Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साखर कारखान्यांचे सांडपाणी पंचगंगेत

0
0

कोल्हापूर: गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी बायपासद्वारे ते सांडपाणी पंचगंगा नदीत सोडण्याची साखर कारखान्यांनी केलेली व्यवस्था सोमवारी उघड झाली. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाहणी समितीने सोमवारी विविध कारखान्यांना एकाचवेळी अचानक भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित कारखान्यांना बायपास व्यवस्था तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची खात्री करण्यासाठी पुन्हा पाहणी केली जाणार आहे.

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात होण्यापूर्वी पंचगंगा नदी काठावरील कारखान्यातून निघणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था पाहण्यासाठी सोमवारी समितीने दौरा आयोजित केला होता. प्रांताधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रा​देशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, पोलिस, जिल्हा परिषद यांच्या प्रतिनिधींनी दोन टीमद्वारे पाहणी केली.

या कारखान्यांबरोबर पंचतारांकित एमआयडीसीमधील सीईटीपीचीही पाहणी केली. कारखान्यांची अचानक तपासणी केली असता अनेक कारखान्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली आहे. पण या प्रक्रियेऐवजी बहुतांश सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये सोडण्याची बायपास व्यवस्था केल्याचेही दिसून आले. सांडपाणी सोडण्याचे आउटलेट कुठे आहे, कशा प्रकारे सांडपाणी सोडले जाते याची छायाचित्रे घेण्यात आली. अचानक केलेल्या पाहणीमुळे कारखान्यांच्या यंत्रणेची धावपळ उडाली. गंभीर त्रुटी दिसून आल्यानंतर समितीने तिथेच ही बायपास व्यवस्था काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार आहे. तर कारखान्यांनी ही व्यवस्था काढून घेतली आहे का याची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राध्यापक,पदवीधरमध्ये मोठी चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळ व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी सोमवारी प्रसिद्ध झाली. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांच्यामध्ये शिक्षक, अॅकेडमिक काउन्सिलसाठी थेट लढत आहे. रविवारपासून ३८ उमेदवारी अर्जावरील अपिल सुरू असल्याने पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रक्रिया सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लांबली. प्राचार्य गटातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. विविध अधिकार मंडळासाठी २०० हून अधिक उमेदवार रिंगणात राहिले. दरम्यान अर्जावरील अपिलात नऊ जणांचे अर्ज मान्य झाले.

प्राचार्य गटातील दहापैकी आठ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. डीटीएनटी प्रवर्गात प्राचार्य चंद्रशेखर तुकाराम कारंडे व प्राचार्य सखाराम तुकाराम शिंगटे यांचे उमेदवारी राहिल्याने या जागेसाठी निवडणूक होणार आहे. एसटी प्रवर्गात उमेदवार नसल्याने जागा रिक्त राहिली. संस्था प्रतिनिधी गटात सहापैकी जागा ​बिनविरोध झाल्या. विकास आघाडीचे उमेदवार राजू जयवंतराव आवळे यांचा अर्ज अपिलात मंजूर झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

शिक्षक गटात २८ उमेदवार

विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा यांच्यामध्ये शिक्षक गटातील दहा जागासाठी थेट लढत आहे. दहा जागेसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत. शिक्षक खुल्या गटातील पाच जागेसाठी प्रा. सतीश घाटगे, प्रा. मनोज गुजर, प्रा. किशोर जाधव, प्रा. चंद्रकांत माने, प्रा. गिरीश नाईक, प्रा. अरुण पाटील, प्रा. अशोकुमार पाटील, प्रा. भारत पाटील, प्रा. दत्तात्रय पाटील, प्रा. वसंत पाटील, प्रा. युवराज पाटील, प्रा. महादेवी पवार, प्रा. बाळासाहेब सोळोखे आणि प्रा. लक्ष्मण वाघमाडे हे रिंगणात आहेत. पदव्युत्तर शिक्षक गटात विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंचात लढत होणार असून तीन जागेसाठी नऊ जण रिंगणात आहेत. यामध्ये प्रा. उत्तम बोंबले, प्रा. एस. डी. डेळेकर, प्रा. प्रवीणकुमार पाटील, प्रा. तृप्ती करेकट्टी, प्रा. भारती पाटील, प्रा. उर्मिला पोळ, प्रा. निखिल गायकवाड, प्रा. श्रीकृष्ण महाजन, प्रा. एस. एस. पन्हाळकर यांचा समावेश आहे. नोंदणीकृत पदवीधर गटात नऊ जागेसाठी ३० उमेदवार पात्र ठरले आहेत. विद्यापीठ विकास आघाडी, आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे उमेदवार रिंगणात आहेत.

..........

विकास आघाडीचा आज प्रचाराचा प्रारंभ

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्यावतीने मंगळवारी (ता.७) प्रचाराचा प्रारंभ होणार आहे. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज येथे सकाळी ११ वाजता मेळावा आयोजित केला आहे.​ विद्यापीठ विकास आघाडीचे पदाधिकारी, संस्थाचालक, प्राचार्य संघटना, अभाविपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळावा होईल.

……….

अभ्यास मंडळाच्या निवडणुका बिनविरोध

विविध अभ्यास मंडळासाठी १०९ उमेदवार पात्र ठरले आहेत. काही अभ्यास मंडळाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर काही ठिकाणी निवडणूक होत आहे. दरम्यान जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, लॉ, होम सायन्स शारिरीक शिक्षणशास्त्र विभाग, कम्प्युटर सायन्स, इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड बायो टेक्नॉलॉजी या अभ्यास मंडळासाठी उमेदवार न मिळाल्याने जागा रिक्त राहिल्या.

…………

‍प्राचार्य गटातील दहापैकी आठ जागा बिनविरोध

प्राचार्य गटातील डीटीएनटी जागेसाठी निवडणूक

संस्था प्रतिनिधी गटातील सहापैकी जागा बिनविरोध

शिक्षक (प्राध्यापक) गटातील दहा जागेसाठी २८ उमेदवार

पदव्युत्तर शिक्षक गटातील तीन जागेसाठी नऊ उमेदवार

नोंदणीकृत पदवीधर गटात नऊ जागेसाठी ३० जण रिंगणात

पदवीधर गटातील प्रा. लोभाजी भिसे बिनविरोध

अॅकेडमीक कौन्सिलमधील शिक्षकसाठी ११ जण रिंगणात

अॅकेडमीक कौन्सिलमध्ये डीटीएनटीतून प्रा. शर्मिला साबळे बिनविरोध

अॅकेडमीक कौन्सिलमध्ये शिक्षक ओबीस व एसटी प्रवर्ग रिक्त

२५ अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी १०९ उमेदवार पात्र

सात अभ्यास मंडळांना उमेदवार नाहीत

अकरा अभ्यास मंडळे बिनविरोध

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके उडविल्यावरूनदोन गटात हाणामारी

0
0

इचलकरंजी

कोरोची येथील लोकमान्यनगर परिसरात ग्रामपंचायत निवडणूक वाद आणि फटाके फोडल्याच्या कारणातून तलवार व काठीने झालेल्या हाणामारीत आठजण जखमी झाले. यावेळी घरातील प्रापंचिक साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या प्रकरणी शहापूर पोलिसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

लोकमान्यनगर परिसरात पांडुरंग पाटील तसेच नितीन आनंदा सुर्यवंशी हे शेजारी राहतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत या दोघांमध्ये काही कारणातून वाद निर्माण झाला होता. त्यातूनच सुर्यवंशी यांनी पाटील यांच्या दारात फटाके वाजवल्याने वाद चिघळला होता. फटाके का वाजवले याचा जाब विचारण्यासाठी पांडुरंग पाटील व त्यांचा मुलगा विकास हे गेला असता नितीन आनंदा सुर्यवंशी, अनिल खरसे, प्रकाश कडुलकर, आनंदा सुतार, सतिश सुर्यवंशी, आनंदा सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी व अन्य पाच ते सहाजणांनी या दोघांना लाथाबु्क्क्यांनी मारहाण केली. यावेळी आनंदा सुतार याने विकास याच्या हातावर तलवारीने वार केल्याने तो जखमी झाला. तसेच पांडुरंग पाटील यांमयासह वाद सोडविण्यास आलेल्या प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा रामचंद्र या दोघांनाही काठीने मारहाण करण्यात आल्याने तेही जखमी झाले आहेत, अशी फिर्याद पांडुरंग पाटील यांनी दिली आहे.

तर नितीन सुर्यवंशी याने दिलेल्या फिर्यादीत पांडुरंग पाटील यांच्यासह सहाजणांनी फटाके का वाजविले अशी विचारणा करत नितीन याच्यासह त्याची आई लक्ष्मी सुर्यवंशी, आनंदा सुर्यवंशी, विकास सुर्यवंशी व आनंदा सुतार यांना तलवारीने वार केल्याने चौघेजण जखमी झाले. या प्रकरणी पांडुरंग पाटील यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची उडाली तारांबळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिसांनी ओपन बारवर कारवाई सुरू केल्याने उघड्यावर बसून मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांची तारांबळ उडाली आहे. ३० ऑक्टोबरपासून रोज रात्री पोलिसांची छापेमारी सुरू असल्याने नेहमीच तळीरामांमुळे गजबजलेले अड्डे रिकामे होत आहेत. रविवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी क्रशर चौक आणि मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूलच्या मैदानातून १८ तळीरामांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

तळीरामांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणांना मद्यप्राशनाचे अड्डे बनवले आहे. ओपन बारचे प्रमाण वाढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर नागरिकांकडूनही तक्रारी वाढल्या होत्या. पोलिसांनी गेल्या आठवड्यापासून ओपन बारवर कारवाईची मोहीम सुरू केली असून, रोज रात्री अचानक ओपन बारवर छापे टाकले जात आहेत. आठवड्यात सत्तरहून अधिक तळीरामांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी रात्री क्रशर चौक, इराणी खाण परिसर आणि मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूलच्या मैदानात कारवाई केली. या कारवाईत १८ तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत.

सुरेश जयराम सावंत (वय २८, रा. सानेगुरुजी वसाहत), केशव शिवाजी पोवार (२६, मंगळवार पेठ), अमेय मंगेश लळीत (२३, रा. फुलेवाडी रिंगरोड), ओंकार विनायक गायकवाड (२४, सानेगुरुजी वसाहत) आणि धनंजय नानासो देसाई (२३, रा. मंगळवार पेठ) यांना शाहू दयानंद हायस्कूलच्या मैदानावरून ताब्यात घेतले. विनायक राजाराम साळोखे (२७), अनिकेत बाबूराव नाटेकर (२४, रा. दोघेही कळंबा) यांना क्रशर चौकातून ताब्यात घेतले. हणमंत लक्ष्मण जेमगी (४०, रा. गंगाई लॉन, कोल्हापूर), सतीश अप्पाण्णा कोटूर (४०, हरिओमनगर), लकमान शकील सोलापुरे (२३, रा. लक्ष्मीपुरी), अंजुम अस्लम जमादार (३०, रा. शिवाजी रोड, कोल्हापूर), इमाम शौकत मुजावर (३६), अभिजित रघुनाथ गोरे (३९) मंजित मोहन घोसरवाडे (२५), विवेक दुंडग्या हिरेमठ (२९, चौघेही रा. फुलेवाडी), योगेश नागेश जाधव (२६), किरण सीताराम करपे (२६), करण प्रताप शेटे (२६, तिघेही रा. सम्राटनगर) यांना क्रशर चौकातील इराणी खणीजवळील खुल्या जागेतून ताब्यात घेतले.

पोलिसांनी १८ तळीरामांना ताब्यात घेऊन उघड्यावर मद्यप्राशन करणे आणि विनापरवाना मद्य सोबत बाळगल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आठवड्याभरात ७० हून अधिक तळीरामांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांवर लवकरच कोर्टात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली आहे. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री पंचगंगा नदी घाट आणि पिकनिक पॉइन्ट येथून कारवाईला सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटा’ च्या अध्यक्षाची उचलबांगडी

0
0

Gurubal.mali@timesgroup.com

tweet@:gurubalmaliMT

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेतील (सुटा ) संघर्ष पुन्हा उफाळला असून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. रघुनाथ ढमकले यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच केलेल्या या कारवाईने संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. संघटनेच्या वादग्रस्त मालमत्तेवरून सुरू झालेल्या या संघर्षात अध्यक्षांचाच बळी घेण्याचा प्रताप पाच पांडवाचा केल्याची जोरदार चर्चा आहे. या कारवाईने संघटना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर उभी राहण्याची शक्यता आहे.

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संस्थाचालकांच्या विरोधात संघर्ष केल्याने संघटनेची ताकद वाढली. संघटनेचा प्रभाव वाढला. संघटनेने विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर सत्ता मिळवली. यामुळे एकेकाळी ‘सुटा बोले, विद्यापीठ डोले’ अशी परिस्थिती होती. पण ४० वर्षानंतरही संघटना आपल्याच ताब्यात असावी या अट्टहासाने संघटनेत संघर्ष सुरू झाला. यातून काहींनी संघटनेला राम राम केला, तर काहींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यातून संघटनेची ताकद कमी झाली. गेल्या पाच सहा वर्षांपासून संस्थेच्या मालमत्तेवरून संघर्ष सुरू आहे. इमारत खरेदी संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत खुलासा केला जात नसल्याने संशय वाढत आहे. सतत जाब विचारल्यानेच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ढमकले यांच्यावरील कारवाई हा देखील याचाच एक भाग असल्याचे कळते. चांगले काम केल्याचे बक्षीस म्हणून मुदतवाढ दिलेल्या प्रा, रघुनाथ ढमकले यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. रविवारी तातडीने घेतलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे बँकेच्या व्यवहाराचे अधिकार देखील गोठवण्यात आले. संघटनेच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

चार वर्षे जिल्ह्याचे अध्यक्ष असलेल्या ढमकले यांनी संघटनेत प्रभाव निर्माण केला होता. तो काही कारभाऱ्यांना खटकत होता. यातूनच त्यांचे पख छाटण्याचे काम काही महिने सुरू होते. त्यांनी सिनेट निवडणुकीसाठी प्राध्यापक गटातून अर्ज भरला आहे. त्यांना उमेदवारी द्यावी असा कोल्हापूर जिल्हा कमिटीने ठराव केला. त्यानुसार त्यांनी अर्ज भरला. पण इतर तीन जिल्ह्यातील संघटनेचे नाव पुढे करत कोल्हापुरातीलच काहींनी त्यांच्या उमेदवारीस विरोध करत दुसऱ्याचे नाव पुढे केले. याला ढमकले यांनी आक्षेप घेतला. निवडणूक लढवण्याची त्यांनी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना अध्यक्षपदावरूनच मुक्त करण्यात आले. या पद्धतीने कारवाई करण्याचा अधिकार संघटनेच्या जनरल काउन्सीलला आहे. पण संस्थाचालकांना नियमानुसार काम करण्याचा आग्रह धरणाऱ्या या संघटनेने नियम धाब्यावर बसवत कारवाई केली. ते करताना किमान ज्याच्यावर कारवाई करतो, त्याची बाजू ऐकून घेण्याची तसदीदेखील घेतली गेली नाही. यावरून संघटनेत नेमके काय सुरू आहे, याचा दाखलाच मिळत आहे. या कारवाईने संघटनेत खळबळ उडाली आहे.

अडवा अन जिरवा…

संघटनेत आपल्यापेक्षा कुणीही वरचढ होऊ नये, अशी काहींची रणनीती आहे. कुणीही पदाधिकारी झाला तरी संघटना आपल्याच ताब्यात रहावी यासाठी कारभारी असलेले पाच पांडव सतत कार्यरत असतात. यामध्ये प्रा. एस. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, प्रा. टी. व्ही. स्वामी, प्रा. ए. पी. देसाई, प्रा. एस. के. मठपती यांचा समावेश आहे. ढमकले यांनी वादग्रस्त इमारत खरेदीचा जाब विचारल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यासाठी केवळ उमेदवारीचे कारण पुढे करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षासह सर्वच पदाधिकारी या कारभाऱ्यांच्या हातातील बाहुले म्हणून काम करत आहेत. यामुळे संघटनेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र त्यांना संघटनेपेक्षा आपले स्थान महत्त्वाचे वाटत असल्याने आपल्यापेक्षा वरचढ होणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

संघटनेच्या कार्यकारिणीची रविवारी बैठक झाली. यामध्ये ढमकले यांच्याबाबत चर्चा झाली. संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याबद्दल कारवाई म्हणून त्यांना पदावरून काढून टाकले आहे. त्यांचे सर्व अधिकार देखील गोठवण्यात आले आहेत.

प्रा. आर. एच. पाटील, अध्यक्ष सुटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागवल्या पेंढारकरांच्या स्मृती

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मानाचे पान,’ ‘जय मल्हार,’ ‘दो आँखे बारह हाथ’ या गाजलेल्या सिनेमातील निवडक प्रसंग, त्या सिनेमात दिवंगत अभिनेते बाबूराव पेंढारकर यांच्यावर चित्रीत प्रसंग, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी दिलेली दाद आणि मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणीतून स्मृती जागविण्यात आल्या. डॉ. चंद्रकांत मांडरे कला अकादमीच्यावतीने अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचा ५० वा स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम झाला.

शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील जुन्या काळाचा माहोल अनुभवायला मिळाला. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, मांडरे कला अकादमीचे विश्वस्त, शास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी पेंढारकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांची अभिनयशैली, विविध प्रकारच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा, मराठी व हिंदी सिनेमातील भूमिका याविषयींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. यानंतर ‘मानाचे पान, जय मल्हार, दो आँखे बारह हाथ’ या सिनेमातील निवडक प्रसंग दाखविण्यात आले.

कला अकादमीचे विश्वस्त विश्वास काटकर यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कला अकादमीचे विश्वस्त मोहन पतंगे यांच्यासह कलाप्रेमी मोठ्या संख्येने उ​पस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ तोळ्यांचे दागिने लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगरातील सम्राट बेकरीसमोर सुनीता शंकर ससे (वय ५५) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने पावणेतीन लाख रुपयांच्या १५ तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. सोमवारी (ता. ६) पहाटे तीन ते सातच्या दरम्यान चोरीची घटना घडली. सुनीता ससे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहे. चोरीस गेलेले दागिने ससे यांच्यासह त्यांच्या मुलीचे होते. परिसरात असलेल्या दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

जुना राजवाड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुनीता ससे या मुलगा अमित याच्यासह संभाजीनगरात राहतात. सुनीता यांची मुलगी वर्षा मांगलेकर यांना प्रसुतीसाठी दोन दिवसांपासून संभाजीनगरातील गंगोत्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मुलीचेही दागिने घरातील कपाटात ठेवले होते. ससे दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये मुलीजवळ थांबतात. मुलगा अमित हा पहाटे लवकर उठून कामासाठी बाहेर पडतो. नेहमीप्रमाणे अमित सोमवारी पहाटे तीन वाजता उठला. घराला कुलूप लावून त्याने किल्ली बाहेरील बाथरुममध्ये ठेवली होती. सकाळी सातच्या सुमारास सुनीता घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या स्थितीत दिसला. आत जाऊन पाहिले असता, लोखंडी तिजोरीतील साहित्य विस्कटले होते. कपाटाच्या आतील कप्प्यातील सात तोळे वजनाची सोन्याची पट्टी, साडेतीन तोळे वजनाचा राणीहार, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे कानातील टॉप, आठ ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट आणि दोन ग्रॅमच्या दोन अंगठ्या, असे पावणेतीन लाख रुपये किमतीचे सुमारे १५ तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरीचा प्रकार लक्षात येताच ससे यांनी मुलगा अमितला याची माहिती दिली. अमितने जुना राजवाडा पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकालाही पाचारण केले होते. ससे यांच्या घराच्या पाठीमागील जागेपर्यंत श्वानाने मार्ग काढल्यानंतर श्वान तिथेच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. सुनीता ससे यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

भरवस्तीत धाडशी चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिन्याभरात जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोऱ्यांची उकल झालेली नाही, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी परिसरातील दुकानांच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, यात चोरटे कैद झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैय्याकुमारच्या सभेला कोल्हापुरात विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जेएनयू विद्याथी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार यांच्या बुधवारी होणाऱ्या सभेपुर्वीच कोल्हापुरातील वातावरण तापले आहे. कन्हैय्याकुमारच्या सभेला परवानगी देऊ नये, असे निवेदन हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. तर महापालिकेने आयोजकांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अ​धीक्षकांची परवानगी सादर करण्यास सांगितले असून काही अटींचेही पत्र दिले आहे.

ऑल इंडिया स्टुडंटस आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या पुढाकाराने केशवराव भोसले नाट्यगृहात ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ या‌विषयावर युवक, विद्यार्थ्यांची परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैयाकुमार मार्गदर्शन करणार आहे. राज्यातील अन्य शहरांमध्ये सभा झाल्या असून कोल्हापुरातीलही सभेची तयारी सुरू आहे. मात्र महापालिकेने सोमवारपर्यंत नाट्यगृहाची परवानगी दिलेली नाही. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची परवानगी सादर करण्यास महापालिकेने आयोजकांना सांगितले आहे. तसेच वास्तू वा नाट्यगृहातील वस्तूंचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबर दोन लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करणे, आसनक्षमतेपेक्षा जास्त नागरिक आल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा अटींचे पत्रही दिले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी महापालिकेकडे आली नसल्याचे सांगण्यात आले.

हिंदुत्त्ववादी संघटनांच्यावतीने सोमवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली. कन्हैय्याकुमार यांच्या सभेने येथील सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त करत देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे. महापालिकेचे केशवराव भोसले नाट्यगृह अथवा अन्य सभागृह उपलब्ध करून दिले जाऊ नये, अशी मागणी केली आहे. यावेळी चंद्रकांत बराले, सुनील पाटील, संभाजी भोकरे, मधुकर नाझरे, शशिकांत बिडकर, शिवाजीराव ससे आदी उपस्थित होते. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी त्यांच्या राज्यात सभा झाल्या आहेत. त्यांना मते मांडण्याचा अधिकार आहे, असे सांगितले.

सकाळी दहा वाजता विद्यार्थी परिषदेला सुरुवात होणार आहे. एक वाजता परिषदेचा समारोप होणार आहे. यामध्ये पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येवर चर्चा करण्यात येणार आहे. परिषद स्थळाला ‘शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे नगरी’ असे नाव देण्यात येणार आहे. तर उमा पानसरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच देशद्रोही घोषणा दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल कन्हैयाकुमार यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. दरम्यान, एक घर, एक पुस्तक अभियानांतर्गत मुक्त सैनिक वसाहत येथे साकारण्यात येणाऱ्या पहिल्या वाचनालयाचे उद्‍घाटन कन्हैय्याकुमार यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेत १५ हजार पुस्तके जमा झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रणांगणाबाहेरच सुटला तिढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंदोलनाचे रण न पेटताही उसाला चांगला दर मिळू शकतो, हे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी यंदा दाखवले. यामुळे एफआरपी अधिक दोनशे असा फार्म्युला नेत्यांनी मान्य केल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगला दर पडेल असे दिसते. तातडीने कोणतीही निवडणूक नसल्याने विषय तापवण्यात कोणालाच रस नसल्यानेच चार दिवसात दराचा तिढा सुटला. यात कुणालाही श्रेय न मिळू देण्याची काहींची इच्छा पूर्ण होत हंगामाची साखर पेरणी झाली.

पाच दिवसांपुर्वी उसाचा हंगाम सुरू झाला. पण दराचा प्रश्न सुटला नव्हता. यामुळे आंदोलनाच्या छायेतच उसाच्या गाड्या कारखान्याकडे निघाल्या होत्या. तातडीने दराचा प्रश्न मिटावा यासाठी काही नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. हे करताना त्याचे श्रेय शेतकरी संघटनेच्या नेत्यांना विशेषत: खासदार राजू शेट्टी यांना मिळू नये, असे सरकारला वाटत होते. त्यासाठी सारी व्यूहरचना आखण्यात आली होती. राज्य सरकारकारमधून बाहेर पडल्यापासून खासदार शेट्टी यांनी भाजप विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.

ऊस दर आंदोलनात खासदारांची कोंडी करण्याचा आदेशच दिल्लीतून आला होता. त्यांचे आंदोलन दडपण्याबरोबरच त्यांना ऊसदराचे श्रेय मिळू नये, याचे नियोजन झाले होते. याला अर्थातच दोन्ही काँग्रेसमधील काही नेत्यांची व साखर कारखानदारांची साथ होती. याची कुणकुण शेट्टींना लागली होती. त्यामुळे सर्वांना एकाचवेळी सर्वांना अंगावर न घेण्याची खेळी करत त्यांनी आंदोलनाची आक्रमकता कमी केली. शिवाय शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते म्हणून इमेज तयार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या महिन्यात दिल्लीत मोठे आंदोलन होत आहे. त्याच्या तयारीसाठी त्यांना दिल्ली गाठायची होती. येथे आंदोलनात अडकल्यास त्यांची अडचण होणार होती. त्यांच्या अनुपस्थितीत आंदोलन भरकटले असते तर त्याचा फटका संघटनेला बसला असता. यामुळे नेमके कुठे थांबायचे याची पक्की जाण असलेल्या शेट्टींनी दराचा प्रश्न फारसा ताणला नाही.

ऊस दराचे श्रेय शेट्टींना मिळू नये यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि काही नेते धडपडत होते. एफआरपी अधिक तीनशेची घोषणा हा त्याचाच एक भाग होता. तीनशेऐवजी दोनशे करत तडजोड करण्याचे ठरले. मुळात आंदोलनाची सुरूवात फारच उशिरा सुरू झाली होती. फार दिवस आंदोलन ताणल्यास शेतकरी देखील नाराज होण्याची शक्यता होती. यंदा उसाचे पीक जोमात आहे. साखरेचा दर चांगला आहे. उसाला चांगला दर देण्यात फारशा अडचणी नाहीत. यामुळे कारखानदार देखील चांगला दर देण्याच्या मनस्थितीत होते. फक्त कारखानदार आणि शेतकरी संघटना नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्याची जबाबदारी सरकारची होती. ती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतिशय कौशल्याने हाताळली. सहकाराचा फारसा अनुभव नसला तरी राजकीय हुशारीवर त्यांनी दुसऱ्या वर्षी पुन्हा हा प्रश्न चिघळू दिला नाही. प्रश्नाच्या मुळाशी जावून तो सोडवण्याची त्यांचा स्वभाव आणि दोन्ही घटकांना समाधान होईल, असा मार्ग काढण्याची त्यांची कला उपयोगी पडली. पूर्वी कारखाने केवळ दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे होते. आता मात्र यामध्ये सेना आणि भाजपचा शिरकाव झाला आहे. यामुळे शेट्टीना पूर्वी ताकद देवून दोन्ही काँग्रेसला जेरीस आणण्याची भूमिका सेना भाजपची राहिली नाही. या दोन पक्षाविरोधात रान उठवताना दोन्ही काँग्रेसला फारसे दुखवण्यात स्वाभिमानीला रस नव्हता. त्याचाही फायदा दराचा प्रश्न तातडीने निकालात निघण्यात झाला.

ज्या पद्धतीने ऊसदराचा तोडगा निघाला, तो पाहता त्याचे श्रेय सर्वांनाच मिळाले. सरकारने योग्य मध्यस्थी केली, कारखानदारांनी चांगला दर देण्याची मानसिकता दाखवली, खासदारांनी फारसे आडेवेढे न घेता दर मान्य केला, राज्यमंत्री खोत यांनी सरकार व शेतकरी यांची बाजू मांडत मदत केली यामुळेच चार दिवसांत हा प्रश्न मिटला. याचे श्रेय आमचेच असे म्हणायला सारे मोकळे झाले. यात फायदा शेतकऱ्यांचा होइल असले बोलले जात आहे. गतवर्षीपेक्षा जादा दर मिळाला. फक्त आणखी थोडे ताणले असते तर आणखी शंभर रुपये मिळाले असते, याची हूरहूर शेतकऱ्यांना लागली.

विरोधकांची ताकद कमी

ज्यांनी या दराला विरोध केला आहे, त्यांची ताकद सरकार आणि कारखानदार या दोघांना चांगली माहिती आहे. यामुळेच त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले गेले. त्याचे पडसाद उमटणार नाहीत, याची कल्पना दोघांनाही आहे. शिवाय चार दिवस ज्या ज्या संघटनांनी आंदोलने केली, त्यामध्येच फारसा जीव नव्हता, आक्रमकता नव्हती, त्यामुळेच यंदा सारेच काही ठरवून झाल्याचे नाटक झाले, असे म्हणायला बराच वाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च पन्नास हजार, अनुदान सहा हजार

0
0

Appasaheb.mali@timesgroup.com
Tweet:@Appasaheb_MT

कोल्हापूर : ‘आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपय्या’ची अनुभूती सध्या नाट्य संस्था घेत आहेत. राज्य सरकारच्या राज्य नाट्य स्पर्धेत नाटकाच्या तयारीपासून सादरीकरणापर्यंत पोहोचायला साधारणपणे पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र हौशी कलाकरांसाठी पर्वणी असणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतून खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. खर्च पन्नास हजार रुपये आणि राज्य सरकार नाटक निर्मितीसाठी अनुदान देते सहा हजार रुपये असे चित्र सध्या आहे.

नाट्य संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी स्पर्धा घेते. सरकारकडून राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी संस्थांना नाटकाच्या निर्मितीसाठी तीन हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शिवाय प्राथमिक फेरीतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे पंचवीस, पंधरा आणि दहा हजार रुपयांचे बक्षीस आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यंदा निर्मितीसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय अंमलात आणला. निर्मितीसाठीचे अनुदान दुप्पट करून ते सहा हजार रुपये केले. मात्र खर्चाच्या तुलनेने अनुदान कमी असल्याचे नाट्य संस्थांचे म्हणणे आहे.

राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारे बहुतांश कलाकार हौशी असतात. आपापला कामधंदा, नोकरी, व्यवसाय सांभाळत ते नाटकाची आवड जोपासतात. स्पर्धेच्या आधी दोन महिने नाटकाची जुळवाजुळव सुरु होते. नाट्यसंहिता, सरावसाठी हॉल, वेशभूषा, मेकअप, वाहतूक जादाची लाइट आणि साऊंड सिस्टीम अशा विविध कारणांसाठी किमान चाळीस हजार रुपये खर्च होतात. प्राथमिक फेरीतील स्पर्धेत बाहेरगावच्या नाट्य संस्थेपुढे प्रवास आणि सेट वाहतुकीचा जादा भार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून बाहेरगावच्या नाटयसंस्थांना एक वेळचा प्रवास खर्च दिला जातो. अशाने नाट्यसंस्थांना अच्छे दिन कधी येणार असा सवाल हौशी नाट्य क्षेत्रातील कलाकार, नाट्यनिर्माते करत आहेत.

हौशी नाट्यसंस्था रंगभूमीच्या आवडीखातर स्पर्धेत सहभाग नोंदवितात. स्पर्धेत नाटक प्रभावीरित्या सादर करण्यासाठी संस्था ताकतीने प्रयोग सादर करतात. संहिता, नेपथ्य, सेट, वेशभूषा आणि स्पर्धेआधी दोन महिने सराव यांसाठी साधारणपणे पन्नास हजार रुपये खर्च होतात. काही संस्था यापेक्षा जादाही खर्च होतात. त्यामानाने निर्मिती अनुदान कमी आहे.

राजश्री खटावकर, कार्याध्यक्ष फिनिक्स क्रिएशन्स

हौशी नाट्यसंस्थांचा नाटकाचा खर्च तालमींपासून सुरु होतो. स्पर्धेआधी दोन महिने सरावाला सुरुवात होते. सरावासाठी हॉल, त्याठिकाणी लाइट आणि नेपथ्य यांसाठी संस्थांना पैसे मोजावे लागतात. स्वतंत्र सेट तयार करावा लागतो, त्यासाठी सुमारे पंधरा हजारांहून अधिक खर्च येतो. ऐतिहासिक किंवा भव्य नाटकांचा सेट, मेकअप, वेशभूषेसाठी जादा खर्च वाढतो. नाटकासाठी पार्श्वसंगीत रेकॉर्ड करुन घ्यावे लागते. खर्चाचा तपशील पाहता मिळणारे निर्मिती अनुदान तोकडे आहे.

महादेव जाधव, दिग्दर्शक, रंगयात्रा नाट्यसंस्था इचलकरंजी

स्पर्धेतील बहुतांश कलाकार हौशी असतात. संस्थांना संहिता निवडणे, तालमीचा हॉल ते लेखकाच्या मानधनापर्यंत तयारी करावी करावी लागते. हौशी नाट्यसंस्था हा खर्च पदरमोड सोसून करतात. हौशी कलाकार यासाठी आपापल्या परीने निधी जमवतात. राज्य सरकारने निर्मिती अनुदानात वाढ करावी.

युवराज घोरपडे, रंगकर्मी सुगुण नाट्यसंस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारणे’ चा थेंबही देणार नाही

0
0

जयसिंगपूर

‘इचलकरंजीच्या पाणी योजनेस वारणा नदीकाठच्या गावांचा विरोध आहे. अद्याप या नदीकाठच्या अनेक गावांना पिण्याचे पाणी नाही, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या योजना पूर्ण नाहीत, प्रकल्पग्रस्तांना पाणी नाही. ज्या उद्देशाने धरण बांधले तो उद्देशच सफल झालेला नाही. यामुळे आम्ही वारणेचे एक थेंबही पाणी देणार नाही. पाणी न्यायचेच असेल तर आमच्या प्रेतांवरून न्यावे लागले’, असे प्रतिपादन वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी केले.

इचलकरंजीच्या अमृत योजनेस दानोळीसह वारणा नदीकाठच्या गावांचा विरोध होत असल्याने इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी दानोळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात चर्चेसाठी आले होते. यावेळी दानोळीच्या सरपंच सुजाता शिंदे, वारणा बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या, ‘इचलकरंजीला पाणी आवश्यकता आहे, ते देण्याची माझी जबाबदारी आहे. एक टीएमसी पाणी मंजूर केलेले आहे. ते मला दानोळी गावची बहीण म्हणून ओवाळणी द्यावी.’

नगरसेवक अजितमामा जाधव म्हणाले, ‘कृष्णेवरची योजना निकामी झाली आहे. तुमच्या पाण्यात वाटणी न मागता एक टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. गावाच्या विकासाला आम्ही हातभार लावू, इचलकरंजीला पाणी द्यावे.’

नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, ‘इचलकरंजीला पिण्यासाठी व उद्योगासाठी पाण्याची आवश्यकता आहे. इचलकरंजीने उद्योग व व्यापारामधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिले आहे. त्या शहराला पाण्याची आवश्यकता आहे.’

यावेळी सरपंच सुजाता शिंदे यांनी इचलकरंजीच्या पदाधिकारी व अधिकारी यांचे स्वागत केले. यानंतर दानोळीबरोबरच वारणा काठच्या गावांच्यावतीने अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले,‘ इचलकरंजीने पाणी नेल्यास वारणा काठच्या नागरीकांना फास लावावा लागेल. आज आम्ही पाणी दिले तर पुढची पीढी आम्हाला माफ करणार नाही. वारणाकाठचे नागरिक कोणत्याही प्रलोभनाला व जोर जबरदस्तीला बळी पडणार नाहीत.’

यावेळी इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, अशोक स्वामी, तानाजी पोवार, सुनिल पाटील, रवी माने, विठ्ठल चोपडे, मदन झोरे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, भाऊसो आवळे, मनोज साळुंखे, संगिता आलासे, सारिका पाटील, नेहा हुक्कीरे, वर्षा जोग, सुनिता कोरे, संध्या बनसोडे, सोनाली अनुसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक गुन्हे’कडेही डीएसकेंविरोधात तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डीएसके ग्रुपमध्ये केलेली गुंतवणूक परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडेही तक्रार अर्ज दिला आहे. सुमारे तीनशे तक्रारदारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिले आहेत, तर अजूनही तक्रारदारांचा ओघ सुरूच आहे. तक्रार अर्ज घेण्यासाठी राजारामपुरी पोलिसांनी पोलिस ठाण्यात स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे.

डीएसके ग्रुप आर्थिक अडचणीत सापडल्याने गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा अडकल्या आहेत. ठेवीची मुदत संपूनही रक्कम मिळत नाही. गेल्या दीड वर्षांपासून एकाही ठेवीदाराला रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे ठेवीदारांनी डीएसके ग्रुपच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. कोल्हापुरात ६०० हून अधिक गुंतवणूकदार असून, त्यांची २०० कोटींहून अधिक रक्कम अडकल्याची माहिती गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना दिली होती. मोठी रक्कम अडकल्याने पोलिसांनीही याचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारी देण्याचे आवाहन केले. यानुसार रविवारपासून शहरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्याचे काम सुरू आहे. गुंतवणूकदारांची गर्दी पाहून पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी तक्रारी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली. गुंतणूकदारांच्यावतीने वकील सत्यजित पवार आणि गुंतवणूकदार संघटनेचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रविवारी दिवसभर तक्रारदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेतले. सोमवारी सुमारे तीनशे अर्ज राजारामपुरी पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार चेतन घाडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतही धाव घेतली आहे. तक्रारीचे सविस्तर निवेदन, गुंतवणूकदारांची नावे, त्यांनी केलेली गुंतवणूक याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिली आहे. या शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी गुंतवणूकदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार आणि वकील सत्यजित पवार हे गेले होते, मात्र आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र शेडे कामानिमित्त शहराबाहेर असल्याने टपाल विभागात तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती गुंतवणूकदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे.

आजच्या सुनावणीकडे लक्ष

पुणे आणि मुंबईतील काही गुंतवणूकदारांनी डीएसके ग्रुपविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सर्वच गुंतवणूकदारांच्या नजरा मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागल्या आहेत. गुंतवणूकदारांची रक्कम तातडीने व्याजासहीत परत मिळावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

अन्यथा कोर्टात तक्रार करणार

कोल्हापुरातील गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यासह आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडेही तक्रार केली आहे. गुंतवणूकदारांची नावे, गुंतवणुकीच्या रकमा, कालावधी अशी माहिती पोलिसांकडे दिली आहे. विधी विभागाच्या सल्ल्याने पुढील तपास करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. यात विलंब झाल्यास कोर्टात जाऊन तक्रार देण्याचा पर्याय स्वीकारला जाईल, अशी माहिती गुंतवणूकदारांचे वकील सत्यजित पवार यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर ही कलावंतांची खाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत माने अशी जुन्या पिढीतील मराठी चित्रपटातील चालती-बोलती विद्यापीठे होती. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे अनेकांना अभिनयाची संधी मिळाली. नव्या पिढीला अभिनयाचे धडे देण्यासाठी अशा कृर्तत्ववान व्यक्तींची आजही आवश्यकता आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्या जयमाला काळे-इनामदार यांनी केले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा वर्धापन दिन व बाबूराव पेंढारकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद‍्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात अग्निकंकण चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात झाली.

जयमाला काळे-इमानदार म्हणाल्या, ‘कौटुंबीक परिस्थितीमुळे अभिनय किंवा नृत्याचे प्रशिक्षण घेता आले नाही. पण चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाची संधी मिळाली. व्ही. शांताराम, अभिनेत्री संध्या यांच्यापासून प्रेरणा मिळाली. बाबूराव पेंढारकर यांच्यामुळे एका चित्रपटात नृत्याची संधी मिळाली. कोल्हापुरात अशा दिग्गज लोकांची खाण होती. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. नव्या पिढीला अभिनयाचे शिक्षण देण्यासाठी अशा लोकांची आवश्यकता आहे.’ कोल्हापुरातून अभिनयाला सुरुवात करताना बुरुड गल्लीत एक वर्ष वास्तव केले अशी आठवण त्यांनी सांगितली.

मुंबई येथील संरक्षण निधी संकलनाच्या कार्यक्रमाची आठवण सांगताना अभिनेत्री लिला गांधी म्हणाल्या, ‘कार्यक्रमात नृत्याची संधी मिळणार होती. पण मुलाची तब्बेत ठिक नसल्याने द्विधा मन:स्थिती होती. तरीही कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमानंतर माझी अस्वस्थता पाहून स्वत: बाबूराव पेंढारकरांनी पुण्यापर्यंत मोटारीने पोहोच केले. त्यानंतरही मुलाच्या तब्येतीविषयी सातत्याने विचारपूस केली. केवळ चित्रपटपुरते कलाकारांशी संबंध न ठेवता, त्याबाहेरही आपुलकी जपली जात होती.’

महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अनघा पेंढारकर, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी मनोगत व्यक्त केले. इम्तियाज बारगीर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद‍्घाटन समारंभास श्रीलेका पेंढारकर, सतीश बिडकर, शरद चव्हाण, रवींद्र बोरगावकर, भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाहक रणजीत जाधव यांनी आभार मानले.

आज महोत्सवात

सकाळी ११ वा. : देवता
दुपारी ३ वा. : छत्रपती शिवाजी
सायंकाळी ६ वा. : थोरातांची कमळा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलाचे अपहरण

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील शाळकरी मुलगा प्रदीप सरदार सुतार (वय ९) हा रविवारपासून (ता. ५) बेपत्ता आहे. विशाल ऊर्फ प्रकाश बंडा लोहार (२४, रा. तिसंग, ता. गगनबावडा) या नातेवाईकानेच प्रदीपचे अपहरण केल्याचा संशय प्रदीपच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

कळे पोलिसांसह जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (ता. ६) अपहृत प्रदीपचा रंकाळ्यानजिक इराणी खणीत शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रदीपचा शोध लागलेला नाही. दरम्यान, अपहृत प्रदीपचा नातेवाईक विश्वास लोहार याच्यासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरदार तुकाराम सुतार मरळी (ता. पन्हाळा) येथे पत्नी अनुराधा, मुलगा प्रदीप व मुलगी श्रावणी (वय ५) यांच्यासह राहतात. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यांचा प्रदीप हा मुलगा गावातील प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिकतो. सरदार यांचा मावसभाऊ विश्वास उर्फ प्रकाश लोहार अधूनमधून सुतार यांच्या घरी येतो. रविवारी चारच्या सुमारास तो मरळी येथे सुतार यांच्या घरी पोहोचला. भूक लागली आहे, असे सांगून तो सरदार यांच्या घरात जेवला. यानंतर तो व्हरांड्यात बसला होता. सरदार यांचा मुलगा प्रदीप बाहेरून घरात येताच त्याला खाऊ घेण्याचे आमिष दाखवून विश्वास त्याला सोबत घेऊन गेला. घरात कोणालाही कल्पना न देताच हे दोघे बस स्थानकाकडे निघाले होते. ओंकार रोहिले या तरुणाने विश्वास आणि प्रदीप या दोघांना दुचाकीवरून मरळी बसस्थानकावर सोडले. बराचवेळ मुलगा प्रदीप घरात दिसत नसल्याने आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. विश्वाससोबत मुलगा गेल्याची माहिती सरदार यांना मिळताच विश्वासच मुलाला सोबत घेऊन गेल्याचा अंदाज त्यांनी बांधला.

सरदार यांनी तिसंगी येथे फोन करून विचारणा केली तर विश्वास आणि प्रदीप दोघेही आलेले नाहीत असे सांगितले. त्यानंतर विश्वासच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा प्रदीप माझ्याबरोबर नाही, असे त्याने सांगितले. आपण कळे येथे असल्याचे त्याने सांगितल्याने काही नातेवाईकांनी कळे जाऊन शोध घेतला, तर विश्वास तिथे आढळला नाही. यानंतर त्याने आपण कोल्हापुरात रंकाळा परिसरात असल्याचे सांगितले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास सुतार कुटुंबीय कोल्हापुरात पोहोचले. त्यांनी विश्वासकडे विचारपूस केली, मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संतप्त कुटुंबीयांनी विश्वासला चोप देऊन जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

जुना राजवाडा आणि कळे पोलिसांनी सोमवारी रंकाळ्यासह इराणी खाण परिसरात शोधमोहीम राबवली. अग्निशामक दल, व्हाइट आर्मी, आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिवसभर बोटींच्या मदतीने शोध घेतला, मात्र विश्वासने वारंवार उलटसुलट माहिती देऊन पोलिसांना बुचकळ्यात टाकले. यावेळी अपहृत प्रदीपचे वडीलही उपस्थित होते. शोधमोहीम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपहरणाच्या गुन्ह्यची नोंद कळे पोलिस ठाण्यात झाली आहे. रात्री उशिरापर्यंत प्रदीपचा शोध न लागल्याने नातेवाईकांसह पोलिसांची चिंता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा खणीत शोधमोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रदीप सरदार सुतार (वय ९) या शाळकरी मुलाच्या अपहरणाची फिर्याद दाखल होताच कळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधून रविवारी रात्रीपासूनच शोधमोहिमेला सुरुवात केली. सोमवारी दिवसभर रंकाळा, क्रशर चौक, अंबाबाई मंदिर, रंकाळा बस स्टँड परिसरात शोध मोहीम राबवली. अग्निशामक दल, व्हाइट आर्मी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवली, मात्र प्रदीपचा शोध न लागल्याने चिंता वाढल्या आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी विश्वास लोहार या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने उलटसुलट माहिती देऊन पोलिसांना बुचकळ्यात टाकले. ‘प्रदीपला रंकाळ्यापर्यंत आणले होते. तेथून तो हात झटकून निघून गेला. प्रदीपचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह इराणी खणीत फेकला. रंकाळा स्टँड परिसरात तो माझ्यापासून निघून गेला,’ अशी माहिती त्याने दिल्याने पोलिसांनी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली.

जुना राजवाडा आणि कळे पोलिसांनी सोमवारी दुपारी रंकाळा परिसरातील इराणी खणीसह इतर दोन खणींमध्ये शोधमोहीम सुरू केली. संशयित विश्वास लोहार याला खणीवर आणले होते, मात्र तो संदिग्ध माहिती देत होता. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिस, अग्निशामक दल, व्हाइट आर्मी, जिल्हा आपती व्यवस्थापनच्या पथकांनी बोटीतून पाण्यात गळ टाकून शोध घेतला. रात्रीपर्यंत शोध मोहीम सुरू होती, मात्र अपहृत प्रदीपचा शोध लागला नाही. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ, कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई, आपत्ती व्यवस्थापनचे दिनकर कांबळे आदींनी शोध मोहीम राबवली. उशिरापर्यंत प्रदीपचा शोध न लागल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावरील ताण वाढला होता.

मनोरुग्ण की विकृत

अविवाहित असलेला संशयित विश्वास लोहार हा अधूनमधून मरळी गावात जात होता. यापूर्वी तो दोनवेळा प्रदीपला सोबत घेऊन तिसंगी येथे गेला होता. रविवारी कोणालाही न सांगता तो प्रदीपला घेऊन गेला होता. प्रदीपला खाणीत फेकल्याचे तो सांगत आहे. काही वेळातच तो रंकाळा स्टँड परिसरातून निघून गेल्याचे सांगत आहे. वारंवार तो चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत आहे. तो मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

स्कूबाचे कीट नाही

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अत्यावश्यक साधनांचा अभाव आहे. गंभीर परिस्थिी उद्भवल्यानंतरच त्यांची धावपळ होते. पाण्यात खोलवर जाऊन एखादी वस्तू, वाहन किंवा व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लागणारे स्कूबा ड्रेस कीट या विभागाडे नाही. त्यामुळे व्हाइट आर्मीला पाचरण करून इराणी खणीत शोध मोहीम राबवली, मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवली.

नातेवाईकांची घालमेल वाढली

प्रदीपला रंकाळ्याजवळ खाणीत फेकल्याचे संशयित विश्वास लोहार याने पोलिसांकडे सांगताच प्रदीपच्या वडिलांना धक्का बसला. संशयित खोटे सांगत आहे काय याची खत्री करा, असे वारंवार ते पोलिसांना सांगत होते. शोधमोहिमेदरम्यान अनेकदा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. स्वतःला सावरत ते शोधमोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलात्कारप्रकरणी एकास अटक

0
0

जयसिंगपूर

विवाहितेवरील बलात्कारप्रकरणी कुरूंदवाड पोलिसांनी खिद्रापूर (ता.शिरोळ) येथील एकास अटक केली आहे. राजू विठ्ठल कोष्टी असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पिडीत महिला व राजू कोष्टी हे खिद्रापूर येथे राहतात. दोघांचे छायाचित्र व रेकॉर्डींग कोष्टी याच्याकडे आहे. या आधारे धमकी देवून तो पिडीत महिलेवर बलात्कार करीत होता. तसेच छायाचित्रे व रेकॉर्डींग पाहिजे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याला कंटाळून पिडीत महिलेने सोमवारी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पी.बी. केदार करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्तिकी यात्रेत विठुरायाच्या चरणी कोटीचे दान

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेत विठ्ठल भक्तांनी देवाच्या चरणी भरभरून दान दिले. कार्तिकी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणी १ कोटी ८६ लाख रुपयांचे दान जमा झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दानात तब्बल ५९ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मागील तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रात यंदाच्या वर्षात चांगला पाऊस झाला. भाविकांनीही देवाच्या चरणी भरभरून दान अर्पण केले. आज जमा झालेल्या पैशाची मोजणी करण्यात आली. विविध विभागातून एकूण १ कोटी ८६ लाख १४ हजार ५६२ रुपये पंढरपूर देवस्थानाकडे जमा झाले.

मागील वर्षीच्या तुलनेने यंदाच्या वर्षी भाविकांची गर्दी काहीशी कमी झाली. मात्र असे असले तरी यावर्षी तुलनेने गेल्यावर्षी पेक्षा यात्रा कमी भरून देखील उत्पन्न ५९ लाख रुपयांनी वाढलेले दिसून आले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुत्त्ववाद्यांचा टिपूच्या जयंतीला विरोध

0
0

बेळगाव
टिपू सुलतान जयंती साजरी करण्याला विरोध दर्शवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
टिपू सुलतान कर्नाटक आणि कन्नड विरोधी होता. त्याने म्हैसूर, कोडगू आणि चिक्कमंगलोर येथील जनतेवर अत्याचार केले आहेत. हजारो लोकांचे बळी त्याने घेतले असून, हिंदूंवर अमानुष अत्याचार केले आहेत. त्याची राज्य कारभाराची भाषा पर्शियन आणि उर्दू होती. तो हिंदुविरोधी होता. शेकडो मंदिरांचा त्याने विध्वंस केला होता. असे असतानाही आपली व्होट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी टिपू सुलतान जयंती कर्नाटक सरकार सरकारी पातळीवर साजरी करत आहे. टिपू सुलतान जयंतीवेळी दंगेही झाले आहेत. असे असताना इंग्रजांविरुद्ध लढला, असे दाखवून त्याला स्वातंत्र्ययोद्धा म्हणून गौरविण्यात येत आहे. इंग्रजांविरुद्ध तो स्वतःच्या स्वार्थासाठी लढला, त्यामुळे टिपू सुलतान जयंती साजरी करू नये, असे विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अच्युत कुलकर्णी यांनी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांना निवेदन दिले. आमदार संजय पाटील, एम. बी. जिरली, महानगर भाजप अध्यक्ष राजेंद्रकुमार हरकुणी, भाजप युवा नेते किरण जाधव, श्रीनिवास बिशनकोप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बेकायदा धार्मिक स्थळांवरसोलापुरात हातोडा

0
0

सोलापूर
सोलापूर शहरात बेकायदा उभारण्यात आलेल्या एकूण २५० धार्मिक स्थळांवर हातोडा पडणार आहे. सोमवारपासून पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत सोलापुरातील विविध भागातील २५० बेकायदा धार्मिक स्थळे पाडण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त अविनाश ढाकने यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. सोलापुरात २९ सप्टेंबर पूर्वीची १ हजार ७५९ धार्मिक स्थळे होती, त्यापैकी संबंधितांनी सबळ पुरावे दिल्यामुळे १ हजार ४९७ धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करण्यात आले.
दरम्यान, पाडण्यात येणाऱ्या धार्मिक स्थळांच्या यादीमध्ये एकूण २५६ स्थळांचा समावेश होता. त्यापैकी ६ स्थळे स्वतःहून काहींनी काढून घेतली. उर्वरित २५० अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामावर महापालिकेने सोमवारपासून हातोडा चालवायला सुरूवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफावरहल्ला करून चांदीची बॅग लंपास

0
0

जयसिंगपूर

गणेशवाडी येथील दिनेश अशोक पोतदार या सराफ व्यावसायिकास बॅटने मारहाण करून त्यांच्याजवळील सुमारे आठ किलो चांदी असणारी बॅग चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी रात्री ही घटना घडली.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, दिनेश पोतदार यांची गणेशवाडी, आलास, बुबनाळ याठिकाणी सराफी दुकाने आहेत. आलास येथील दुकानाचे काम दिनेश हे स्वत: पाहतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ते दुकान बंद करून आलास- कवठेगुलंद मार्गे गणेशवाडीकडे मोपेडवरून जात होते. यावेळी आलासपासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी दिनेश यांच्यावर बॅटने हल्ला केला तसेच त्यांच्याकडील सुमारे आठ किलो चांदी असणारी बॅग घेवून पलायन केले. यावेळी दिनेश यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने असणारी दुसरी बॅग चोरट्यांचा हाती लागली नाही. यानंतर जखमी अवस्थेत दिनेश यांनी मोपेडवरून चोरट्यांचा कर्नाटक हद्दीपर्यंत पाठलाग केला, मात्र चोरटे पसार झाले.

दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम, प्रेमकुमार केदा यांच्यासह पथकाने रात्री उशिरा महाराष्ट्र् कर्नाटक सीमाभागातील गावात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र चोरटे मिळून आले नाहीत. मंगळवारी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी विनायक नरळे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे शहाजी निकम व कुरुंदवाड पोलीसांनी कर्नाटकातील अंकली, मांजरी जुगुळ मंगावती, कागवाड आदी ठिकाणी शोध मोहीम राबविली. परंतु चोरट्याच ठावठिकाणा मिळाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images