Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्जमाफी योजना फसवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने आश्वासने देऊन त्यापासून पळ काढण्याची भूमिका दोन वर्षांत सातत्याने घेतली आहे. सरकारच्या फसवा-फसवीच्या उद्योगामुळे शेतकरी पेटून उटला आहे. असंतोष कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेमुळे त्याची अधिकच फसवणूक झाल्याने तो अधिकच प्रक्षोभक बनला असून यातून राजकर्ते स्वत:ची फसवणूक करत आहे. पुढील तीन वर्षांत अशीच स्थिती राहिल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.

पाटील म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा राज्य सरकारला विसर पडला आहे, पण सत्तेवर आल्यानंतर दिलेली आश्वासनेही पाळली जात नाहीत. दोन वर्षापुर्वी तुरडाळीचा दर २०० रुपयांवर पोहोचल्यानंतर मागणी व पुरवठ्याचा अभ्यास करुन हमीभाव वाढवला, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. टंचाईच्या काळात डाळ आयात करून निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देशात डाळींचे बंपर पीक आल्यानंतरही निर्यातीच्या धोरणात बदल केलेला नाही.’

‘नैसर्गिक संकटामुळे शेतीमालाच्या किमती विशिष्ट रकमेवर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण या नैसर्गिक संकटाबरोबर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सुलतानी संकट निर्माण झाले आहे. शेतीमालाचे धोरण ठरवताना अनुकूल प्रतिकुल स्थितीचा विचार केला जात नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच तोट्यात निघाला आहे. सर्वच बाबतींमध्ये शेतकऱ्यांविषयक धोरण चुकीचे ठरत असल्याने असंतोष वाढत आहे. यावर उपाय म्हणून कर्जमाफी योजना जाहीर केली, त्यामधूनही शेतकऱ्यांची फसवणूकच झाली असल्याची टीका त्यांनी केली.

‘कोल्हापुरात चंद्रकांतगड’

भगवानगडाप्रमाणे कोल्हापुरात चंद्रकांत गड तयार झाला आहे. गडावर कोणतेही गाराणे मांडण्यास गेल्यास भरपूर आश्वासने मिळतात, पण प्रत्यक्षात कोणत्याही आश्वासनांची पूर्तता होत नाही. कृषी वीज पंपांच्या दरवाढीबाबतही असाच अनुभव आल्याचे सांगत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आपल्या खास शैलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जळीतकांडावरून भडका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

बाकडी वाजवणे, शाब्दिक खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप, मंजूर-नामंजूर, विरोधकांची आक्रमकता, सत्ताधारी-विरोधकांत हातघाई, अंगावर धावून जाणे यामुळे कागल नगरपालिकेची मंगळवारची विशेष सभा वादळी ठरली. नगरपालिकेच्या इमारतीस आग लागून भीषण दुर्घटना घडल्यानंतर पहिलीच सभा बोलावली होती. पालिका जळीतकांडाचा राजकीय भडक्याने या सभेत रौद्ररूप धारण केले. पालिकेच्या इतिहासात पोलिस बंदोबस्तात विशेष सभा पार घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

नगरपालिकेची विशेष सभा शाहू नगर वाचनालयात पार पडली. नगरपालिकेस लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही सभा बोलावली होती. सभागृहासमोर या सभेत मंजुरीसाठी नऊ विषय ठेवले होते. सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय बहुमतात मंजूर केले. परंतु सर्वच विषयांना विरोधकांनी कडाडून विरोध केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. मुख्याधिकारी टिना गवळी पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या.

पालिका इमारतीस लागलेल्या आगीची सीआयडीमार्फत कसून चौकशी व्हावी, बांधकाम अभियंत्यांच्या एफआयआरची कॉपी जोडून मुदतवाढ प्रस्ताव पाठवावा, मंजुरीनंतरच काम करावे, दोषीकडून व्याजासह नुकसानभरपाई मंजूर व्हावी, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, नुकसानीच्या खर्चाचा अजेंड्यावर उल्लेख नाही, झालेल्या नुकसानीसंदर्भात समिती नेमावी, आदी मागण्यांचे निवेदन सभेच्या सुरुवातीस विरोधी गटाकडून नगराध्यक्षांना देण्यासाठी भाजपचे पक्षप्रतोद विशाल पाटील व्यासपीठासमोर गेले असता विषयपत्रिकेवरील विषय सुरुवात होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटले. सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रतोद प्रवीण काळबर व विशाल पाटील यांच्यात जोरदार हमरी-तुमरी होऊन ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कागल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील माळगे यांनी पोलिस फौजफाटा सभागृहात पाचारण केला. सभेच्या कामकाजाला गोंधळात सुरुवात झाली.

विषयपत्रिकेवर या दुर्घटनेसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी, विकासकामाचा निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, नुकसानीसाठी आकस्मिक निधी मिळावा, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करावे, खबरदारी आवश्यक त्या उपाययोजना करणे, कामकाज कन्याशाळेत स्थलांतरित करणे आदी नऊ विषय जळीत दुर्घटनेसंदर्भात विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले होते. सत्ताधारी गटाकडून पक्षप्रतोद काळबर, चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, सौरभ पाटील आदींनी विरोधकांचे आरोप फेटाळत काही विधानांचा निषेध केला. विरोधकांच्या आरोपाचे मुद्दे खोडून काढले व सर्व विषय बहुमताने मंजूर केले. विशाल पाटील यांनी पालिका इमारत आगीसंदर्भात केलेले गंभीर आरोप मागे घ्यावेत, अशी जोरदार मागणी काळबर यांनी लावून धरली. तसेच विशाल पाटील यांनी माफी मागितल्याशिवाय सभेचे कामकाज चालू न करण्याची सूचना त्यांनी केली. नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आपल्या अधिकारात प्रशासनाच्या मदतीने कामे पूर्ण करून घ्यावीत, असा आग्रह सत्ताधारी गटाने धरला.

उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी यावेळी राष्ट्रवादी नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून आग विझवल्याबद्दल त्यांचे अभिनंद केले.

भाजपकडूनच आग; राष्ट्रवादीचा आरोप

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सभेवेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांकडून कागल पोलिस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये भाजप नगरसेवकांनीच सुपारी देऊन हे कृत्य घडवून आणले आहे अशी आमची खात्री आहे. तपासात राजकारण न आणता निष्पक्षपातीपणे तपास करावा व आरोपीस कठोर शिक्षा करावी. भाजपचे नगरसेवक आरोपी शोधण्यास मदत करण्यापेक्षा राजकारण करून बेताल व चुकीचे आरोप राष्ट्रवादी नगरसेवकांवर करीत अाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनव्हेस्ट इन कोल्हापूर प्रदर्शन शनिवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे (सीआयआय) मेक इन इंडियाच्या धर्तीवर इनव्हेस्ट इन कोल्हापूर २०१७ प्रदर्शन १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केले आहे. शाहुपूरी जिमखाना मैदानावर चार दिवस होत असलेल्या प्रदर्शनाचे शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होत आहे. प्रदर्शनात लघुउद्योजकांची उत्पादने, पेटंटसह कोल्हापूर ब्रॅण्डच्या उत्पादनांचा समावेश आहे. सीआयआयचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही महिती दिली.

अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले, ‘१८ नोव्हेंबरला किर्लोस्कर ब्रदर्स लि.चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर, सीआयआय महाराष्ट्र स्टेट काऊन्सिलचे अध्यक्ष ऋषीकुमार बागला, खासदार धनंजय महाडिक, उद्योगपती बाबाभाई वसा यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन होईल. प्रदर्शनात देश विदेशातील नामांकित कार्पोरेट कंपन्याचे स्टॉल, मशिनरी, उद्योग क्षेत्राशी निगडित संबधित सर्वच उत्पादनाचे स्टॉल आहेत. प्रदर्शन उद्योग क्षेत्र आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. नवीन उद्योग येत असूनही उद्योजकांना नवे तंत्रज्ञानाची माहिती गरजेचे आहे. नवउद्योजक, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला प्रदर्शन मोलाचे ठरणार आहे. प्रदर्शनात लघू उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. उद्योगांत सुरु असलेली पेटंटसाठी नवे दालन खुले केले जाणार आहे.’

अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले, ‘चार दिवसांच्या प्रदर्शनात १८ नोव्हेंबरला उद्योग क्षेत्रात भारतासाठी संधीवाढ, १९ नोव्हेंबरला पर्यटन क्षेत्रातील संधीवाढ, इलेक्ट्रिक व्हेईकलला संधी, भारतीय महिलांचे नेटवर्क विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. २० नोव्हेंबरला व्यवसायापासून व्यवसाय ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, व्यापार, व्यवसाय विषयावर मार्गदर्शन होईल. २१ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता कौशल्य विकास आणि दुपारी अडीच वाजता खुली चर्चा होईल. प्रदर्शनासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज, फाउंड्री इक्विपमेंट, गोशिमा, स्मॅक, फाउंडीमन असोसिएशन, मॅक, स्लिमा, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, उद्यम सोसायटी, एमएसएमई संस्था सहकार्य करीत आहेत.’

यावेळी सीआयआयचे मोहन घाडगे, प्रताप पुराणिक, सचिन शिरगावकर, विशाखा आपटे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्जवल नागेशकर, इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, गोशिमाचे अध्यक्ष सूरजितसिंह पवार, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, फाइव्ह स्टार एमआयडीसीचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, फाउंड्री इक्विपमेंटचे रवींद्र शिरपूटकर, क्रिएटीव्हचे सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँका, पतसंस्थांना हवे पाठबळ

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर :सर्वसामान्य व्यक्तींच्या गरजेतून सहकार चळवळीला सुरुवात झाली. दररोजच्या जीवनातील गरजा भागवण्यासाठी असा स्थानिक परिस्थितीचा विचार करून सहकारी बँका, पतसंस्था उदयास आल्या. आर्थिक संस्थांच्या निर्मितीतून सामान्य लोकांची पत वाढवून त्याच्या गरजा भागवल्या. पण त्याचवेळी सहकारी संस्थांमध्ये झालेले गैरव्यवस्थापन, सरकार व रिझर्व्ह बँकेचे निकष यातून अनेक बँकांना टाळे लागले. तर अनेक बँकांना स्पर्धेत टिकता न आल्यामुळे विलिनीकरण अथवा अवसायनात जाण्याची नामुष्की ओढावली. ज्या बँका आपले अस्तित्व टिकवून आहेत, त्यांना सरकराच्या पाठबळाबरोबरच आरबीआयच्या निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

सहकारी साखर कारखान्यांच्या निर्मितीनंतर १९७० च्या सुमारास सहकारी बँकांच्या स्थापनेस सुरुवात झाली. त्यापुर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पतपेढीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवल्या जात होत्या. सिंचनाच्या सुविधा वाढल्यानंतर उसासारखे नगदी पिकांमधून लोकांच्या हातामध्ये चार पैसे मिळू लागले. लोकांची सुबत्ता वाढत गेल्यानंतर सहकारी आर्थिक संस्थांची प्रगती होऊ लागली. कधी लोकांच्या मदत करण्यासाठी तर कधी स्वत:चे राजकीन नेतृत्व पुढे आणण्यासाठी संस्थांची स्थापना केली. त्यातूनच गैरव्यवस्थापनाला चालना मिळू लागली.

नोकरभरती, पत नसताना मर्जीतील लोकांना केलेले कर्जवाटप, वसुलीवर झालेला परिमाण यामुळे बँकांच्या एनपीएचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे बहुजनांसाठी स्थापन केलेल्या बँका अ‍वसायनात काढण्याबरोबरच काही बँकांना विलिनीकरणाचा आधार घ्यावा लागला. एकीकडे विश्वासालाच तढा जात असताना राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. सुलभ कर्जपुरवठा, ऑनलाइन बँकिंग प्रणाली अशा अत्याधुनिक बँकिंग व्यवसायाला चालना मिळत असताना सहकार बँका या स्पर्धेला सामोरे जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सहकारी बँका, पतसंस्था म्हणजे राजकारणा अड्डा असा सरकारचा ‘समज’ असल्याने त्यांना नेहमीच वेगळ्या तराजूमध्ये तोलले जात आहे. सहकारी बँका पत हिनाना पतवान बनवत असताना सरकारी धोरण आणि आरबीआयच्या निकषांमुळे अडचणीत येऊ लागल्या आहेत. केंद्राकडून राष्ट्रीयीकृत बँकांसाठी भरघोस भागभांडवलाचा पुरवठा केला जात असताना, राज्य सरकार मात्र सहकारी बँकाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्याचा फटका बँकिंग व्यवसायाला भसत आहे. सहकारी बँकांनीही सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता व्यवस्थापन सक्षम बनवण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा इतरांची पत तयार करताना सहकारी संस्थाची पत कधी कमी झाली हे कळणारही नाही.

दहा वर्षांत ५० टक्के पतसंस्थांना टाळे

भूदरगड, तपोवन, मानिनी, महावीर अशा अनेक नावाजलेल्या पतसंस्थांची स्थापना केली. केवळ राजकीय लाभासाठी स्थापन झालेल्या जिल्ह्यातील पतसंस्थांची संख्या अडीच हजारपर्यंत पोहोचली. कर्जवितरणातील अनियमितता, वसुलीकडे झालेले दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे यातील निम्म्या पतसंस्थांना टाळे लागले असून कशाबशा १५२३ संस्था सुरू आहेत. बंद पडलेल्या संस्थांमुळे लाखो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि भागभांडवल बुडाले आहे. याकडे सहकारातील तज्ज्ञ दुर्लक्ष करुन निकष कमी करण्याची मागणी करत असले, तरी सभासदांच्या ठेवी सुरक्षीत राखण्यासाठी आणि सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी आ‍वश्यकच आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंचे बाण, मुख्यमंत्र्यांची जोडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात रान उठवत असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे या दोन नेत्यांच्या सभा आणि कार्यक्रमांमुळे राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. येत्या २४ व २५ नोव्हेंबरला दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत अनेक स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. सहा जाहीर सभामधून ठाकरे सरकारचा समाचार घेण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्र्यांनी विविध कार्यक्रम आणि भेटीगाठीच्या माध्यमातून पक्ष भक्कम करण्याचे नियोजन केल्याचे समजते.

गेली काही महिने ठाकरे भाजपच्या विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहेत. पंतप्रधानापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वांवरच ते टीका करत असून यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. नारायण राणे यांच्या मंत्र‌िमंडळ विस्तारातील संभाव्य सहभागाच्या हालचालीने सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी सेनेने दिली आहे. मुंबईत सुरू असलेल्या या हालचालीचे केंद्र पुढील आठवड्यात कोल्हापूर होण्याची चिन्हे आहेत. कारण मुख्यमंत्री फडणवीस व ठाकरे हे दोघेही शुक्रवार आणि शनिवारी (ता. २४, २५) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. योगायोगाने या नेत्यांचा शुक्रवारी येथे मुक्काम आहे. यामुळे या दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

ठाकरे यांच्या दोन दिवसांत सहा जाहीर सभा होणार आहेत. कोणतीही निवडणूक नसताना सहा सभा घेण्यात भाजपच्या विरोधात रान उठवण्याचा सेनेचा मानस आहे. शेतकरी, व्यापारी व कामगारांशी ठाकरे संवाद साधणार आहेत. सांगली, तासगाव व कराड येथेही त्यांच्या सभा होणार आहेत. याच दरम्यान, मुख्यमंत्रीदेखील कराड, कोल्हापूर, कागल येथील विविध कार्यक्रमाना उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांतील ठाकरे यांची भाषा पाहता कोल्हापुरातदेखील ते भाजपवर जोरदार प्रहार करण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रहाराला मुख्यमंत्री उत्तर देतात की बेदखल करता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवस कोल्हापूर राजकीयदृष्ट्या संवेदनशील होणार असल्याची चर्चा आतापासून सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात माजी मंत्री विनय कोरे यांची भेट ठरली असून त्यांच्याकडे भोजनाचा कार्यक्रम ठरला आहे. कोरे यांना ताकद देण्याबरोबरच वारणा ग्रुपची ताकद पक्षाबरोबर कशी येईल, याची चाचपणी करण्यात येणार असल्याचे समजते. समरजित घाटगे यांना ‘म्हाडा’चे अध्यक्षपद दिल्यानंतर विधानसभेची तयारी म्हणून कागलचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा भरगच्च दौरा

मुख्यमंत्री फडणवीस हे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी कोल्हापुरात येणार आहेत. आल्यानंतर ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर ‘सावली’च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून नंतर कदमवाडी येथील अॅपल हॉस्पिटलच्या नूतन सेंटरचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. रात्री वारणा समुहाला भेट देणार असून कोल्हापुरात मुक्काम आहे. २५ नोव्हेंबरला कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत‌िस्थळाला अभिवादन करून हुतात्मा साखर कारखान्यात आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. तेथून पुन्हा ते कोल्हापूरात येणार असून कागल येथे कागल बँकेच्या नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. या बँकेला शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचे नाव देण्यात येणार आहे. तेथूनच ते मुंबईला रवाना होणार आहेत.

ठाकरेंच्या सहा सभा

उद्धव ठाकरे हे देखील २४ नोव्हेंबरला कोल्हापुरात येणार आहेत. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे शेतकरी संवाद आयोजित केला असून तेथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांची नेसरी, हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे जाहीर सभा होईल. उचगाव येथे कामगाराशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी कुडित्रे येथील कुंभी कारखान्यावर त्यांची तिसरी जाहीर सभा होईल. यादिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त ठाकरे यांच्या हस्ते शंभर ईरिक्षांचे वाटप करण्यात येईल. ठाकरे कोल्हापुरात मुक्काम करणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शिरोळ तालुका दौरा असून तेथे बसस्थानकाचे उद्‍घाटन व जाहीर सभा होणार आहे. तेथून ते सांगली जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीआयडीकडून दोघांची चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पोलिसांच्या अमानुषतेचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची मागणी अखेर मान्य झाली आणि कुटुंबीयांचा संशय असलेल्या दोन व्यक्तींची चौकशी सीआयडीने सुरू केली. यामध्ये अनिकेत कामाला असलेल्या लकी बॅग दुकानाचा मालक निलेश खत्री आणि त्या मालकाची बाजू घेणारा गिरीष लोहाना यांचा समावेश आहे.

बॅग दुकानात संशयित युवराज कामटे याचे येणेजाणे आणि त्या दुकानात अवैध कृत्य चालत असल्याचा कुटुंबीयांचा संशय आहे. अनिकेतचा अमानुष छळ करुन खून करण्याचे नेमके कारण बॅग दुकानाशी निगडीत आहे का?, याचा उलगडा होण्यासाठी कुटुंबीयांनी संबंधित दोघांची कसून चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. अनिकेतचा त्या दुकानाशी चार ते पाच वर्षांपासून संबंध होता. पण त्याच्या कामात सातत्य नव्हते, अशीही माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, सीआयडीच्या पथकाने मंगळवारी कोथळे आणि भंडारेविरोधात फिर्याद दिलेल्याचीही चौकशी केली असून, सात निलंबित पोलिसांचीही चौकशी केली जाणार आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त

कोथळेच्या कुटुंबीयांनी बॅग दुकानदारासह दोघांवर संशय घेतल्याने सीआयडीने त्यांची चौकशी सुरु केली. बॅग दुकानातील सीसीटिव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी अनिकेतचा कोठडीत खून झाल्याचे समोर येताच सीआयडीने लकी बॅग दुकानावर तत्काळ छापा घातला होता. अनिकेतच्या खुनाचे प्रकरण उजेडात आल्यापासून बॅग दुकान आणि त्याठिकाणच्या अवैध कृत्यांबाबत सतत चर्चा होत आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय आणि त्या दुकानाशी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सतत संबध येण्याचे कारण काय? या पातळीवर सीआयडीला सखोल तपास करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारूळमध्ये बाटली आडवी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

वारूळ (ता. शाहूवाडी) येथे दारूबंदीसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये ठरावाच्या बाजूने २५९ महिलांनी मतदान केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दारूची बाटली आडवी झाली. गावातील ४५० पैकी २९२ (६३.४७ टक्के) महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण २७६ वैध मतांपैकी उभ्या बाटलीसाठी केवळ १७ मत मिळाली, तर एकूण प्रक्रियेत १६ मते अवैध ठरली.

येथील केंद्रीय प्राथमिक शाळा इमारतीमध्ये सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान तर सायंकाळी सहानंतर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. अपेक्षेप्रमाणे बाटली आडवी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कृती समितीच्या प्रमुख व ग्रामपंचायत सदस्या माया शंकर पाटील, उपसरपंच कल्पना सुतार यांच्यासमवेत गावातील महिलांनी दारूची बाटली आडवी झाल्याचा आनंद मिरवणुकीने साजरा केला. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

शिवारे, सरूड या दोन गावांतील दारूबंदीनंतर प्रत्यक्ष मतदानामध्ये दारूची बाटली आडवी करून लढा यशस्वी करून दाखविणारे वारूळ हे शाहूवाडी तालुक्यातील तिसरे गाव ठरले. यासाठी दारूबंदी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक गिरीश फोंडे, तालुका संघटक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिला व तरूण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने गेल्या सहा महिन्यांपासून गावात दारूबंदीसाठी लढा सुरू ठेवला होता. महसूल कर्मचाऱ्यांनी मतदान व त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक अनिल गाडे, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संजय जाधव, उपनिरीक्षक सचिन भवड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेट निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा व विविध अधिकार मंडळाच्या (सिनेट) निवडणुकीतील प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. १७ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरल्याने सर्व गटातील उमेदवारांनी आता मतांचे गणित आखत मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यासह शिवाजी विद्यापीठ विकास मंच, नोंदणीकृत पदवीधर, महाविद्यालयीन शिक्षक, संस्था चालक या गटातील उमेदवारांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांची संपर्कयंत्रणा अधिक बळकट केली आहे. शिक्षक (प्राध्यापक) गटातील दहा जागा आणि पदवीधर गटातील नऊ जागांसाठी मोठी चुरस आहे. शिक्षक गटातील दहाही जागा ‘सुटा’साठी प्रतिष्ठेच्या आहेत. तसेच अॅकेडमिक कौन्सिल, पदव्युत्तर शिक्षक गटातील निवडणुकीतही आघाडी आणि ‘सुटा’मध्ये लढत आहे. तर शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीमध्ये रयत शिक्षण संस्था व विवेकानंद शिक्षण संस्था यांचा समावेश झाल्यामुळे प्रचार मोहीमेने वेग घेतला आहे. ज्या जागा बिनविरोध झालेल्या नाहीत त्यांनी प्रचार यंत्रणेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

अॅकेडमिक कौन्सिल, पदव्युत्तर शिक्षक गटातील लढतींवर अधिक लक्ष केंद्रीत करत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्रचाराची आखणी केली आहे. विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर सुटाच्या प्रचार यंत्रणेत भर देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक गटातील सदस्यांच्या स्वतंत्र भेटी घेत प्रचाराची रणधुमाळी उठली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना केंद्रीभूत ठेवून विद्यार्थी कृतिसमितीच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून शेवटच्या टप्प्यात प्रचाराची मोहीम शिगेला पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नालेसफाईसाठी डीपीडीसीकडून ७५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील नाले सफाईसाठी महापालिकेकडे स्वतंत्र बजेट नाही. यंदाच्या पावसाळ्यात नाले ओसंडून वाहिल्यानंतर निर्माण झालेल्या नाले सफाईसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून नाले सफाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यज‌ित कदम यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.

पावसाळ्यापुर्वी नाले सफाई करण्यासाठी महापालिका परंपरागत पद्धत वापरत असते. त्यामुळे सफाईला मर्यादा येऊन नाले कचऱ्यांनी भरलेले असतात. मोठा पाऊस झाल्यास कचऱ्यामुळे नाले तुडुंब भरतात व काही वेळेस त्याचा काठावरील नागरिकांना धोका निर्माण होतो. यंदाच्या पावसाळ्यात नाले ओसंडून वाहिल्याने शेजारील घरांमध्ये पाणी शिरले व नुकसान झाले. महापालिकेत नाले सफाईसाठी स्वतंत्र बजेट नसल्याने स्वच्छतेला मर्यादा येत असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आमदार अमल महाडिक यांनी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार नियोजन मंडळाने ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीचा वापर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रकल्प आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी मंगळवारी भाजप, ताराराणी आघाडीच्या गटनेत्यांबरोबर ​विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी तातडीने आराखडा तयार करुन पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

२१ झाडू कामगारांवर कारवाई

कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या २१ झाडू कामगारांवर महापालिका प्रशासनाने वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. ​महिन्यातील पाच ते १५ दिवसांपर्यंत गैरहजर राहणाऱ्या कामगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने तयार केलेल्या प्रस्तावावर सुनावणी घेऊन वेतनवाढ रोखण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

केएमटीकडील चालक अचानक गैरहजर राहिल्यानंतर करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईनंतर आरोग्य विभागाकडूनही अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महिन्यात पाच, दहा व १५ दिवस गैरहजर राहणाऱ्या झाडू कामगारांवर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला होता. अनेक झाडू कामगार तर चार व पाच दिवसांची हजेरी भरत होते. या कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या प्रस्तावानुसार प्रशासनाने सुनावणी घेऊन २१ कामगारांवर कारवाई करण्याचे आदेश काढले. या कर्मचाऱ्यांच्या दोन ते तीन वेतनवाढ रोखल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मागणी पाहून उत्पादन घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आर्थिक ताळेबंदावर उद्योगांचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे नफा आणि तोटा या सूत्राचा उद्योगातील प्रत्येक घटकाने जाणीवपूर्वक अभ्यास करावा. बाजारपेठेची मागणी पाहून तेवढेच उत्पादन करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन सोलापूरच्या प्र्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडचे अध्यक्ष यतीन शाह यांनी केले. कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे ‘उद्योगश्री’पुरस्कार प्रदानप्रसंगी ते बोलत होते. शाह यांच्या हस्ते इंजिनीअरिंग असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात मंगळवारी पुरस्कार वितरण झाले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक दिवंगत बापूसाहेब जाधव आणि युनिमेटल सिस्टिमसचे संस्थापक दिवंगत उद्योगपती दादासाहेब शिंदे यांना मरणोत्तर आणि मेटाफोर सिंथेसिसच्या नलिनी नेने यांना हा पुरस्कार देण्यात आला. जाधव कुटुंबियांतर्फे विजयमाला जाधव, दीपक जाधव, भरत जाधव, अजित जाधव, प्रिया जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दादासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियातर्फे अरविंद शिंदे, जयंत शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘माय जर्नी फॉर्म अ नॅशनल टू अ ग्लोबल प्लेअर’ या विषयावर यतीन शाह म्हणाले, ‘उद्योग चालविण्यासाठी मालक आणि कामगार यांनी आर्थिक ताळेबंदावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या मागणीनुसारच उत्पादन करण्याची गरज आहे. व्यवस्थापनाची अंमलबजावणी, कर्मचाऱ्यांची कामाची पद्धत आणि नेटके नियोजन झाल्यास संस्थेला अधिक फायदा होतो. जादा उत्पादन केल्यास तोटा सहन करावा लागतो. उद्योगाची उभारणी करताना अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे.’

असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर म्हणाले, ‘पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. या वर्षी पहिल्यांदाच महिला उद्योजकाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासात मोलाची भर टाकणाऱ्या यशस्वी उद्योजकांना हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.’

भरत जाधव म्हणाले, ‘उद्योगपती बापूसाहेब जाधव यांच्या कार्याचा वारसा यापुढे चालवू. त्यांचा आदर्श ठेऊनच सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी अग्रेसर राहू.’ अरविंद शिंदे, नलिनी नेने यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी उद्योगपती, सचिन मेनन, श्रीकांत दुधाणे, मानद उपाध्यक्ष नितीन वाडीकर, हिंदुराव कामटे, दिनेश बुधले, रणजित शाह, अतुल आरवाडे, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, जयदीप मांगोरे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विकास आघाडी-वारणा समूहा’त गट्टी

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet : @Appasaheb_MT

कोल्हापूर : जागा वाटपात सामावून न घेतल्यामुळे ‘एकला चलो रे’चा नारा देत सिनेटवरील शिक्षक गटात उमेदवारी जाहीर केलेल्या वारणा शिक्षण समूहाला विद्यापीठ विकास आघाडीने बरोबर घेतले आहे. शिक्षक खुल्या गटातील एक जागा वारणा शिक्षण समूहाला दिल्याने हे दोन्ही घटक विद्यापीठ निवडणुकीत एकत्र आले. दुसरीकडे सिनेटवरील शिक्षक (प्राध्यापक) गटातील दहा जागेसाठी मोठी चुरस आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यासाठी या गटातील निवडणूक प्रतिष्ठेची आहे. खुल्या गटात अपक्ष उमेदवारांचे विकास आघाडी आणि सुटासमोर आव्हान असणार आहे. शिवाय डीटीएनटी गटात सुटाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.

जागा वाटपाच्या ​प्रक्रियेत विकास आघाडी आणि वारणा समूहात अंतर राहिले. वारणा शिक्षण समूहातर्फे शिक्षक खुल्या गटातून प्रा. बी. टी. साळोखे (वारणानगर) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराला सुरुवात केली. कला वाणिज्य विज्ञान कॉलेज, फॉर्मसी आणि इंजिनीअरिंग कॉलेज मिळून वारणेचे १३९ प्राध्यापक आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यात पोहचली असताना वारणा शिक्षण समूह आणि विकास आघाडी एकत्र आले. वारणा शिक्षण समूहाचे प्रमुख विनय कोरे आणि विकास आघाडीचे प्रमुख संजय डी. पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार विकास आघाडीकडून अर्ज दाखल केलेल्या प्रा. किशोर जाधव (इंजिनीअरिंग कॉलेज कसबा बावडा) यांनी माघार घेतली. व् वारणेच्या प्रा. साळोखे यांची उमेदवारीचा विकास आघाडीत समावेश झाला.

कोल्हापूर, सांगली, सातारा मिळून ३३६६ प्राध्यापक मतदार आहेत. ‘शिक्षण व शिक्षकांच्या हित संबंधांच्या रक्षणासाठी ‘सुटा’ निवडणूक लढवित असल्याचा संघटनेचा दावा आहे. तर विद्यापीठाचा विकास आणि शिक्षक व विद्यार्थी केंद्रीभूत कामकाज हा विकास आघाडीचा अजेंडा असल्याचा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खुल्या पाच जागेसाठी १३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. विकास आघाडीच्या उमेदवारांत प्रा. सतीश घाटगे (कराड), प्रा. चंद्रकांत माने (पाटण), प्रा. व्ही.एम.पाटील (रामानंदनगर), प्रा. लक्ष्मण वाघमोडे (आष्टा) आणि प्रा. बी.टी.साळोखे (वारणानगर) यांचा समावेश आहे. ‘सुटा’कडून डॉ. डी. एन. पाटील (बिद्री), डॉ. अरुण पाटील (कोल्हापूर), प्रा. ए. बी. पाटील (मिरज), प्रा. युवराज पाटील (चिखली), प्रा. एम.डी.गुजर (देऊर) उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवारांत प्रा. गिरीष नाईक, प्रा. भारत पाटील आणि प्रा. महादेव पवार यांचा समावेश आहे.

‘एनटी’गटात मध्यवर्ती -कोल्हापूर सुटा आमने-सामने

सुटातील कारभाऱ्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविलेल्या व कोल्हापूर सुटा पुरस्कृत प्रा. रघुनाथ ढमकले (कोल्हापूर) यांची एनटी गटात अपक्ष म्हणून उमेदवारी आहे. सुटा मध्यवर्तीककडून डॉ. आर. आर. थोरात (कराड) व विकास आघाडीकडून प्रा. बी. टी. बदामे (तासगाव) असा तिरंगी सामना आहे. प्रा. प्रकाश भोजे (वारणानगर) यांनी माघार घेतली आहे. ओबीसी प्रवर्गात सुटाकडून प्रा. प्रकाश कुंभार (तिसंगी) तर विकास आघाडीकडून प्रा. सतीश पावसकर (कसबा बावडा) उमेदवार आहेत. एसटी प्रवर्गात सुटाच्या प्रा. अलका निकम (सांगली) तर विकास आघाडीचे प्रा. सिध्देश्वर गायकवाड ( लोणंद ) आमने-सामने आहेत.

आरक्षण प्रवर्गात लढतीत रंग

महिला आणि एससी प्रवर्गात तिरंगी सामना आहे. सुटाकडून प्रा. ईला जोगी (कराड), आणि विकास आघाडीकडून प्रा. माधव पवार (गारगोटी ) रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून प्रा. विद्या श्रीपती पाटील (गगनबावडा) उमेदवार आहते. एससी गटात ‘सुटा’कडू प्रा. एन.के. खंदारे (वाळवा) व विकास आघाडीचे प्रा. संजय साठे ( हुपरी) आ​णि अपक्ष प्रा. नागनाथ बनसोडे यांच्यात लढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेशी करार करण्यात स्वारस्य नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर सौंदर्यीकरणासाठी देण्यात येणाऱ्या प्रस्तावांना सध्याच्या गटातटाच्या राजकारणातून भ्रष्टाचार, अधिकार अशा विविध नावाखाली लालफितीत गुंडाळून महापालिकेच्या कपाटात ठेवले जातील. यापेक्षा महापालिकेकडून कोणतेही अधिकार नको व कोणताही करार नको. पूर्वी जे उभारले आहे, त्याचे संगोपन केले जाईल, अशी भूमिका केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकाद्वारे मांडली आहे.

पित्रे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सरकारी संस्थांचे पाठबळ, लोकांचा सहभाग व उद्योग जगतातील सीएसआरच्या माध्यमातून शहराचे रुप कसे पालटू शकते हे सिद्ध करायचे होते. यातून वर्षभरात विविध प्रकल्प राबवले. केएसबीपीमध्ये विविध क्षेत्रातील अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश होता. दुभाजकांमध्ये झाडे, नेचर पार्क, मिरजकर तिकटी सुशोभीकरण,कॉमन मॅनचे शिल्प, पोलिस गार्डन, तिरंगा झेंडा अशा उपक्रमांचा समावेश होता. शहरात ५० हून अधिक उद्याने आहेत. महापालिका त्याची निगा राखत नाही. रंकाळा तलाव व तेथील उद्यानाची दुरवस्था आहे. अशा परिस्थितीत कुणी लोकसहभागातून सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करणे व स्वतःही धोरणात्मक निर्णय न घेणे हा शहर विकासातील मोठा अडथळा बनेल. त्यावर चर्चा होऊन याला आमचा विरोध असेल असे सांगून प्रस्ताव लालफितीत गुंडाळून महापालिकेच्या कपाटात धूळखात पडतील. त्यापेक्षा केएसबीपीला महापालिकेकडून कोणतेही अधिकार नको व कोणतेही करार करण्यास स्वारस्य आहे. जे यापूर्वी उभारले आहे, त्याचे संगोपन करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुकृत्यांनी आंबोली होतेय बदनाम

$
0
0


रमेश चव्हाण, आजरा

आंबोली सर्व ऋतूंमध्ये आबालवृद्धांना पर्यटनासाठी प्राधान्याने स्वीकारलेले एक सौंदर्यस्थळ. यामुळेच तर सह्याद्रीच्या दक्षिण-पश्चिम टोकाकडील आणि अरबी समुद्रापासून काही किलोमीटर अंतरावरील घाटमाथ्यावर वसलेले हे हजारो एकरांवरील पर्यटन केंद्र सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील निर्जन आणि एकांत अशा निवांतपणाचा वापर आता गुन्हेगारी कारवायांसाठी होत असल्याचे सिद्ध होत आहे. सर्वसामान्यच नव्हे, तर पोलिसांच्या वर्दीतील माणसांनाही या परिसराचा असा दुरुपयोग करण्याचे धाडस होत आहे.

आंबोलीच्या विस्तीर्ण अशा भूभागावर वसलेल्या विविध पर्यटनकेंद्रांचा समावेश होतो. यामध्ये बेळगाव-सावंतवाडी मार्गावर नांगरतास धबधबा, या मार्गापासून तीन किलोमीटरवर हिरण्यकेशीचे उगमस्थान, गेळे परिसरातील कावळेसाद, चौकुळचे विहंगम सौंदर्य, आंबोली गावापासून पश्चिमेला महादेवगड पॉइंट, आंबोलीचा मुख्य घाटरस्ता सुरू होतानाचा सनसेट पॉइंट, नागमोडी वळणाचा घाटमार्ग, कर्नाटक आणि उर्वरित कोकणाचे नजरेच्या एका टप्प्यात सामावून देणारे टॉवर पॉइट्स ही या स्थळांची खरीखुरी खासियत आहे. या परिसरात दिवसाच्या कोणत्याही प्रहरी येथे मनमुराद हिंडण्या-फिरण्याची कोणालाही बंदी नाही. पण याच वैशिष्ट्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. अतिसाहसापायी जीव गमावण्याच्या विविध घटना व अपघातांसह आजूबाजूच्या परिसरात केलेल्या गुन्हेगारी कारवायांमधील पुरावे नष्ट करण्यासाठी या परिसराचा वापर होत आला आहे. पूर्वीच्या तुलनेत याचे प्रमाण सध्या वाढू लागल्याने आंबोली बदनाम होते आहे

साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी येथील नांगरतास धबधब्याचा वापर एक मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी झाला होता. पण त्या मृतदेहाच्या पँटच्या बेल्टमुळे हा खून उघडकीस आल्यावर मोठा गहजब आजरा शहरात माजला होता. त्यानंतर अव्याहतपणे लहानमोठ्या कारस्थानी कारवाया आणि छापाससत्रे या परिसरात सुरू असल्याचे उघड झाले आहे. गेल्या ऑगस्टपासून मात्र आंबोलीला मोठी कुख्याती मिळाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिमद्यसेवनामुळे दोन तरुणांनी स्वतःला कावळेसादच्या आत्मघाती दरीमध्ये झोकून दिले, तर आठवड्यापूर्वीच सांगली पोलिसांकडून तरुणाचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर चारच दिवसांत डोके ठेचून मारलेल्या मृतदेहाचा येथे कडेलोट झाला आहे.

आंबोली परिसरात सर्वच ठिकाणी सहजतेने मिळणारा एकांतपणा, शासन-प्रशासनाची उदासीनता याचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेली गुन्हेगारी प्रवृत्ती आणि 'आवो, जावो घर तुम्हारा' यासारख्या बेफिकिरी स्वागतवृत्तीसह या परिसरातील पर्याप्त सुरक्षा यंत्रणेचा अभाव याला कारणीभूत ठरतो आहे.

दिवस-रात्रीच्या कोणत्याही प्रहरात अगदी लिलया आणि बिनधोकपणे कोणालाही वावर करता येत असल्याने अशा परिस्थितीचा लाभ घेणाऱ्यांचे फावते आहे. आंबोलीमधील एकमेव पोलिस दूरक्षेत्राला यावर नियंत्रण ठेवणे अवघड बनले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कळंबा कारागृहातील गणेश पोपट शिंदे या कैद्यानं बुधवारी सकाळी नैराश्यातून ब्लेड आण पत्र्यानं स्वतः वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानं पोटावर आणि मांडीवर दहा ते बारा ठिकाणी वार केलं आहेत. अचानक झालेल्या या प्रकारामुळं कळंबा कारागृहाचं प्रशासन हडबडून गेलं आहे.

कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मूळचा करुडवाडीचा (जि. सोलापूर) असून खुनाच्या आरोपाखाली २०१४पासून तुरुंगात आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी त्यानं २०१५ मध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कैद्यांना दाढी करण्याठी ब्लेड दिलं जातं. हे ब्लेड आणि पत्र्याच्या तुकड्याच्या सहाय्यानं कारागृह सर्कलच्या पाच क्रमांकाच्या स्वच्छतागृहात त्यानं स्वत:वर वार करून घेतले. कारागृह प्रशासनाला हा प्रकार कळताच बंदोबस्तावर असलेल्या कारागृह पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी गणेशला तातडीनं कारागृहाच्या रुग्णालयात दाखल केलं. तेथून त्याला सीपीआरमध्ये नेण्यात आलं. या प्रकरणी त्याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

IRCTCची विशेष रेल्वे कोल्हापुरातून धावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेली काही वर्षे आयआरसीटीसीची रेल्वे कोल्हापुरातून सोडण्याच्या मागणी मान्य झाली आहे. येत्या २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरातून उत्तर भारत यात्रेसाठी रेल्वे धावणार आहे. या यात्रेसाठी ८२० आसनक्षमता असून ५५० तिकीटांची नोंदणी झाली आहे. ११ रात्री १२ दिवसांच्या कालावधीसाठी प्रत्येक व्यक्तिसाठी ११ हजार ३४० तिकीट दर आकारला जाणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडचे सहाय्यक व्यवस्थापक (पर्यटन) गुरुराज सोन्ना यांनी ही माहिती दिली. त्यांनी मंगळवारी कोल्हापूर रेल्वेस्थानकाला भेट दिली.

व्यवस्थापक सोन्ना म्हणाले, ‘केंद्र सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. उत्तर भारत यात्रेत उदयपूर, अजमेर, जयपूर, मथुरा, आग्रा, हरिद्वार, अमृतसर, वैष्णोदेवी ही प्रेक्षणीय स्थळे पाहता येणार आहेत. यात्रेसाठी आकारल्या जाणाऱ्या तिकीट दरातून दोन वेळचे शाकाहरी भोजन, नाष्टा, निवासाची व्यवस्था, बस, प्रत्येक रेल्वेच्या डब्यात सुरक्षा कर्मचारी, प्रत्येक डब्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापक तैनात केला आहे.

पर्यटनस्थळावर रात्रीच्या वेळी प्रवास आणि दिवसभरात विविध ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे. २४ नोव्हेंबरला ही रेल्वे कोल्हापुरात येणार आहे. येत्या चार दिवसांत या रेल्वेच्या आगमनाची वेळ निश्चित केली जाणार आहे. बुधवार पर्यंत आयआरसीटीचे कर्मचारी कोल्हापुरात थांबणार आहेत. प्रवासी त्यांच्याकडे या यात्रेसाठी नोंदणी करु शकतात. त्यासह www.irctctourism.comवर ऑनलाइन बुकिंग करु शकतात. त्यासह अधिकृत प्रतिनिधीकडेही धनादेश किंवा रोख देऊन तिकीटाची नोंदणी करता येऊ शकते. आयआरसीटीचे अधिकृत केंद्र रेल्वेस्थानकाच्या आवारात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासह उत्तर भारत, दक्षिण भारत यात्रेसाठी भारत दर्शन यात्रेची नियोजन सुरु आहे.’ यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते.

रेल्वेचे थांबे
कोल्हापूर
मिरज
सातारा
पुणे
लोणावळा
कल्याण
वसई रोड
सुरत
बडोदरा
रतलाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात पोलिसांची चौकशीसीआयडीच्या पाच पथकाकडून मोहीम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोर भंडारे याचा सीआयडीने बुधवारी कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. या प्रकरणी निलंबित केलेल्या सातही पोलिसांची चौकशी आणि जबाब रात्री उशीरापर्यंत नोंदविले जात होते. चौकशीसाठी सीआयडीने सांगलीजवळच्या पाच जिल्ह्यातील सीआयडी पथकाचा कँपच लावला आहे.
अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांनाही जबाबासाठी बोलावले असून त्यांचा नेमका आक्षेप काय आहे? याची पडताळणी केली जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या कृत्याची विविध कारणे समोर येत असून ती सर्व तपासली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सध्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त पुरावे संकलित करण्यावर भर देण्यात येत आहे. संशयित उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झाकीर पट्टेवाले या सर्वांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवले आहे. त्यांना तपासाठी सीआयडी कँपमध्ये आणले जाते. ज्यांच्यासमोर पोलिस गुन्हेगारांनी अनिकेतचा अमानुषपणे जीव घेतला त्या सर्व सात पोलिसांना निलंबित केले असून त्याची चौकशी सीआयडीने सुरू केली आहे. यामध्ये ठाणे अंमलदार मिलिंद शिंदेसह प्रदीप जाधव, गजानन व्हावळ , श्रीकांत बुलबुले, स्वरुपा संतोष पाटील, ज्योती वाजे आणि सुभद्रा साबळे यांचा समावेश आहे.
खाकी वर्दीतील गुंडांना आधी गोळ्या घाला...
गोळ्या घालण्याची इतकीच खुमखुमी असेल तर सरकारने आधी खाकी वर्दीतील गुंडांना गोळ्या घाला आणि त्यानंतर सामान्य शेतकऱ्यांची चळवळ दडपण्यासाठी गोळ्या झाडाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत बोलताना दिली. नगरमध्ये शांततेत सुरू असणारे शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला खाकी वर्दीतील गुंड न्यायासाठी लढणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांवर गोळ्या झाडत आहेत, तर सांगलीत खोट्या गुन्ह्यात अडकवून निरपराध तरूणाचा खून करण्याचा पराक्रम खाकी वर्दीतील गुंड करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
डीएनए अहवाल लवकरच
वास्तविक डीएनए चाचणीचा अहवाल यायला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु कोथळे खून प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनीच अनिकेतचा खून करून त्याचा मृतदेह जाळून मुख्य पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीव्दारे तो मृतदेह अनिकेतचाच आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. तपासाला गती येण्यासाठी डीएनएचा अहवाल लवकर मिळविण्यासाठी सरकार पातळीवरुनच प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.
सीबीआय’ चौकशी कराः शेट्टी
अनिकेत कोथळेच्या खुनाची कोठडीतील घटना म्हणजे खाकी वर्दीआड लपलेली गुंडगिरीच आहे. पोलिस अधीक्षकांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. त्याचबरोबर पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे यांची एकूण हालचाल आणि त्यांनी घेतलेली भूमिका पाहता आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याच्या संशायापासून त्या दूर राहू शकत नाहीत. अशा सर्व संशयांचा केंद्रबिंदू पोलिस असल्याने या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’मार्फतच चौकशी केली पाहिजे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीत केली.
सांगलीतील भारतनगरमध्ये जाऊन बुधवारी शेट्टी यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अनिकेतच्या भावाचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, एकूणच हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पोलिसांनीच पोलिस दलाचा खेळखंडोबा केला आहे. सर्व संशयित पोलिसच असल्याने सीआयडी चौकशीत या खाकीतील गुंडांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीच झाली पाहिजे, सामान्य जनतेला कायदा हातात घ्यायला लावू नका.
मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते आहे. त्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालायला हवे होते. मात्र, त्यांचे लक्ष नाही. आपण यापूर्वीही तातडीने मेलद्वारे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांच्या गुन्हेगारी वृत्तीची चौकशी तत्काळ होणे आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण गृहखातेच बदनाम होईल. खाकी वर्दीतीलच गुंड होऊन अन्याय करायला लागले तर न्याय मागायचा कोणाकडे? सीबीआय चौकशीची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सामान्यांवरील अन्ययाचा प्रतिकार करण्यासाठी सामान्यांनाच कायदा हातात घ्यावा लागेल, अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी आणू नये, असेही शेट्टी म्हणाले.
कोथळे कुटुबीयांच्या आरोपाची शहानिशा सुरू
अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांनी पहिल्या दिवसांपासून पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्याबाबत घेतलेला आक्षेप कायम आहे. कुटुंबीयाच्या आक्षेपांची दखल घेऊन सीआयडीने बॅग व्यापारी आणि मध्यस्थी करणारा, अशा दोघांची चौकशी सुरू केली आहे. कुटुंबीयांचा नेमका आक्षेप काय आहे, हे जाणून घेण्यासाठी कोथळे कुटुंबीयांना सीआयडीने चौकशी कँपमध्ये बोलावले आहे. अनिकेतचा जीव जाईपर्यंत त्याला मारहाण करण्याचे, अघोरी पद्धतीच्या थर्ड डिग्रीचा वापर करण्याचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. अनिकेत आणि तो काम करीत असलेला बॅग दुकानदार यांच्यातला वाद पोलिस ठाण्यात मिटल्यानंतर अनिकेतच्या खूनापर्यंत जे काय घडले, त्याचा घटनाक्रम अद्याप उघड करण्यात आलेला नाही. अनिकेतवर लुटमारीचा दाखल झालेला गुन्हा आणि त्यातला फिर्याद खोटा असल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्या अनुषंगाने संबधित फिर्यादीची मंगळवारी दिवसभर उलटतपासणी घेतली. पण, तो आपल्या फिर्यादीवर ठाम असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अनिकेतचा बॅग दुकानदाराबरोबरचा वाद आपसात मिटल्यानंतर अनिकेत आणि अमोल भंडारे हे दोघे पोलिसांना कुठे सापडले. लुटमारीच्या फिर्यादीला या दोघांची नावे कशी समजली. रात्री अडीच वाजता लुटमारीची घटना घडल्यानंतर कोथळे आणि भंडारे या दोघांना अटक केल्याचे पहाटे तीन वाजता त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. त्या दिवशी सायंकाळी घराबाहेर पडलेला अनिकेत पुन्हा घरी आलाच नव्हता. थेट पोलिसांचा त्याला अटक केल्याचाच फोन आला होता. त्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक कट करून अनिकेतला या गुन्ह्यात गोवले आहे का? असे करण्यामागे पोलिसांचा उद्देश कोणता होता? या गोष्टींचा उलगडा होणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी नगरसेवकांवरकारवाईसाठी कायदा दुरुस्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
जय महाराष्ट्र घोषणेवर बंदी घालण्याच्या घोषणेमुळे वादग्रस्त ठरलेले कर्नाटकचे नगरविकास खात्याचे मंत्री रोशन बेग यांनी आता मराठी नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी कायदा दुरुस्ती करण्याचे सूतोवाच केले आहे. काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक झाली, त्या बैठकीत रोशन बेग यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
मंगळवारी काही स्वयंघोषित कन्नड नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काळ्या दिनावर बंदी घाला, काळ्या दिनात सहभागी झालेल्या नगरसेवकांवर कारवाई करा, अशी मागणी केली होती.
मात्र, सध्याच्या कायद्यानुसार कोणतीही कारवाई नगरसेवकांवर करता येत नाही म्हणून रोशन बेग यांनी महापालिका कायद्यात दुरुस्ती करून राज्यविरोधी कारवाई किंवा घोषणा देणाऱ्या नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याची योजना रोशन बेग आखत आहेत.
मागील वर्षी मराठी भाषिक महापौर सरिता पाटील काळ्या दिनाच्या फेरीत तोंडाला काळी पट्टी बांधून सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई कर्नाटक सरकारला करता आली नाही. महापालिका बरखास्त करण्याला सरकार अनुकूल नव्हते. त्यामुळे कन्नड संघटनांना चिडीचूप बसावे लागले होते. यंदा मराठी भाषिक महापौर संज्योत बांदेकर काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाल्या होत्या. पण, त्यांच्यावरही कर्नाटक सरकारला कोणतीच कारवाई करता आली नाही. महापालिका बरखास्तीला विरोधी गटाचा विरोध आहे. त्यामुळे ठराविक नगरसेवक वा अन्य व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा घाट सरकारने घातला आहे.
खासगी डॉक्टरांचा बेमुदत संप
दवाखाने बंद; सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्दी
निपाणी
खासगी वैद्यकीय दुरुस्ती विधेयक खासगी डॉक्टरांसाठी मारक ठरणारे आहे. हे विधेयक लागू करू नये, या मागणीसाठी निपाणीतील खासगी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. मंगळवारीही हा संप कायम राहिल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली. खासगी दवाखाने बंद तर सरकारी रुग्णालयात गर्दी, असे चित्र सोमवारपासून दिसू लागले आहे.
खासगी वैद्यकीय दुरुस्ती विधेयक लागू करण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. खासगी रुग्णालये व डॉक्टरांकडून आरोग्यसेवेसाठी भरमसाठ शुल्क आकारले जात आहेत. यासह अनेक बाबतीत त्यांच्याकडून जनतेची पिळवणूक होत आहे. असा दावा करीत कर्नाटक सरकारने अशा खासगी रुग्णालये व डॉक्टरांवर वचक ठेवण्यासाठी विधेयक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे डॉक्टर व रुग्णालयांचे नुकसान होईल, अशी भूमिका घेत कर्नाटकातील आयएमएमच्या १७७ शाखांनी विरोध करीत संपाची भूमिका घेतली आहे. यापूर्वी ३ जुन व ३ नोव्हेंबर रोजी संप करण्यात आला होता. मात्र, त्याची सरकारने दखल घेतली नव्हती. सोमवारपासून (ता. १४) बेळगाव येथे सरकारचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सोमवारपासून संप पुकारण्यात आला आहे. बुधवारीही हा संप कायम राहिल्याने रुग्णांना मोठा फटका बसला. जोपर्यंत सरकार विधेयक मागे घेत नाही किंवा आयएमएशी या विषयी चर्चा करीत नाही, तोपर्यंत हा संप कायम राहणार असल्याचे निपाणी आयएमएचे सेक्रेटरी डॉ. शितल शेट्टी यांनी सांगितले.
रुग्णांची महाराष्ट्रात धाव
तावरणातील बदलांमुळे सर्दी, थंड, ताप, खोकला या आजारांचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र निपाणीत डॉक्टरांचा संप सुरू असल्याने या रुग्णांचे हाल होत आहेत. परिणामी निपाणी भागातील रुग्णांनी उपचारांसाठी महाराष्ट्रात धाव घेतली आहे. निपाणीनजीक असणाऱ्या कागल, कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज भागातील रुग्णालयात कर्नाटकातील रुग्णांची गर्दी दिसत आहे.
विधेयक विधानसभेत सादर
खासगी वैद्यकीय रुग्णालय दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी सलग तिसऱ्या दिवशीही खासगी डॉक्टरांनी आपली सेवा स्थगित ठेवल्यामुळे रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. मंगळवारी आरोग्यमंत्री रमेशकुमार यांनी विधेयक विधानसभेत विधेयक मांडले. आजही काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची या विधेयकावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी विधेयक मागे घ्यावे, दुरुस्ती करावी अशी मते बैठकीत व्यक्त झाली. तेव्हा आरोग्यमंत्री रमेशकुमार यांनी बैठकीतून बाहेर पडणे पसंद केले. रमेशकुमार विधेयक मंजूर करून घेण्यावर ठाम आहेत. जनतेचा विचार करून हे विधेयक मांडण्यात आले आहे. विधेयक रद्द झाले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशी ठाम भूमिकाही रमेशकुमार यांनी घेतली आहे. कालपासून डॉक्टरांच्या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र यांनी कालपासून उपोषण सुरू केले आहे. आता दर रोज उपोषणात प्रत्येक जिल्ह्यातील डॉक्टर सहभागी होत आहेत. डॉक्टर सरकारने अन्यायकारक विधेयक मागे घ्यावे, या मागणीवर ठाम आहेत, तर सरकार विधेयक मंजूर करून घेण्यावर ठाम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस वाहतूक करणाऱ्यावाहनांची आरटीओकडून तपासणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
ऊसदरासाठी सुरू असलेले आंदोलन आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. बुधवारी पंढरपूरमध्ये आंदोलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओकडून कडक तपासणी सुरू केल्याने रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने गायब झाली आहे.
साखर कारखानदार पोलिसांच्या मदतीने आंदोलन मोडून काढू लागल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील कायद्याची लढाई कायद्यानेच करण्यासाठी बेकायदा ऊस वाहतुकीबाबत आरटीओ विभागाला तक्रार केल्याने आरटीओ पथकाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेनंतर आता साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. पहिल्याच दिवशी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा सहकारी साखर कारखाना आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या केन यार्डमध्ये जाऊन आरटीओ पथकाने ट्रॅक्टरचे कागदपत्रे, कायदेशीर पूर्तता आणि ओव्हरलोडची तपासणी केली. पहिल्याच कारखान्यावर हजर असलेल्या बहुतांश ट्रॅक्टर नियमात अपात्र ठरले. ओव्हरलोडमध्ये सापडल्याने त्यांना तातडीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यापूर्वी ऊस वाहतूक थांबविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने हाती घेतली होती मात्र, कारखानदारांनी पोलिसांच्या मदतीने आंदोलकांची धरपकड सुरू केल्याने ऊसदर आंदोलन तुटण्याच्या मार्गावर असताना आता स्वाभिमानाने आरटीओ तपासणीचे नवीन कार्ड खेळून कारखानदारांना अडचणीत आणले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बाबत नियम अतिशय कडक असून, आजवर कधीच या नियमांवर कोणी बोट ठेवून तक्रार केली नव्हती. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीची नोंदणी आवश्यक असते. या ट्रॉलींना हायड्रॉलिक ब्रेक गरजेचे असतात. त्याला रिफ्लेक्टर असणे गरजेचे असते. नियमानुसार सर्वच ऊस वाहतूक करणारी वाहने ओव्हरलोड असल्याने आरटीओच्या प्रत्येक नियमात या वाहतूकदारांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे तपासणी सुरू झाल्याची माहिती मिळताच सर्वच रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारी वाहने गायब झाली आहेत. ज्या रस्त्यांनी रोज शेकडो उसाचे ट्रॅक्टर जात होत, त्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. स्वाभिमानाची ही मात्र लागू पडल्याने नाईलाजाने कारखानदारांना पहिला हप्ता जाहीर करावा लागणार आहे. सोलापूर आरटीओ कार्यालयाला दिलेल्या तक्रारीनुसार स्वाभिमानी आता हा फॉर्मुला राज्यभर वापरणार असून, अशी तपासणी मोहीम राज्यभर सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधींच्या कामाची फेरटेंडर

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

टेंडर भरण्यासाठी केलेल्या नवीन नियमावलीमुळे कंत्राटदारांनी टेंडर न भरण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गेल्या आर्थिक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, वीज वितरण अशा विविध क्षेत्रातील कोट्यवधींची कामे रखडली. या रखडलेल्या कामांमुळे रस्त्यांची दुरुस्ती, पाइपलाइनची कामे, विविध बांधकामे अशा सर्वच विकासकामांना फटका बसला आहे. टेंडर प्रक्रिया बंद होऊ नये म्हणून अशा कामांची फेरटेंडर करण्यात आली आहेत. कंत्राटदारांनी घेतलेला आंदोलनाचा पवित्रा आता मागे घेतला असला तरी अनेक कामांचा निधी परत जाऊ नये यासाठी रखडलेली कामे विनाअडथळा पूर्ण करुन घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.


सव्वाशे कामे ‌थांबली

इपीएफ, जीएसटी या एकापाठोपाठ आलेल्या अडचणींमुळे महापालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान, दलितेतर तसेच ​दलित प्रभागांमधील आणि महापालिकेच्या निधीतून करण्यात येणारी पवडी व पाणीपुरवठा विभागातील जवळपास सव्वाशे कामे रखडली आहेत. त्यात अगदी गटार दुरुस्तीपासूनच्या कामांचा समावेश असून रखडलेल्या कामांची अंदाजित रक्कम २० कोटी रुपये आहे. तर राज्य सरकारकडून निधी आलेल्या प्रकल्पांनाही टेंडर न भरण्याचा फटका बसला आहे. या रखडलेल्या कामांमुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

महापालिकेतील कामे घेत असताना संबंधित कंत्राटदाराने इपीएफची नोंदणी करणे आवश्यक केले होते. ही नोंदणी नसलेल्या कंत्राटदारांना कामांचे टेंडर भरण्यास मज्जाव करण्यात आला होता. परिणामी कामे बंद पडली होती. २०१६-२०१७ या आर्थिक सालातील कामे ठप्प झाली. त्यानंतर राज्य सरकारने कंत्राटदारांना लागू केलेल्या नवीन अटींमुळे कंत्राटदारांच्या संघटनेने टेंडर न भरण्याचे जाहीर केले. त्यामुळे छोट्या कामांपासून मोठ्या कामापर्यंतचे साऱ्यांचीच टेंडर भरण्यात आली नाहीत. त्यातूनच अनेक टेंडरना मुदतवाढ देण्यात येत होती. या प्रकाराने कंत्राटदार त्रस्त असतानाच जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. महापालिका स्वनिधीतून गटार, शौचालयांची दुरुस्ती, महापालिकेच्या शाळांची दुरुस्ती, किरकोळ साहित्याची खरेदी, स्टेशनरी, मार्केट इमारतींची दुरुस्ती अशी कामे करत असते. त्यांची टेंडरच भरली गेली नसल्याने विकास कामे रखडली होती. याशिवाय नगरोथ्थान, दलितेतर, दलित प्रभागांमध्ये ​सरकारकडून निधी ​दिला आहे. अमृत योजनेतील १०७ कोटीच्या कामाचे फेरटेंडर करावे लागले आहे. राज्य सरकारकडून आलेला निधी या वर्षात खर्च करण्याची आवश्यकता आहे.


साडेसहा हजार किलोमीटर रस्त्यांची ‘वाट’

कोल्हापूर ः निधीअभावी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील साडेसहा हजार किलोमीटर रस्त्यांची वाट लागली आहे. त्याची देखभाल, दुरूस्ती आणि पुनर्बांधणी जि. प. बांधकाम विभागाची यंत्रणा करते. दरवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी १५ ते २० लाख रूपये सरकारकडून येतात. मात्र यंदा पावसाळा होऊन दोन महिने उलटून गेले तरी निधी देण्यात सरकारने ठेंगा दाखवला आहे. परिणामी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

जिल्हयात जिल्हा मार्ग ४००० किलोमीटरचे आहेत. ‌उर्वरित अडीच हजार ‌किलोमीटर इतर रस्ते आहेत. त्या सर्व रस्त्यांवर नियमित दुचाकी, चारचाकींची वर्दळ असते. पूर्वी रस्त्यांची बांधणी चांगली केलेली नाही. भरीव निधीही दिला नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर रस्ते खड्डेमय होतात. खड्ड्यांतून रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. ऊस हंगाम सुरू होण्याआधी आणि पावसाळा झाल्यानंतर खड्डे भरावे लागतात. अन्यथा ऊसाचे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी जाऊन पुन्हा खड्डे मोठे होत आहेत. अपघाताचे प्रमाण वाढते. रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. निधीच नसल्याने प्रशासनास वाहनधारक, सामान्य लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त जिल्हयाची घोषणा केली होती. प्रत्यक्षात खड्डेयुक्त जिल्हयाचा अनुभव वाहनधारकांना येत आहे..


निधीअभावी महावितरणलाच ‘शॉक’

कोल्हापूर ः महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरु आहे. ग्राहकांना दिलेल्या सुविधांच्या तुलनेत वसुली होत नसल्याने धडक मोहीम राबविली. सुमारे १२ कोटींच्या थकित बिलाची वसुली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आहे. यात घरगुती, व्यापारी, औद्योगिकसह शेती पंपधारक आहेत. या वसुलीचा फटका महावितरणच्या विविध विकासकामे आणि प्रकल्पांवर झाला आहे. महावितरणकडून वीज ग्राहकांची आणि महावितरणने विविध कामांसाठी आउटसोर्सिंग केले आहे. या माध्यमातून कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. जोपर्यंत थकीत बिल वसुली होत नाही तोपर्यंत नव्या योजनांसाठी निधी दिला जाणार नसल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील पावसाच्या काळात जळालेले रोहित्र, नवीन विजेचे खांब, नवीन कनेक्शनसह देखभाल दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी नसलेल्या प्रस्तावित विकासकामांच्या निविदाही काढलेल्या नाहीत. महावितरणमध्ये बहुतांशी कामांचे खासगीकरण झाले आहे. अनेक एजन्सीला कामांचे ठेके दिले आहेत. राज्य सरकारकडे प्रस्तावित कामांसाठी महावितरणने सुमारे एक कोटीहून अधिक निधीची मागणी केली आहे. मात्र हा निधी अद्याप दिलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला मारून पतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या मारहाणीत राजश्री सुभाष कुंभार (वय ३८, रा. शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीमजवळ) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पती सुभाष दत्तात्रय कुंभारने (वय ४५) याने चांदी पॉलिश करण्यासाठी वापरणारे जाणारे रसायन पिवून आत्महत्या केली. बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शुक्रवार पेठेत चांदी व्यावसायिकांच्या घरात घडलेल्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी सांगितले की, सुभाष आणि त्याची पत्नी राजश्री हे शुक्रवार पेठेतील दुमजली घरात राहतात. घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा चांदी कारखाना आहे. दांपत्याने शुक्रवारी रात्री मोठा मुलगा गणेश (वय १२) आणि लहान मुलगा करण (१०) या दोघांना खेळण्यासाठी बाहेर पाठविले. पहिल्या मजल्यावरील दरवाजा बंद करून ते बेडरुममध्ये गेले. रात्री पावणेआठ वाजता या दाम्पत्यात कौटुंबिक कारणातून वाद निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी तिकडे लक्ष दिले नाही. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे वाद सुरू होता. भांडणाचा आवाज घराबाहेर येत होता. यावेळी पती सुभाष याने रागाच्या भरात पत्नी राजश्रीला लाकडाच्या जोरदार फटक्याने डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. यात राजश्रीच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. पत्नी मृत झाल्याचे समजताच चांदी पॉलिशसाठी वापरणारे जाणारे रसायन पिवून आत्महत्या केली.

सुमारे अर्ध्या तासानंतर खेळायला गेलेली मुले परत घरी परतली. आई-वडील दरवाजा उघडत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेजारी राहणारे त्याचे चुलते, परिसरातील नागरिक जमा झाले. याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस आल्यानंतर दाम्पत्याने बेडरुममध्ये आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसले. दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी आत्महत्येचे मूळ कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images