Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कर्जमाफीच्या माहितीमध्येतांत्रिक अडचणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र, कर्जमाफीच्या माहितीमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पडणारी कर्जमाफी लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मदतीने माहिती दुरुस्तीसह पाठविण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारच्या पोर्टलवर पात्र लाभार्थींची यादी दिसत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार होती. प्रत्यक्षात प्रमाणपत्र दिलेले शेतकरी वगळता इतरांची यादीच सरकारच्या संकेतस्थळावरून गायब झाली आहे, या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या पहिल्यादिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात कर्जमाफीची रक्कम खात्यावर टाकण्यापूर्वीची कोणतीही पूर्वतयारी जिल्ह्यात झालेली नव्हती. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याला सोमवारपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ मिळू शकला नव्हता. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिवाळीतील सलग तीन दिवसांचे कारण पुढे केले होते. मंगळवारी जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांपैकी २५ जणांच्या कर्जदारांच्या खात्यावर कर्जमाफीची ९ लाख ४८ हजार दोनशे रुपयांची रक्कम जमा झाली. इतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर बुधवारपासून रक्कम जमा होणार होती. मात्र, प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे सरकारने संकेतस्थळावर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची यादी लाभार्थी म्हणून प्रसिद्ध केली होती, ती यादीच गायब झाली आहे.
कर्जमाफीच्या पाठविलेल्या माहितीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात शंभर टक्के सोसायट्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. परंतु, अनेक संस्थांच्या माहितीमध्ये अडचणी येत आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या मदतीने अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माहिती दुरुस्तीसह पाठविण्याचे कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, मात्र त्यासाठी जादा कालावधी लागणार असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीयीकृत बँकापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व्यवस्थित माहिती सादर करण्यात आली आहे, परंतु, तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफी लांबणार असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाआत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील अॅड. संग्राम धोंडीराम पाटील यांनी बुधवारी इस्लामपूर येथील त्यांच्या ऑफीसमध्ये डोक्यात गोळी मारून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑपरेशन करून रात्री त्यांच्या मेंदूतील बंदुकीची गोळी काढण्यात आली आहे. डॉक्टरांनी धोका टळल्याचे सांगितले असले तरी अद्यापही त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अॅड. संग्राम पाटील यांचा वकिलीचा व्यवसाय आहे. इस्लामपूर येथील राजारामबापू शॉपिंग सेंटरमधील पहिल्या मजल्यावर गाळा नंबर सहामध्ये त्यांचे ऑफिस आहे. सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ते ऑफीसमध्ये आले केबिनच्या दरवाज्याच्या वरील बाजूची कडी लावून त्यांनी हा प्रकार केला. त्यानंतर काही वेळाने त्यांचे सहकारी अॅड. संदीप भीमराव पाटील आले त्यांनी दरवाजा वाजवला, फोन केला तरीही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेजारच्या गाळ्यातील ऑफीसमधील काही संबंधित वकीलही जमले. सर्वांनी त्यांच्या गावाकडून काही लोकांना बोलवून दरवाजा तोडला. हा प्रकार पाहून सर्वजण अचंबित झाले. त्यांना तातडीने इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरून पोलिसांनी त्यांचा मोबाईल, देशी बनावटीचे रिव्हाल्वर व डायरी ताब्यात घेतली. त्यांच्या टेबलवर डायरीच्या पहिल्या पानावर सॉरी, असे लिहून पेन तिथेच ठेवल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकाराबाबत दिवसभर तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेवून त्यांच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच ते चालवत असलेल्या कट्टा भिशीच्या वादातून मंगळवारी नगरपालिकेच्या गेटसमोर त्यांची वादावादी झाली होती. या प्रकारातूनच असे घडले असावे, अशी चर्चा आहे. या बाबत पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी दिलेल्या माहिती व्यतिरिक्त अन्य काहीही नोंद नाही. अॅड. संग्राम पाटील रात्री एक वाजेपर्यंत कापूसखेड गावात त्यांच्या पॅनेलच्या विजयी उमेदवारांची डिजिटल लावण्यासाठी मुलांच्या बरोबर होते. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोथळीत शॉर्टसर्किटने व्हॅनला आग

$
0
0

जयसिंगपूर

कोथळी (ता.शिरोळ) येथे लक्ष्मीनगरजवळ शॉर्टसर्किटमुळे अचानक ओमनी व्हॅनने पेट घेतला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे निदर्शनास येताच तातडीने व्हॅनमधील सात महिलांना खाली उतविण्यात आले, यामुळे जिवीतहानी टळली. दरम्यान, जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे सुमारे तासभर कोथळी-उमळवाड मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

याबाबत अधिक माहिती अशी, गौरवाड (ता.शिरोळ) येथील राजेंद्र माणिक आरबाळे हे ओमनी व्हॅनमधून नातेवाईकांच्या सांत्वनासाठी आले होते. यावेळी व्हॅनमध्ये सात महिलाही होत्या. कोथळीतून परत गौरवाडकडे जात असताना कोथळी-उमळवाड मार्गावरील लक्ष्मीनगरजवळ शॉर्टसर्किटने व्हॅनने पेट घेतला. यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते संजय नांदणे यांनी जयसिंगपूर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकास पाचारण केले. पथकाने ही आग आटोक्यात आणली. मात्र व्हॅन आगीत जळून खाक झाली. दरम्यान, जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस तोडणी-वाहतूक कामगार आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील ऊस तोडणी-वाहतूक कामगारांच्या मागण्यांसाठी त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी करून त्वरीत मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी राज्य ऊस तोडणी-वाहतूक कामगार संघटनेने बुधवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी लक्ष्मीपुरी परिसर दणाणला. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जोरदार टीका केली. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, ‘सिटू संलग्न महाराष्ट्र ऊस तोडणी-वाहतूक कामगार संघटनेने राज्यातील ऊस तोडणी-वाहतूक कामगारांच्या मागण्यांसाठी सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. संघटनेने ऑगस्टमध्ये मागण्यांचे निवेदन दिले. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी दरवाढीचा त्रिपक्षीय करार होण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकार आणि राज्य साखर संघाने वेळकाढूपणा सुरू केला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. त्याचा परिणाम गळीत हंगामावर परिणाम होईल. मागण्यांबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास ऊस तोडणी-वाहतूक बंद पाडली जाईल.’

दरम्यान, ‘करारांबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकरा राज्य स्तरावर असल्याने निवेदन साखर आयुक्तांना पाठवून देऊ. कारखाना स्तरावरील मागण्यांबाबत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संघटना प्रतिनिधी, कारखानदारांची बैठक घेऊ’ असे आश्वासन रावळ यांनी शिष्टमंडळाला दिले.

आंदोलनात राज्य महासचिव प्रा. डॉ. सुभाष जाधव, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगले, विलास दिंडे, दिनकर आदमापुरे, आनंदा डफळे, पिलाजी शिंदे, विलास केनवडे आदींसह ऊस तोडणी-वाहतूक कामगार सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सरी बागेतील समाधिस्थळी शिवसेनेने केली सफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळावर मद्यप्राशन केले जात असल्याचा प्रकार उघड केल्यानंतर शिवसेनेने बुधवारी सकाळी समाधिस्थळ गोमूत्र व पाण्याने स्वच्छ केले. काहीजणांमुळे संपुर्ण कोल्हापूरकरांना मान खाली घालावयास लावणारे प्रकार रोखण्याची जबाबदारी महापालिका, पोलिस यंत्रणेची आहे. वेळप्रसंगी ​शिवसेनेचे कार्यकर्तेही फेरी मारून अशा तळीरामांना धडा शिकवतील, असा इशारा जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला.

समाधिस्थळाबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर शिवसैनिकांनी तातडीने समाधिस्थळाला भेट दिली. यावेळी समाधिस्थळाच्या पायऱ्यांभोवती दारुच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. या बाटल्यांबरोबर सिगारेटची रिकामी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी अशा पार्टीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू दिसून आल्या. खाद्यपदार्थांच्या पिशव्याही अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आल्या. हे सर्व पाहून येथे दररोज मद्यपींचा धिंगाणा असणार हेच दिसून येत होते. त्याबरोबर समाधिस्थळाच्या पायऱ्यांवर बसून गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्यामुळे पायऱ्या त्या रंगाने रंगून गेल्या होत्या. सामान्यांचा आधारवड असलेल्या शाहू राजाच्या समाधिस्थळाची अशा पद्धतीने केली जाणारी विटंबना पाहून सारेजण हळहळले व संतापही व्यक्त केला.

तातडीने गोमूत्र व पाणी आणून जिल्हाप्रमुख संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पायऱ्यांवर टाकून स्वच्छ केले. इतक्या ज्यांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूरची भूमी सुजलाम, सुफलाम बनली, अशा छत्रपती शाहू राजांबाबत सर्वांच्याच मनात सदैव कृतज्ञतेची भावना असली पाहिजे, असे सांगत संजय पवार म्हणाले, ‘लाज वाटणारी ही घटना असून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वाचा फोडून जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. पोलिस, महापालिकेने त्यांची जबाबदारी पार पाडावी. शिवसैनिकही रात्री या परिसरात फेरी मारुन समाधिस्थळाचे पावित्र्य जपण्याचे काम करतील.’

यावेळी अरविंद यादव, पप्पू नाईक, बापू कोळेकर, संतोष माने या शिवसैनिकांबरोबर स्थानिक नागरिकही उपस्थित होते.


जाब विचारला

शिवसेनेच्यावतीने समाधिस्थळावर स्वच्छता करण्यात येत असल्याचे समजताच कामाचे कंत्राटदार तिथे आले. त्यांनी आपले वॉचमन असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधील समाधिस्थळाजवळ मिळालेल्या बाटल्यांचे छायाचित्र व बातमी दाखवत हे कसे घडले? असा जाब विचारला. त्यावर कंत्राटदारांनी चूक झाल्याचे मान्य करत येथूनपुढे आवश्यक ती दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाची वेळच येणार नाही

$
0
0

कागल

‘उसाची असलेली उपलब्धता व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस येणार आहेत. सोबतच ऊस उत्पादक सभासदांना अधिक दर मिळणार असल्याने यापुढे ऊसदरासाठी आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. एफआरपी पेक्षाही जादा दर देण्यात बिद्री साखर कारखाना राज्यात अव्वल राहील,’ असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. बिद्री साखर कारखान्याच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले,‘ देशात दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र उत्पन्नाचा बहुतांशी हिस्सा हा छोट्या सोसायटीपासून ते ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आडवाआडवीत, जिरवाजिरवीत अनाठायी खर्च होतो. संघर्ष, कटूता टाळत ही ताकद विधायक कार्यासाठी खर्च करुया. निवडणुकीपुरते राजकारण करत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरुन विकासाचे प्रश्न हातात हात घालून सोडवले पाहिजेत. राजकारणामुळे पिढ्यानपिढ्यांचे वैरत्व नको. राष्ट्रीयकृत बँकामधून डाटा चुकीचा आल्याने काही प्रमाणात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास विलंब होत आहे. मात्र काही लोक त्याबाबत आकांडतांडव करत आहेत. रस्त्यांच्या कामासंबंधी जीएसटीच्या समावेशाने टेंडर भरण्यास ठेकेदारांनी विलंब केला आहे. त्यामध्ये सुधारणा झाली असून अवेळी पडत असलेल्या पावसामुळे खड्डे बुजवण्यात अडचणी येत आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल.’

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘विरोधकांनी दिलेल्या नऊ जागांची ऑफर धुडकावून लावत भाजपने आमच्यासोबत आघाडी करून आमच्यावर विश्वास दाखविला. यापुढे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ या विश्वासास पात्र राहून काम करतील. कारखान्याच्या प्रगतीसाठी लागणारे सहकार्य जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’ नूतन अध्यक्ष के.पी.पाटील, आमदार सुरेश हाळवणकर,ए.वाय.पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

याप्रसंगी माजी आमदार नामदेवराव भोईटे, गोकुळचे संचालक बाबा देसाई, धैर्यशील पाटील, नाथाजी पाटील, मनोज फराकटे, भूषण पाटील,पंडीतराव केणे, युवराज वारके, बाबासो पाटील, गणपतराव फराकटे, प्रभारी कार्यकारी संचालक एस.जी किल्लेदार यांच्यासह सर्व आजी-माजी संचालक, पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. स्वागत ए.वाय.पाटील यांनी केले. आभार नूतन उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.

------------

चौकट

दिलदार राष्ट्रवादी बरा ...

राज्यात सुरू असलेल्या भाजप शिवसेना शीतयुध्दाची झलक ‘बिद्री’तही पहावयास मिळाली. नुकत्याच झालेल्या कारखान्यामया निवडणुकीतील भाजप शिवसेना या दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमधील आरोपप्रत्यारोप पाहता भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता कपटी मित्रापेक्षा दिलदार राष्ट्रवादी मित्र बरा, अशी बोचरी टीका केली.

--------------------------------------------

चौकट

अन् पालकमंत्री संतापले

पुंगळी काढून फिरणाऱ्या मोटरसायकलींच्या आवाजाने कार्यक्रमस्थळी चाललेले पालकमंत्री पाटील चांगलेच संतापले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्यांनी या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकली जप्त करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे कार्यकर्त्यांची पळताभुई थोडी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जे. बीं.चे चित्ररूपी स्मरण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

व्यक्तिचित्रातील गाभा असलेला आणि चित्रातील व्यक्तीच्या अस्तित्व जपून ठेवणारा बोलकेपणा रंगरेषांमधून अचूक टिपणारे चित्रकार जे. बी. सुतार हे नाव काळाच्या पडद्याआड गेले. तरीही त्यांच्या प्रभावी व्यक्तिचित्रांतील अस्तित्वाच्या अनुभूती त्यांच्या चित्रकृतींमधून कायम स्मरणात राहतील’ अशा शब्दात आदरांजली वाहण्यात आली. गेल्या चाळीस वर्षापासून ​चित्रकारीतेत उत्तुंग काम करणाऱ्या जे. बी. सुतार यांना जे. बी. प्रेमी ग्रुपतर्फे बुधवारी शाहू स्मारक भवनात शोकसभेत आदरांजली वाहण्यात आली. जे. बी. यांच्या सहवासातील अनेकांनी आठवणींना उजाळा दिला.

दिग्दर्शक चंद्रकांत जोशी म्हणाले, ‘एखाद्या कलाकाराचं असणं किती महत्त्वाचं आहे ते त्याच्या नसण्यानंतरच उमजतं. जे.बी. यांच्याबाबत हा सिद्धांत तंतोतंत लागू पडतो. प्रसिद्धीच्या वलयात न येता शांतपणे काम करण्यात तल्लीन असलेल्या जे. बी. यांची चित्रे पाहिली की ‘हुबेहूब’ या शब्दाची व्याख्या पटते.’

दिग्दर्शक यशवंत भालकर म्हणाले, ‘सिनेमांच्या पोस्टरमुळे जे. बी. सुतार यांच्या सानिध्यात येण्याचे भाग्य मिळाले. चित्रकला याविषयी त्यांच्या कल्पना स्पष्ट होत्या. कलाकार हा कधीच संपत नसतो. त्याच्या कलेतून तो उरतोच. जे. बी. हे त्यांच्या ​चित्ररूपाने आपल्यात असतील हे समाधान मोठे आहे.’

प्राचार्य अजेय दळवी म्हणाले, ‘जे. बी. सुतार यांची चित्रे ही निरीक्षणातून शिकण्यासाठी विद्यापीठ होती.’

निर्मितीचे अनंत खासबारदार म्हणाले, ‘इतका मोठा कलाकार असूनही नव्या कलाकारांना प्रोत्साहन देणे, संवाद साधणे यासाठी ते नेहमीच सहकार्य करत. नव्या गोष्टींचे त्यांना कौतुक होते.’

माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, चंद्रकांत मांडरे कलादालनचे विश्वस्त विश्वास काटकर, ज्येष्ठ ​चित्रकार विश्रांत पोवार, वसंतराव मुळीक, प्रशांत जाधव, बबेराव जाधव, राजा उपळेकर, अनिल उपळेकर, रियाज शेख आदींनी जे. बी. सुतार यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळिवडेतील तिरंगी लढतीत अपक्षांच्या भाऊगर्दीने चुरस

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

करवीर तालुक्यातील वळिवडे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चुरशीची तिरंगी लढत होत आहे. शुक्रवारी (ता. २७ ऑक्टोबर) मतदान होणार असून ६ प्रभागांतून ४५ उमेदवार रिंगणात आहेत. आमदार सतेज पाटील गटाची विद्यमान राजर्षी शाहू आघाडी, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची शेतकरी बहुजन विकास आघाडी आणि युवा शेतकरी आघाडी यांत लढत रंगली असून, शुक्रवारी निवडणुकीवेळी ७२०० नागरिक मतदान करतील. या लढतीकडे करवीर पूर्व परिसराचे लक्ष लागून राहिले आहे. थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत तिन्ही आघाड्यांचे उमेदवार हे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत. अनुभवी उमेदवारांमुळे प्रचारात चांगलाच जोर आला आहे. गावातील प्रभाग ४ मध्ये राजर्षी शाहू आघाडी आणि युवा शेतकरी आघाडीने युती केली आहे. येथे शाहू आघाडीचा एक तर युवाचे शेतकरी आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. गांधीनगर व्यापार पेठेलगतच्या वळिवडेचा मुख्य व्यवसाय शेती व दूग्ध व्यवसाय आहे. पंचगंगा नदीमुळे गावात सुबत्ता आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू आघाडीचे आठ, युवा शेतकरी आघाडीचे सहा आणि माजी सरपंच भगवान पळसे यांचे अपक्ष तीन असे सतरा उमेदवार निवडून आले होते. राजर्षी शाहू आघाडीने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापलू. आघाडीने आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गावात विकासकामे केली आहेत.

यंदा शाहू आघाडीचे प्रमुख रणजितसिंह कुसाळे आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदस्यपदासाठी एकूण सोळा उमेदवार उभे केले आहेत. सरपंचपदासाठी माजी उपसरपंच सुहास तामगावे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडीनंतर युवा शेतकरी आघाडीमध्ये फूट पडली. राजगोंडा वळिवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बहुजन विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. वळिवडे यांनी सरपंचपदासाठी माजी उपसरपंच रावसाहेब दिगंबरे यांना उमेदवारी दिली आहे. आघाडीने सदस्यपदासाठी चौदा उमेदवार उभे केले आहेत.

युवा शेतकरी आघाडीने सरपंचपदासाठी माजी उपसरपंच अनिल पंढरे यांना उमेदवारी देत सदस्यपदासाठी पंधरा उमेदवार उभे केले आहेत. चार प्रभागांत एकूण सात उमेदवारांनी अपक्ष राहून मतदारांकडे कौल मागितला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवामान बदलाने बिघडले आरोग्य

$
0
0



कोल्हापूर टाइम्स टीम

सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव एकाच दिवशी मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरीही थंडीची चाहूल नाही. उलट ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

जूनमध्ये पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलैमध्ये अनियमित पावसाने चिंता वाढवली. ऑगस्टमध्ये काही नक्षत्रे जोरदार बरसली, तर काही नक्षत्रे कोरडीच गेली. सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात तर हवामानाचा अंदाज लावणेच कठीण झाले. अनियमित पावसाने हवामानाचा नूरच बदलून गेला आहे. सध्या सकाळी थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलाचा त्रास लहान मुलांसह वृद्धांना सहन करावा लागत आहे. घसादुखी आणि सर्दीपासून आजारांना सुरुवात होते. दिवाळीत तेलकट पदार्थ खाल्ल्याने हा त्रास होत असेल असे समजून याकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र यातूनच आजार बळावतात. खोकला, अशक्तपणा आणि अंगदुखीने अनेक रुग्ण सध्या त्रस्त आहेत. मधुमेह, हृदयविकार, कॅन्सरच्या रुग्णांना बदलत्या हवामानाचा जास्त त्रास सहन करावा लागतो. याशिवाय लहान मुलांवरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत आहे.

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा धोकाही कायम आहे. गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या ६१ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. याशिवाय साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढू शकतात. किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एल. एस. पाटील यांनी केले आहे. हिवाळा आरोग्यवर्धक मानला जातो, मात्र हिवाळ्याच्या तोंडावर बदलत्या वातावरणाचा फटका बसू नये, यासाठी पोषक आहार आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधिस्थळी संरक्षक भिंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू समाधिस्थळाची कायमस्वरुपी सुरक्षा करण्यासाठी संपुर्ण परिसर बंदिस्त करणारी संरक्षक भिंत तातडीने बांधण्यात येणार आहे. यासाठी जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजूरी मिळाली आहे. आता त्यानुसार टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच त्या परिसरात मोठ्या लाइटचीही सोय करण्यात येणार आहे.

दोन वर्षापासून या समाधिस्थळाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी सात कोटीहून ​अधिक खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात चबुतरा व मेघडंबरी बनवण्याचे काम सुरू आहे. चबुतऱ्याचे काम झाले असले तरी या कामाच्या संरक्षणासाठी काहीच व्यवस्था केलेली नसल्याने अगदी समाधिस्थळाच्या बांधकामापर्यंत पर्यटक, मालट्रक उभे केले जातात. त्यामुळे बांधकाम नजरेआड होत असल्याने तिथे मद्यपींचा अड्डा बनला होता. हा प्रकार बंद होण्यासाठी समाधिस्थळाची जागा बंदिस्त करुन घेणे आवश्यक होते. शाहू महाराजांची समाधी असल्याने पुरातन वास्तूप्रमाणे संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन आराखड्यामध्ये केले होते. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. त्यामुळे दोन टप्प्यात भिंत बांधण्याचे पूर्वी ठरले होते. त्याप्रमाणे ५६ लाख रुपये खर्च करुन प्रवेशाकडील बाजूची भिंत बांधण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र या प्रकाराने तेथील गैरप्रकारांना आळा बसणार नाही, अशी वस्तूस्थिती महापौर हसीना फरास यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयुक्त चौधरी यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवत पूर्ण परिसराला बंदिस्त करणारी भिंत बांधण्याचे ठरवण्यात आले.

यासाठी जवळपास सव्वा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असून येत्या दोन ते तीन दिवसात टेंडरही प्रसिद्ध केले जाणार आहे. अल्प मुदतीचे टेंडर करुन तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याचे महापौर फरास यांनी सांगितले. यामुळे समाधिस्थळाचे बांधकाम बंदिस्त झाल्याने आपोआपच त्या परिसरातील वावर कमी होईल. त्यातून पावित्र्य जपले जाणार आहे.

महापालिकेचे पोलिसांना पत्र

महापालिकेच्या वॉचमनना मद्यपी दादागिरी करण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे​ पोलिसांनी गस्त सुरू केली व मद्यपी तसेच अन्य गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई केली तर आपोआपच साऱ्या प्रकारांना आळा बसणार आहे. यासाठी महापौर हसीना फरास यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र दिले आहे. या परिसरात गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही आवाहन पत्रातून केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांना उठाबशांची निर्भया पथकाची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात निर्भया पथकाच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. बुधवारी महावीर गार्डन परिसरात हुल्लडबाजी आणि अश्लील चाळे करणाऱ्या तरुण, तरुणींवर पथकाने कारवाई केली. हुल्लडबाजांना गार्डनमध्येच उठाबशा काढण्याची शिक्षा करून निर्भया पथकातील अधिकाऱ्यांनी गार्डनमधील ज्येष्ठ नागरिकांशी चर्चाही केली.

सार्वजनिक ठिकाणी तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी रोखण्यासाठी निर्भया पथकांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत छेडछाड करणाऱ्या तरुणांसह सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बुधवारी पथकाने शहरातील महावीर गार्डन, महावीर कॉलेज, रंकाळा आणि अंबाई टँक परिसरात १२ जणांवर कारवाई केली. रंकाळा पदपथ उद्यान आणि महावीर गार्डनमध्ये हुल्लडबाजी करून अश्लील चाळे करणाऱ्या तरुण, तरुणींना निर्भया पथकाने ताब्यात घेतले होते. या तरुण, तरुणींना पथकाने गार्डनमध्येच उठाबशा काढण्याची शिक्षा केली. तरुणांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे उद्यांनांमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कारवाईदरम्यान निर्भया पथकातील उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी उद्यानांमधील ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली. दिवसभरात १२ तरुणांचे उदबोधनही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर गार्डनमधून मंगळसूत्र पळविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावीर गार्डनच्या वॉकिंग ट्रॅकवर फिरायला आलेल्या वृद्धेच्या गळ्यातील, अडीच तोळे सोन्याचे ७५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसडा मारून अज्ञात चोरट्याने पळवले. मंगळवारी (ता. २४) संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार घडला. आशा सुधाकर कामत (वय ७७, मूळ रा. प्लॉट नं. २०१, गुरुकुल पॅलेस, टिळकवाडी, बेळगाव, सध्या फ्लॅट नं. २०४, डी. सी. एलिगन्स, शाहू ब्लड बँकेजवळ) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मूळच्या बेळगावच्या आशा कामत यांचा शाहू ब्लड बँकेजवळील डीसी एलिगन्समध्ये फ्लॅट आहे. कुटुंबीयांसमवेत त्या येथे राहतात. रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत त्या पतीसह फिरण्यासाठी महावीर गार्डनमध्ये जातात. मंगळवारी संध्याकाळी पती सुधाकर यांच्यासह गार्डनमध्ये गेल्या. वॉकिंग ट्रॅकवरून दोघेही चालत होते. सव्वासातच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा एक तरुण समोरून आला. अचानक त्याने आशा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. त्यानंतर त्याने जिल्हाधिकारी कार्यालय चौकाच्या बाजूने धूम ठोकली. काही क्षणात घडलेल्या या प्रकाराने कामत दाम्पत्य गोंधळले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटा पळाला. चोरट्याने हिसडा मारल्याने आशा जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या गळ्यावर जखम झाली. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शहर डीवायएसपी डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूपुरीचे प्रभारी निरीक्षक संजय साळुंखे यांनी गार्डनमध्ये पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही मिळवले. चोरट्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता. बराच काळ गार्डनमध्ये रेंगाळत असल्याचे दिसले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधिस्थळासाठी सव्वा कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळावर खुलेआम मद्यपान करुन परिसराची विटंबना होत असल्याचा प्रकार ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बुधवारी उघड केल्यानंतर महापालिका आणि पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. संरक्षक भिंतीसाठी सव्वा कोटीची तरतूद करण्याचा निर्णय महापालिकेने तातडीने घेतला. या परिसरात महा​पालिकेने कारवाईचा इशारा देणारा फलक लावला असून समाधिस्थळाच्या सुरक्षेसाठी वॉचमनची नेमणूक करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत शहर पोलिस उपअधीक्षकांना रोज याठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. शिवाय कायमस्वरुपी सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाशी चर्चा करण्याचेही आदेश दिले. यानुसार शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी समाधिस्थळाची पाहणी केली.

समाधिस्थळावरील चबुतऱ्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून त्यावर बसवायच्या मेघडंबरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्ण झालेला प्रशस्त चबुतरा आणि पायऱ्यांवर बसून मद्यप्राशन केले जात असल्याचा प्रकार मंगळवारी दिसून आला. तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या होत्या. बुधवारी सकाळीही अशा बाटल्या, सिगारेट पाकिटे, प्लास्टिक ग्लास, खाद्यपदार्थांच्या पिशव्याही आढळल्या.

‘महाराष्ट्र टाइम्स’ ने यासंदर्भातील वृत्त बुधवारच्या अंकात प्रसिद्ध केले. त्याची गांभिर्याने दखल घेत महापालिकेची यंत्रणा सकाळपासूनच कामाला लागली. महापौर हसीना फरास यांनी उपशहर अभियंता एस. के. माने यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार गंभीर असल्याने अधिकाऱ्यांकडून त्यासाठी तातडीने उपाययोजनेचे आदेश दिले. यात प्रामुख्याने समाधिस्थळाची माहिती करुन देणारा फलक बनवण्यास सांगण्यात आले.

या ठिकाणी बांधकाम कंत्राटदाराचे वॉचमन आहेत. मात्र मद्यपींकडून त्यांनाही धमकी देण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या वॉचमनकडून त्यांना अटकाव केला जात नव्हता. त्यामुळे महापालिकेचा वॉचमन नेमण्याचा आदेश देण्यात आला. सरकारी कर्मचारी नेमल्याने त्यांना धमकावण्याचे प्रकार झाल्यास गुन्हे नोंदवता येतील. याप्रमाणे सायंकाळच्या आतच समाधिस्थळाची माहिती तसेच परिसरात गैरकृत्ये केल्यास कारवाईचा इशारा देणारा फलक लावण्यात आला. गुरुवारपासून खासगी सुरक्षा व्यवस्थाही कार्यरत होणार आहे.

पोलिस यंत्रणेनेही हा प्रकार गांभीर्याने घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहिते यांनी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच रोज रात्री परिसरात पोलिसांना पाठवून मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार डॉ. अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांचे पॅचवर्क आठवडाभरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवळपास सर्वच रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे शहरवासियांना सहन करावा लागत असलेला त्रास पुढील आठवड्यापासून कमी होणार आहे. महापालिकेच्यावतीने संपुर्ण शहरातील खड्डे पॅचवर्कचे काम हाती घेण्याचे आदेश महापौर हसीना फरास यांनी बुधवारी दिले. यासाठी कामगारांची भासणारी कमतरता भरुन काढण्यासाठी महापालिकेच्या विविध हॉल, व्यायामशाळांमध्ये असलेले सर्व शिपाई, वॉचमन या कामासाठी घेण्यात यावेत, असेही सुचविण्यात आले. लवकरच वॉर्ड कार्यालयातर्फे याचे आदेश काढले जातील.

पावसाने मुक्काम वाढवल्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. खड्ड्यांच्या भीतीमुळे वाहने हळू चालवत असल्याने वाहतूक संथ होत आहे. एकीकडे खड्डे व दुसरीकडे वाहतुकीची कोंडीने शहरवासिय वैतागून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर हसीना फरास यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी प्रभागनिहाय पॅचवर्कसाठी अडीच लाख याप्रमाणे दोन कोटी रुपयांची तरतूद असल्याचे लेखाधिकारी संजय सरनाईक यांनी सांगितले.

‘प्रशासनाने पावसाळ्यानंतर काम सुरू करू असे सांगितले होते. मात्र, अद्यापही पॅचवर्कला सुरुवात नाही. पॅचवर्कसाठी एस्टीमेट तयार करण्यात आले आहे का, गेल्यावर्षीची कामे अजून पूर्ण नाहीत’, अशी विचारणा शिक्षण समिती सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रविण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील यांनी केली.

तर ‘अपुरे मनुष्यबळ असल्यास ठेकेदारामार्फत पॅचवर्कची कामे करुन घ्या. इतर विभागात काम करणारे पवडी कर्मचारी घेऊन पॅचवर्कची कामे पूर्ण करा. ठेकेदारांकडून जुनी कामे प्रथम पूर्ण करून नवीन कामांचा ठेका द्या’, अशा सूचना उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार यांनी केल्या.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘महापालिकेच्या कामांचे नियोजन प्रत्येक वॉर्ड कार्यालयाच्या पातळीवर तयार आहे. मात्र महापालिकेचा डांबरी प्लँट सुरू झालेला नाही. दोन ते तीन दिवसात हा प्लँट सुरू करण्यात येईल. अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे.’

महापौर फरास यांनी, ‘प्रभागनिहाय पॅचवर्कचे काम तातडीने हाती घ्या. कामगार नसतील तर महापालिकेच्या व्यायामशाळा व हॉलमधील ५० च्या आसपास असलेल्या शिपाई, वॉचमनना या कामासाठी घ्या’ असे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, नगरसेवक श्रावण फडतारे, मोहन सालपे, नगरसेविका माधुरी लाड, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, आर. के. जाधव उपस्थित होते.

विरोधी नगरसेवक अनुपस्थित

या बैठकीसाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी़, नगरसेवक उपस्थित होते. विरोधी भाजप, ताराराणी आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने महापालिकेच्या चौकात चर्चा सुरु होती.

‘मटा’च्या बातमीची दखल

शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने वैतागलेल्या शहरवासियांची व्यथा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मंगळवारी ‘रस्ते गेले खड्ड्यात’ या माध्यमातून सचित्र मांडली होती. वाहनधारकांबरोबर पादचाऱ्यांनाही फटका बसत असल्याने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती होण्याची नागरिकांची अपेक्षा होती. त्याची दखल घेत महापौर हसीना फरास यांनी तातडीने बुधवारी पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली. तीन दिवसात पॅचवर्क सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे पुढील आठवड्यात पॅचवर्कच्या कामामुळे त्रास काही प्रमाणात कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिद्री कारखान्याच्याअध्यक्षपदी के.पी. पाटील

$
0
0

कागल

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी.पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठलराव खोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवारी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे होते.

कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपद के. पी. पाटील यांना देण्याचे निश्चित होते. निवडून आलेल्या संचालकांत भाजपचे पाच संचालक आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी संचालक विठ्ठलराव खोराटे व नीताराणी सूर्यवंशी यांच्या नावाची चर्चा होती. अखेर खोराटे यांनी उपाध्यक्षपदी बाजी मारली. बुधवारी सकाळी अकरा वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या. अध्यक्षपदासाठी के. पी. पाटील यांचे नाव संचालक बाबासाहेब पाटील यांनी सुचविले. त्यास प्रवीणसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी खोराटे यांचे नाव ए. वाय. पाटील यांनी सुचविले. त्यास गणपतराव फराकटे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.

नूतन अध्यक्ष के.पी. पाटील यांचा सत्कार प्रशासकीय अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते, तर उपाध्यक्ष खोराटे यांचा सत्कार गणपतराव फराकटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी के. पी. पाटील म्हणाले,‘ दहा वर्षांत बिद्री कारखान्याचा कारभार करताना तो अधिक सभासदाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. सहवीज प्रकल्प उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन सभासदांच्या पाठबळावर प्रकल्पाची उभारणी झाली. त्यामुळे 'बिद्री'च्या सभासदांनी आमच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करून सत्ता आमच्या हाती सोपवली आहे. सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संचालक मंडळ काम करीत राहील.’

यावेळी संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रविणसिंह पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, धोंडीराम मगदूम, धनाजीराव देसाई, केरबा पाटील, श्रीपती पाटील, जगदीश पाटील, अशोक कांबळे, नीताराणी सूर्यवंशी, अर्चना पाटील, युवराज वारके, प्रदीप पाटील यांच्यासह प्रशासकीय सदस्य प्रदीप मालगावे, अजय ससाणे उपस्थित होते. स्वागत एस. जी. किल्लेदार यांनी केले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३० नोव्हेंबरपर्यंत सुनावणी लांबणीवर

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी बुधवारी (ता. २५) जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणीसाठी ३० नोव्हेंबर ही तारीख दिली आहे, त्यामुळे पुढील तारखेला संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे. बुधवारी सुनावणीसाठी जामिनावर सुटलेला आरोपी समीर गायकवाड उपस्थित होता.

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने समीर विष्णू गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाला अटक केली होती. यानंतर सीबीआयने डॉ. तावडे याला अटक केले. गायकवाडला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, तर तावडे पुणे येथे सीबीआयच्या कोठडीत आहे. याबाबत बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होती, मात्र हायकोर्टातील सुनावणी ३० ऑक्टोबरला असल्याने जिल्हा कोर्टातील सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही. या सुनावणीसाठी संशयित तावडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार होता, मात्र कामकाज होऊ न शकल्याने आता ३० नोव्हेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संशयित गायकवाडच्या जामिनाला पानसरे कुटुंबीयांसह सरकारने विरोध केला आहे. याबाबत हायकोर्टात अपिल दाखल केले असून, ३० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. शिवाय पानसरे हत्येप्रकरणी घाईत कोर्टात खटल्याचे कामकाज सुरू करू नये, या मागणीसाठी पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबत १४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे, अशी माहिती आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली. सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे, आरोपींचे वकील समीर पटवर्धन, जामिनावरील संशयित समीर पटवर्धन, मेघा पानसरे, दिलीप पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानाचे प्री ऑपरेटिंग लायसन्स पंधरा दिवसांत

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळावरुन विमानोड्डाणाचा कच्चा परवाना ( प्री ऑपरेटिंग लायसन्स) येत्या पंधरा दिवसांत मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक संचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) संयुक्त पथकाने बुधवारी कागदपत्रांची छाननी पूर्ण केली आहे. गुरुवारी विमानतळाची पाहणी केली जाणार आहे. पहिल्या विमानाचे टेक ऑफ झाल्यानंतर विमानोड्डाणाचा पक्का परवाना मिळणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. डीजीसीए आणि एएआयच्या पथकाने खासदार महाडिक यांची सायंकाळी भेट घेतली. समितीसोबत झालेल्या चर्चेनंतर महाडिक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, ‘विमानतळ पाहणीसाठी आलेल्या पथकाने दिवसभरात उड्डाणासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पाहणी केली. विमानसेवा सुरु होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पूर्ण झाली आहेत. कागदपत्रांच्या छाननीनंतर समिती गुरुवारी विमानतळाची पाहणी करणार आहे. पाहणीचा अहवाल तातडीने सरकारला दिला जाणार आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि विमानतळावरील पाहणीनंतर १५ दिवसांत विमानोड्डाणाचा कच्चा परवाना पंधरा दिवसांत मिळणार आहे. त्यामुळे विमानसेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परवाना मिळणार असल्याने मुंबईतील वेळेच्या स्लॉटचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यामुळे गेली सहा वर्षे बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरु होईल. एअर इंडिया आणि स्पाइस जेट कंपनीने विमानसेवा सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोल्हापूरहून जाणाऱ्या विमानाला दर बुधवारी आणि शुक्रवारचा स्लॉट मिळाला आहे. परवान्यामुळेच वेळही निश्चित होणार आहे. त्यासह २७४ कोटींच्या विमानतळ विस्तारीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यासाठी सल्लागार आणि अभियंत्याची नेमणूक केली आहे. यामध्ये विमानाची धावपट्टी, टर्मिनल बिल्डींगसह अन्य कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदाही तीन महिन्यात काढली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारके बनली तळीरामांचे अड्डे

$
0
0


कोल्हापूर टाइम्स टीम

नव्या पिढीला प्रेरणादायी असलेले राष्ट्रपुरुष आणि नेत्यांची शहरात ठिकठिकाणी स्मारके आणि पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यातून प्रेरणा घेण्याऐवजी नव्या पिढीने ही ठिकाणे म्हणजे दारुपार्टी, धूम्रपानाची हक्काची ठिकाणे बनवली आहेत. पुतळ्यांच्या ठिकाणी कमी प्रमाणात असलेली लाइट व्यवस्था, सुरक्षा रक्षक वा वॉचमनची वाणवा आणि कुणी येत नसल्याने मिळणारा निवांतपणा यामुळे तिथे केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे दारुच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, खाद्यपदार्थांच्या पिशव्या रोज तिथे पाहायला मिळतात. याबाबत प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत तर ही स्मारके म्हणजे तळीरामांचे अड्डे अशीच होण्याची भीती आहे.

शहरामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यांच्या देखभालीची तसेच संरक्षणाची जबाबदारी महापालिकेची आहे. काही पुतळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तर काही उद्यानांमध्ये व उपनगरांच्या परिसरात आहेत. अनेक ठिकाणी पुतळ्याचा आवार सार्वजनिक परिसर मानून त्या त्या परिसरातील काही तरुण मनमानी पद्धतीने वर्तन करत असतात. त्यांना महापालिकेचा कुणी कर्मचारी हटकण्यास गेल्यास त्यालाच दम दिला जातो. यामुळे काय करतात ते करु देत, असे म्हणून कर्मचारीही तिकडे दुर्लक्ष करतात. अशी टोळकी मद्यप्राशन करुन गेल्यानंतर काही ठिकाणचे वॉचमन तेथील पडलेल्या बाटल्या, ग्लास, पत्रावळीसारखा कचरा एकत्र करुन ठेवतात. यामुळे तळीरामांच्या टोळक्यांना पुन्हा तिथे पार्टी करण्यास हुरुपच चढत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पोलिस दलाची मदत घेऊन अशा अड्ड्यांच्या ठिकाणी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. काही पुतळ्यांना बसवण्यात आलेले लोखंडी रेलिंग म्हणजे कपडे सुकवण्यासाठीची व्यवस्था वाटते. शाहूनगरमध्ये शाहू पुतळ्याच्या रेलिंगचा उपयोग या प्रकारे झाल्याने तो पुतळा झाकोळला गेला आहे.

गांधी पुतळा

शिवाजी पेठेतील गांधी मैदान म्हणजे मध्यवस्तीतील मैदान. या मैदानातच पश्चिमेला महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. पुतळा परिसरात वर्दळ कमीच असते. रात्री तर हा परिसर निर्मनुष्य होतो. त्यामुळे या पुतळ्याच्या परिसरात ठेवण्यात आलेली बाकडी, बसवण्यात आलेल्या फरशा तळीरामांची हक्काची ठिकाणे बनली आहेत. रात्री तिथे बसून मद्यप्राशन करण्याचा अनेकांचा नित्यक्रम असल्याचे दिसून येते. बुधवारीही तेथील कचरा एकत्र केलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या मद्यांच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच प्लास्टिकचे ग्लासही होते. सिगारेटची रिकामी पाकिटेही होती. या परिसरात रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास आरामात मिळत असल्याने दररोज सकाळी त्या गोळा करणारे आवर्जून येत असतात. पुतळ्याच्या खालीच बसून अनेकजण कार्यक्रम करत असतात. ज्या महात्मा गांधींची आदर्श तत्वे जग पाळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच पुतळ्याखालील जागा तळीरामांनी मद्य पिण्यासाठी निवडली आहे हे दुखदायक आहे. या परिसरात येणाऱ्यांना अटकाव करणारी व्यवस्था नाही. तसेच तिथे लाइटची सोय केली तरी दिवे फोडले जात असल्याने अंधार कायम असतो.

.....

बाळासाहेब देसाई पुतळा

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेला लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई यांचा पुतळा सायंकाळनंतर अंधाराच्या साम्राज्यातच असतो. त्या परिसरात आराम बसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे पुतळ्याचा परिसर नजरेत येत नाही. तसेच पुतळ्याला संरक्षक भिंत असल्याने पुतळ्याच्या परिसरात कुणी बसलेले असले तरी लक्षात येत नाही. यामुळेच हा परिसर तळीरामांचा अड्डा झाला आहे. गवत उगवल्यामुळे तिथे दुरवस्था झाली आहे. पण तळीराम दररोज येत असल्याने बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास यांचाही खच पडला आहे. ​या पुतळ्याजवळही पुरेशी लाइट व्यवस्था नाही. तसेच पुतळ्यासमोरील रस्त्यावर दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने पुतळ्याच्या आवारात आरामात पार्टी करण्याची सवयच झाली आहे.

.......

आईचा पुतळा

राजारामपुरीतील आईचा पुतळा परिसर अतिशय गजबजलेला असतो. या पुतळ्याला कुणी नुकसान पोहचवू नये म्हणून लोखंडी ग्रील लावण्यात आले आहे. या पुतळ्यासमोर कारंजासाठी सोय करण्यात आली आहे. त्यालाही लोखंडी ग्रील लावलेले आहे. इतकी दक्षता घेऊनही अनेकजण या पुतळ्याजवळच बसून मद्यप्राशन करुन बाटल्या टाकून जात असल्याचे दिसून येते. पुतळ्याच्या आवारात दारुच्या छोट्या बाटल्या आढळून आल्या. तसेच पाण्याच्या बाटल्याही तिथेच पडलेल्या दिसून आल्या. या परिसरातच दारुविक्रीचे दुकान आहे. तिथून बाटली खरेदी करायची व पुतळ्याजवळ अंधारात बसून कार्यक्रम करायचा असा अनेकांचा नित्यक्रम असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

......

मंडलिक पुतळा

जवाहरनगर हा परिसर तसा उपनगराचा. रहिवास क्षेत्र असलेल्या या परिसरात जवाहरनगर विद्यामंदिरसमोर रिकामी जागा आहे. या जागेवर कै. रावसाहेब मंडलिक यांचा पुतळा आहे. येथील जागा पूर्वी मंडलिकांच्या असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांचा जवाहरनगरमधील रिकाम्या जागेवर अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याची दुरवस्था झाली आहे. हा पुतळा कुणाचा आहे हे सांगणारी पाटीही तिथे नाही. पुतळ्याजवळचा परिसर गवताने व्यापला आहे. परिसर निर्मनुष्य असल्याने तिथे तळीरामांनी अड्डा केला आहे. रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून जाण्याबरोबरच अनेक बाटल्या फोडण्याचेही प्रकार तिथे झाल्याचे दिसून येते. तसेच प्लास्टिक ग्लास, बाटल्याही पडलेल्या पहायला मिळतात.

०००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये जेजुरी जवळच्या राजेवाडी स्टेशनजवळ दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी कोल्हापूर आणि पुणे येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटे दीड-दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. महालक्ष्मी एक्स्प्रेस बुधवारी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटली होती. रात्री दीडच्या सुमारास रेल्वे राजेवाडी स्टेशनजवळ पोहोचली. सिग्नल न मिळाल्याने चालकाने रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत खिडक्यांमधून हात घालून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. तसेच प्रवाशांकडील मोबाइलही या दरोडेखोरांनी हिसकावले. सात ते आठ डब्यात हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला. झोपेतील प्रवाशी जागे झाल्यानंतर या दरोडेखोरांनी पळ काढला. रेल्वे चालकाने स्टेशनमध्ये चौकशी केल्यानंतर सिग्नलमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. दरोडेखोरांनी सिग्नलमध्ये बिघाड करून लूट केल्याचे स्पष्ट होताच राजेवाडी स्टेशनमधील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मात्र रेल्वेत सुरक्षा पोलीस नसल्याने तक्रार नोंदविता आली नाही. कोल्हापुरात पोहोचल्यानंतर तीन प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. तर काही प्रवाशांनी मिरज स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला.याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारके बनली तळीरामांचे अड्डे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरामध्ये अनेक ठिकाणी नेते आणि राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यांच्या देखभालीची तसेच संरक्षणाची जबाबदारी महापालिकेची आहे. काही पुतळे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तर काही उद्यानांमध्ये व उपनगरांच्या परिसरात आहेत.

अनेक ठिकाणी पुतळ्याचा आवार सार्वजनिक परिसर मानून त्या त्या परिसरातील काही तरुण मनमानी पद्धतीने वर्तन करत असतात. त्यांना महापालिकेचा कुणी कर्मचारी हटकण्यास गेल्यास त्यालाच दम दिला जातो. यामुळे काय करतात ते करु देत, असे म्हणून कर्मचारीही तिकडे दुर्लक्ष करतात. अशी टोळकी मद्यप्राशन करुन गेल्यानंतर काही ठिकाणचे वॉचमन तेथील पडलेल्या बाटल्या, ग्लास, पत्रावळीसारखा कचरा एकत्र करुन ठेवतात. यामुळे तळीरामांच्या टोळक्यांना पुन्हा तिथे पार्टी करण्यास हुरुपच चढत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच पोलिस दलाची मदत घेऊन अशा अड्ड्यांच्या ठिकाणी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. काही पुतळ्यांना बसवण्यात आलेले लोखंडी रेलिंग म्हणजे कपडे सुकवण्यासाठीची व्यवस्था वाटते. शाहूनगरमध्ये शाहू पुतळ्याच्या रेलिंगचा उपयोग या प्रकारे झाल्याने तो पुतळा झाकोळला गेला आहे.

गांधी पुतळा
शिवाजी पेठेतील गांधी मैदान म्हणजे मध्यवस्तीतील मैदान. या मैदानातच पश्चिमेला महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. पुतळा परिसरात वर्दळ कमीच असते. रात्री तर हा परिसर निर्मनुष्य होतो. त्यामुळे या पुतळ्याच्या परिसरात ठेवण्यात आलेली बाकडी, बसवण्यात आलेल्या फरशा तळीरामांची हक्काची ठिकाणे बनली आहेत. रात्री तिथे बसून मद्यप्राशन करण्याचा अनेकांचा नित्यक्रम असल्याचे दिसून येते. बुधवारीही तेथील कचरा एकत्र केलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या मद्यांच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच प्लास्टिकचे ग्लासही होते. सिगारेटची रिकामी पाकिटेही होती. या परिसरात रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास आरामात मिळत असल्याने दररोज सकाळी त्या गोळा करणारे आवर्जून येत असतात. पुतळ्याच्या खालीच बसून अनेकजण कार्यक्रम करत असतात. ज्या महात्मा गांधींची आदर्श तत्वे जग पाळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच पुतळ्याखालील जागा तळीरामांनी मद्य पिण्यासाठी निवडली आहे हे दुखदायक आहे. या परिसरात येणाऱ्यांना अटकाव करणारी व्यवस्था नाही. तसेच तिथे लाइटची सोय केली तरी दिवे फोडले जात असल्याने अंधार कायम असतो.

मंडलिक पुतळा
जवाहरनगर हा परिसर तसा उपनगराचा. रहिवास क्षेत्र असलेल्या या परिसरात जवाहरनगर विद्यामंदिरसमोर रिकामी जागा आहे. या जागेवर कै. रावसाहेब मंडलिक यांचा पुतळा आहे. येथील जागा पूर्वी मंडलिकांच्या असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांचा जवाहरनगरमधील रिकाम्या जागेवर अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चबुतऱ्याची दुरवस्था झाली आहे. हा पुतळा कुणाचा आहे हे सांगणारी पाटीही तिथे नाही. पुतळ्याजवळचा परिसर गवताने व्यापला आहे. परिसर निर्मनुष्य असल्याने तिथे तळीरामांनी अड्डा केला आहे. रिकाम्या बाटल्या तिथेच टाकून जाण्याबरोबरच अनेक बाटल्या फोडण्याचेही प्रकार तिथे झाल्याचे दिसून येते. तसेच प्लास्टिक ग्लास, बाटल्याही पडलेल्या पहायला मिळतात.

आईचा पुतळा
राजारामपुरीतील आईचा पुतळा परिसर अतिशय गजबजलेला असतो. या पुतळ्याला कुणी नुकसान पोहचवू नये म्हणून लोखंडी ग्रील लावण्यात आले आहे. या पुतळ्यासमोर कारंजासाठी सोय करण्यात आली आहे. त्यालाही लोखंडी ग्रील लावलेले आहे. इतकी दक्षता घेऊनही अनेकजण या पुतळ्याजवळच बसून मद्यप्राशन करुन बाटल्या टाकून जात असल्याचे दिसून येते. पुतळ्याच्या आवारात दारुच्या छोट्या बाटल्या आढळून आल्या. तसेच पाण्याच्या बाटल्याही तिथेच पडलेल्या दिसून आल्या. या परिसरातच दारुविक्रीचे दुकान आहे. तिथून बाटली खरेदी करायची व पुतळ्याजवळ अंधारात बसून कार्यक्रम करायचा असा अनेकांचा नित्यक्रम असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

बाळासाहेब देसाई पुतळा
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेला लोकनेते (कै.) बाळासाहेब देसाई यांचा पुतळा सायंकाळनंतर अंधाराच्या साम्राज्यातच असतो. त्या परिसरात आराम बसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे पुतळ्याचा परिसर नजरेत येत नाही. तसेच पुतळ्याला संरक्षक भिंत असल्याने पुतळ्याच्या परिसरात कुणी बसलेले असले तरी लक्षात येत नाही. यामुळेच हा परिसर तळीरामांचा अड्डा झाला आहे. गवत उगवल्यामुळे तिथे दुरवस्था झाली आहे. पण तळीराम दररोज येत असल्याने बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास यांचाही खच पडला आहे. ​या पुतळ्याजवळही पुरेशी लाइट व्यवस्था नाही. तसेच पुतळ्यासमोरील रस्त्यावर दुचाकी व अन्य वाहने उभी केली जात असल्याने पुतळ्याच्या आवारात आरामात पार्टी करण्याची सवयच झाली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
महापालिकेच्यावतीने महापुरुषांच्या तसेच अन्य पुतळ्यांची देखभाल केली जात असली तरी जयंती व पुण्यति‌थीदिवशीच त्यांची स्वच्छता होत असल्याचे वास्तव आहे. पुतळ्याच्या बाजूने असलेल्या रस्त्यांवर सफाई केली जाते. मात्र आवारात स्वच्छता होत नाही. काही पुतळ्यांच्या ठिकाणी लाइट नाही. त्याचा फायदा तळीराम उठवत असतात. अशा ठिकाणी पोलिसांकडूनही कधी हटकले जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images