Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगलीत पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

सांगली इथं एका पोलीस निरीक्षकानं सर्व्हिस रिव्हॉल्वरनं स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सखाहरी गिरजप्पा गडदे (वय ४९) असं त्यांचं नाव आहे. गडदे यांच्या आत्महत्येनं पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गडदे हे २७ वर्षांपासून पोलीस सेवेत होते. सध्या ते सांगली पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. आज पहाटेच्या सुमारास देवल कॉम्प्लेक्समधील राहत्या घरी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नोकरीत प्रमोशन मिळत नसल्यानं गडदे यांना नैराश्य आले होते. या मानसिक तणावातूनच त्यांनी स्वत:ला संपवले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


STकर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

राज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने कडक भूमिका घेत व ड्युटी गाड्या घेऊन आलेल्या वाहक-चालकांना अर्धनग्न अवस्थेत विश्रांतीगृहाच्या बाहेर काढले असून ऐन दिवाळीत हे कर्मचारी रस्त्यावर आले आहे. दरम्यान, पंढरपूरप्रमाणे राज्यभरातील सर्वच आगारांत शेकडो वाहक-चालक अडकून पडले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था स्थानिक कर्मचारी करीत आहेत.

संपावरील कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर मुक्कामासाठी करीत होते. आज दुपारी अचानक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढले. या कर्मचाऱ्यांचे सर्व सामानही कुलुपात अडकून पडले आहे. जर संपावर जायचे असेल तर एसटीचे विश्रांतीगृह वापरायचे नाही, असा नियम दाखवत या बाहेरगावच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत रस्त्यावर फेकण्यात आले आहे.

महामंडळाच्या या निर्णयामुळे संपकरी कर्मचारी आणखी संतप्त झाले असून इंग्रजांपेक्षा वाईट अवस्था या सरकारने केल्याचा आरोप केला जात आहे. परिवहन मंत्र्यांना हा संप मिटवायचा नसून चिघळवायचा आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने अत्याचार केला जात आहे, असा आरोप हे कर्मचारी करीत आहेत. 'दिवाकर रावते मुर्दाबाद', 'रावते हटाव'च्या घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याबाबत आदेश असलेला ई-मेल आल्यानेच आपण कारवाई केली असून कर्मचाऱ्यांना कामावर यायचे असेल तर पोलीस बंदोबस्तात गाड्या बाहेर काढायची प्रशासनाची तयारी असल्याचे आगार व्यवस्थापक दळवी यांनी सांगितले.

दरम्यान, परिवहन विभागाकडून आलेल्या आदेशात वाहक-चालक यांची विश्रांतीगृहे रिकामी करावीत आणि संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टर्न टेबल लॅडरला निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंजुरी सोळा मजली इमारत बांधण्याची. पण, आपत्कालीन स्थितीत बचाव कार्यासाठी टर्न टेबल लॅडर नाही. त्यामुळे उंच इमारत बांधण्यास परवानगी मिळत नाही अशी स्थिती आहे. महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकार कोल्हापूरला खास बाब म्हणून टर्न टेबल लॅडर खरेदीसाठी ५० टक्के अर्थसहाय करणार आहे. नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या मान्यतेनंतर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्याच्या मंजुरीसाठी गेला आहे. आठवड्यात राज्य सरकारकडून टर्न टेबल लॅडर खरेदीसाठी निधी मंजूर केल्याची अधिकृत माहिती महापा​लिकेला उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. टर्न टेबल लॅडर उपलब्ध झाल्यास शहरात सोळामजली इमारत (५० ते ५५ मीटर) बांधण्याचा मार्ग सूकर होईल.

कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्यामुळे शहराच्या विस्तारावर मर्यादा पडल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वी शहरात ११ मजली इमारत बांधकाम करण्यास परवानगी दिली. पण महापालिकेकडे अत्याधुनिक टर्न टेबल लॅडरची सुविधा नाही. नगर रचना विभागाकडून अकरा मजली इमारतींना परवानगी देताना बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिज्ञापत्र घेतले. दरम्यान नगरविकास विभागाच्या (डी क्लास) नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे कोल्हापुरात १६ मजली इमारतीचे बांधकाम करता येणार आहे. मात्र महापालिकेकडे टर्न टेबल लॅडरच नसल्यामुळे उंच इमारतीचा प्रस्ताव कागदापुरताच मर्यादित राहिला आहे.

दुसरीकडे महापालिकेने टर्न टेबल लॅडर खरेदीसाठी राज्य सरकारकडे ८० टक्के निधीची मागणी केली होती. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने हा प्रस्ताव परत पाठवत ५०-५० टक्केचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. टर्न टेबल लॅडर खरेदीचा ११ कोटीचा प्रस्ताव आहे. महापालिकेने ५० टक्के रक्कम भरण्यास तयार असल्याचे नगरविकास विभागाला कळविले.शिवाय स्थायी समिती सभा, सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा होऊन राज्य सरकारकडे रितसर प्रस्ताव सादर झाला. महापालिकेने अर्थसंकल्पात टर्न टेबल लॅडरसाठी निधीची तरतूद केली आहे. महसूलमंत्री पाटील आणि नगर विकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीसाठी सादर झाला आहे. राज्य सरकार, पुनर्वसन अंतर्गत खास बाब म्हणून ५० टक्के निधी देणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खास बाब म्हणून टर्न टेबल लॅडरसाठी निधी उपलब्ध होणार आहे. टर्न टेबल लॅडर उपलब्ध झाल्यास मोठ्या गृहप्रकल्प उभारणीला गती मिळेल. तसेच नागरीकीकरण वाढेल. महापालिकेच्या स्थायी समितीची, सर्वसाधारण सभेची मंजुरी आणि ऑफीस प्रस्ताव अशा विविध टप्प्यावर कामे झाल्याने हा प्रश्न मार्गी लागत आहे.

विजय सूर्यवंशी, गटनेते (भाजप)

टर्न टेबल लॅडर खरेदी करताना राज्य सरकारच्या अ​ग्निशमन सल्लागार यांच्याकडून तांत्रिक मान्यता घ्यावी लागते. त्यानुसार तांत्रिक प्रस्ताव अग्निशमन सल्लागारांकडे सादर करण्यात येणार आहे. महापालिकेकडून टर्न टेबल लॅडरचा तांत्रिक तपासणी प्रस्ताव तयार केला आहे.

रणचित चिले, मुख्य अधिकारी अग्निशमन विभाग

काय होणार

उंच इमारतींच्या परवानगीचा मार्क सूकर

उंच इमारतीत आपत्ती व्यवस्थापन करणे

आपत्तकालीन स्थितीत लोकांची सोडवणूक

बचाव कार्य, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडव्यासाठी बाजारपेठ सजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साडेतीन मुहूर्तापैकी एक दीपावली पाडव्याचा योग साधत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. दिवाळीनिमित्त सवलतींचा पाऊस पाडत खरेदी लाभदायी व्हावी यासाठी दुकानांची प्रवेशद्वारे सजली आहेत. स्वप्नातील घरांपासून ते चारचाकी वाहनांपर्यंत आणि गृहोपयोगी वस्तूंपासून स्मार्ट डिजिटल गॅझेटपर्यंत खरेदीला उधाण येणार आहे. दिवाळी पाडव्याचा माहोल लक्ष वेधून घेत असून शुक्रवारी पाडव्यानिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे.

पाडव्याचा मुहूर्त साधून बाजारपेठेत होणाऱ्या खरेदीसाठी व्यापारीवर्गाने जय्यत तयारी केली आहे. खास ऑफर्सही ग्राहकांसाठी देण्यात आल्यामुळे खरेदीला सवलतींची झालर आहे. यामध्ये मोबाइल फोन, टॅब, लॅपटॉप यासह गृहोपयोगी वस्तूंमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनरच्या बाजारपेठेत नवीन मॉडेल्सही दाखल झाले आहेत. यावर्षी खास पाडव्यानिमित्त चारचाकी वाहनांमध्ये नव्या ब्रँड्सच्या कारही डेरेदाखल झाल्या असून मुहूर्ताने होणाऱ्या खरेदीतून घसघशीत उलाढाल होणाऱ्या रियल इस्टेटच्या बाजारपेठेतही नव्या प्रोजेक्टच्या बु​किंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘स्मार्ट’ गॅझेट मार्केट फुल्ल

स्मार्टफोनच्या दुनियेत सतत येणाऱ्या नवनव्या मॉडेल्समुळे मोबाइल मार्केट बहरले आहे. यंदाच्या दिवाळी पाडवा खरेदीच्या बाजारपेठेत स्मार्टफोन खरेदीकडेच ग्राहकांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. स्मार्ट फोनची नवी रेंजही बाजारपेठेत आली असून ऑनलाइन मार्केटच्या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी शहरातील इलेक्ट्रॉनिक डीलर सज्ज झाले आहेत. तसेच लॅपटॉप, कम्प्युटरमध्ये एलईडी स्क्रीनची खरेदी पाडव्याच्या निमित्ताने होणार आहे. कॉलिंग टॅबलाही तरूणाईकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने बाजारपेठेत टॅबच्या व्हरायटी आहेत. ​

कार, बाइक खरेदी होणार सुसाट

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापुरात वाहन खरेदीची धूम सुरू आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या खरेदीत ३५ टक्के वाढ झाली आहे. फेस्टिव्हल ऑफर्समुळे खरेदीचा उत्साह वाढला असून, दिवाळीच्या मुहूर्तावर अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल वाहन क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. खास पाडव्याचा मुहूर्त साधत कार खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ५०० कोल्हापूरकरांनी कार बुकिंग केले आहे. तर आयत्यावेळी दिवसभरात १५० च्या आसपास ग्राहकांकडून कार बु​किंग होण्याची शक्यता वाहन उद्योगातील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

चारचाकी वाहनांच्या खरेदीत कोल्हापूर जिल्हा सध्या आघाडीवर आहे. जिल्ह्यात मारुती कंपनीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे, तर ह्युदाई, होन्हा, टोयोटा, महिंद्रा, शेवरोलेट, टाटा, रिनोव्ह, आदी कंपन्यांचीही वाहने विक्रीत आघाडीवर आहेत. महागड्या कारमध्ये मर्सिडीज, स्कोडा आणि ऑडीची क्रेझ कायम आहे. मोठ्या कारमध्ये इनोव्हा, फॉर्च्युनर यांची चौकशी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त कार खरेदीवर थेट आर्थिक सवलती दिल्या आहेत, तर फ्री इन्शुरन्स, फ्री सर्व्हिसिंग अशा ऑफर्सही विक्रेत्यांनी देऊ केल्या आहेत. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे वाहन

उद्योगात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकींमध्येही जोरदार उलाढाल सुरू आहे. दुचाकी विक्रीत स्प्लेंडर आणि बुलेटने आघाडी घेतली आहे. स्पोर्टस् बाइक्सनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे

सोने बाजारपेठ झळाळली

शुभमुहूर्त आणि त्यात तोंडावर आलेली लग्नसराई यामुळे पाडव्याचा दिवस सोने-चांदी खरेदीसाठी खास मानला जातो. या पार्श्वभूमीवर गुजरीसह शहरातील सोने बाजारपेठ झळाळली आहे. गेल्या काही दिवसांत सोने दरात होणारी चढ-उतरण यामुळे सराफ व्यवसायात मंदीचे सावट होते. मात्र, दसऱ्यापासून सोने-चांदी खरेदीला मागणी वाढली आहे. सराफ व्यावसायिकांनी पाडव्यानिमित्त खास ऑफर दिल्या आहेत. यामध्ये सोन्याच्या वजनाची चांदी मोफत, घडणावळीवर सूट अशा सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पाडव्यादिवशी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून पसंती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाची मोडतोड, शंखध्वनी, रावते यांचा फलक फाडला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी कर्मचारी संपाच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. मागण्यांची दखल न घेता सरकारने कामगारांवर कारवाईच्या काढलेल्या पत्रकाचे पडसाद कोल्हापुरात उमटले. गुरुवारी, संपाच्या तिसऱ्या दिवशी कामगार संतप्त झाले. संतप्त कामगारांनी मध्यवर्ती एसटी बसस्थानकात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा फलक फाडला. कर्मचाऱ्यांविरोधात काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. विभागीय कार्यालयासमोर शंखध्वनी करण्यात आला. रंकाळा बसस्थानक परिसरात अवैध वाहतूक करणारे वाहन एसटी कामगार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी फोडले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. त्यामुळे जिल्ह्याच्या बारा आगारातून एकही एसटी बस बाहेर पडली नाही.

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सुमारे साडेपाच हजारांहून अधिक कामगार संपात सहभागी झाले आहेत. गुरुवारी पहाटेपासूनच कर्मचाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. संप बेदखल केल्याच्या रागातून संतप्त कामगारांनी दुपारी बाराच्या सुमारास विभागीय कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सरकारने कामगारविरोधी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. एसटीच्या कृती समितीसह दहाहून अधिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

संपावर तोडगा न काढता आरटीओकडून चालक आणि वाहकांचे बॅच रद्द करण्याचे सूचना केल्याने कामगार अधिकच संतप्त झाले. या कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा फलक फाडला. कामगारांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारामुळे भयभीत झालेले प्रवासी मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडले. दरम्यान, संभाजीनगर आणि रंकाळा बसस्थानकातून कामगार सेनेच्या कामगारांनी एसटी सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार एसटी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. रंकाळा बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहतूक करणारी आठ ते दहा खासगी वाहने लावण्यात आली होती. हा प्रकार एसटी कामगारांना समजताच त्यांनी तातडीने एका वाहनचालकाला स्थानकाबाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्या चालकाने बाहेहर जाण्यास नकार दिल्याने एसटी कामगारांनी संबंधिताचे वाहन फोडले. या प्रकारामुळे रंकाळा बसस्थानकात काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर खासगी वाहतूकही बंद ठेवण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर आगार आणि रंकाळा स्टॅण्डवरुन दिवसभरात एकही एसटी धावली नाही.

कामगारांच्या संपाला दिवसभरात विविध संघटनांनी पाठिंबा दिला. खासदार धनंजय महाडिक, मधुरिमाराजे छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, प्रदेश संघटक अनिल घाटगे, सर्व श्रमिक संघाचे अतुल दिघे, सीटूचे सुभाष जाधव, आयटकचे दिलीप पवार, आरपीआयचे उत्तम कांबळे आदींनी भेट देऊन संपाला पाठिंबा दिला. दरम्यान, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधन अनेक कुटुंबाचे भरणपोषण करणाऱ्या एसटीचे बसेसचे कामगारांनी पूजन केले.

बारा आगाराला अडीच कोटीचा फटका

संपाबाबत सरकार काहीच सकारात्मक भूमिका घेत नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. त्यामुळे ते संप मागे घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा आगारांना तीन दिवसांत २ कोटी ४० लाखांचा फटका बसला आहे. संपामुळे रेल्वेगाड्यांना गर्दी आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात दररोज दहा लाखांची भर पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजळले मांगल्याचे दीप

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चैतन्य आणि उत्साहाचे तेज घेऊन आलेल्या दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात लक्ष्मीपूजनादिवशी गुरुवारी घरोघरी तसेच व्यापारी व उद्योजकांच्या व्यवसायात मांगल्याचे दीप उजळले. पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करून धनलक्ष्मीची आराधना करण्यात आली. सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत लक्ष्मीपूजनासाठी शुभ वेळ असल्यामुळे याकाळात लक्ष्मीपूजन करण्यात आले. कलशपूजन, झेंडूच्या फुलांची सजावट, धूपअगरबत्तीचा दरवळ आणि शुभेच्छांचा स्नेह अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाचा दिवस मंगलमय झाला.

सायंकाळच्या टप्प्यातच अनेकांनी लक्ष्मीपूजनाच्या विधीला सुरुवात केली. नेत्रदीपक रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आ​णि पणत्यांच्या लखलखाटात लक्ष्मीपूजनाची सायंकाळ उजळून गेली. रांगोळ्यांनी अंगण सजवण्यात आले होते, तर व्यापारीपेठांत लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या माळांची सजावट करण्यात आली होती. केळीचे झाडे, आंब्याच्या पानाच्या डहाळ्यांनी वातावरणात मांगल्याची झाक आली होती.

झेंडू, बेंडबत्तासू, कुबेरलक्ष्मी फोटो, फळे, धणे अशा साहित्याने पूजाविधी करण्यात आला. सजविलेल्या चौरंगावर कलशमांडणी करण्यात आली. दिवाळी म्हणजे समृद्धीचा आनंद साजरा करण्याचा दिवस. त्यामुळे धनाची पूजा आणि भरभराटीची आराधना या पूजाविधीतून करण्यात आली. फळांची आरास, विद्युत रोषणाई आणि रांगोळीची सजावट यामुळे लक्ष्मीपूजनाला धार्मिक थाट आला.

लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी वहीपूजन करत असल्यामुळे व्यापारीपेठांमध्येही लक्ष्मीपूजनाचा सोहळा साजरा करण्यात आला. सायंकाळी सहा वाजून ११ मिनिटांपासून रात्री आठ वाजून ४१ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनासाठी शुभवेळ होती. तसेच वहीपूजन करण्यासाठी सायंकाळी सव्वासहा ते रात्री नऊ वाजून १८ मिनिटांपर्यंत अमृतयोग होता. या शुभमुहूर्ताचा योग साधत गुरुवारची सायंकाळ लक्ष्मीपूजनाच्या मांगल्यपूर्ण वातावरणात उजळली.

झेंडूबाजार बहरला

लक्ष्मीपूजनासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. यामध्ये केशरी व पिवळा झेंडू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला. गुरुवारी लक्ष्मीपूजन आणि शुक्रवारी पाडवा असल्याने झेंडूच्या फुलांना वाढती मागणी आहे. गुरुवारी सकाळी झेंडूच्या दराने किलोला शंभरी ओलांडली. आंब्याची पाने, विड्याची पाने, यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. शहरातील बिंदू चौक, पापाची तिकटी, शिंगोशी मार्केट, राजारामपुरी येथे फूल मार्केट बहरले. शिंगोशी मार्केट येथे फूल खरेदीला गर्दी वाढल्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच मिरजकर तिकटी ते कोळेकर तिकटी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. खास लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या तयार माळा व तोरणेही विक्रीसाठी होती. खास दिवाळीसाठी जयसिंगपूरसह शिरोळ भागातील गावांमधून झेंडू फुले बाजारात दाखल झाली.

बेंडबत्ताशांमध्येही उलाढाल

लक्ष्मीपूजनासाठी महत्त्व असलेले बेंडबत्तासे खरेदीसाठीही गुरुवारी दुपारपर्यंत गर्दी होती. ​चिरमुरे आणि बेंडबत्तासे यासह पूजेच्या साहित्याचा पुडा, फळे यांना मागणी असल्यामुळे उलाढाल झाली. लक्ष्मी व कुबेर यंत्राच्या प्रतिमा, फोटोफ्रेम खरेदीसाठी पापाची तिकटीसह प्रमुख बाजारपेठांत गर्दी झाली.

वही व चोपडी खरेदीला गर्दी

पाडव्यादिवशी होणाऱ्या वहीपूजनासाठी वही खरेदीसाठी गुरुवारी दुकानांत गर्दी झाली होती. वर्षभरातील व्यापाराचा लेखाजोखा पूर्ण करून नवीन हिशेबवह्या आणून त्यांचे पूजन करण्याचा प्रघात आहे. त्यातच शहरातील अनेक बाजारपेठांमध्ये वर्षाची हिशेबवही याच दिवशी पूर्ण केली जाते. गोदामाचे मालक, कारखानदार, अडत दुकानदार, होलसेल व रिटेल व्यापारी यांच्यासह शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी पूजनासाठी हिशेब वह्या तसेच चोपड्या खरेदी केल्या. त्यामुळे शहरातील वह्या खरेदीसाठी स्टेशनरी दुकानांमध्ये गर्दी झाली होती. व्यापारीवर्ग दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या आपल्या आर्थिक वर्षासाठी नव्या हिशेबांच्या वह्यांची पूजा करतात. दुकान, घरांमध्ये पाडव्यानिमित्त वहीपूजनावेळी आरती, मंत्रोच्चार केला जातो. पाडव्या‌निमित्त वहीपूजनासाठी बाजारात पूजेच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारीवर्गाने वहीपूजन करण्यासाठी मोठी लगबग सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंडक्टरांची दिवाळी स्थानकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकाळी सहा वाजता सुरू होणारी ड्युटी आणि संघटनेने पुकारलेला बंद यामुळे तीन महिला कंडक्टरची मध्यवर्ती बसस्थानकात दिवाळी साजरी झाली. कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही, पुरेसा पगार नसल्याने दिवाळीचे कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत. संपातून तोडगा निघाला नसल्याने आर्थिक कोंडी आणि दीपावली पाडवा, भाऊबीजही बसस्थानकावर साजरी करावी लागणार असल्याची खंत महिला कंडक्टरनी व्यक्त केली. सहकाऱ्यांसोबत संपात सहभागी झालेल्या महिला कंडक्टर मानसिक तणावाखाली आहेत.

उमा राजेंद्र सडोले, संजीवनी जाधव, अनुराधा महेश परीट या तीन महिला कंडक्टर मध्यवर्ती बसस्थानकावर कार्यरत आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशीही या बसस्थानकात थांबून आहेत. एसटी कर्मचारी संघटनेच्या सभासद असल्याने त्या संपात सहभागी झाल्या आहेत. तत्पूर्वी संपात सहभागी झाल्यास दिवाळीचा बोनस मिळणार नसल्याचे एसटी प्रशासनाने त्यांना सांगितले होते. त्यामुळे २५०० हजार रुपयांचा बोनस मिळाला. पण कपडे खरेदी करण्यासाठी संपामुळे वेळ मिळाला नसल्याचे या महिला कंडक्टरनी सांगितले.

उमा सडोले या दऱ्याचे वडगाव येथील आहेत. संजीवनी जाधव या अंबप तर अनुराधा परीट या किणी-वाठार येथील रहिवाशी आहेत. कर्तव्य बजावित असल्याने त्यांना दिवाळी घरी साजरा करता आलेली नाही. पहाटे सहा वाजता या महिला कर्मचारी कामावर हजर होतात. यापूर्वी संजीवनी जाधव आणि अनुराधा परीट या ड्युटीवर असताना बसला अपघात झाला होता. जाधव आणि अनुराधा या आजारी असतानाही कर्तव्य बजावित आहेत. जाधव या द्विपदवीधर आहेत. तर अन्य दोघींचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. संपात सहभागी झाल्यास बोनस मिळणार नाही, असा इशारा एसटी प्रशासनाने दिला होता. या महिलांनी खातेनिहाय विभागीय लिपिक पदासाठी अर्ज केला आहे. संपात सहभागी झाल्यास त्यातही अडचणी येऊ शकतात अशी शक्यता असल्याने मानसिक तणावाखालीच त्या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यांची तेरा ते चौदा वर्षे सेवा झाली आहे. सुरुवातीला सेवेत रुजू झाल्यानंतर एकही रजा आणि सुट्टी न घेता १८० दिवस काम करावे लागते. त्यानंतर तीन वर्षे रोजंदारी सेवा बजाविल्यानंतर पूर्णवेळ सेवेत घेतले जाते. पूर्णवेळ सेवेत १४०० रुपये बेसिक वेतन आहे. चौदा वर्षे सेवा बजावूनही सध्या त्यांना सध्या ५ हजार रुपये बेसिक वेतन आहे. ही स्थिती सरकारने बदलावी एवढीच त्यांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी ट्रॅव्हल्सचे उखळ पांढरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी टेम्पो ट्रॅव्हलरसह खासगी वाहनांची चोख व्यवस्था केली. मात्र, या व्यवस्थेने एसटी प्रशासन, पोलिस आणि आरटीओच्या डोळ्यात धूळफेक करीत प्रवाशांचे खिसे मोकळे केले. खासगी वाहतुकचालकांचे उखळ पांढरे झाले आहे. गेली तीन एसटीच्या सुरू असलेल्या संपाचा फायदा खासगी वाहतूक व्यवस्थेने घेतला. गेल्या तीन दिवसांत ट्रॅव्हल्स चालकांनी लाखो रुपयांची कमाई केली.

प्रवाशांची सोय होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतुकीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली. मात्र, ही व्यवस्था प्रवाशांच्या अंगलट आली आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवासाठी किती तिकीट आकारण्याचे नियंत्रण नसल्याने मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका प्रवाशांना बसला. कोल्हापूरहून कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तारकर्ली, गणपतीपुळेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहतुकीने लूटमारच झाली. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना प्रत्येकी एक हजार रुपये दर काही ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. आठ ते दहा जणांचा ग्रुप असल्यास दहा हजार रुपये दर सांगण्यात आला. एसटीने कोकणात जाण्यासाठी १५० ते २०० रुपये तिकीट नेहमीचा दर आहे. मात्र संपाचा फायदा उचलत प्रत्येक व्यक्तिमागे ८०० रुपये जादा घेतले गेले.

मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी बाहेर पडल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटांनी प्रवाशांकडे विचारणा केली. प्रवासाचे ठिकाण आणि प्रवासी पाहून दर सांगण्यात आला. कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या आठ जणांच्या कुटुंबाला आठ हजार रुपये दर सांगण्यात आला. कोल्हापूर ते कागल, सांगली, मिरज, निपाणी, संकेश्वर, बेळगाव, राधानगरी, गगनबावडा या मार्गावर पर्यायी व्यवस्था केलेल्या वाहनांनी सुविधा दिली. मात्र, भरमसाठ दर आकारणी सुरू केल्याने ही सेवाच प्रवाशांच्या अंगलट आली. शहर वाहतूक शाखा आणि आरटीओने गुरुवारीही केवळ बघ्याची भूमिका घेतली. शहर वाहतूक पोलिसांनी केवळ वाहनांना रांगेची शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले. आर्थिक लूबाडणूक होत असल्याची तक्रारी कोणाकडे करायची, असा प्रश्न प्रवाशांना पडला. अखेर घर गाठायचे एवढाच ठाम निर्णय प्रवाशांनी घेतल्याने अनेकांचा खिसा रिकामा झाला. काही प्रवाशांना महामार्गावरील वाहतुकीसाठी तावडे हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी शंभर रुपये आकारण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकातून बससेवा बंद असल्याने काहींनी रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठीही काही रिक्षाचालकांनी परगावच्या प्रवाशांची जादा पैसे आकारून लुबाडणूक केली. गेले तीन दिवस प्रवाशांना आर्थिक लूटमारीला सामोरे जावे लागत आहे. स्थानकातून प्रवासी खेचून आणणारे एजंट मात्र कमिशन मिळवून मालामाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फक्त पायपिटीचा गावागावांत पर्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गाव तिथे एसटी या घोषवाक्याप्रमाणे जिल्ह्यातील १२१७ गावांपैकी जवळपास ९७३ गाव, वाड्या वस्तींपर्यंत एसटी पोहचते. सकाळी बहुतांश गावागावांमधून सुटणाऱ्या कॉलेज गाडीपासून तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणची सुरू होणारी वाहतूक रात्रीच्या वस्तीच्या गाडीपर्यंत सुरू असते. पण दोन दिवसाच्या एसटीच्या संपामुळे या गावकऱ्यांचे पायच थांबल्यासारखी परिस्थिती आहे. आडवळणी असलेल्या गावातील ग्रामस्थांची परिस्थिती दयनीय झाली आहे.

एसटी जिल्ह्यात दररोज सहा हजार फेऱ्या करत असते. जवळपास १५०० मार्ग जिल्ह्याच्या वाड्यावस्तीपर्यंत पोहचतात. त्यातून अगदी दुर्गम वाडीजवळ एसटी पोहचवण्याचे काम झाले आहे. यामुळे अनेक गावातून दररोज नोकरीनिमित्त शेजारील मोठ्या गावात, तालुक्याला जाणारे नोकरदार, भाजीपाला विक्रीसाठी तसेच बँकेतील व्यवहार करण्यासाठी बाहेर पडणारे शेतकरी यातील बहुतांशजणांची भिस्त असते ती गावात येणाऱ्या एसटीवर. काही गावांमधून सकाळपासून सुटणाऱ्या एसटीमुळे अशा प्रवाशांची सोय होते. मात्र आता एसटीच बंद झाल्याने या प्रवाशांना गावातील जादा पैसे देऊन वडाप वाहतुकीचा वापर करावा लागत आहे. मोठ्या गावांमध्ये वडाप असते.

छोट्या वाड्यावस्तीपर्यंत वडापची वाहने जात नाहीत. तेथील रस्ते व्य​​वस्थित नसल्याने वडाप व्यावसायिक जातच नाहीत. जे जातील, ते जास्त पैसे घेऊन जाण्याचा वायदा करतात. त्यामुळे मोठ्या गावापर्यंत जाण्याची व्यवस्था वडापमधून होते. पण तिथून आडवळणी असलेल्या छोट्या गावांपर्यंत, दुर्गम असलेल्या वाड्यांपर्यंत जाण्यासाठी चालत जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. सध्या दिवाळीचे वातावरण असल्याने अशा गावाकडे येण्याची तयारी अनेक चाकरमान्यांची केली होती. पण तिथपर्यंत एसटी नसल्याने काय पर्याय काढायचा या विचारात अनेकांनी गावाकडे येण्याचे टाळले.


विक्रेत्यांची कोंडी

गावातून दररोज बाजारात भाजीपाला विक्रीबरोबरच खासगी नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्यांची कोंडी झाली आहे. भाजीपाला तर कशाही प्रकारे बाजारात न्यायचा असल्याने गावातील मालवाहू वाहने किंवा दुचाकीवरुन पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक वडाप व्यावसायिकांनीही मोठ्या रस्त्यावरील, तालुक्याच्या ठिकाणापर्यंत वाहतूक करण्याचे धोरण अवलंबल्याने छोट्या गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीने दवडली उत्पन्नाची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वडाप वाहतूक सुसाटपणे धावत असताना, केएमटीला मात्र या संधीचा फायदा उठविता आला नाही. इच्छाशक्तीचा अभाव, वाहक चालकांची अपुरी संख्या आणि नियमांच्या चौकटीत कामकाज यामुळे केएमटीने संप कालावधीत जादा उत्पन्न मिळवण्याची संधी दवडली. केएमटी प्रशासन आणि आरटीओ विभाग यांच्यामध्ये योग्य समन्वय असता तर प्रवासी वाहतुकीचे नियोजन झाले असते. पण २० किलोमीटरच्या अंतराबाहेरील वाहतूक लेखी परवानगीवरुन घोडे अडल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे केएमटीकडील अनेक चालक रजेवर असल्याने नियमित वेळापत्रक कोलमडेल ही भीतीही प्रशासनाला असल्याने जोखीम पत्करली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वच मार्गावरील एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे केएमटी कोल्हापूर शहरलगतच्या १७ गावांमध्ये प्रवासी वाहतूक करते. यामध्ये वडगाव, कागल, गांधीनगर, कणेरी, रुकडी, माणगाव, चिंचवाड, शिये, जठारवाडी, बहिरेश्वर, कोगे, शिरोली दुमाला, येवती, चुये, बाचणी या मार्गावर केएमटी बस धावतात. एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे आरटीओने केएमटीला वीस किलो मीटर परिघाच्या अंतराबाहेरही प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली. त्यानुसार केएमटीने कोल्हापूर ते इचकरंजी, कोल्हापूर ते जयसिंगपूर मार्गावर बस वाहतूक केली असती तर उत्पन्नात भर पडली असती.

केएमटीने शहर परिसर आणि आसपासच्या १७ गावांतील प्रवासी वाहतुकीसाठी बुधवारी ८६ तर गुरुवारी ९२ बस रस्त्यावर उतरविल्या. पारंपरिक मार्ग सोडून जयसिंगपूर, इचलकरंजीसह वीस किलो मीटर परिघाच्या अंतराबाहेर बस उपलब्ध केल्या नाहीत.

या मार्गावरुन प्रवासी वाहतूक आणि उत्पन्न या संदर्भात जाणून घेण्यासाठी केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ होता. केएमटीतील अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीस किलो मीटर अंतराच्या बाहेरील प्रवासी वाहतुकीसाठी आरटीओकडून लेखी परवानगी पत्र मिळाले नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. प्रवासी वाहतुकीसंदर्भातील परवानगीच्या माहितीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांच्याशी संपर्क झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत ट्रक उलटून ११ मजूर ठार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

सांगलीत आज सकाळी फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ मजूर जागीच ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी या मजुरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासगाव तालुक्यातील कवठेमहाकाळ येथील योगेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. काही मजुरांना घेऊन हा ट्रक कराडच्या दिशेने चालला होता. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर फरश्या भरण्यात आलेल्या होत्या. कवठेमहाकाळ मार्गावरील योगेवाडीजवळ ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटला आणि ट्रकमधील ११ मजूर जागीच ठार झाले. तर फरश्या अंगावर आदळल्याने १५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अपघातात ठार झालेले सर्व मजूर कर्नाटकचे असून मजुरीसाठी ते कराडला जात होते. एसटीचा संप असल्याने फरशी भरलेल्या ट्रकमधून त्यांना प्रवास करावा लागल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयची शहिदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

'ऑन ड्युटी २४ तास' असलेले पोलीस कर्मचारी आणि बॉलिवूडचा संवेदनशील अभिनेता अक्षयकुमार यांनी यंदा १०३ शहिदांच्या कुटुंबीयांची दिवाळी प्रकाशमान केली. कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाने शहिदांच्या नातलगांना निराशेचा अंधार झटकून टाकण्याचं बळ दिलं.

भारतमातेचं रक्षण करत असताना ज्यांनी आपला पुत्र, पती किंवा पिता गमावला, अशा कोल्हापूर परीक्षेत्रातील शहिदांच्या कुटुंबीयांची यादी करण्याच्या सूचना विश्वास नांगरे-पाटील यांनी केल्या. त्यानुसार १०३ शहिदांच्या नावांची यादी तयार झाली. या सर्व शहिदांच्या घरांमध्ये या दिवाळीला मिठाई घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. जेव्हा या उपक्रमाबद्दल अभिनेता अक्षयकुमारला कळलं, तेव्हा या कुटुंबांना मदत करण्यासाठी तोही पुढे सरसावला.

भारतीय लष्कराबद्दल अक्षयला प्रचंड आदर, अभिमान आहे. जवानांसाठी, शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी तो नेहमीच धावून जातो. यावेळी त्यानं २५ हजार रुपयांचे १०३ चेक तयार केले आणि त्यासोबत एक सदिच्छा पत्र जोडलं. सर्व शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण हा खारीचा वाटा उचलत असल्याचं सांगून त्यानं आपल्या मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

पोलिसांनी दिलेली मिठाई आणि त्यासोबत अक्षयकुमारकडून आलेला धनादेश पाहून शहिदांच्या कुटुंबीयांना अश्रू आवरता आले नाहीत.

अक्षय कुमारचं पत्र...



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटने २३ लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाच बंगला परिसरात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत मालती प्रिंटिंग प्रेससह तीन दुकाने जळून खाक झाली. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सातच्या सुमारास लागलेल्या या आगीत सुमारे २३ लाखांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. नागरी वस्तीत लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पाच बंगला परिसरात प्रकाश संभाजीराव विचारे (रा. अमृताश्रम, पाच बंगला परिसर, कोल्हापूर) यांचे पत्र्याचे शेड आहे. हे शेड वापरासाठी भाड्याने दिले असून, यात प्रिंटिंग प्रेस, दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आणि एका वकिलांचे कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास या शेडमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही वेळातच भीषण आगीच्या ज्वाळा पसरल्या. परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. काही वेळातच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. शेडचे मालक विचारे हेदेखील माहिती मिळताच पोहोचले. नागरी वस्तीत मध्येच आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तास अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. यात सुभाष माधव सूर्यवंशी (रा. पाच बंगला परिसर) यांची मालती प्रिंटिंग प्रेस जळून खाक झाली. प्रेसमधील प्रिंटिंग मशिन, बायडिंग मशिन, कम्प्युटर, प्रिंटर, वायरिंग, कागद हे साहित्य जळून १५ लाखांचे नुकसान झाले.

अॅड. अंजली अजित चव्हाण-देसाई (रा. राजेंद्रनगर) यांच्या कार्यालयातील कम्प्युटर, प्रिंटर, टेबल, खुर्च्या, लाकडी कपाट, फाइल्स असे सुमारे पाच लाखांचे साहित्य जळाले. प्रकाश भगवान यादव (रा. साई मंदिर, दत्तनगर, कळंबा) यांच्या गॅरेजमधील दोन दुचाकींसह गॅरेजमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे यादव यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी जेसीबी मशिनच्या सहायाने साहित्य बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. अग्निशामक दलाचे प्रमुख रणजित चिले यांच्यासह दस्तगीर मुल्ला, मनीष रणभिसे, तानाजी कवाळे आदी जवानांनी आग विझवण्याचे काम केले. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, शॉर्ट सर्किटने आग लागली असावी, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लज आगाराला २५ लाखांचा तोटा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यानी सोमवारी (ता.१६) मध्यरात्रीपासून पुकारलेला संप अखेर पाचव्या दिवशी मागे घेतला. ऐन दिवाळी सणामध्ये पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले. मात्र राज्य परिवहन मंडळालाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. दरवर्षी केवळ दिवाळी सणा कालावधीत गडहिंग्लज आगार सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न घेते. मात्र यावर्षी सर्वाधिक उत्पन्न होणाऱ्या काळात लालपरी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. त्याचबरोबर एसटी मंडळालाही मोठे नुकसान सोसावे लागले. दरम्यान आज भाऊबीज दिवशी वाहतूक सुरू झाल्याने काही प्रमाणात हा तोटा भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.

गडहिंग्लज बसस्थानकात सुमारे ९० बसेस प्रवाशांसाठी तैनात असून यासाठी सुमारे साडेचारशे कर्मचारी कार्यरत आहेत. संप कालावधीत या सर्व गाड्या आगारात उभ्या होत्या. संपामुळे आगाराचे नियोजन कोलमडले. कारण पाच दिवसाच्या बंदमुळे बहुतांश गाड्यांच्या बॅटरी निकामी झाल्या होत्या. त्या पुन्हा पुर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्याना कष्ट घ्यावे लागले. मुक्कामी गाड्या न गेल्याने वेळापत्रकात ऐनवेळेचे बदल करावे लागले. बऱ्याच कालावधीतनंतर वर्कशॉपमध्ये निरव शांतता पसरली होती ती आज सकाळी भंग पावली.

नोकरी व्यवसायामुळे पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा ठिकाणी असलेले गडहिंग्लजकर दिवाळी सणाला दरवर्षी गडहिंग्लजला येतात. तसेच ग्रामीण भागातून बहुतांश लोक सणासुदीच्या खरेदीसाठीही मोठ्या शहरात जाणे पसंत करते. यासाठी बहुतांश लोक हे राज्य परिवहन मंडळाच्या एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे दिवाळी काळात वर्षभरातील सर्वाधिक मोठी कमाई करण्याची संधी या विभागाला मिळते. मात्र यावर्षी ऐन दिवाळीत एसटीचा संप असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तर एसटी मंडळाला आर्थिक तोटा स्वीकारावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोर्टलवर नाव नसल्याने शेतकरी संभ्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थकीत रक्कम खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, राज्य सरकारने योजनेंतर्गत सुरू केलेल्या पोर्टलवर लाभार्थी शेतकऱ्यांची नावेच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पहिल्या टप्प्यात सरकारकडून पूर्ण थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यानंतर प्रोत्साहनपर योजनेतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असला, तरी शेतकऱ्यांना याबाबतची पूर्ण माहितीच नसल्याने ते बँक खाते असलेल्या ठिकाणी विचारणा करू लागले आहेत. त्यामुळे सहकार विभाग व बँकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचा ‘शब्द’ पाळताना राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करत कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप केले. प्रमाणपत्रांचे वाटप करताना कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्याला ६५० कोटींचा कर्जमाफीचा लाभ मिळणार असून एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले. मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी राज्य सरकारच्या पोर्टलवर आपले नाव आहे का, हे पाहण्यासाठी धाव घेतली. पण या यादीमध्ये नाव नसल्याने अनेकजणांचे धाबे दणाणले आहेत.

त्यामुळे नाव नसलेल्या लाभार्थ्यांनी विकास सेवा संस्थांच्या सचिवांसह बँक व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अचारसंहितेमुळे अनेक गावांमध्ये चावडी वाचन झालेले नव्हते. चावडी वाचन न झालेल्या ६५० गावांचे चावडी वाचन पुढील आठवड्यात होणार आहे. पण सर्व लाभार्थ्यांच्या याद्यांचे लेखापरीक्षण होऊन याद्या अपलोड झालेल्या असताना पोर्टलवर नाव दिसत नसल्याने अनेकांची कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील थकबाकीदार कर्जदारांची संख्या सुमारे ४९ हजार असली, तरी याही कर्जदारांची नावे पोर्टलवर दिसत नसल्याने कर्जमाफीत नेमका कोणाचा समावेश झाला आहे, याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने उसासारखे नगदी पीक घेतले जात असल्याने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची संख्या ८५ ते ९० टक्के आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या कमी राहणार आहे. जिल्ह्यातील किती लोकांना पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणार हे सोमवारी (ता.२३) स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार ६५० कोटींची कर्जमाफीची रक्कम मिळणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाऊबीज गोड झाली….

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऐन दिवाळीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप भाऊबीजेच्या दिवशी मागे घेण्यात आल्याने लाखो नागरिकांना दिलासा मिळाला. लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचा पाडवा साजरा करून भाऊबीजेसाठी चाललेल्या बहिणींना ओवाळणीच मिळाल्याची भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केली. संप मागे घेतल्याने प्रवाशांची खासगी वाहतूकदारांच्या लुटीतून सुटका झाली; तसेच परतीच्या प्रवासाचा मार्गही मोकळा झाला.

सोमवारपासून थांबलेली एसटीची चाके शनिवारपासून पुन्हा धावू लागली. चार दिवस प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शनिवारी पहाटे साडेसहा वाजल्यापासून एसटी प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. कोल्हापूर ते पणजी मार्गावर सकाळी साडेसहा वाजता पहिली बस धावली. कोल्हापूरचे मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुल झाले. संपानंतरच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४० हजार प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला.

शनिवारी सकाळपासून बारा आगारात एसटी फलाटवर लावण्यासाठी तारांबळ उडाली. कोल्हापूर ते पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगांव, नाशिक, शिर्डी या एसटीचे वेळापत्रक कोलमडले. आगाऊ तिकिट नोंदणीसाठी आरक्षण काउंटरवर प्रवाशांची रांग लागली. गेले चार दिवस मोकळे असलेले एसटी स्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुल झाले. एसटी कॅण्टीन, परिसरातील स्टॉल, स्थानक प्रमुखांचे कार्यालय, एसटी संघटनांची कार्यालये, कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या गर्दीने फुलून गेल्या. प्रवासी संख्या आणि मागणीनुसार कोल्हापूर ते जोतिबा, पन्हाळा, इचलकरंजी, चंदगड मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या. संपामुळे जिल्ह्यातील काही गावांत गेलेल्या एसटी बसेस आगारात परत आल्या नाहीत. त्यामुळे दिवसभरात ७० टक्के एसटीचे ऑपेरशन झाल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत साडेतीन कोटींवर तोटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसटी कर्मचाऱ्यांचा चार दिवस झालेल्या संपाचा आर्थिक फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला. कोल्हापूर जिल्ह्याच्या बारा आगाराला चार दिवसांत साडेतीन कोटींचा फटका बसला. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत महत्त्वाचा कणा असलेल्या एसटीची सेवा ऐन दिवाळीत विस्कळित झाल्याने उत्पन्नावर पाणी पडले, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. ऐन दिवाळीत घरी जाणारे नोकरदार अडकून पडल्याने तसेच खासगी वाहनधारकांनी मनमानी पैसे आकारल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

एसटीच्या कोल्हापूर आगारात ७०० हून अधिक एसटीच्या ताफ्यात आहेत. त्यासह नव्याने दाखल झालेल्या शिवशाहीच्या वीसहून अधिक बसेस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगाराला दिवाळी सणातून दरवर्षी ३५ लाखांहून अधिक फायदा मिळतो. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संपाची सुरुवात केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली चालक, वाहक, वाहतुक निरीक्षक, स्थानक प्रमुख, यंत्रशाळेतील कामगार, विभागीय वाहतूक कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाल्याने एसटी सेवा थांबली. ऐन दिवाळी सणात प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागला. कोल्हापूर ते पुण्यासाठी एक हजार आणि मुंबईसाठी दोन हजार रुपये दर मोजावा लागला. दरवर्षी दिवाळीच्या काळात कोल्हापूर ते पुणे, मुंबई, रत्नागिरी, गणपतीपुळे, पावस, चंदगड, आजरासह परिसरात मुंबई पुणेतील चाकरमानी गावाकडे परततात. त्यांच्या सेवेसाठी १५० हून एसटी सेवेसाठी तैनात केल्या होत्या. मात्र संपाची सुरुवात झाल्यास या एसटी आगाराच्या आवारात थांबून राहिल्या. दररोज एसटीला ८० लाखांचा तोटा झाला. नव्याने दाखल झालेली शिवशाही एसटी महामंडळाने एका फेरीपाठीमागे २० हजारांचे उत्पन्न मिळवून देते. संपामुळे शिवशाहीच्या फेऱ्याही थांबल्या. पुणे आणि मुंबई मार्गावर शिवशाही थांबल्याने दिवसाला सरासरी दोन लाखांचा फटका बसला. एसटी स्थानकावरील आयता प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स चालकांना मिळाला. प्रवाशांनीखासगी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, काळी पिवळी जीप, मॅटडोर आणि ट्रकने प्रवास केला. जिल्ह्यातंर्गत प्रवासासह लांबच्या पल्ल्यासाठी तिप्पट ते चौपट दर आकारण्यात आले. कोल्हापूर आगाराला झालेला सुमारे साडेतीन कोटींचा तोटा मात्र येत्या काही दिवसांत भरुन काढावा लागणार आहे.

ग्रामीण भागात प्रचंड त्रास

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एसटीची बस हाच एकमेव आधार आहे. संपामुळे दिवाळी बाजार आणि अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सरकारी पातळीवर खासगी वाहनांना मुभा दिल्याने वडाप चालकांनी मनमानी पैसे आकारले. गेल्या चार दिवसांत जेवढे लुटता येईल इतके सर्वसामान्य नागरिकाला लुटले. त्यावेळी आरटीओ आणि परिवहनची यंत्रणा डोळ्यावर कातडे ओढून गप्प बसली.

एसटी कर्मचाऱ्यांची तारांबळ

‍९०० एसटीचे नियोजन

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मध्यवर्ती बसस्थानक, कार्यशाळेत लावलेल्या एसटी बसेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या. पहाटे सहा वाजल्यापासून प्रवाशांच्या सेवेत लालपरी रुजू झाली. सोमवारपासून खासगी सेवेचा आधार घेतलेल्या प्रवाशांन सुटकेचा निश्वास टाकला. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ आगारात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा सुरू झाली. आगारात सुमारे ९०० हून अधिक एसटी थांबल्या. बारा आगाराच्या ठिकाणीही संप मागे घेईपर्यंत एसटी स्थानकाबाहेर एकही एसटी धावली नाही. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटकसह सुमारे पाच हजार कर्मचारी संपावर होते. चालक आणि वाहकांसह संघटनेचे पदाधिकारी असलेले अधिकारी आणि कर्मचारीही संपात सहभागी झाले. प्रत्येक आगाराच्या आवारात संघटनेने आंदोलन सुरू केले होते. आगाराच्या आवारात मंडप टाकण्यात आले. शनिवारी सकाळी संप मागे घेतल्याचा निर्णय झाल्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. यंत्रशाळेत थांबलेल्या एसटीची स्वच्छता आणि सुस्थितीत करण्यासाठी कामगारांची धावपळ उडाली. त्यानंतर एसटी फलाटवर आणल्या. कोल्हापूर ते पुणे, मुंबई, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, गणपतीपुळे या लांब पल्ल्याच्या एसटीसह जिल्ह्यातील सुमारे १३०० हून अधिक गावांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या. चालक आणि वाहकांची तारांबळ उडाली. संपात असलेले कर्मचारी सकाळी सहा वाजल्यापासून सेवेत रुजू झाले. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून एसटीचे चालक आणि वाहक तत्काळ कामावर रुजू झाले. लांब पल्ल्याच्या एसटीचे नियोजन करण्यात आले. विभाग नियंत्रक नवनीत भानप सध्या दीर्घ रजेवर आहेत. विभागीय वाहतूक अधिकारी पदाची रिक्त जागा गेली दीड वर्षे रिक्त आहे. प्रभारी कार्यभार सोपविलेल्या अधिकाऱ्यांची नियोजन करताना धावपळ उडाली. विभागीय कार्यालयालही शनिवारी सुटी असल्याने नियोजन करण्यात तारांबळ उडाली. एसटी विभागाकडून संप असला तरी कामगारांचे नियोजन केले जाते. मात्र संपात सर्वच संघटनेचे कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कसरत करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीला राज्य द्या, बळकट व्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आपला देश पूर्वीपासून कृषीप्रधान देश असला, तरी शेतकरी आणि गावगाड्यातील श्रमिकांना कधीही सुखाचे दिवस आले नाहीत. श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे राज्य यावे म्हणूनच स्वातंत्र्यलढा झाला, परंतू आजही देशात शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत बिकट बनले आहे. त्याच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी बळीच्या हातात सत्तेची सूत्रे देऊन त्यांचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. बळीराजा महोत्सव समितीच्यावतीने बळीराजा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतरा पवार-पाटील होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुभाष देसाई, माजी महापौर भिकशेठ पाटील व अंनिसच्या कार्यकर्त्या इंद्रायणी पाटील यांचा बळीराजा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा राजा म्हणून आपण बळीराजाचे स्मरण करतो. मात्र सद्यस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बदलल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही. शेतकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी प्रतिज्ञा करुन समताधिष्ठीत भारताची निर्मिती करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय विषमता गाडून टाकण्याची आवश्यकता आहे.’

डॉ. देसाई म्हणाले, ‘धर्मांध शक्ती भारतीय बहुजन समाजाच्या प्रगतीला मारक ठरत आहेत. खरे भारतीय धर्म तत्त्वज्ञान बुद्ध, वारकरी संप्रदाय, संत कबीर, तुकाराम, विवेकानंद, महात्मा फुले यांनी दिले आहे. याची माहिती समाजातील सर्व थरांत पोहोचवण्याची गरज आहे.’ माजी आमदार पवार-पाटील यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव का मिळत नाही, याची तर्कसंगत मांडणी केली. यावेळी पुरस्कारप्राप्त भिकशेठ पाटील व इंद्रायणी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, पी. बी. पोवार, अनिल घाटगे, बाळ बरगे, अनिल चव्हाण, प्रा. डॉ. जे. बी. शिंदे, सीमा पाटील आदी उपस्थित होते. संभाजीराव जगदाळे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. रवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विकास जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये प्रवाशाची झाली फरफट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिरोळ तालुक्यातील बसस्थानकांमध्ये शुकशुकाट असून बसस्थानकांचा ताबा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांनी घेतला होता. कुरुंदवाड आगारातील चालक, वाहकांसह २७० कर्मचारी या संपात उतरल्याने गेले चार दिवस सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत. खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. या संपामुळे कुरुंदवाड आगारास गेल्या चार दिवसांत २० लाखांचा फटका बसला.

सातवा वेतन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीतच एस. टी.कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शिरोळ तालुक्यात दानोळी, चिपरी, शिरोळ, कुरुंवाडसह काही गावात खासगी प्रवासी वाहतुकीची व्यवस्था आहे. मात्र अन्य ठिकाणी एस. टी.कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना पायपीट करावी लागली. लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर दिपावली पाडव्यादिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. या परिस्थितीचा फायदा घेत अनेक खासगी वाहतूकदारांकडून अडवणूक झाली.

कुरुंदवाड आगारात ५५ बसेस असून ८७ चालक तसेच १०६ वाहक ३८ यंत्रशाळा कर्मचारी तसेच ४१ प्रशासन कर्मचारी असे एकूण २७० कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपात उतरले होते. कुरुंदवाड आगाराच्या सर्व बसेसद्वारे १८ हजार किलोमीटर प्रवाशांची वाहतूक केली जाते. यातून आगारास दररोज साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवसात वीस लाखांचा फटका बसला.

एस. टी.कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सेवा ठप्प असल्याने नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी झाली. संपाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले, त्यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षांनी जयसिंगपूर बसस्थानकाचा ताबा घेतला. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक खासगी वाहनातून करण्यात येत होती.

संपाचे हत्यार उपसण्यापुर्वी ४० दिवस एस. टी. कामगार युनियनने नोटिस दिली होती. मात्र एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. यामुळेच नाईलाजास्तव बेमुदत संप सुरू करावा लागला होता. हा संप आमच्यावर लादलेला होता. एस.टी. प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. संपामुळे प्रवाशांचे हाल झाले. आता तरी सरकारने तातडीने प्रश्न सोडवावा.

-अरूण वास्कर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राफय एस.टी. कामगार युनियन कोल्हापूर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांमुळे शहर गजबजले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या सुटीमुळे गुरुवारपासून कोल्हापुरात सुरू झालेला पर्यटकांचा ओघ शनिवारी अधिकच वाढला. पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापुरातील रस्ते, पार्किंगस्थळे आणि पर्यटनस्पॉट फुलून गेले. शुक्रवारी पाडव्याची सुटी तर जोडून आलेला वीकेंड यामुळे पुणे, मुंबई, कर्नाटक आणि गुजरातसह देशातील विविध राज्यांतून आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर पॅक झाले.

कोल्हापुरातील निवासी हॉटेल्समध्येही सध्या पर्यटकांची बऱ्यापैकी संख्या असून, यातील बरीचशी हॉटेल्स हाउसफुल झाली आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या काही पर्यटकांची थोडी तारांबळ उडाली. शाळा महाविद्यालयांना आणखी आठवडाभर सुटी असल्याने या आठवड्यात पर्यटकांची ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठीही येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. रात्री आपल्या गावी परतण्यापेक्षा कोल्हापुरात हॉटेल्सवर राहणे पर्यटक पसंत करत आहेत. तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गोव्याला किंवा कोकणात जाणे किंवा गोव्याहून परतताना कोल्हापुरात एक रात्र हॉल्ट घेऊन सकाळी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतण्याचा पर्यटकांचा बेत असतो.

गेल्या दोन दिवसांत पर्यटकांचा कोल्हापुरातील ओघ वाढू लागला आहे. हॉटेल्समध्ये बुकिंग झाले असून, रविवारी कोल्हापूर हाउसफुल्ल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी डिसेंबरचा आणि मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि दिवाळीनंतरचा आठवडा कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी असते, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. नवरात्रोत्सवात पावसाने अनेक पर्यटकांची दैना उडवली होती. त्या तुलनेत दिवाळीच्या सुटीत पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

पार्किंगस्थळे झाली फुल्ल

पर्यटकांची वाहने पार्क करण्यासाठी बिंदू चौक, लक्ष्मी मार्केट, शिवाजी स्टेडियम येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारपासून वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे सर्व पार्किंगस्थळे हाउसफुल झाली आहेत. अनेक पर्यटकांनी दसरा चौक, रंकाळा परिसर याठिकाळी वाहने उभी करून जवळपासच्या पर्यटनस्थळी पायी जाणे पसंत केले.

यात्री निवाससह हॉटेलही पॅक

शहरातील बहुतांश यात्री निवास, छोटी हॉटेल्स व मोठी हॉटेल्स बुक झाली आहेत, तर काही पर्यटकांनी स्थानिक नातेवाइकांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे. शहरासह पन्हाळा, जोतिबा,​ खिद्रापूर, नृसिंहवाडी, आंबा येथील हॉटेल्सनाही मागणी वाढली आहे. दिवाळीच्या सुट्या ऑक्टोबर महिनाअखेर असल्यामुळे येत्या पंधरा दिवसांत पर्यटनाचा वाढता ओघ राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images