणावाखाली जगत आहे. अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत तर अनेकांचा मृत्यू झाला. मात्र केवळ पाहणी करण्यापलीकडे सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही अशा शब्दांत यावेळी शिक्षकांनी निषेध करण्यात आला.

निधीची तरतूद करावी, २० टक्के अनुदानपात्र शाळांना तातडीने अनुदान द्यावे, उर्वरित शाळांचे मूल्यांकन तातडीने सुरू करावे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. २००० साली मूल्यांकन झालेल्या शाळांना पात्र ठरल्याचा आदेश २०१६ साली काढण्यात आला. एकीकडे पाच वर्षे सत्तेत असलेल्या आमदारांना हजारांच्या पटीत मानधन, पेन्शन, भत्ते दिले जातात. मात्र, आयुष्यभर शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांना पगारही दिला जात नाही. ही विसंगती सरकारला शोभणारी नाही. जर सरकारला टिकायचे असेल तर त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा शिक्षकांच्या नुकसानीला सरकार जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी सुनील कल्याणी, आनंदा वारंग, प्रकाश पाटील, गजानन काटकर, राजेंद्र भोरे, प्रवीण पारखे आदींसह दीड हजार शिक्षक संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पद्मावती’ सेटच्या आगीचा तपास क्लोज

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com
tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर : नऊ महिन्यांपूर्वी पन्हाळा परिसरातील मसाई पठारावर ‘राणी पद्ममावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारलेल्या सेटला आग लावण्यात आली. या घटनेने कोल्हापूरकरांवर आरोपांच्या फैरी झडल्या गेल्या. देशभरात कोल्हापूरची बदनामी होऊन येथील चित्रीकरणाच्या व्यवसायावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले. पण नऊ महिन्यानंतर ही आग कुणी लावली? याचा शोध न लागल्याने पोलिस तपासाची फाइल बंद करण्यात आली आहे. केवळ प्रसिद्धीसाठीच सेटला आग लावल्याचा कांगावा केला गेल्याच्या चर्चेला यामुळे बळकटी येत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर सध्या जी आंदोलने सुरू आहेत, त्यालाही आता केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटच असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे.

राजस्थानमध्ये ‘राणी पद्ममावती’च्या चित्रीकरणाला विरोध झाल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कोल्हापूर गाठले. यासाठी मसाई पठारावर भव्य सेट उभारण्यात आला. युद्धाचे काही प्रसंग या पठारावर चित्रीत करण्यात येणार होते. याशिवाय भव्य महाल उभारण्यात आला होता. पण, नऊ ​महिन्यांपूर्वी म्हणजे १४ मार्च २०१७ रोजी रात्री बारा वाजल्यानंतर पन्नास व्यक्तींच्या एका गटाने तेथील सेट जाळण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल बाँबचा वापर करून आग लावल्याने चित्रीकरणासाठी आणलेले बरेच साहित्य जळाले. मौल्यवान वस्तू या आगीत खाक झाल्या. घोड्याचा तबेला पेटल्याने मोठे नुकसान झाले. याबाबत पन्हाळा पो​लिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘राणी पद्मावती’ची चुकीची प्रतिमा या चित्रपटात रंगवली जात असल्याचा आरोप करत आग लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला सांगली अथवा कोल्हापुरातील काही लोकांनी ही आग लावल्याचा आरोप झाला. नंतर आगीची जबाबदारी राजस्थानमधील करणी सेनेने घेतल्याचेही सांगण्यात आले. पण या सर्व चर्चेत सर्वाधिक बदनामी झाली ती कोल्हापूरची. देशपातळीवरील सर्वच प्रसारमाध्यमांत ही बातमी झळकली. त्यातून अनेकांनी कोल्हापूरांवर टीकेची झोड उठवली. स्थानिकांनीच ही आग लावली असे म्हणत कोल्हापूरच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. चित्रिकरणासाठी सुरक्षित ठिकाण असताना विनाकारण जिल्ह्याची बदनामी झाली. या भागात चित्रीकरण होत असल्याने अनेकांना रोजगार मिळतो. अशा घटनांनी त्याला आळा बसेल अशी भीतीही व्यक्त झाली.

देशभरातील प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्याने ही आग नक्की लावली कुणी याच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. त्यांनी तपास केला. या घटनेला नऊ महिने उलटले, मात्र यातील एकाही आरोपीपर्यंत पन्हाळा पोलिस पोहचू शकले नाहीत. पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपास केला. पण धागेदोरे मिळाले नाहीत. त्यामुळे याबाबत काही धागेदोरे मिळेपर्यंत फाइल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर पन्नास व्यक्ती येथे येऊन आग लावत असतील तर ते पोलिसांना कसे सापडत नाहीत?, राजस्थानमधून एवढे लोक आलेच कसे? कोल्हापूरचे लोक असतील तर त्यांनी असे का केले? श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांचा तपासात उपयोग का झाला नाही? असे अनेक प्रश्न नऊ महिन्यानंतरही कायम राहिले. त्यामुळे नवीनच शंका उपस्थित केली जात आहे. स्वतःच आग लावून चित्रपट वादग्रस्त करण्यासह अनुषांगिक विम्यासह अन्य लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात होता. या आरोपांचीही चर्चा तपासातील अपयशामुळे पुन्हा सुरू झाली आहे.


पन्हाळा पोलिसांनी काही महिने या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याबाबत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे मिळाले नाहीत. जोपर्यंत काही ठोस हाती लागत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा पोलिस तपास थांबवण्यात आला आहे.

रवी साळोखे, पोलिस निरीक्षक, पन्हाळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती कारखाना बंदपाडण्याचा प्रकार उघडकीस

$
0
0

राधानगरी

शाहूनगर, परिते ( ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस शुद्धीकरणाच्या भांडयाच्या स्कम विभागात तीन लोखंडी रॉड टाकून यंत्रणाच बंद पाडण्याचा गंभीर प्रकार बुधवारी उघडकीस आला. अज्ञातांनी केलेल्या या प्रकारामुळे तब्बल सोळा तास कारखाना बंद पडून लाखोंचे नुकसान झाले.

भोगावती कारखान्यात या वर्षीच्या गळीत हंगामात आतापर्यत १७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन उच्च दर्जाची साखर उत्पादित झाली आहे. मात्र बुधवारी सकाळी रसशुद्धीकरणाची प्रक्रिया बिघडल्याचे कामगारांच्या लक्षात आले. त्यामुळे कारखान्यातील ऊस गाळप थांबवण्यात आले. तज्ज्ञांकडून रसशुध्दीकरण प्रक्रिया व यंत्रणेची तपासणी केली असता भांड्यातील स्कममध्ये तीन मोठे लोखंडी रॉड सापडले. हे रॉड टाकल्यामुळे शुध्दीकरण प्रक्रियाच ठप्प होऊन मळी व रसाचे एकत्रीकरण होऊ लागले. परिणामी बुधवारी सकाळी सहापासून ऊस गाळपच थांबवण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील - कौलवकर व सहकारी रात्री उशिरापर्यंत कारखान्यावर उपस्थित होते.

कोणातरी विघ्नसंतुष्टाने या पध्दतीने कारखाना बंद पाडण्याचा प्रकार कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. या घटनेमुळे कारखाना तब्बल सोळा तास बंद ठेवायची वेळ आली. वाहनतळावरील ऊस वाळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कारखान्याचेही कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. या घटनेने कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. याबाबत अध्यक्ष पी.एन.पाटील म्हणाले, ‘ कारखान्याची माहिती असणाऱ्या अज्ञाताने हा प्रकार घडवला आहे. कारखाना बंद पाडण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी कामाच्या ताणाने आणखी दोन कर्मचारी रुग्णालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या याद्या अपलोड करताना बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिलिप वेसावे व जयंत पाटील या दोन कर्मचाऱ्यांना कामाच्या अतिताणामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. मंगळवारी सहायक निबंधक अमित दराडे यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर बुधवारी पुन्हा दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम जिल्हा बँकेच्या आयटी विभागात सुरू आहे. कामाचा निपटारा त्वरीत करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री १२ पर्यंत सहकार विभाग व जिल्हा बँकेचे कर्मचारी कामकाज करत आहेत. लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने काम लवकर संपवण्याच्या सुचनेमुळे कर्मचारी तणावात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी आजारी पडणाच्या घटना घडू लागल्या आहेत.

मंगळवारी कामाच्या अतिताणाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक अमित गराडे बेशुद्ध पडले होते. त्यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गराडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असतानाच बुधवारी पुन्हा जिल्हा बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकती बिघडली. संगणकावर काम सुरू असताना एकाचवेळी वेसावे व पाटील यांना अस्वस्थता जाणवू लागली. त्यांची अवस्था पाहूण कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा नदीतील सांडपाणी रोखण्याची आयुक्तांची ग्वाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यातून थेट पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने कोल्हापूरपासून पुढील ३४ गावांमधील ग्रामस्थांना काविळसारखे आजार होत आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याची बाब बुधवारी शिरढोण तसेच अन्य गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी, जयंती नाला येथील काम युद्धपातळीवर सुरू आहे. जास्तीत जास्त २५ दिवसांत हा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या जयंती नाल्यातील पाइपलाइन फुटल्याने १४ सप्टेंबरपासून मैलामिश्रित सांडपाणी नाल्यातून पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे. ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने काम करण्यास अडचणी येत होत्या. पाऊस संपल्यानंतर महापालिकेने काम सुरू केले आहे. त्यासाठी टेंडर भरले नसल्याने खास बाब म्हणून काम करुन घेतले जात आहे. सध्या नाल्यात नवीन पाइप बसवण्यासाठीचे काम केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिरढोण व अन्य गावातील ग्रामस्थांनी निवदेन दिले. पंचगंगा नदीमधील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवले आहे. सांडपाण्याचे प्रमाण तिथे वाढल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता गंभीर बनणार आहे. त्यामुळे तातडीने जयंती नाल्यातील काम पूर्ण करून सांडपाणी थांबवण्याची मागणी निवेदनात केली. सध्या मिसळत असलेल्या सांडपाण्यामुळे ३४ गावातील नागरिक व जनावरांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना उलटी, जुलाब, कावीळसारखे आजार होत आहेत. दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. ही प​रिस्थिती अशीच राहिली तर सर्वच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

सांडपाणी थांबवण्याचे काम तातडीने केले नाही तर जनआंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. या शिष्टमंडळात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई, विश्वास बालिघाटे, दादू चौगुले, अविनाश पाटील, अशोक मगदूम यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेशी वेतन करार कायदेशीरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वेतन करार बीआयआर कलम ५८ (१) नुसार कायदेशीर आहे. कायदेशीर करारात सहकार कायद्याला हस्तक्षेप करता येत नाही. बोनस, महागाई भत्ता, फरक याबाबत कोर्टाने युनियनच्या बाजूने निकाल दिला आहे. करारावर पाच महिने चर्चा झाली असताना, जिल्हा बँकेचे सीईओ केवळ सुडबुद्धीने कर्मचारी युनियनवर आरोप करत आहेत, असा आरोप बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. युनियनच्या फंडाबाबत बोलणाऱ्या चव्हाण यांनी आपले वेतन आणि भत्त्याचा आकडा जाहीर करावा असे, आव्हानही त्यांनी दिले.

दिघे म्हणाले, ‘२००८-९ मध्ये बँकेला ऑपरेटिंग प्रॉफिट झाला. २००७ मध्ये कर्मचारी वेतन करार संपला होता. २००९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर युनियने कराराची वेतन केली. त्यानंतर पाच महिने करारामध्ये दुरुस्त्या, वाचन होऊन सप्टेंबरमध्ये करार अस्तित्वात आला. करारावेळी कामगार अधिकाऱ्यांसह सहकार विभागाचे धनंजय डोईफोडे उपस्थित होते. मग युनियन व कामगारांचा द्वेष करणाऱ्या चव्हाण यांना ते समजले नाही का? २०११-१२ च्या वार्षिक अहवालावेळी ते स्वत: प्रशासक असताना करार बेकायदेशीर असल्याचा उल्लेख न करता कर्मचाऱ्यांचे दहा कोटी ७५ लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाबार्ड तपासणी किंवा वैधानिक लेखापरिक्षणामध्येही वेतन करार बेकायदेशीर असल्याचे नमूद नाही. केवळ बँकेला धोका असल्याचे सांगून सातत्याने कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक दिली.’

डिस्ट्रिक्ट युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांची भरती युनियनने केली नाही. बँक अडचणीत असताना बँक, सहकार बचाव मोर्चे कर्मचाऱ्यांनी काढले. ३७० कोटींची वसुली केली. ११२ कोटींच्या अपात्र कर्जमाफी रकमेसाठी मुंबई, दिल्ली येथे बैठका घेतल्या. लाभांश नसताना शेअर्स भांडवल वाढवले. वेतन करारानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फरक रक्कम मागितली आहे. मात्र सर्वांचा फरक मागितला असा शेतकऱ्यांमध्ये चुकीचा समज पसरवत आहेत.’

पत्रकार परिषदेस दिलीप लोखंडे, आनंदराव परुळेकर, बी. आर. पाटील, आय. बी. मुन्शी, रमेश लिंबेकर, प्रकाश जाधव, रामभाऊ बोडके, सुरेश सूर्यवंशी, अशोक यादव आदी उपस्थित होते.


चेअरमन मुश्रीफांचा पोरकटपणा

‘जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात मंत्री, खासदार, आमदारांचा समावेश होता. संचालक म्हणून कार्यरत असतानाच वेतन करार झालेला असताना चेअरमन करार माहीत नसल्याचे सांगत आपला पोरकटपणा दाखवत आहेत’ अशी टिका अतुल दिघे यांनी केली. ‘लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी असे बेजबादार वक्तव्य करू नये’ असे ते म्हणाले.


सुडबुद्धीने गरळ ओकले

‘बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात कोणी पुढाकार घेऊ नये, यासाठी सीईओ चव्हाण सुडबुद्धीने गरळ ओकत आहेत. संघटनेच्या हेतुबद्दल संशय निर्माण करुन भंपकपणाची विधाने करत आहेत. संघटना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फंड गोळा करते. फंड कोणाच्या घरी जात नाही. बँकेची काळजी होती, मग भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्याला पाठिशी का घातले’, असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी कामाच्या ताणाने आणखी दोन कर्मचारी रुग्णालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या याद्या अपलोड करताना बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिलिप वेसावे व जयंत पाटील या दोन कर्मचाऱ्यांना कामाच्या अतिताणामुळे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. मंगळवारी सहायक निबंधक अमित दराडे यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर बुधवारी पुन्हा दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम जिल्हा बँकेच्या आयटी विभागात सुरू आहे. कामाचा निपटारा त्वरीत करण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री १२ पर्यंत सहकार विभाग व जिल्हा बँकेचे कर्मचारी कामकाज करत आहेत. लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने काम लवकर संपवण्याच्या सुचनेमुळे कर्मचारी तणावात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी आजारी पडणाच्या घटना घडू लागल्या आहेत.

मंगळवारी कामाच्या अतिताणाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक अमित गराडे बेशुद्ध पडले होते. त्यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. गराडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असतानाच बुधवारी पुन्हा जिल्हा बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांची प्रकती बिघडली. संगणकावर काम सुरू असताना एकाचवेळी वेसावे व पाटील यांना अस्वस्थता जाणवू लागली. त्यांची अवस्था पाहूण कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच मंदिरांत पगारी पुजारी?

$
0
0

मुंबईतील बैठकीत कायद्याबाबत चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी पगारी पुजारी नेमण्याबाबतचा कायदा केवळ अंबाबाई मंदिरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या साडेतीन हजार मंदिरांत लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयामार्फत सुरू झाल्या आहेत. अंबाबाई मंदिर कायदा करण्याबाबतच्या मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकीत बुधवारी झालेल्या चर्चेत पगारी पुजारी नेमण्याबाबतच्या कायद्याच्या कक्षेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थानमधील सर्व मंदिरांचा समावेश करण्याचाच कायदा करण्याबाबत चर्चा झाली. राज्याच्या विधी व न्याय मंत्रालयात ही बैठक झाली.

सध्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी पुजारी हटाव संघर्ष समितीने केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनीही अंबाबाई मंदिरात स्वतंत्र कायदा करावा, अशी भूमिका घेतली आहे. अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याबाबत येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याची ग्वाही विधी व न्याय मंत्रालयातर्फे दिली आहे. त्यानुसार गेल्या दीड महिन्यापासून या कायद्याबाबत मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, स्वतंत्र अंबाबाई मंदिराबाबत हा कायदा करण्याऐवजी त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन हजार मंदिरांचाही समावेश करण्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावरून मतांतर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत अंबाबाई मंदिराबाबत स्वतंत्र कायद्याच्या मंजुरीसंदर्भात बैठक बोलावली होती. येत्या हिवाळी अधिवेशनात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा संमत करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यामुळे हा विषय सध्या पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत केवळ चर्चाच झाली असून, सध्या सुरू असलेली कायद्याच्या मसुद्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, कोणताही ठोस निर्णय या बैठकीत झाला नाही.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन हजार मंदिरांपैकी अंबाबाई व जोतिबा मंदिरातून देवस्थान समितीला मोठे उत्पन्न मिळते. अन्य मंदिरांतून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या मंदिरात पगारी पुजारी नेमल्यास सरकारवरच आर्थिक बोजा पडेल असाही मुद्दा चर्चेत आला. पंढरपूर, शिर्डी देवस्थानमधील कायद्याच्या अनुषंगाने पगारी पुजारी नेमण्याच्या प्रक्रियेच्या आधारे अंबाबाई मंदिरासह अन्य सर्व मंदिरांतही पगारी पुजारी नेमण्यापूर्वी त्याबाबत हरकती, दावे, प्रतिदावे यांचाही विचार या प्रक्रियेत करण्यात येणार आहे.

बैठकीस विधी व न्याय विभागाच्या कार्यासन अधिकारी राखी चव्हाण, विधी व न्याय विभागाचे सहसचिव एम. बी. गोसावी, उपसचिव बी. एम. गुरव, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, आदी उपस्थित होते.

राज्याच्या विधी व न्याय मंत्रालयाने हिवाळी अधिवेशनात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा मंजूर करू असे स्पष्ट केले होते. त्यानुसार या कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबत आयोजित बैठकीत पगारी पुजारी नेमण्याचा कायदा केवळ अंबाबाई व जोतिबा मंदिरातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील सर्व साडेतीन हजार मंदिरांसाठी लागू करण्याचा विचार चर्चेसाठी मांडला आहे. विधी व न्याय मंत्रालय यादृष्टीने हा कायदा व्यापक करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीत अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत स्वतंत्रपणे कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यासाठी ठोस निर्णय झाला नाही.

- विजय पोवार, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल बसच्या धडकेतडॉक्टर जागीच ठार

$
0
0

इचलकरंजी

इचलकरंजी-हातकणंगले मार्गावरील स्टेशन रोड येथे स्कूल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डॉ. रामचंद्र शंकर फडणीस (वय ७५) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली असून राहुल मधुकर सौंदत्तीकर यांनी वर्दी दिली आहे. पोलिसांनी स्कूल बस ताब्यात घेतली असून चालक महादेव बंडगर याला अटक केली आहे.

जवाहरनगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ डॉ. रामचंद्र फडणीस हे कुटुंबासह राहण्यास आहेत. डॉ. फडणीस हे आयजीएम हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाले आहेत. ते नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी स्टेशन रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेथून परतत असताना व्यंकटेश कॉलनी परिसरात पाठीमागून येणाऱ्या स्कूल बसने (क्र. एमएच ०४ जी २६७५) त्यांना धडक दिली. धडक लागून ते खाली पडल्यानंतर बसचे पाठीमागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अन्य नागरिकांनी पाहून दूरध्वनीवरुन फडणीस यांच्या नातेवाईकांनी दिली. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन फडणीस यांना आयजीएम हॉस्पिटलमध्ये आणले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने स्टेशन रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

डॉ. फडणीस यांनी आयजीएम रुग्णालयात प्रदीर्घकाळ सेवा बजावली होती. ते मनमिळाऊ स्वभावाचे आणि जुने जाणते डॉक्टर होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. फडणीस हे क्रीडाप्रेमी होते. विविध स्पर्धा अथवा सरावादरम्यान जखमी होणाऱ्या खेळाडूंवर ते नि:शुल्क उपचार करीत असत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटेचे तपासात असहकार्य

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

अनिकेत कोथळे खून प्रकरणाच्या आजपर्यंतच्या तपासानंतर कुणालाही क्लीन चीट देण्यासारखी स्थिती नाही. संशयित उपनिरीक्षक युवराज कामटे तपासात सहकार्य करत नाही. मात्र त्याला कॅमेऱ्यासमोर बोलावेच लागेल. या प्रकरणात आत्तापर्यंत २० जणांची चौकशी झाल्याचे सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.

गुरुवारी दुपारपासून कामटेची इन कॅमेरा चौकशी सुरू होती. इतका मोठा गुन्हा त्याच्या हातून होऊनही त्याला काहीच वाटत नसल्यासारखे त्याचे वर्तन आहे. कॅमेऱ्यासमोर गप्पच राहण्याबरोबरच तुम्हाला काय पाहिजे ते नोंदवा, अशी भाषा तो वापरत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘घटनेदिवशी ठाण्यात कर्तव्यावर असलेले आणि आता निलंबित असलेल्यांचे जबाब घेण्यात येत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही पोलिसांना घटनेची माहिती असणार आहे. त्यांचेही जबाब घेण्यात येणार आहेत. कामटेला माहिती द्यावीच लागेल. त्याला जे सांगायचे आहे, ते त्याने सांगावे.’

पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या रजेच्या काळात ठाण्याचा कारभार पाहणारे उपनिरीक्षक चव्हाण यांचीही चौकशी केली जाणार आहे. डॉ. दीपाली काळे यांच्या भूमिकेबाबत अनिकेतच्या नातेवाईकांना संशय आहे, असे विचारले असता गायकवाड म्हणाले की, या प्रकरणाची आणि डॉ. काळे यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतरच त्यांची या प्रकरणात कोणती भूमिका होती, हे स्पष्ट होणार आहे.

एसपी, डीवायएसपींची चौकशी वरिष्ठ करणार

जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांची गुरुवारी चौकशी होऊ शकली नाही. त्यांना चौकशीसाठी तयार राहण्याबाबत पूर्वकल्पना दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर स्वतंत्र ठिकाणी ही चौकशी होईल. अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून संशयित सांगलीत येईपर्यंतचा घटनाक्रम समोर येणे, ही घटना घडत असताना वरिष्ठ अधिकारी म्हणून प्रत्येकांनी काय केले, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यासाठी या दोघांचीही चौकशी करणे आवश्यक आहे, असे गायकवाड म्हणाले.

संशयितांचे कपडे जप्त

अनिकेतचा मृतदेह विश्रामबागमधील एका खासगी हॉस्पिटलपर्यंत नेल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तो मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्येही नेल्याचे समोर येत आहे. या दरम्यान संबंधित पोलिस गाडी आणि संशयित कोणकोणत्या ठिकाणी गेले, आले याचे कोणत्यातरी सीसीटिव्हीत चित्रित झाले असण्याची शक्यता आहे. याचा शोध घेणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. अनिकेतला मारहाण करण्यापासून ते त्याचा मृतदेह जाळण्यापर्यंतच्या काळात संशयितांच्या अंगावर असणारी कपडे जप्त करण्यात आली आहे. संशयीत अनिल लाड याला पुन्हा आंबोली घाटातील घटनास्थळी नेऊन चौकशी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाचा लढा पुन्हा तापणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली सहा महिने थंडावलेले खंडपीठ आंदोलन पुन्हा तापणार आहे. खंडपीठ नागरी कृती समिती आणि जिल्हा बार असोसिएशनने घेतलेल्या बैठकीत आंदोलन पुन्ही तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या भेटीपासूनच होणार आहे. २४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात त्यांची भेट घेऊन खंडपीठाच्या आश्वासनाबाबत विचारणा करण्याचे नियोजन नागरी कृती समितीने केले आहे.

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी (सर्किट बेंच) मुख्यमंत्र्यांनी स्वतः ११०० कोटी रुपयांची घोषणा करून दीड वर्ष उलटले, मात्र अद्याप याची पूर्तता झालेली नाही. सहा जिल्ह्यातील वकिलांची खंडपीठ कृती समिती आणि नागरी खंडपीठ कृती समितीने सहा महिन्यांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. कोल्हापुरातील खंडपीठासाठी आठवड्यात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्या भेटीदरम्यान दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामुळेच खडंपीठ कृती समितीने साखळी उपोषण मागे घेतले होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या आश्वासनाचा पाठपुरावा झालेला नाही. खंडपीठाबाबत सरकारच्या पातळीवर काहीच हालचाल नसल्याने अखेर पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय वकिलांसह सर्वपक्षीय नागरी खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. शनिवारी (ता. ११) झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.

कोल्हापुरातील खंडपीठासाठी मुख्यमंत्र्यांनी ११०० कोटी रुपयांची घोषणा करून कॅबिनेटचा ठराव करताना मात्र पुण्याचेही नाव घुसडले. केवळ कोल्हापूरच्या नावाचा ठराव नव्याने करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. याबाबत काहीच हालचाली झालेल्या नाहीत. मुख्य न्यायमूर्तींसोबत चर्चा झाली की नाही याबाबतदेखील स्पष्टता नाही, त्यामुळे खंडपीठ कृती समिती मुख्यमंत्र्यांना विचारणा करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जिल्ह्यातील खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनाही बोलवले जाणार आहे. याशिवाय सहा जिल्ह्यातील खंडपीठ कृती समिती आणि पक्षकार संघटनाही उपस्थित राहणार आहे, अशी माहिती नागरी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी दिली आहे.

सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या भेटी

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. प्रशांत शिंदे सध्या सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या भेटी घेऊन पुढील आंदोलनाबाबत चर्चा करीत आहेत. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वकिलांनी आंदोलन तीव्र करण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता. १८) रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील बार असोसिएशनशी चर्चा होणार आहे. यानंतर खंडपीठ कृती समिती नागरी कृती समितीसोबत आंदोलनात सक्रीय होणार आहे, अशी माहिती अॅड. शिंदे यांनी दिली.

सनद पणाला लावू

कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होणारी आंदोलने करू नयेत, अशी सूचना हायकोर्टाने आंदोलक वकिलांना केली आहे. हायकोर्टाच्या सूचनेचा अवमान न करता आंदोलन पुढे सरू ठेवावे असा एक मतप्रवाह खंडपीठ कृती समितीत आहे, तर काही वकिलांनी खंडपीठासाठी सनद पणाला लावण्याचाही इशारा दिला आहे. सरकारसह न्याययंत्रणेला कोल्हापुरातील खंडपीठाची गरज लक्षात आणून देण्यासाठी प्रसंगी उग्र आंदोलन केले जाईल, असे वकिलांनी स्पष्ट केले आहे.

केवळ खंडपीठाचे आश्वासन देऊन कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिकांना झुलवत ठेवणे योग्य नाही. गेल्या २८ वर्षांपासून सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह शुक्रवारी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

आर. के. पोवार, निमंत्रक, सर्वपक्षीय नागरी खंडपीठ कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीएफ कार्यालयाला टाळे ठोकू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एका आठवड्यात बँकांमध्ये बायोमेट्रिकचे काम सुरू न केल्यास पीएफ कार्यालयालया टाळे ठोकण्याचा इशारा पेन्शनर्सच्यावतीने गुरुवारी आयोजित केलेल्या मोर्चावेळी देण्यात आला. किमान ६५०० हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता द्यावा, डिजिटलसाठी मुंबईला हेलपाटे मारायला लावू नका, अशा घोषणा देत सर्व श्रमिक संघाच्या पेन्शनर विभागाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कार्यालय, ताराबाई पार्कातील भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि इएसआय हॉस्पिटलवर हा मोर्चा नेण्यात आला. तीनही ठिकाणी अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी नसल्याने पेन्शनधारकांनी संताप व्यक्त केले. मोर्चात पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सीबीएसजवळील विक्रम हायस्कूलपासून मोर्चा सुरू झाला. एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे पेन्शनर्संनी संताप व्यक्त केला. तेथून मोर्चा घोषणा देत पीएफ कार्यालयासमोर आला. मोर्चा मोठा असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

यावेळी सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, निवृत्तीवेतनधारकांना साडेसहा हजार रुपये पेन्शनसह महागाई भत्ता दिला जात नाही. बायोमेट्रिक पद्धतीपेक्षा हयातीच्या दाखल्याच्या आधारे पेन्शन आणि पेन्शनखात्याला झिरो बॅलन्स सुविधा देण्याची गरज आहे. मात्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारातून निधीची करते. त्यामानाने सुविधा दिल्या जात नाहीत.’ नाना जगताप म्हणाले, ‘निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान साडेसहा हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. कोशियारी समितीने तसा अहवालही दिला आहे, सरकारने अद्याप अहवालातील शिफारसी स्वीकारलेल्या नाहीत. विरोधी पक्षात असताना भाजपने या विषयावर आवाज उठवला होता, पण सत्तेत आल्यानंतर त्यांना विसर पडला आहे.’

अनंत कुलकर्णी यांनी बायोमेट्रिक पद्धत चांगली असली, तरी यामध्ये त्रुटी असल्यामुळे जिल्ह्यातील अनेकजण पेन्शनपासून वंचित राहिले आहेत, ही बाब स्पष्ट केली.

तेथून इएसआय हॉस्पिटलवर मोर्चा नेण्यात आला. तेथे मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून पेन्शनर्स सहभागी झाले.

मोर्चात प्रकाश जाधव, बाळकृष्ण शिरगावकर, विलास चव्हाण, बाबूराव काटकर, इमाम राउत, व्ही. डी. भोसले, दामोदर गुरव, दत्ता सावंत, आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराज्यीय चोरट्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफोड्या आणि मोबाइल चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (ता. १५) अटक केले. आनंदा सोमाप्पा सुटगण्णावार (वय २१, रा. हुक्केरी, जि. बेळगाव) असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून जिल्ह्यातील नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील ११० ग्रॅम सोन्यासह १२ किमती मोबाइल आणि तीन डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) जप्त केले आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. संशयित आनंदा सुटगण्णावार हा चोरीचे मोबाइल विक्रीसाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. यानुसार बुधवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १२३ मोबाइल मिळाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. संशयित आनंदा सुटगण्णावार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटा असल्याचे लक्षात येताच त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने शहरासह जिल्ह्यातील नऊ चोऱ्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील ११० ग्रॅम सोने, १२ किमती मोबाइल आणि तीन डीव्हीआर असा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सुटगण्णावार याने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन, कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार, लक्ष्मीपुरी आणि कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक चोरी केल्याची कबुली दिली आहे. सुटगण्णावार याच्यावर हुक्केरी पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने हुक्केरी परिसरात सहा चोरीचे गुन्हे केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याची अधिक चौकशी सुरू केली असून, त्याच्याकडून चोरी, घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी वर्तवली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, अमोल माळी, विजय कोळी, मोहन पाटील, संतोष माने, शहाजी पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दिवसा केल्या घरफोड्या

आनंदा सुटगण्णावार हा गेल्या सात वर्षांपासून चोऱ्या करीत आहे. भरदिवसा बंद घरांची टेहळणी करून तो घरातील किमती वस्तूंवर डल्ला मारत होता. खिडक्यांचे गज कापून तो आत प्रवेश करीत असे. जिथे चोरी केली त्या परिसरात चोरीतील दागिन्यांची विक्री न करता तो अन्य जिल्ह्यात जाऊन दागिने आणि मोबाइलची विक्री करीत होता, त्यामुळे इतके दिवस पोलिसांच्या हाती लागला नाही. उघडकीस आलेल्या सर्व चोऱ्या त्याने एकट्यानेच केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनपाच्या निधीचे बेकायदा वाटप’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेश येथील केएमटी अपघात मृत तसेच जखमी झालेल्या नागरिकांना महापलिकेच्या फंडातून २१ लाख २५ हजार रुपयांची दिलेली मदत वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या नागरिकांनी बसचा थर्ड पार्टी इन्शुरन्स मागणी केली असती तर संबंधितांना हॉस्पिटल व इतर खर्चास रक्कम मिळाली असती. पण त्याकडे प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून बेकायदा रक्कम दिल्याची तक्रार माजी आमदार सुरेश साळोखे यांनी नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली आहे.

केएमटी बस ताबूत विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसून झालेल्या अपघातात तीन मृत तर १९ जण जखमी झाले. या अपघातानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन बस पेटवण्याची घटना झाली. त्यामुळे मृतांना प्रत्येकी पाच लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख व किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत देण्याचे महापौरांनी जाहीर केले होते. त्यानुसार आयुक्तांनी महापालिका व परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना बेकायदेशीर अदा केल्याची तक्रार साळोखे यांनी केली आहे.

साळोखे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये शासकीय भविष्य निधीच्यावतीने बसचा थर्ड पार्टी इन्शुरन्स उतरवण्यात आला आहे. अपघातग्रस्त नागरिकांनी क्लेम केल्यानंतर नुकसान भरपाई मिळू शकते, अशी तरतूद आहे. याप्रकरणी कोणतीही छाननी न करता महापालिका व परिवहन उपक्रमाकडे तरतूद नसताना २१ लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करावी व ही रक्कम संबंधितांकडून वसूल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांत रायगडावर सुवर्ण‌सिंहासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रायगडावर ३२ मनाचे सुवर्ण सिंहासनाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने १०० कोटी दिले तरी घेणार नाही. केवळ लोकांच्या देणगीतून येत्या दीड ते दोन वर्षांत सिंहासन प्रतिष्ठापना करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी गावागावात शिवभक्त, मराठा आणि हिंदूंनी समिती नेमून देणगी देण्याचे आवाहन करावे,’ असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी गुरुवारी केले.

श्री शिवप्रतिष्ठातर्फे ‌‌बिंदू चौकात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. भिडे म्हणाले, ‘आमची झोळी फाटकी आहे. तरीही आम्ही लोकाश्रयाच्या बळावर सुवर्ण सिंहासनची प्रतिष्ठापना करणारच आहे. त्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही. विरोध केल्यास जनतेच्या रोषास सामोरे जावे लागणार हे माहीत आहे. त्यामुळेच स्वतःला पुरोगामी, समाजवादी म्हणवून घेणारेही गप्प आहेत. सिंहासनासाठी देणगी घेण्यासाठी कोणतेही पावती पुस्तक छापण्यात येणार नाही. ज्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत शिवप्रतिष्ठानच्या खात्यावर भरावे. देणगीसाठी प्रत्येक गावात स्वतंत्र समिती स्थापना करावी. दंवडी देऊन देणगीसाठी आवाहन करावे. हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अनेक लढाया केल्या. त्यांना काहीवेळा स्वकियांनी धोकाही दिला. मात्र त्यावर मात करीत त्यांनी लढाया जिंकल्या. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आदर्श घेऊन हिंदूनी संघटित झाले पाहिजे. हिंदूराष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करावे.’ यावेळी शरद माने, आशिष लोखंडे, सुरेश यादव, सुधाकर सुतार आदी उपस्थित होते.

प्रचंड बंदोबस्त

संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बिंदू चौकात भिडे यांचे व्याख्यान झाल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भोगावती’ प्रकरणीपोलिसांकडून चौकशी सुरु

$
0
0

राधानगरी

शाहूनगर परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ऊसरस शुध्दीकरणाच्या भांडयाच्या स्कम विभागात लोखंडी रॉड टाकून यंत्रणाच बंद पाडण्याचा गंभीर प्रकार घडल्यानंतर गुरुवारी कार्यकारी संचालक अनंत निकम यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पन्नासजणांच्या पथकाने प्रत्यक्ष कारखान्यावर चौकशीस सुरवात केली.

भोगावती कारखान्यात बुधवारी सकाळी अचानकपणे रसशुद्धीकरणाची प्रक्रिया बिघडल्याचे कामगारांच्या लक्षात आले. त्यामुळे कारखान्यातील ऊसगाळप थांबवण्यात आले. तज्ज्ञांकडून रसशुध्दीकरण प्रक्रिया व यंत्रणेची तपासणी केली असता भांड्यातील स्कममध्ये तीन मोठे लोखंडी रॉड सापडले. हे रॉड टाकल्यामुळे शुध्दीकरण प्रक्रियाच ठप्प होऊन मळी व रसाचे एकत्रीकरण होऊ लागले. परिणामी बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून ऊस गाळपच थांबवण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सह्याद्री कारखाना (कराड) येथील तज्ज्ञांना बोलविले. तज्ज्ञांनी कारखाना बंद का पडला याचा शोध घेतला. तब्बल सत्तावीस तासांनंतर कारखान्याचे ऊसगाळप सुरु झाले. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप जाधव हे पन्नास पोलिसांच्या ताफ्यासह चौकशीसाठी कारखान्यावर आले. रस शुध्दीकरण विभागाकडे तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवून प्राथमिक चौकशी सुरु केली.

याबाबत निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या विभागाकडे काम करणाऱ्या सुमारे पंचवीस कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी सुरु असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावू. ’ दरम्यान भोगावाती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांनी रस शुद्धीकरण केंद्रात लोखंडी रॉड टाकून कारखाना बंद पाडण्याचे कृत्य निंदनीय असल्याचे सांगून कारखान्याच्या वतीने सीआयडी चौकशी करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images