Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘डीएसके’चे ठेवीदार एकवटले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेले शेकडो गुंतवणूकदार समोर येत आहेत. अनेकांच्या ठेवींची मुदत संपूनही ठेवींची रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. फसवणुकीची व्याप्ती वाढल्याने अडकलेली रक्कमही वाढण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. ५) गुंतवणूकदार राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार आहेत.

गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापुरातील शेकडो गुंतवणूकदारांनी डीएसके फायनान्समध्ये गुंतवणूक केली. एक लाखापासून ते कोट्यवधींची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुरुवातीला नियमित व्याजाची रक्कम मिळाली. १५ ते १८ टक्के व्याज मिळाल्याने गुंतवणूकदारांचा ओढा डीएसके फायनान्सकडे वाढला. पहिल्या टप्प्यात ६०० गुंतवणूकदार समोर आले आहेत. त्यांचे सुमारे २०० कोटी रुपये डीएसकेमध्ये अडकले आहेत. पुणे आणि मुंबईत डी. एस. कुलकर्णी यांच्या घरासह कार्यालयांवर पोलिसांनी छापे टाकल्याने कोल्हापुरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. शुक्रवारी गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन झालेल्या फसवणुकीबद्दल माहिती दिली होती.

गुंतवणूकदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार यांनी जिल्ह्यातील सर्व गुंतवणूकदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. यानुसार रविवारी सकाळी सडेदहाच्या सुमारास सर्व गुंतवणूकदार उद्यमनगर येथे एकत्र येणार आहेत. यानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती गुंतवणूकदारांचे अॅड. सत्यजित पवार यांनी दिली. गुंतवणूकदारांमध्ये निवृत्त शिक्षक, प्राध्यापक, वकील, सरकारी कर्मचारी, व्यापारी आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. मोठ्या रकमा अडकून पडल्याने गुंतवणूकदारांत कमालीची अस्वस्थता आहे. बहुतांश गुंतवणूकदार वयस्कर आहेत, त्यामुळे फसवणुकीच्या भीतीने गुंतवणूकदारांना धक्का बसला आहे.


कार्यालयांचे भाडे थकीत

डीएसके कंपनीचे उद्यमनगर येथे अलिशान कारचे शोरूम आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या शोरूमच्या इमारतीचे भाडे थकले आहे. कामगारांचे पगारही दिलेले नाहीत. त्यामुळे कामगारांमध्येही अस्वस्थता आहे. काही कामगार काम सोडून गेल्याचेही सांगण्यात येते.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपोत्सवाचा पंचगंगेला साज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

पहाटेच्या शांततेत मावळतीला निघालेला पौर्णिमेचा चंद्र, झोंबणारा थंड वारा आणि परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या एका उत्सवासाठी सज्ज होत्या. पहाटे चार वाजता मेणबत्त्या प्रज्वल‌ित झाल्या. घाटावर एका रेषेत लावलेल्या पणत्या मेणबत्तीने प्रज्वल‌ित होऊ लागल्या. पणत्यांच्या उभ्या,आडव्या रेषा एकमेकांत गुंफल्या गेल्या आणि पंचगंगेवर हजारो ज्योतीने घाट उजळून गेला. दीपोत्सवाने पंचगंगेला चढलेला साज पाहण्यासाठी भल्या पहाटे करवीरकरांनी मोठी गर्दी केली होती.

पंचगंगा नदी घाट आणि दीपोत्सव हे अनोखं नातं गेली काही वर्षे घट्ट झाले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यासाठी गेले आठवडाभर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्यावतीने नियोजन सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पंचगंगा नदी परिसरात लगबग सुरू होती. कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट, मंदिरे, समाधी मंदिरात पणत्या लावल्या होत्या. विविध मंडळाचे कार्यकर्ते,कलाकार, महाविद्यालयीन युवतींच्या जादूई बोटातून रांगोळी साकारली जात होती. पहाटे साडेतीन वाजता पंचगंगा नदी परिसर रांगोळ्यांनी नटला होता.

चार वाजता पंचगंगा नदीची ओटी भरण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्नान करण्यासाठी मोजकेच भाविक व पोहणारी मंडळी आली होती. ‘हर हर महादेव’ गजराने नदीची शांतता भंग पावत होती. त्यानंतर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, दीपोत्सव पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मेणबत्तीने पणत्या प्रज्वल‌ित करण्यास सुरुवात केली. पणत्या पेटू लागल्या. घाट उजळून निघाला. हा सोहळा टिपण्यासाठी कॅमेरे, मोबाइल फ्लॅश होऊ लागले. दीपोत्सव पाहण्यासाठी नदीवर नागरिकांची गर्दी होऊ लागली. नदीतही दिवे सोडले जात होते.

एकीकडे पारंपरिक दिव्यांच्या प्रकाशाची उधळण होत असताना ब्रह्मपुरी पिकनिक पाँईटवर लेसर किरणांचा प्रकाश नदीपात्रावर ​पडत होता. आकाशात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. दीपोत्सवात सांस्कृतिक दीपोत्सवही साजरा झाला. प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक कलाकारांच्या भाव​गीत व भक्तीगीतांची साथ मिळाली. दोन चित्रपटांच्या प्रमोशनासाठी स्क्रीन उभारण्यात आल्या होत्या. अनहद ग्रुपच्यावतीने हौशी बाथरुम सिंगर्संना कराओके ट्रॅक ठेवण्यात आला होता. पहाटे सुरू झालेली जुन्या नव्या गाण्यांची मैफल सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होती. सूर्योदयानंतर घाटावरील किरणांच्या आगमनाने दीपोत्सवाची सांगता झाली.

नोटबंदीवर रांगोळीतून टीका

रांगोळीतून अनेक सामाजिक विषयांना हात घातला होता. उत्तरेश्वर पेठेने नोटबंदीच्या निर्णयाबद्दल प्रथम पुण्यस्मरण अशी रांगोळी रेखाटली होती. नोटांच्या प्रतिकृती ठेऊन पुष्पहार अर्पण केला होता. साईबाबांचा दीपोत्सव, आयर्न ग्रुपने सौरसिटीवर कोल्हापूर शहर हा देखावा मांडला होता.त्यामध्ये सर्व सरकारी कार्यालये, चौक, स्ट्रीट लाईट सोलरवर अशी देखाव्याची मांडणी केली होती. लेक वाचवा, खेळाकडे वळा, छत्रपती शिवरायांचे विचार, वृक्षतोड या विषयावरील रांगोळी व देखावे मांडण्यात आले होते.

आर्टिफिशियल दीपोत्सवाबद्दल नाराजी

पंचगंगा परिसर फक्त पणत्या व दिव्यांनी उजळून निघावा, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. ब्रह्मपुरी पिकनिक पाँईटवरील लेसर लाईट,समाधी मंदिरावर सोडण्यात आलेल्या एलईडी प्रकाश झोत, शिवाजी पुलावरील सोडण्यात आलेल्या लाइटस् च्या माळा, भल्या मोठ्या स्क्रीन, साऊंड सिस्टीम यामुळे पारंपरिक दीपोत्सवावर परिणाम होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

नियोजना अभाव

दीपोत्सवात मिळेत त्या जागेवर रेखाटलेल्या रांगोळा, प्रवेशद्वारातच फ्लेक्स फलकाची गर्दी, रस्त्यांवरील पार्किंगमुळे पंचगंगा नदीवर नियोजनाचा अभाव जाणवत होता. साऊंड सिस्टीमचा आवाज नदी परिसराची शांतता भंग करत होता. येण्या जाण्याचे मार्ग नसल्याने हुल्लडबाजीचे प्रकारही घडले. हजारो लोकांची उपस्थिती असतानाही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांना वाढीव वीजदराचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिक क्षेत्राला विजपुरवठा करताना विभागनिहाय दर वेगवेगळे निश्चित केले आहेत. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ वगळता पश्चिम महाराष्ट्रासह इतर ठिकाणच्या उद्योगांना वाढीव वीजदराचा फटका बसत आहे. राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींना विजेचे समान दरांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने प्रयत्न केले जातील. तसेच पंजाब सरकारप्रमाणे पाच वर्षे विजेचे दर स्थिर ठेवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी पत्रकार बैठकीत दिली.

मंडलेचा म्हणाले, ‘चेंबर ऑफ कॉमर्सने राज्याचा विकासाचा वेग वाढवण्यासाठी नवीन उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योगातील नवीन संधी याविषयी विशेष परिषद फेब्रुवारी २०१८ मध्ये आयोजित केली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत घटकांची राज्यस्तरीय परिषद २० डिसेंबर रोजी कोल्हापुरात घेण्यात येणार आहे. औद्योगिक प्रगतीसाठी चेंबर नेहमीच प्रयत्नशील असताना काही समस्या या क्षेत्राला भेडसावत आहेत.’

‘पंजाब सरकारने औद्योगिक क्षेत्राला मदत करण्यासाठी पाच वर्षे विजेचे दर स्थिर ठेवण्याचे धोरण निश्चित केले आहे. बरोबरीचे राज्ये असे निर्णय घेत असताना राज्यात मात्र पुरेशी विजेची उपलब्धता होत नाही. एकीकडे सरकार विजेचे उत्पादन वाढल्याचे सांगत असताना लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या मतामध्ये तफावत जाणवत असल्यामुळे याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम झाला असला, तरी त्यामुळे आर्थिक शिस्त लाभली असून पुढील तीन वर्षांपासून त्यांचे चांगले परिणाम दिसू लागतील, असा विश्वास मंडलेचा यांनी व्यक्त केला.

चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष ललीत गांधी म्हणाले, ‘लघू व्यवसायिकांना बळ देण्यासाठी मुद्रालोन योजना सुरू झाली असताना बँकामार्फत योजनेच्या माध्यमातून कर्ज देत नाहीत. चुकीची आकडेवारी सांगून दिशाभूल करत आहेत, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी पुन्हा चर्चा करुन योजनेसंबंधी कोल्हापुरात मेळवा घेणार आहे.’

पत्रकार बैठकीस उद्योजक आनंद माने, जयेश ओसवाल, चंद्रकांत जाधव, राजू पाटील, सुरज‌ितसिंह पोवार, हरीश्चंद्र धोत्रे, लक्ष्मीदास पटेल, हरीभाई पटेल, शिवाजीराव पोवार, राहूल नष्टे, विनोद डुणुंग आदी उपस्थित होते.

विमानसेवेचा अडथळा

चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने एप्रिल २०१८ मध्ये ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो’ घेण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी देशविदेशातून उद्योगक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एक्सोचे स्थळ अद्याप निश्चित नसले, तरी कोल्हापूरमध्ये विमानसेवा सुरू असती, तर निश्चित विचार झाला असता असे मंडलेचा यांनी सांगितले. मंडळेच्या या भूमिकेमुळे कोल्हापुरातील विमानसेवा जानेवारीपर्यंत सुरू न झाल्यास एक्स्पोचे कोल्हापुरात आयोजन होणे अशक्य आहे. त्यामुळे रखडलेली विमानसेवा कोल्हापुरच्या विकासाला मारकच ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुजाऱ्यांची इडीकडून चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘अंबाबाई मंदिरातील काही पुजाऱ्यांनी पुण्यात जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जनतेची दिशाभूल केली आहे. मंदिरातील उत्पन्न दडवण्याचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा हा गंभीर प्रकार आहे. याची दखल घेऊन सरकारने तातडीने इडीकडून पुजाऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाची चौकशी करावी,’ अशी आग्रही मागणी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने केली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी समितीने शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुजारी हटाओ संघर्ष समितीवर आरोप केले होते. याबाबत पुजारी हटाव संघर्ष समितीने शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. समितीने पुजाऱ्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला असून, पुजारी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना समितीचे सदस्य दिलीप पाटील म्हणाले, ‘मंदिरातील पुजारी हटवून सरकारी पुजारी नेमण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. हिवाळी अधिवेशनात याबाबत कायदा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे, त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलन स्थगित केले आहे. आंदोलक शांत असताना त्यांना मुद्दाम डिवचण्याचे काम पुजाऱ्यांकडून सुरू आहे. कोल्हापूरच्या मंदिरातील प्रश्न त्यांनी पुण्यात जाऊन मांडून चूक केली आहे. पुजाऱ्यांचे आठवड्याचे उत्पन्न केवळ दोन लाख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे, मात्र हा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असूनही पुजारी चुकीची माहिती देत आहे. याशिवाय गाभाऱ्यावर अधिकार सांगणारे पुजारी खोटी माहिती पसरवत आहेत. सरकारने मंदिरातील पुजाऱ्यांची इडीकडून चौकशी करावी,’ अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘मोघल काळात मंदिरातील देवीच्या मूर्तीचे रक्षण केले हा पुजाऱ्यांचा दावा खोटा आहे. तेव्हा घोरपडे सरकार यांनी कपिलतीर्थ मार्केट परिसरातील एका दिवळीत देवीची मूर्ती ठेवली होती. यानंतर छत्रपती घराण्याच्या आदेशाने मूर्तीची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. गांधी हत्येनंतरच्या दंगलीतही पुजाऱ्यांनी कोल्हापूर सोडून पळ काढला होता. कोल्हापूरकरांच्या विरोधामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पुजाऱ्यांकडून सुरू आहे. यासाठी ते मूर्तीलाही बाधा पोहोचवू शकतात. देवीला येणारे दागिने आणि रकमेचाही हिशोब देवस्थान समितीने पुजाऱ्यांकडून घ्यावा,’ अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

‘ब्राम्हण विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्यासाठीच पुजाऱ्यांनी पुण्यात जाऊन पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकार कायदा करणार आहे, त्यामुळे सरकारवर दबाव टाकण्याचाच हा प्रयत्न आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कोल्हापूरकर संयम बाळगत आहेत, मात्र यातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पुजारीच जबाबदार असतील,’ असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, वसंतराव मुळीक, शिवाजी जाधव, मुरलीधर जाधव, प्रताप वरुटे-नाईक, आदी उपस्थित होते.

आमचा संयम संपला

‘पालकमंत्र्यांच्या आश्वासनानुसार कोल्हापूरकर शांत आहेत. गेल्या आठवड्यात पुजाऱ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील कॅमेरे बंद करून कुरापत काढली. आता पुण्यात जाऊन चुकीची माहिती प्रसार माध्यमांना दिली. पुजारी हटाओ संघर्ष समितीवर खोटे आरोप केले. संघर्ष समिती ही कोल्हापूरकरांचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे पुजाऱ्यांकडून कोल्हापूरकरांचा अपमान केला जात आहे. आता आमचा संयम संपला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास याला पुजारीच जबाबदार असतील,’ असा स्पष्ट इशारा संघर्ष समितीने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी अधिक शंभरचा तोडगा शक्य?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपीवरून निर्माण झालेल्या संघर्षावर रविवारी (ता.५) तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारखानदारांनी पहिली उचल म्हणून एफआरपी अधिक शंभर रुपये आणि उर्वरित शंभर रुपये नंतर देण्याचा प्रस्ताव कारखानदारांकडून शेतकरी संघटनांकडे पाठवला असल्याचे समजते. स्वाभिमानी संघटना ३४०० रुपयांवर ठाम असली तरी संघर्ष कमी करण्यासाठी आजच्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बैठकीत सर्वमान्य तोडगा निघाल्यास सोमवारपासून पूर्ण क्षमतेने गळीत हंगामाला सुरुवात होणार होईल.

एआरफीवरुन शेतकरी संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. संघर्षामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. जे कारखाने सुरू आहेत त्याठिकाणची ऊस वाहतूक रोखली जात आहे. गुरुवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बोलवली बैठक निष्फळ ठरल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी कारखानदारांची बैठक झाली, मात्र त्यातून कोणताही प्रस्ताव पुढे आला नाही.

शनिवारी खासदार राजू शेट्टी कोल्हापुरात आल्यानंतर दराचा तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली झाल्या. स्वाभिमानीच्या काही कार्यकर्त्यांनी ‘हमिदवाड्या’चे चेअरमन संजय मंडलिक यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. मंडलिक यांच्याबरोबर चर्चा सुरू असताना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेऊन एफआरपीचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते. कारखानदारांनी दिलेल्या प्रस्तावांमध्ये एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यास संमती दिली असल्याची चर्चा आहे. यातील शंभर रुपये नंतर देण्यात येणार आहेत. तर ‘रयत क्रांती’ संघटनेने एफआरपी आणि अधिकचे ३०० रुपये दोन टप्प्यात देण्यास संमती दिली असल्याचे वृत्त आहे. दोन्ही संघटना तडजोडीस मान्यता देण्याची शक्यता निर्माण झाल्याने यावर तोडगा निघण्याचे चित्र आहे.

०००००००००००००


शेतकऱ्यांना जादा दर मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. संघर्षाशिवाय मार्ग काढण्यासाठी ‘रयत’चे प्रयत्न सुरू आहेत. चर्चेमधून निश्चितच मार्ग निघेल.

सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाठारमध्ये ऊसतोडी बंद पाडल्या

$
0
0

हातकणंगले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तळसंदे,चावरे परिसरातील वारणा कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडून ऊसतोड मजूरांना पळवून लावले. साखर कारखानदारांचा निषेध केल्यामुळे यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, कुंभोज येथून सोमवारी (ता.६) सकाळी १० वाजता शरद व वारणा साखर कारखान्यावर मोटरसायकलची भव्य रॅली काढण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

चालू गळीत हंगामातील उसाचा दर जयसिंगपूर येथे झालेल्या ऊसपरिषदेत केलेल्या मागणीनुसार पहिला हप्ता एकरकमी ३४०० रुपये मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी वाठार, तळसंदे,चावरे परिसरातील ऊसतोडी बंद पाडल्या. जोपर्यंत साखर कारखानदार उसाचा पहिला हप्ता जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी माने यांनी सांगितले. यावेळी परिसरातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त करत ऊसतोड मजूरांना शेतातून पळवून लावले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या विरोधात नसून शेतकरी वर्गाने ऊसदर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊसतोडी घेऊ नयेत, असे आवाहन जिल्हा दक्षता समिती सदस्य वैभव कांबळे यांनी केले. आंदोलनात आण्णा मगदूम, संपत पोवार, सुरेश पाटील, रामदास वड्ड, सुधीर मगदूम, राहुल पाटील, बबलू घोडके, हरीभाऊ जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्कर दाजीपूरमधून इदरगंज पठाराकडे

$
0
0

राधानगरी

दाजीपूर(ता.राधानगरी) परिसरात आलेला टस्कर दाजीपूर अभयारण्यातून इदरगंज पठाराकडे मार्गस्थ झाला आहे. टस्कर इदरगंज पठाराकडे गेल्यामुळे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दाजीपूर अभयारण्यात डीगस गावच्या परिसरात हा टस्कर गगनबावडा परिसरातून आला होता. गेले तीन दिवस टस्कर डिगस गावच्या परिसरात होता. टस्करच्या आगमनामुळे वन विभागाने धास्ती घेऊन दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना अनिश्चित कालावधीसाठी बंदी घातली होती. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी टस्करच्या मागावर पाळत ठेवून होते. या टस्करने सर्वांचीच झोप उडवली होती. टस्कर केंव्हाही येईल आणि धडक मारून जाईल या भीतीपोटी डीगस परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली होते. परिसरातील लोक एकत्र येऊन उंचावर बसून टस्करची हालचाल आणि तो कोठे जातो यावर लक्ष ठेवून होते.

शनिवारी सकाळी दाजीपूर अभयारण्य परिसरातील डीगस गावच्या जंगलातून टस्कर राधानगरी जलाशयाच्या बॅक वॉटरमधून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पोहत जाऊन देवगड राज्यमार्गाच्या पलिकडील इदरगंज पठाराकडे मार्गस्थ झाला आहे.

मात्र टस्कर पुन्हा माघारी फिरला तर कठीण परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माघारी फिरत असलेला टस्कर आजरा,चंदगडमार्गे कर्नाटकच्या जंगलात जाण्याची शक्यता वन विभागाच्या वतीने वर्तवली जात आहे.

...............

कोट

‘राधानगरी दाजीपूर अभ्यारण्यात आलेला टस्कर आता परतीच्या मार्गाला लागला आहे. दाजीपूर परिसरात येणारे वन्य प्राणी आणि अभयारण्यातील प्राणी मानवी वस्तीत वारंवार आक्रमण करत आहेत. बऱ्याचवेळा नागरिकांच्यावर वन्यप्राण्यांनी हल्ले केले आहेत. वन विभागाच्या वतीने वन्यप्राणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सौर कुंपण योजना राबवून वन्य प्राणी काबूत ठेवावेत.

सम्राट केरकर,बायसन नेचर क्लब,राधानगरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायकोर्टाच्या ‌निकालाला आव्हान देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी शुक्रवारी सांगली जिल्हा बार असोसिएशनची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत चर्चा झाली. हायकोर्टाच्या अवमान याचिकेतील निकालावर सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा पर्यायही बैठकीत मांडण्यात आला. सर्व जिल्ह्यातील बार असोसिएशनची चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती निमंत्रक अॅड. प्रशांत शिंदे यांनी दिली.

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी खंडपीठ कृती समितीने सरकारला अवधी द्यावा, असे आवाहन सरकारने केल्याने गेली चार महिने खंडपीठ आंदोलन शांत आहे. हायकोर्टानेही अवमान याचिकेवर निकाल दिला असून, यापुढे काम ठप्प करून आंदोलन न करण्याची ताकीत खंडपीठ कृती समितीला दिली आहे. याबाबत सर्व जिल्ह्यातील बार असोसिएशनची मते आजमावण्याचे काम सध्या खंडपीठ कृती समितीकडून सुरू आहे. समितीने शुक्रवारी सांगली जिल्हा बार असोसिएशनची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत हायकोर्टाने दिलेल्या अवमान याचिकेवरील निकालाबाबत चर्चा करण्यात आली. ‘या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे. त्याचबरोबर हायकोर्टाने निकालात घालून दिलेल्या अटी डोळ्यासमोर ठेवून त्या अटींचे उल्लंघन न करता आंदोलनाची दिशा ठरवावी. खंडपीठ कृती समिती जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे आंदोलन सुरू ठेवू,’ असे मत अॅड. श्रीकांत जाधव यांनी व्यक्त केले. खंडपीठ आंदोलनासाठी कायमस्वरुपी सुकाणू समिती नेमावी, अशा सूचनाही ज्येष्ठ वकिलांनी केल्या.

सर्व जिल्ह्यातील बार असोसिएशनशी चर्चा करून खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जणार आहे. सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती निमंत्रक शिंदे यांनी बैठकीत दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव अॅड. किरण पाटील यांच्यासह अॅड. संपतराव पवार, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अमित महाडिक, सांगली जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप सरकार अतिनालायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची याआधीच्या सरकारला चाड नव्हती त्यामुळे ते नालायक तर आत्ताचे भाजप सरकार अतिलानायक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकरी आणि कारखानदार यांच्यात मध्यस्थी करण्याची एकीकडे सरकार जबाबदारी झटकत असताना, कोल्हापुरात मात्र पोलिस बंदोबस्तात ऊस पुरवठा करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख देत आहेत. सरकारची एकप्रकारची दडपशाही असून यामागे बोलवता धनी दुसराच असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

ऊस दरावरुन शेतकरी संघटना, कारखानदार आणि सरकार यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरफीमध्ये यापुर्वीच ३०० रुपयांची वाढ केलेली असल्याने कारखानदारांना एफआरपी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र वाढीव एफआरपीवरुन निर्माण झालेल्या संघर्षामध्ये मधस्थी करण्याची जबाबदारी टाळत असल्याच्या भूमिकेवर खासदार शेट्टी यांनी जोरदार घणाघात केला.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आघाडी सरकारने नेहमीच बोटचेपी भूमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी किंमत मिळू शकली नाही. आघाडी सरकारचा कित्ता भाजप सरकार गिरवत आहे. निवडणुकीपूर्वीची त्यांची आश्वासने पाहता ते आधीच्या सरकारपेक्षा अतिनालायक ठरले आहे. केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ केलेली असली, तरी साखरेचे दर पाहता त्यामध्ये वाढीव किंमत मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच संघटनेने पहिली उचल ३४०० रुपये मागितली आहे. पण कारखानदार दर देण्यास तयार नसताना ऊस दराचा तिढा निर्माण झाला आहे. दराचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सरकार जबाबदारी झटकत आहे.’

पालकमंत्र्यांवर आरोप

शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव मिळवून देण्याऐवजी पोलिस बंदोबस्तात ऊस पुरवठा करण्याचे जिल्हा पोलिसप्रमुखांनी आदेश दिले आहेत. पोलिस बळाचा वापर करून दडपशाही करण्याचा प्रयत्न असून यामागे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप केला. संघटनेच्या आंदोलनाला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला आहे, पण त्यांना शेतकऱ्यांचा ‘प्रसाद’ माहीत असल्यामळे ते धाडस करणार नाहीत, असा टोलाही लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचीच बदली करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

राज्य सरकारचे बदली धोरण, ऑनलाइन कामे, जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यासाठी रस्त्यांवर उतरलेल्या प्राथमिक शिक्षकांनी ‘एकजूट करुया गुरुजींची, बदली करूया सरकारची’ अशी घोषणा दिली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील, दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. कोल्हापूर जिल्हा प्राथ​मिक शिक्षक संघटना समन्वय समितीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. समितीच्यावतीने उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले.

वेतनश्रेणी आदेश, ऑनलाइन कामे, जुनी पेन्शन योजना लागू करा, एम. एस. सी. आय. टी. प्रशिक्षण या मागण्यासह अन्यायी नवीन बदली धोरण बदला या मागणीसाठी शनिवारी दुपारी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलजवळील प्राथमिक शिक्षक बँकेच्या आवारापासून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. राज्य सरकार व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधाच्या घोषणा शिक्षक देत होते. आयर्विन ख्रिश्चन ​हायस्कूल, उमा टॉकिज, कॉमर्स कॉलेज,बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा,दसरा चौक, व्हीनस टॉकिज, बसंत बहार रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी शिक्षकांनी राज्य सरकारच्याविरोधात घोषणा देत निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

शिक्षकांसमोर रविकुमार पाटील, गौतम वर्धन, सर्जेराव सुतार, प्रमोद तौंदकर, राजाराम वरुटे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांची बदली झाली पाहिजे. पण बदली होत असताना शिक्षकांवर अन्याय होत असलेला २७ फेब्रुवारी, २०१७ च्या निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने दिवाळी सुटीनंतर बदल्याचा घाट घातला आहे. सध्या शाळा सुरू झाल्या असून परीक्षा सुरू आहेत. अशावेळी कुटुंबासह बदलीच्या ठिकाणी शिक्षकांना जाण्यास अडचण होणार आहे, याकडे राज्यसरकारचे लक्ष वेधण्यात आले.

समितीच्यावतीने उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हणले आहे, वाडी, वस्ती, गाव, पाड्यावरील शेतकऱ्यांनी ग्रामीण भागात काम करताना शिक्षकांनी स्वतःची पदरमोड करून व लोकवर्गनीतून शाळांची शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल व आयएसओ मानांकन केल्याने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या क्रमांक झेप घेऊ शकला आहे. शिक्षकांच्यावर अशै​क्षणिक कामांचा ससेमिरा लावून बहुजनांच्या शिक्षणाचा गळा घोटला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व सरकारी काम सोशल मीडियावर सुरू आहे. सरकारी निर्णय व दुरुस्त्यामुळे गोंधळ उडू लागला आहे. मागील सहा महिन्यांत बदल्यांच्या गोंधळामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सारखा कार्यक्रम मागे पडू लागला आहे. राज्य सरकार शिक्षकांच्यात फोडा, झोडा व राज्य करा अशी नीती राबवत आहे, असा आरोप करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व समन्वय समितीचे निमंत्रक मोहन भोसले, जनार्दन निऊंगरे, सुधाकर सावंत, प्रसाद पाटील, एस. डी. लाड, भरत रसाळे, यांच्यासह शिक्षक नेत्यांनी केले.

शिक्षकांच्या प्रमुख मागण्या

२३ऑक्टोबरचा निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीचा सरकारी आदेश रद्द करावा

शिक्षकांना करावी लागणारी ऑनलाइन कामे बंद करून डेटा ऑपरेटरची नेमणूक करा

२००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या ​शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

२७ फेब्रुवारीचा शिक्षक बदली निर्णयात दुरुस्ती व सुधारणा करुन बदल्या मे २०१८ मध्ये कराव्यात

एमएससीआयटी साठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिनेट’वर विकास आघाडीचे वर्चस्व !

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) आणि विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीची चुरस आणखी वाढली. शनिवारी अर्ज माघारीनंतर शिक्षक गट, अॅकेडमिक कौन्सिल (विद्वत सभा) आणि पदव्युत्तर शिक्षक गटासाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ यांच्यात थेट लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. नोंदणीकृत पदवीधर गटांत विकास आघाडीविरोधात आजी-माजी विद्यार्थी कृती समिती आणि ‘सुटा’ किती ताकद लावतात, यावर निकाल अवलंबून असणार आहे.

दरम्यान, प्राचार्य आणि संस्था प्रतिनिधी गटातील बहुतांश जागा बिनविरोध करत विद्यापीठ विकास आघाडीने सिनेटवर वर्चस्व राखण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले. सिनेट व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी संस्था चालक, प्राचार्य संघटना आणि ‘अभाविप’ यांनी एकत्र येऊन विद्यापीठ विकास आघाडीची स्थापना केली आहे. सिनेटमधील ७६ पैकी ३८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये प्राचार्य गटातील दहापैकी नऊ तर संस्था गटातील सहापैकी सहा जागांवर ​​आघाडीचा वरचष्मा सिद्ध झाल्याचा दावा आघाडीचे पदाधिकारी प्राचार्य डी. आर. मोरे व प्रताप माने यांनी शनिवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर दिली. विद्यापीठ विकास आघाडीने गेल्या दहा वर्षांत विद्यापीठ, कॉलेजिस, प्राध्यापक, विद्यार्थी अशा सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठीय व कॉलेजमधील संशोधनाला प्राधान्यक्रम दिले. विकासाभिमुख कामकाज केल्यामुळे विद्यापीठ निवडणुकीत आघाडी बाजी मारेल, असा दावाही त्यांनी केला.

सोमवारी (ता.६) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून, १७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. शिक्षक (प्राध्यापक) गटातील दहा जागा आणि पदवीधर गटातील नऊ जागासाठी मोठी चुरस आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यापीठ शिक्षक संघाने शिक्षक गटातील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिक्षक गटातील दहाही जागा ‘सुटा’साठी प्रतिष्ठेच्या आहेत. तसेच अॅकेडमिक कौन्सिल, पदव्युत्तर शिक्षक गटातील निवडणुकीतही आघाडी आणि ‘सुटा’मध्ये लढत आहे. विद्यापीठ निवडणुकीसंदर्भात ‘सुटा’च्या कार्यकारिणीची रविवारी (ता.५) बैठक होणार आहे. या बैठकीत नोंदणीकृत पदवीधर गटात कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

................

पदवीधर गटाकडे लक्ष

नोंदणीकृत पदवीधर गटातून दहापैकी नऊ जागांसाठी चुरस आहे. विद्यापीठ विकास आघाडीकडून सर्व जागा लढविल्या जाणार आहेत. या गटात विकास आघाडी पाच जागा तर ‘अभाविप’ पाच जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. अभाविपकडून अमित कुलकर्णी, दिनेश जंगम (सातारा), विशाल गायकवाड (सांगली), आरती शिंदे (कोल्हापूर) आणि इचलकरंजीचे पंकज मेहता यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. या गटातील एका अर्जासाठी अपिल केले असून रविवारी त्यावर निर्णय होणार आहे. एसटी प्रवर्गातून प्रा. लोभाजी भिसे यांचा एकच अर्ज उरल्याने ते बिनविरोधाच्या मार्गावर आहेत. आजी-माजी विद्यार्थी कृती समितीने पदवीधर गटातील निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग कामगाराचा खून उघडकीस

$
0
0

इचलकरंजी

खोतवाडी (ता. हातकणंगले) उत्तमनगर परिसरातील राहुल गोवर्धन सुरवसे (वय २८) या यंत्रमाग कामगाराचा आर्थिक देवघेवीतून खून करण्यात आला. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी अनिकेत अरुण चव्हाण (वय २५, रा. खोतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला हा खून शनिवारी उघडकीस आला.

राहुल सुरवसे हा खोतवाडी येथील उत्तमनगर परिसरात राहण्यास आहे. लोटस पार्क येथील कारखान्यात तो आणि त्याचा मित्र अनिकेत चव्हाण एकत्र कामास होते. नेहमीप्रमाणे राहुल गुरुवारी कामावरून घरी आला होता. त्याचदिवशी दुपारी अनिकेतने त्याला घरी काम असल्याचे कारण सांगून बोलवून नेले होते. अनिकेत याने मालकाकडून पैसे उधार घेऊन दोघांनी शेतात विहिरीशेजारीच बसून मद्यप्राशन केले. त्यानंतर राहुल हा विहिरीत पोहण्यास उतरला होता. पोहल्यानंतर तो विहिरीच्या काठावर येऊन विश्रांती घेत असताना अंकुश याने त्याचे पाय वायरने बांधले. शेतातच पडलेल्या एका खांबाला बांधून राहुल याला विहिरीत टाकून दिले. या घटनेनंतर अनिकेत हा राहुल याच्या घरी जावून त्याची सतत चौकशी करत होता. दोन दिवस झाले तरी राहुल घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी शहापूर पोलिस ठाण्यात राहुल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला असता संशयावरुन अनिकेत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवी केली. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने राहुल याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिली. राहुल हा मागील काही महिन्यांपासून सासूरवाडी सोलापूर येथे होता. गावी जाण्यासाठी त्याने अनिकेतकडून २० हजार रुपये घेतले होते. उसने दिलेल्या पैशाची मागणी करुनही राहुल याने परतफेड न केल्याने चिडून अनिकेत याने राहुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी जीवनमुक्तीच्या अनिल घोडके व त्यांच्या पथकाने दोन तास शोधाशोध करून राहुलचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे, शहापूरचे पोलिस निरिक्षक सीताराम डुबल यांनी पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून आयजीएम येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुल याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फक्त कॉल करा, आम्ही येऊ!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘लाच घेणे आणि देणे या दोन्ही प्रवृत्ती संपवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) थेट तक्रारदारापर्यंत पोहोचत आहे. तक्रारदाराने पायपीट करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. तक्रारदारांनी फक्त या विभागाच्या नंबरवर एक फोन करावा. यानंतर लगेच एसीबीचे अधिकारी तक्रारदारापर्यंत पोहोचणार आहेत. लाचखोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पुढचे पाऊल उचलले आहे,’ अशी माहिती एसीबीचे उपअधीक्षक गिरिश गोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गेल्या १० महिन्यात २१ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.

नियमित कामांमध्येही त्रुटी काढून नागरिकांकडून लाचेच्या स्वरुपात पैसे उकळणारी संस्कृती रुजली आहे. महसूल, पोलिस, महानगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम, जीएसटी विभाग, आदी सरकारी कार्यालये लाचखोरीचे अड्डे बनले आहेत. या प्रवृत्तीमुळे सामान्य नागरिकांना मात्र विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो, याशिवाय कामांनाही विलंब होतो. हे प्रकार टाळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती करण्यात आली. गेल्या आठ-दहा वर्षात या विभागाने लाचखोरांना रंगेहात पकडून त्यांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले आहेत. कोल्हापुरातील एसीबीच्या कार्यालयानेही कारवाईत सातत्य ठेवून अनेक लाचखोरांचा पर्दाफाश केला आहे.

लाचखोरांना अद्दल घडवण्यासाठी एसीबीने थेट तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. एसीबीचे जिल्ह्यात केवळ एकच कार्यालय आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तक्रारदारांना एसीबीच्या कार्यालयात पोहोचणे शक्य होत नाही. अशावेळी तक्रारीचा केवळ एक फोन कॉल आला तरीही याची दखल घेण्याचा निर्णय एसीबीने घेतला आहे. तक्रारीच्या फोननंतर एका दिवसात एसीबीचे कर्मचारी तक्रारदारांपर्यंत पोहोचतात. या पद्धतीमुळे तक्रारदारांचा वेळ, श्रम आणि पैशांचीही बतच होते. या उपक्रमामुळे अधिकाधिक लाचखोरांवर कारवाई होणार आहे, अशी माहिती उपअधीक्षक गिरिष गोडे यांनी दिली. तक्रारदारांनी १०६४ या हेल्पलाइन नंबरसह उपअधीक्षक गोडे यांच्या ८१०८६६०७०७ या मोबाइल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

जानेवारी २०१७ पासून एसीबीने कोल्हापुरात २१ लाचखोरांना रंगेहात पकडून त्यांना अटक केले. यात नेहमीप्रमाणे महसूल विभागातील लाचखोरांनी आघाडी घेतली आहे. महसूलच्या सात कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. यशिवाय चार पोलिसही लाच घेताना सापडले आहेत. कोल्हापूर महापालिकेतील दोन कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोन, तर वनविभाग, जीएसटी, खणीकर्म विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यासह एक शिक्षकही लाच घेतना सापडला आहे. यातील तीन लाचखोर वर्ग एकचे अधिकारी आहेत. १३ कर्मचारी वर्ग तीनचे, तर पाच कर्मचारी वर्ग चारचे आहेत.

लाचेचे पैसे मिळतात परत

लाचखोरांना पकडून देताना तक्रारदारांच्या पैशांचा वापर केला जातो. लाचखोरावर कारवाई केल्यानंतर तक्रारदाराची रक्कम सील केली जाते. ही रक्कम कोर्टात पुरावा म्हणून सादर केली जाते, तर या बदल्यात तक्रारदाराला सरकारकडून तेवढ्याच रकमेचा चेक मिळतो. २० ते ३० दिवसात ही प्रक्रीया पूर्ण होते, अशी माहिती उपअधीक्षक गोडे यांनी दिली.

तक्रारदारांच्या पाठीशी एसीबी

अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर आपले काम होईल की नाही याची भीती तक्रारदारांच्या मनात असतेच. लाचखोरांना पकडून दिल्यानंतर संबंधित तक्रारदारांचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी स्वतः एसीबीचे अधिकारी पाठपुरावा करतात. काम करण्यास टाळाटाळ झाल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले जाते, त्यामुळे लाचखोरी रोखण्यासाठी निर्भयपणे केवळ एक कॉल करा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

विविध उपक्रमांनी दक्षता सप्ताह साजरा

एसीबीने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला. यात १०६४ हा टोल फ्री क्रमांक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांना एसीबीच्या कार्याची माहिती दिली. भ्रष्टाचारविरोधी जनजागृती रॅली, निबंध स्पर्धा, चर्चासत्र यांचेही आयोजन केले होते. शनिवारी या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारपर्यंत तोडगा ननिघाल्यास संघर्ष अटळ

$
0
0

जयसिंगपूर

‘ रयत क्रांती संघटनेने एफआरपी अधिक ३०० रुपये अशी ऊसदराची मागणी केली आहे. ऊसदरप्रश्नी कारखानदार व संघटनांना एकत्र बोलावून येत्या १० तारखेपर्यंत तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनास हिंसक वळण लागल्यास सरकार जबाबदार राहील,’ असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, ‘ऊसदरासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रयत क्रांती संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. राज्यात एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करावी. एफआरपी अधिक ३०० रुपये ऊस दर द्यावा. ऊस गाळपानंतर १५ दिवसाच्या आत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. मागीलवर्षी ठरल्यानुसार ७०- ३० फॉर्म्युल्यानुसार मागीलवर्षीचा फरक द्यावा. राज्यातील साखर महासंघ व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची समन्वय बैठक घ्यावी. राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करावेत. दोन साखर कारखान्यामधील २५ कि.मी. ची अट रद्द करुन मागेल त्याला परवाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मागील वर्षीचे अंतिम बिल देण्याबाबत साखर आयुक्तांनी आदेश दिले आहेत. सहकारी तत्वावरील कारखान्याची शिफारस आल्यास दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट शिथील करण्याचे सरकारचे धोरण आहे. वजन काटे ऑनलाईन करण्यासाठी आठ दिवसात आदेश निघणार आहेत.’ रयत क्रांती संघटनेच्या मागणीनुसार एफआरपी अधिक ३०० रुपये ऊस दर द्यावा. ऊसदरप्रश्नी त्वरीत तोडगा काढावा अन्यथा आंदोलनास हिंसक वळण लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व आवाडे हे नेहमीच एकत्र आहेत. आज फक्त त्यांनी उघड केले असे नमूद करुन पाटील म्हणाले, ‘शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी तर आवाडे हे राजकारणासाठी लढतात. शेतकऱ्यांचे हित व राजकारण याचा ताळमेळ लागत नाही.’ याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते राजाराम धारवट, इचलकरंजी शहराध्यक्ष रमेश पाटील, शिरोळ तालुका युवा आघाडी अध्यक्ष आकाश राणे, जयसिंगपूर शहर युवा आघाडी अध्यक्ष रोहित आमण्णा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यपंढरीत देवलच पोरके!

$
0
0

anuradha.kadam@timesgroup.com

हरिपूर/सांगली : : संगीत रंगभूमीला मृच्छकटिक, शारदा, संशयकल्लोळसारखी अजरामर नाटके देणाऱ्या, संगीत रंगभूमीची अहोरात्र सेवा करणाऱ्या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांना नाट्यपंढरीतच पोरकेपण यावे? सांगलीकरांनाच नव्हे तर साऱ्या सांस्कृतिक जगतालाच त्यांचा सोयीस्कर विसर पडावा? देवल केवळ आणि केवळ पुरस्कारापुरतेच उरावेत?...यांसारखे अनेक प्रश्न नाट्यपंढरीच्या पाऊलखुणा धुंडाळताना पडले... जिथे ‘संगीत शारदा’तील पदांनी जन्म घेतला, ते हरिपूरही बदलाच्या पसाऱ्यात देवलांपासून कोसो मैल दूर गेले आहे !

देवलांचे त्यांच्या जन्म आणि कर्मभूमीत साधे स्मारक नाही, नाट्यप्रेमींनी केलेल्या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. दरवर्षी मराठी रंगभूमीदिन साजरा होतो. नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावे रंगकर्मींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. देवल फक्त नावापुरतेच राहतात. हीच विषण्ण व्हायला लावणारी वस्तुस्थिती... देवल यांच्या आठवणीही विंगेतल्या अंधाराप्रमाणे पडद्याआड गेल्या आहेत!

हरिपुरात वारणा आणि कृष्णेच्या संथ संगमाकाठी पिंपळाच्या डेरेदार वृक्षाच्या ज्या पारावर देवलांना ‘संगीत शारदा’ नाटकाचे कथाबीज सुचले, त्या तडे गेलेल्या पारावरही संगमरवरी फलकाखेरीज देवलांच्या स्मृतीची एकही खूण नाही.

सांगलीसारखा नाट्याला अनुकूल परिसर, भावे-किर्लोस्कर-खाडिलकर यांची नाट्यपरंपरा, वडील बंधू संगीतशास्त्रज्ञ, दुसरे बंधू कुशल नट आणि किर्लोस्करांसारखे कसदार गुरू अशा वातावरणात गोविंद बल्लाळ देवल हे नाव नाट्यलेखनात उंचीवर पोहोचले. बालपणातील काही वर्षे हरिपुरातील वाड्यात आणि सांगली परिसरातच व्यतीत झालेल्या देवल यांच्या नाट्यलेखनाच्या प्रवासातील महत्त्वाचे वळण असलेल्या संगीत शारदा या नाटकाचा जन्मच हरिपुरात झाला. सांगलीतील विश्रामबागेत असलेल्या खास जागेत देवलांनी ‘शारदा’ हे नाटक एकटाकी लिहून काढले. नाटक लिहिल्यानंतरही पुन्हा देवल यांची पावले हरिपुरातील त्याच पिंपळाच्या पाराकडे वळली; जिथे ‘शारदा’च्या कथानकाची ठिणगी पडली होती. या नाटकाच्या प्रयोगाच्या संकल्पनेवरही या पारावरच बसून देवलांनी शिक्कामोर्तब केले.

मात्र, या ज्येष्ठ नाटककाराच्या स्मृती जतन होणारा एकही घट्ट धागा आजघडीला सांगली किंवा हरिपुरात उरलेला नाही.

मराठी संगीत रंगभूमीसाठी नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचे फार मोठे योगदान आहे. नाट्यपंढरी सांगलीजवळील हरिपूर येथील देवल यांचा वाडा राज्य संरक्षित वास्तू म्हणून समाविष्ट करता येईल का, याची पाहणी करण्यासाठी येत्या चार दिवसांत सूचना देण्यात येतील. तसेच देवल यांच्या स्मृतींचे हरिपूर आणि सांगली येथे जतन करण्यासाठी कोणते उपक्रम व कायमस्वरूपी स्मारक करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी येत्या महिनाभरात बैठक घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. - संजय पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक, महाराष्ट्र राज्य

सांगली संस्थानातील हरिपूर येथील वारणा-कृष्णा संगमाकाठी असलेल्या पिंपळाच्या पारावर नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांना ‘संगीत शारदा’ या नाटकाचे कथाबीज सुचले. देवल यांची हरिपुरातील आठवण या पारावर लावण्यात आलेल्या एका फलकापुरतीच सीमित राहिलेली आहे.

- गोविंद बल्लाळ देवल यांचा हरिपुरातील वाडा जीर्ण

- ‘शारदा’चे कथाबीज सुचलेला पिंपळपार दुर्लक्षित

- विश्रामबागेतील देवलांची जागा स्मारकाच्या प्रतीक्षेत

- स्मृती केवळ देवलांच्या नावाने पुरस्कारापुरत्याच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापुरात ऊस आंदोलन पेटलं

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

ऊस दराबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेले ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज शेतकऱ्यांनी सोलापूरमध्ये जागोजागी ऊसाचे ट्रॅक्टर अडवून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले तर सांगलीच्या म्हैसाळ येथे काही आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायरच पळवले. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व साखर कारखानदारांची थोड्याच वेळात बैठक होणार असून त्यात ऊसप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन पुकारलं. गुरुवारी राज्यसरकारबरोबरची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पंढरपूर-पुणे रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडले. फॅबकेट शुगर फॅक्टरीकडे हा ट्रॅक्टर ऊस घेऊन निघाला होता.

सांगलीतही या आंदोलनाचे पडसाद उमटले. म्हैसाळमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर पळवले.काल मध्यरात्री हा प्रकार घडला. जोपर्यंत ऊसाला टनामागं ३ हजार ५०० रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावे पदक हे माझे सौभाग्यज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींच्या भावना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
‘ नाटककार विष्णुदास भावे यांच्याप्रमाणेच काही गुण माझ्या अंगात असल्याने मी रंगभूमीकडे ओढला गेलो. आज त्यांच्या नावानेच मला पदक मिळत आहे हे माझे सौभाग्य आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जोशी यांना रविवारी सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी सांगलीतील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात रंगभूमी दिन आणि भावे गौरव पदक प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरेल नांदी आणि भावेंच्या गौरव गीताने सोहळ्याची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविकात समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी समितीच्या वाटचालीचा आढावा घेतला. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या या संस्थेला नाट्य क्षेत्रातील मातृसंस्था म्हणून संबोधले जाते. या वेळी मोहन जोशी यांच्या वाटचालीचा आढावा घेऊन निवेदक राजेश दामले यांनी जोशींचा परिचय करुन दिला. त्यानंतर सावरकर यांच्या हस्ते मोहन जोशी यांना २५ हजार रुपये रोख, गौरव पदक आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. जोशी यांचा विविध संस्थांकडूनही सत्कार करण्यात आला. या वेळी जोशी यांच्या पत्नी ज्योती , निर्मलाताई सावरकर, समितीचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह अ‍ॅड. वि. ज. ताम्हणकर, वीणा साखरपे, मेधा केळकर, बलदेव गवळी, जगदीश कराळे, प्राचार्य भास्कर ताम्हणकर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मोहन जोशी म्हणाले, ‘एरवी अनेकवेळा सांगलीला आलो. कधी नाटकासाठी तर कधी नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्ताने. प्रत्येक वेळी सहजपणे वावरलो. पण आज मात्र सकाळपासून एका सुप्त दबावाखाली असल्यासारखे वाटले. भावे गौरव पदकाच्या मानकऱ्यांची यादी वाचल्यानंतर तर छातीची धडधड अधिकच वाढली. खरच आपण या दिग्गजांच्या पंगतीत बसण्यासारखे काही केले आहे का?, असा प्रश्न मनाला विचारला. त्यावेळी मनाने नम्रपणे ते मान्य केले. भावेंचा इतिहास वाचल्यानंतर त्यांच्या जवळपास जाणारे गुण आपल्यात असल्यामुळेच आपण रंगभूमीवर काहीतरी करु शकलोय असे वाटले. आत्मचरित्रात ‘एक तर डोकं नाहीतर भिंत फुटेल,’ असे वाक्य मी घातलय. त्याप्रमाणेच जे आव्हान समोर येईल ते पेलायची हिंमत ठेवली तर यश फार दूर नाही याची प्रचिती मला आली आहे. त्यामुळे अतिशय नम्रपणे हे पदक आपण स्वीकारत आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी अधिक दोनशे रुपयेकारखानदार-शेट्टींच्या बैठकीत घोषणा; सांगलीतील ऊसदराची कोंडी फुटली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
कोल्हापूरप्रमाणेच उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, अशी पहिली उचल देण्यावर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचे, शेतकरी संघटना यांचे एकमत झाल्याने रविवारी ऊसदराची कोंडी फुटली. खासदार राजू शेट्टी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलिप पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी रविवारी जिल्हा बँकेत पत्रकार बैठकीत ही घोषणा केली.
ऊसदराची कोंडी फुटल्याने सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांना २९०० रुपयांपासून ३२०० रुपयापर्यंत पहिली उचल मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दराच्या वादावर पडदा पडल्याने सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच कारखान्याचे गाळप सुरळीत होण्याची शक्यता आहे. रघुनाथदादा पाटील यांनी मात्र, हा तोडगा अमान्य असून पहीली उचल किमान ३५०० रुपये मिळालीच पाहिजे, ही आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले आहे. कारखान्यांना ऊस न देण्याचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे संजय कोले यांनी पहिल्या उचलीच्या नाटकाशी आमचा संबध नसल्याचे सांगून आमचे ध्येय उसाची एकूण किंमत जास्तीत-जास्त मिळवण्यावर आमचा भर असणार आहे. या बैठकीस कारखानदारांचे कोणीही प्रतिनिधी नव्हते. परंतु, त्या सर्वांशी फोनवरुन चर्चा करून त्यांचे प्रतिनिधीत्व दिलीप पाटील यांनी केले.
यंदा कृषी मूल्य आयोगाने एफआरपीमध्ये २५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे यंदाची एफआरपी ९.५० उताऱ्याला २५५० झाली आहे. जिल्ह्यात सरासरी उतारा १२.५० टक्के इतका आहे. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३२८ रूपये प्रती टन पहिली उचल जादा मिळणार आहे. जिल्ह्यात सरासरी ही उचल २९०० रुपयांपासून ३२०० रुपयांपर्यंत जाणार आहे.
आंदोलन मागे- शेट्टी
गतवर्षीपेक्षा पहिली उचल वाढवून घेण्यात आली आहे. वाढलेली एफआरपी व आम्ही मिळवलेली वाढ अशी ३२८ रुपयांची वाढ यंदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही भूमिका सांगली जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना मान्य असल्याने आता आंदोलनाची भूमिका असण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांनी आता आपल्या मर्जीनुसार आवश्यक त्या कारखान्यास ऊस देण्यास अडचण नाही. या शिवाय ७०-३० फॉर्म्युला आमच्या हातात अद्याप आहेच. साखरेचे दर वाढले तर शेतकऱ्यांना आणखी चांगले पैसे मिळणार आहेत, त्यासाठी आम्ही आग्रही असणारच आहे.
कारखानदारांना कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य-दिलीप पाटील
दिलीप पाटील म्हणाले, कोल्हापूरचा प्रश्न निकाली निघाल्याने सांगलीचाही प्रश्न निकाली काढावा. खासदार शेट्टींशी चर्चा करावी, अशी विनंती जिल्ह्यातील कारखानदारांनी केली होती. त्यानुसार शेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यांची भूमिका कारखानदारांना समजावली. कारखानदारांनीही कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य करीत आपण निर्णय घ्यावा. आम्ही त्या प्रमाणे दर देऊ असे आश्वासन दिले आहे. अगदी नव्याने वसंतदादा कारखाना चालवण्यास घेणाऱ्या दत्त इंडिया कंपनीनेही स्पर्धात्मक दर देण्याचे मान्य केल्याचे पाटील व विशाल पाटील यांनीही स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर शरद पवारांचीविश्वासार्हता संपून जाईलपतंगराव कदम यांचे मत

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
‘राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात मोठी लाट आहे. सर्व समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. या वेळी जर शरद पवार यांनी वेगळा विचार केल्यास त्यांची विश्वासार्हता संपून जाईल,’ असे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी व्यक्त केले.
कदम म्हणाले, ‘सांगलीतील एका कार्यक्रमात त्यांच्या उपस्थित मी पवार यांना राष्ट्रवादी-भाजपची छुपी आघाडी संपवा, असे स्पष्टपणे सांगितले होते. राष्ट्रवादीलाही आता दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर काय होते, याची जाणीव झाली आहे. त्यांना काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याने ते वेगळा विचार करतील, असे वाटत नाही.’
घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी भाजपशी जवळीक साधत आहे का, असे विचारताच आपणाला याची कल्पना नाही. फक्त भुजबळ आत आहेत एवढेच माहिती आहे, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.
मंत्रिपद जन्मसिद्ध हक्क नाही; नारायण राणेंना टोला
नारायण राणे यांच्या विषयी बोलताना कदम म्हणाले, मुख्यमंत्री, मंत्रिपद कशाला हवे आहे. सत्तेत किंवा पदावर असताना आपण जे काम करतो, त्यावर आपली बाजारात किंमत ठरत असते. चांगले काम केले नाहीतर पदावरून दूर जाताच कुत्रेही विचारात नाही. एकदा आमदार व्हावे, एकदा मंत्री व्हावे वाटणे साहजिक आहे, पण कायम मंत्री व्हायला लोकशाहीत आपला जन्मसिद्ध हक्क आहे का, असा सवाल त्यांनी राणेंना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ धनगर समाजाचा जल्लोष

$
0
0

सोलापूर
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्‍यांनी नागपूर येथे केल्यानंतर सोलापुरात धनगर समाजाने मोठ्या जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले. निर्णयामुळे सोलापूरसह महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोलापुरातील धनगर बांधवांनी भंडारा उधळून आणि हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.
अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे म्हणून सोलापुरात धनगर समाजाने विराट मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले होते. त्याला लिंगायत वगळता सर्व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. या शिवाय धनगर समाजाने नामकरणाचा उग्र आंदोलनही हाती घेतले होते. सोलापूर विद्यापीठाच्या फलकाला काळे फासले होते. सोलापुरात भंडारा फेकून तर साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न झाला होता.
ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे म्हणून लिंगायत समाज आणि शिवा वीरशैव संघटनेचे नेते प्रा. मनोहर धोंडे यांनी रान उठविले होते. शिवा वीरशैव संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात विद्यापीठाला सिद्धरामेश्वरांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. अगोदर आम्ही मागणी केली असल्याने आम्हालाच प्राधान्य द्यावे, असे शिवा संघटनेचे म्हणणे होते.
मुख्यमंत्र्‍यांचा पुतळा जाळला
सोलापूर विद्यापीठला आहिल्यादेवीचे नाव जाहीर होताच बसवेश्वर सर्कलच्या वतीने पुणे-हैदराबाद महामार्ग काहीकाळ रोखून धरण्यात आला. शिवा संघटनेच्या वतीने कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी विरभद्रेश बसवंती, अरविंद भडोळे-पाटील, राजकुमार शटगार, योगेश जमा, शिवानंद निंबाळकर, संगमेश्वर कांबळे, सागर कुलकर्णी, वैजीनाथ बिराजदार, म्हणतेश पाटील आदी उपस्थित होते.​ चेतन नरोटे, नगरसेवक, प्रवर्तक अहिल्यादेवी होळकर नामकरण संघर्ष समिती. ​ अहिल्यादेवी होळकर नामकरण संघर्ष समितीचे प्रवर्तक, नगरसेवक चेतन नरोटे म्हणाले,
सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची आमची मागणी जुनीच होती. शिवा संघटनेने विनाकारण सोलापुरातील वीरशैव लिंगायत समाजामध्ये गैरसमजूत पसरवून लिंगायत आणि धनगर या दोन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सर्व संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्र्‍यांनी आमची मागणी मान्य करून न्याय दिला आहे. ​ लिंगायत समाजाच्या शिवा संघटनचे संस्प्राथापक . मनोहर धोंडे म्हणाले, येथील विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आहे. म्हणून आम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या नावासाठी विद्यापीठ स्थापनेपासून आग्रह धरला होता. शिवा संघटनेला तसे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीरशैव लिंगायत समाजाचा अपमान केला आहे. राज्यात त्यांचे पुतळे जाळून निषेध नोंदवणार आहे


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images